Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • गोलबाजारातील तो संघर्ष अखेर आमदार धानोरकरांनी सोडविला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गोल बाजारातील महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवर लादलेल्या अन्यायकारक कराच्या विरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. हि अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

     

    सदर याचिकेचा निकाल अद्यापही न आल्याने मनपाने लादलेल्या गाळेधारकाराच्या करात व करावरील व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गाळेधारकांवर लाखो रुपयाचा कर थकीत झाला. या विषयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पुढाकार घेऊन मनपा व गाळेधारक यांच्यात समन्वय घडवून आणून सदर विषयाचा तिढा सोडविला.

     

    वारसान साठी असलेले हस्तांतरण शुल्क सुद्धा कमी करण्यात यावे. दुकान गाळेधारकांसाठी भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित व्हावा या दृष्टीने मनपातर्फे NASH प्रणाली सुरु करण्यात आली असुन नियमित कर भरणा करणाऱ्या गाळेधारकांना रेंटमध्ये ५ टक्के सुट मिळणार आहे.सदर योजना चांगली असुन गाळेधारकांनी याचा फायदा घ्यावा व भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादीत असल्याने नागरीकांनीही कर नियमित भरावा. असे आवाहनही त्यांनी केले.

     

    मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या अंतर्गत येणारे गोलबाजार येथील गाळे गाळेधारकांना देण्यात आले आहे. त्यावर नगरपरिषद अस्तित्वात असतांना कर आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये चंद्रपूर मनपा अस्तित्वात आली. मनपा अस्तित्वात आल्यानंतर गोलबाजारातील गाळेधारकांवर २०० पटीपेक्षा अधिक करवाढ केली.

     

    या करवाढीविरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु सदर प्रकरणाच्या निकाल न लागल्याने गाळेधारकांचा कर वाढत गेला. मनपाने व्याजाच्या बोजा वाढविला. याप्रकरणी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन सदर प्रकरणी तिढा सोडविण्याचा प्रयत्न फ़ेब्रुवारी २०२३ मध्ये केला होता. परंतु त्यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रकरण मार्गी लागले नाही.

     

    या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत देखील गाळेधारकांनी बाजू मांडली होती. त्यानंतर प्रधानसचिवाच्या दालनात आयुक्त व गाळेधारक प्रतिनिधी यांच्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली. त्यानंतर गाळेधारकांनी मनपा विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आज मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात दाखल असलेली याचिका मागे घेण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांना दिले.

     

    आयुक्तांनीं विशेष बाब म्हणून सदर प्रकरणी ११६ गाळेधारकांवरील गाळ्यांच्या करावरील संपूर्ण १०० व्याज माफ करण्याचे पत्र गाळेधारकांना दिले. व उर्वरित गाळेधारकांच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून १५ दिवसात गाळेधारकांना न्याय देण्याचे आश्वासन आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, कर विभाग प्रमुख अनिल घुले, उपायुक्त बोबाटे, कर विभागाचे आत्राम, कुचनकर, राहुल चौधरी तसेच गाळेधारकांचे प्रतिनिधी सुरेश खनके, प्रशांत येनूरकर, अब्दुल इजाज, मोंटू मानकर यांची उपस्थिती होती.

  • वाघाचा गुराख्यावर हल्ला, आणि गुराख्याने वाघाच्या दिशेला भिरकावली काडी आणि…

    News34 chandrapur

    चिमूर – सोमवारी चैती बिट कोलारा कोअर वनक्षेत्राजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली.

     

    नेहमीप्रमाणे कोलारा निवासी गुराखी 57 वर्षीय शंकर दोने हे गुरांना चारासाठी जंगल परिसरात गेले होते, कोलारा गेट परिसरातून शंकर जात असताना त्याठिकाणी झुडपात वाघ दबा धरून बसला होता, संधी मिळताच वाघाने शंकर वर हल्ला केला.

     

    अचानक झालेल्या या हल्ल्यात शंकर घाबरला मात्र हिंमत न हरता शंकर ने जवळ असलेल्या काडीने वाघावर प्रहार केला, काडीचा मार बसल्यावर वाघाने जंगलात धूम ठोकली.

     

    मात्र या हल्ल्यात शंकरच्या शरीरावर जखमा झाल्या, काही वेळात परिसरातील गुराख्यानी शंकर च्या दिशेने धाव घेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

     

    घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस डुबे यांनी भेट दिली. महिला वनरक्षक बी बी सोयाम , गेट व्यवस्थापक अविनाश गणवीर व गावकर्यांनी दवाखान्यात भेट दिली वन्यजीव कोलारा कोअर यांनी तातडीची मदत जखमीला दिली. जखमीला पूढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करन्यात आले.

  • चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे.

    ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे, आज आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

     

    मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करीत बैठक लावू असे आश्वासन आंदोलकांना दिले.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, वस्तीगृहाबाबत चंद्रपुरात वसतिगृह सूरु करू व स्वाधार योजनेचा लाभ इतर ओबीसी विद्यार्थ्यांना देणार असे आश्वस्त केले मात्र आंदोलकांनी मुनगंटीवार यांना हा प्रश्न जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे, वस्तीगृह चंद्रपूर सहित राज्यात सुरू करावे असे आंदोलकांनी म्हटले.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आंदोलकांसोबत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून दिला.

    चंद्रपुरात वस्तीगृह सुरू करावे याबाबत तात्काळ काम सुरू करण्यात येतील असे सावे यांनी आश्वाशीत केले.

    मात्र आंदोलकांनी सरळ सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी ओबीसी नेत्यांसोबत बैठक लावून आमच्या मागणीवर चर्चा करावी, चर्चेतून काही निष्पन्न झाले तर ठीक अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

     

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अर्धे मंत्रिमंडळ गेले, उपोषण सोडविण्याआधी त्यांना सरकारने काय आश्वासन दिले हे अजूनही बाहेर आले नाही, मात्र आमच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली असे चित्र सध्या दिसत आहे, आमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा करीत ओबीसी शिष्टमंडळाला शासनाने आश्वाशीत करावे अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहणार असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले.

  • शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.

     

    आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर यांनी सरदार यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

     

    सरदार यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून त्यांना आता पुढे जाणे शक्य नव्हते. आम आदमी पार्टीची विचारसरणी त्यांना आवडते आणि त्यांना पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे.त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचे पक्ष प्रवेशामुळे जिल्हातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव भूषणजी ढाकूलकर तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.

     

    सरदार यांनी आपल्या प्रवेशाच्या भाषणात सांगितले की, ते शरद पवार-अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी एक नवीन आणि आशादायी पर्याय आहे.

    सरदार यांच्या प्रवेशाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

     

    सरदार हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांच्या पक्षप्रवेशा वेळेस महानगर अध्यक्ष योगेश गोखरे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर सचिव राजू कुडे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर सह संघटन मंत्री सिकंद सागोरे, महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, तब्बसूम शेख, पवन कुमार, जितेंद्र कुमार भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Video Game : चंद्रपुर शहरात व्हिडीओ गेमच्या नावाने जुगार?

    Video game चंद्रपूर – तीन पत्ती जुगारानंतर आता व्हिडीओ गेम पार्लर चा नवा जुगार जिल्ह्यात सुरू झाला आहे, पण हा जुगार शासनाची नजर चुकवून होत आहे.

     

    अनेक वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नव्हते, त्यांनतर व्हिडीओ गेम पार्लर चालक न्यायालयात गेले, काही वर्षांनी हा मुद्दा राज्यातील गृह मंत्रालयात गेले त्यानंतर पार्लर संचालकांच्या बाजूने निर्णय लागला, परवाने नूतनीकरण करण्यात आले.

     

    सध्या चंद्रपूर व बल्लारपूर शहरात तब्बल 25 व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पण यावर नियंत्रण करण्याचे काम हे पोलिसांकडे आहे.

     

    व्हिडीओ गेम पार्लर अधिकृत आहे काय?

    अनेक नागरिक या गेम पार्लरवर पैसे हरल्यावर म्हणतात की मशीन मध्ये सेटिंग आहे, मात्र यामागे काय गुपित आहे हे याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे.

    Video game याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे केले असता त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी चंद्रपुरातील व्हिडीओ पार्लर च्या परवाना बाबत अडचणी पुढे आल्या होत्या मात्र त्यानंतर सदर प्रकरण गृह मंत्रालयात गेले, व निकाल व्हिडीओ पार्लर संचालकांच्या बाजूने लागला.

    सध्या बल्लारपूर व चंद्रपुरात 25 व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आलेले आहे, परवान्यात कमीतकमी 10 मशीन ची परवानगी मिळते, यावर पाहिजे असेल तर तसा अर्ज करावा लागतो.

    Video game परवाना साठी अर्ज आला की त्याबाबत सर्व कागदपत्रांची पडताळणी करीत परवाना दिला जातो, परवान्यात नमूद असलेल्या मशीन पैकी आगाऊ मशीन पार्लर संचालकांने लावल्या तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.

    व्हिडीओ गेम पार्लर च्या मशीन मध्ये गडबड असते का?

    अनेक नागरिकांची ही तक्रार आहे, मशीन मध्ये सेट करून खेळणारा पैसे हरतो पण जिंकत नाही, याबाबत सत्य फक्त त्या मशीनची तंत्रज्ञान विशेषज्ञ सांगू शकतो.

