Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासनाने रीतसर कानडोळा करत आहे. Maratha vs obc

     

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध करत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे असे म्हटले आहे.

     

    शिवाय वास्तविक, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे उपोषणाला बसले तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा तापला.परंतु जरांगे यांची मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी नसून आम्ही संविधानिक मागणी करीत आहोत असे ओबीसी महासंघाने स्पष्ट केले.

     

    दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पाहता चंद्रपूरातील ओबीसी समाजातील लोकही मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.येत्या 17 सप्टेंबर ला ओबीसी समाज बांधव मोठया प्रमाणात महामोर्चा काढणार आहे.

     

    या आंदोलनात मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये ही मुख्य मागणी असून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या उपोषण मंडपास भेट दिली व खुद्द ओबीसींचे मंत्री असताना ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसीच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतील काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले, मात्र उपोषण मागे घेतले आंदोलन नाही असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

     

    राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं अशी मागणी झाली, त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    चंद्रपुरात 11 सप्टेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे आमरण उपोषणाला बसले आहे, मात्र 4 दिवस लोटल्यावर सुद्धा त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्यात आली नाही.

     

    मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गातून नको अशी ठाम भूमिका घेत टोंगे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

     

    जरांगे यांच्या उपोषणाला अर्ध्या मंत्रिमंडळाने भेट दिली, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या मग ओबीसी समाज बांधवांचे काय? त्यांच्या आंदोलनाची दखल कोण घेणार?

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश घेतला, त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले होते.

     

    त्या कार्यक्रमात भाजपचा DNA हा ओबीसी आहे, ओबीसी समाजाला फक्त भाजप न्याय देऊ शकते अशी ग्वाही त्यांनी दिली होती, 15 ऑगस्ट पासून राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात येणार अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी केली होती, मात्र आजपर्यंत एक वसतिगृह सुद्धा सुरू झाले नाही.

     

    जातनिहाय जनगणना, स्वाधार योजना, वस्तीगृह व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी मागणी रवींद्र टोंगे यांनी केली आहे.

     

    टोंगे यांच्या मागण्यांना भाजप न्याय देणार काय? की न्यायाची भाषा ही भाषणापुरती मर्यादित होती? भाजपवासी झालेले अशोक जीवतोडे यांनी तरी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपली कठोर भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायला हवी.

     

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली.

     

    तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील बांधवांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भेट द्यावी अशी मागणी केली, मराठ्यांना एक न्याय तर ओबीसी समाजावर अन्याय करू नका अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

     

    आरक्षणाच्या ठिणगीने राज्यात 2 समाजात भांडण लावण्याची कामे केली जात आहे, मात्र आरक्षणावर ठोस निर्णय सरकारच्या अंगावर येतो की काय अशी वेळ सध्या आली आहे, कमीतकमी भाजपच्या OBC DNA ने तरी ओबीसींच्या रास्त मागण्याची दखल घ्यावी अन्यथा आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही.

  • 15 सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून का साजरा करतात?

    news34 chandrapur

    दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी, भारत अभियंता दिन साजरा करतो, हा दिवस अभियंत्यांच्या समाजातील अतुलनीय योगदानाची ओळख करून देण्यासाठी समर्पित आहे. द्रष्टा अभियंता, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना सन्मानित करण्याचा हा दिवस आहे, ज्यांची जयंती या विशेष प्रसंगासोबत येते. national engineer day 2023

    1861 मध्ये जन्मलेले, विश्वेश्वरय्या यांनी सुरुवातीला म्हैसूर विद्यापीठातून कला शाखेची पदवी (बीए) घेतली. तथापि, त्याच्या अभियांत्रिकीच्या आवडीमुळे त्याला पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळाला, जो आशियातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक होता. या निर्णयामुळे त्याचे भविष्य घडेल आणि त्याच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा मार्ग मोकळा होईल.

     

    विश्वेश्वरय्या यांनी मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू केला. त्याच्या अपवादात्मक कौशल्यांसाठी त्याने त्वरीत ओळख मिळवली आणि त्याच्या अभियांत्रिकी प्रतिभेचे प्रदर्शन करणारे जटिल प्रकल्प हाती घेतले. असाच एक प्रकल्प म्हणजे पुण्याजवळील खडकवासला जलाशयात पाण्याचे पूर दरवाजे असलेल्या पेटंट सिंचन प्रणालीचा विकास. या प्रणालीने सिंचन पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली आणि प्रदेशातील कृषी उत्पादकता लक्षणीयरीत्या सुधारली.