    सध्या हा सुद्धा जुगाराचा प्रकार बनला आहे, चंद्रपुरातील अनेक युवक या जुगाराला बळी पडत आहे, शहरात अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले आहे, चंद्रपूर पोलिसांनी जर त्यांचा परवाना व मशीन मध्ये केलेली गडबडी शोधून काढली तर पार्लर घोटाळा बाहेर पडणार, मात्र यावर अजूनही पोलीस विभाग मार्फत ठोस कारवाई झाली नाही.

    काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी परवान्यात असलेल्या मशीन ची मंजुरी व पार्लर मध्ये असलेल्या मशीन ची पडताळणी केली असता आगाऊ मशीन पोलिसांना त्याठिकाणी दिसल्या पोलिसांनी तात्काळ आगाऊ मशिन जप्त करीत कारवाई केली.

    चंद्रपूर शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर च्या बाबतीत पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवली तर मशीनमध्ये काय गडबड केल्या गेली आहे हे पुढे येईलचं.

    आधी पैसे देत आपल्याला कॉइन दिल्या जात आहे, ते कॉइन टाकून खेळणारा पैसे हरत आहे, पार्लर च्या मशिनी सध्या पॉकेटमार सारखी काम करीत आहे, यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी अनेक नागरिकांची मागणी आहे.

    नियम काय सांगतात?

    दोन दुकानांमध्ये 75 मीटर अंतर असावे, परवानगी च्या अधीन राहून व्हिडीओ गेम मशीन लावाव्या लागतात, प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे. पोकर मशीन लावण्यास सक्त मनाई आहे.

    दर महिन्याला याबाबत संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना चौकशी करावी लागते. मात्र चंद्रपुरात तसे काही होताना दिसत नाही, नियमांना डावलून दुकाने सुरू आहे, यावर जिल्हा व पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करायला हवी.

  • चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे.

    चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा चंद्रपुरात मोठं खिंडार पडलं आहे.

     

    चंद्रपूर आम आदमी महिला अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील यांनी कार्यकर्त्यांसाहित कांग्रेस पक्षात प्रवेश केला.

    आप पक्षात महिलांच्या संघटन उभारणी मध्ये सुनीता पाटील यांचा मोठा वाटा होता.

     

    रविवारी विश्रामगृह चंद्रपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता पाटील यांनी कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला.

     

    यावेळी आप च्या महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, रूपा काटकर, मीना पोटफोडे, महिला सचिव वंदना कुंदावार, सहसचिव सुभद्रा मुन, शबनम शेख, स्वाती डोंगरे, सुहास रामटेके, स्नेहा महाकश्यप, पुष्पा बुधवारे, संतोषी यादव, भीमराव मेंढे, अभिजित संगेवार, सुशील वाहुले, लक्ष्मण पाटील, मुकेश पांडे, रज्जू भैया, अकीब शेख, अमजद खान, नंदकिशोर स्वान, प्रशांत रामटेके, कविता टिपले आदि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

  • ओबीसी समाजाच्या या मागण्या पूर्ण होणार काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात शामिल करावे अशी मागणी केलेली आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे.

     

    या संबंधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संपन्न झालेल्या सभेत सदर मागणीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटनाच्या कडून चंद्रपूर येथे गांधी चौकातून महामोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, यात चंद्रपूर सहीत लगतच्या यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून मोठया प्रमाणात ओबीसी बांधवानी आपला आक्रोश व्यक्त केला.

     

    ओबीसी च्या मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात. यात प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीजातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येवू नये. बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातनिहाय सर्वे करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकार कडे करावी.

     

    कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये. ५२% ओबीसी समाजाला ५२% आरक्षण देण्यात यावे. मा. सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे करावी. महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी मंजूर केलेली ७२ वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरु करावी.ओबीसी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्याकरीता स्वाधार योजना त्वरित लागू करावी.ओबीसी विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमात त्वरित शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजना त्वरित लागू कराव्या. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP) योजनेत इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा (OBC) समावेश करण्याबाबत. नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र व (२) 8 लाख रू. उत्पन्नाची अट अशा दोन अटीपैकी 8 लाख रू. उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

     

    म्हाडा व सिडको योजने अंतर्गत ओबीसी समाजास आरक्षण लागू करण्यात यावे याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, पालकमंत्री ,चंद्रपूर,मुख्य सचिव, प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अध्यक्ष मागासवर्गीय आयोग, पुणे यांना या महामोर्च्याच्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, ऍड. विजय मोगरे, राजेश बेले दिनेश चोखारे, सूर्यकांत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कामडे, विलास माथाणकर श्याम लेडे, कुसुम उदार, अनिल डहाके,कुणाल चहारे,गणेश आवारी, मनीषा बोबडे, गोमती पाचभाई,अनिल शिंदे, देवा पाचभाई,प्रेमा जोगी अक्षय येरगुडे हितेश लोडे यांच्या मार्फत चंद्रपूर उपविभागीय अधिकारी मृगूनाथन यांनी स्वीकारले.