     

    विश्वेश्वरय्या यांनी हाती घेतलेला आणखी एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे म्हैसूरमधील कृष्णा राजा सागरा धरणाचे बांधकाम. 1931 मध्ये पूर्ण झालेल्या या धरणाने केवळ विश्वसनीय पाणीपुरवठाच केला नाही तर जलविद्युत ऊर्जा देखील निर्माण केली, ज्यामुळे प्रदेशाच्या विकासात आणखी योगदान होते.

    1912 मध्ये, विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूरच्या 19 व्या दिवाणाची भूमिका स्वीकारली, हे पद त्यांनी 1918 पर्यंत भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रगतीशील सुधारणा अंमलात आणल्या ज्यामुळे म्हैसूरला एक मॉडेल राज्यात बदलले. सार्वजनिक सेवेसाठीचे त्यांचे समर्पण आणि उत्कृष्टतेचा अथक प्रयत्न यामुळे त्यांना त्यांच्या समकालीन लोकांचा आदर आणि प्रशंसा मिळाली.

    विश्वेश्वरय्या यांचे योगदान त्यांच्या व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडे विस्तारलेले आहे. 1917 मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्याचे नंतर त्यांच्या सन्मानार्थ विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे नामकरण करण्यात आले. ही संस्था देशाच्या प्रगतीत योगदान देणारे अपवादात्मक अभियंते तयार करत आहे.

     

    स्थापत्य अभियांत्रिकीमधील त्यांच्या अपवादात्मक कामगिरीची दखल घेऊन, भारत सरकारने 1968 मध्ये त्यांची जयंती, 15 सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून नियुक्त केला. हा दिवस अभियंते समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण म्हणून काम करतो आणि तरुण पिढीला करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करतो. अभियांत्रिकी मध्ये.

     

    अभियंता दिनानिमित्त, आपण सर मोक्षगुंडम विश्वेश्वरयांचा असाधारण वारसा साजरा करूया आणि सर्व अभियंत्यांचे कृतज्ञता व्यक्त करूया जे त्यांच्या नाविन्यपूर्ण उपायांनी आणि अटल समर्पणाद्वारे जगाला आकार देत आहेत.

  • पोळ्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नांदा फाटा/ नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावे यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षापासून येथील शेतकरी बांधव व प्रतिष्ठित नागरिक शासन दरबारी पायऱ्या झिजवीत आहे.

     

    अनेक राजकीय नेते आमदार खासदार पदाधिकारी अनेकांनी या मागणीला घेऊन केवळ निवडणुकीपुरते मता पुरते राजकारण करत पुलाच्या बांधकामाच्या श्री गणेशाचा नारळ फोडून केला तत्कालीन आमदार वामनराव चटप यांनी सदरील पूल मंजूर सुद्धा करून आणले मात्र त्यानंतर सत्ता बदल झाला व पुलाची मागणी हवेत विरली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक आमदार खासदार आले अनेकांनी नारळ फोडले मात्र पूल काही झाले नाही.

     

    पुलाकरिता तांत्रिक निधी अंदाजपत्रकानुसार मंजूर झाल्याचेही अनेकांनी सांगितले मात्र पुलाअभावी मागील पंधरा दिवसापासून नाल्याच्या पलीकडील परिसरात शेती असलेला शेतकरी आपल्या शेतात सुद्धा जाऊ शकत नाही आहे पोळ्याचा दिवस असल्यामुळे नांदा येथील शेतकरी किसान चौधरी हे आपल्या शेतातील बैलबंडी आणण्याकरिता पलीकडे गेले त्यावेळी परत नाला ओलांडत असताना त्यांची बैलबंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली शेतकरी कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून बाहेर पडला मात्र बैलबंडी वाचवू शकला नाही.