     

    उपरोक्त मागण्या पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी विद्यर्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत.या आंदोलनास ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तयावाडे यांनी समारोपिय भाषणात निवेदनात दिलेल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असा इशारा दिला.

     

    विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार माजी, माजी मंत्री परिणय फुके आमदार अभिजित वंजारी, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर,अशोकभाऊ जिवतोडे, माजी आमदार देवराव भांडेकर,माजी आमदार आशिष देशमुख,माजी आ. सुदर्शन निमकर,नंदू नागरकर, पप्पू देशमुख, महेंद्र ब्राम्हणवाडे, देवराव भोंगडे,सतीश वारजूरकर, संध्याताई गुरनुले,रवींद्र शिंदे,राजेंद्र वैद्य, सलील देशमुख,रमेश राजूरकर,अनिल धानोरकर, किशोर टोंगे, संदीप गिऱ्हे, नितीन भटारकर, प्रशांत वाघरे, अविनाश पाल, गंगाधर वैद्य, गोविंदा पोडे,संदीप आवारी, बळीराज धोटे, विश्वास झाडे, राजू झोडे,अभिलाष गावतुरे, डॉ गावतुरे, प्रवीण खोब्रागडे, सुनील मुसळे राजेंद्र खोब्रागडे,प्रतीक डोर्लिकर,निलेश बेलखेडे, नंदू पढाल, दत्ता हजारें, वासुदेव खेळकर,डॉ. महाकुळकर, गोवील मेहेरकुरे,विजय नळे विजय पिदूरकर, रंजित डवरे डॉ. पियुष मेश्राम, ऋषभ राऊत, निलेश खोडे, आदिवासी समाजाचे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम ,पराग वानखेडे आदी विविध पक्षाचे तथा विविध जातनिहाय संघटना कुणबी, तेली, माळी, सुतार, नाभिक, बारई, सोनार, कलार,धनगर, बेलदार, भावसार, शिंपी, परीट, लोहार, वाढई समाज संघटना सोबतच आरपिआय संघटनेचे समर्थक उपस्थित होते.

  • चंद्रपुरात निघाला ओबीसींचा महामोर्चा

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये,बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे, ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही. सोमवार पासून 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

     

    अन्नत्याग आंदोलनाला शासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही, मात्र मराठ्यांच्या आंदोलनात राज्याच्या अर्ध्या मंत्री मंडळाने भेट दिली, पण ओबीसी आंदोलनाला अजूनही एकाही मंत्र्याने भेट दिली नाही.

     

    सोमवारी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महामोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग दर्शविला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपला सहभाग दर्शविला.

     

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलन मंडपात मोर्चा समाप्त करण्यात आला, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नाही, सरकारने ओबीसी वस्तीगृहाबाबत घोषणा केली मात्र त्याची पूर्तता केली नाही, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    आयोजित महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील हजारो ओबीसी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

     

    या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

     

    वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.

     

    त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर/सावली – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील होप फाऊंडेशन तर्फे चंद्रपुरातील सावली तालुक्यात 16 सप्टेंबरला मोफत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    होप फॉउंडेशन सिरोंचा ही संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काम करत असून मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने दिनांक 16/9/2023 ला होप फॉउंडेशन सिरोंचा तर्फे मे धन्वंतरी मेडिकल सावली ता सावली जिल्हा चंद्रपूर येथे मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

     

    सदर शिबिरात मनोविकार तज्ञ डॉ सचिन हेमके तर धन्वंतरी मेडिकल चे औषध निर्माण अधिकारी तथा संचालक संदीप वसंतराव बेगमवार तर होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी,होप फॉउंडेशन सिरोंचा स्वयंसेवक सूरज गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

    सदर मानसिक आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 10 रुग्णांना मनोविकार तज डॉ.सचिन हेमके यांनी तपासणी केली आणि त्याना होप फॉउंडेशन तर्फे मोफत औषध पण देण्यात आले.

    होप फॉउंडेशन सिरोंचा ता सिरोंचा जिल्हा गडचिरोली या संस्थे तर्फे या पूर्वी चामोर्शी येथे पण मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण 13 रुग्णांना मोफत औषध देण्यात आले होते.

    जसे शरीर आजार होतात तसे मानसिक आजार होतात त्यामुळे मानसिक आजाराबद्दल मनात कसलीही लाज न बाळगता आपण मनोविकार तज्ञ किंवा समुपदेशक कडे जाऊन याबद्दल व्यक्त झाले पाहिजे असे होप फॉउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.