    मागील वर्षीच्या पावसाळ्यात सुद्धा अशा असंख्य घटना या नाल्याच्या पाण्यात घडल्या मात्र वारंवार निवेदना तक्रारी देऊन सुद्धा कसल्याही प्रकारचा न्याय येथील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे की शेवटी प्रशासन हे मोठ्या जीवितहानीची वाट बघत आहे असाच प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असून पुलाची मागणी ही कधी पूर्णत्वास जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा सण असतो ज्या दिवशी वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैलांना सकाळपासून विविध शृंगार करून सजविले जाते मात्र नांदा येथील नाल्याच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना आपली जनावर नाल्याला पूर आल्यामुळे घरी आणता सुद्धा आली नाही.

     

    याशिवाय या जनावरांचे दुसरे दुर्दैव काय असू शकते अनेक शेतकरी पाणी कमी होईल या आशेने नाल्याच्या पलीकडच्या तीरावर पाण्याच्या उतरण्याची वाट बघत उभे आहे असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले कदाचित या नाल्यावर पूल बांधला गेला असता तर या जनावरांना आणि शेतकऱ्यांना पोळा या सणाला मुकावे लागले नसते.

     

    गावातील सुशिक्षित शेतकरी बांधवांनी आता कंबर कसायला सुरुवात केली आहे एवढेच नव्हे तर पोळा भरणाऱ्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी नाल्यावरील पुलाची आवश्यकता दर्शवणारे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले त्यामुळे आता राजकारणी व शासन याकडे कोणत्या दृष्टीने बघते हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार दिनांक 15 ते 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्याता वर्तवली आहे.

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

    ◆ संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या. ◆ मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहा. ◆ रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातून जाणे टाळा. ◆ खराब दृश्यपमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवणे टाळा. ◆ पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबुत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्या  तारा असू शकतात. ◆ पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा. ◆ फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.

     

    वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये

    ◆ विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. ◆ जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. ◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. ◆ आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. ◆ तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. ◆ शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. ◆ विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. ◆ उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. ◆ धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. ◆ जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
    जिल्ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • मालमत्ता व पाणी कराचा भरणा करायचा? पण सुट्टी आली आता काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही मनपाची कर संबंधित कार्यालये सुरु राहणार असुन एकमुस्त कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात येत असल्याने त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट योजना मनपातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

     

    या महिन्यात १६,१७,२३,२४ व ३० सप्टेंबर अश्या ५ शासकीय सुट्ट्या असुन सुटीच्या दिवशी अनेकांना विशेषतः नौकरदार वर्गाला कर भरणे सोयीचे जाते.अधिकाधिक कराचा भरणा व्हावा यादृष्टीने कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असुन सुटीच्या दिवशीही काम करण्याचे निश्चित केले आहे.

     

    करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे तसेच ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे. एकुण मालमत्ता करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर व पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.

     

    जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.

     

    घरी कोणी नसताना बघून त्यांच्याच ओळखीच्या 52 वर्षीय सुधाकर महादेव निमगडे या इसमाने वेळेची संधी साधून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात सावरगाव नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

     

    युवासेना राज्य सहसचिव व युवासेना युवती जिल्हाधिकारी चंद्रपूर रोहिणी विक्रांत पाटील यांनी आज युवासेना युवतीकडून चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या संदर्भात डेप्युटी एस पी मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

    यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी धनश्री हेडाऊ, विपश्यना मेश्राम, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले ,युवती विभाग अधिकारी काजल मडावी उपस्थित होते.

  • लवकरचं बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल सुरू होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 24 तासामधून दररोज तब्बल 18 तास बंद राहणाऱ्या बाबूपेठ रेल्वे फाटकाचा त्रास आता संपणार आहे, कारण रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता निम्मे राहिले असून येत्या काही महिन्यात बाबूपेठ मधील नागरिक उड्डाणपूलावरून जाणार आहे. Babu peth railway flyover

     

    अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे भूमिपूजन तब्बल 7 वेळा करण्यात आले होते, मात्र अधिकृत उदघाटन व्हायला बराच कालावधी लोटून गेला.

     

    भूमीपूजन झाल्यावर सुद्धा संथगतीने या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते, कासवगतीने आपला प्रवास पूर्ण करीत हा रेल्वे उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात आहे.

     

    13 सप्टेंबर ला रेल्वे विभागाने चांदा फोर्ट व मुख्य रेल्वे लाईन वरून उड्डाणपूल यशस्वीरीत्या क्रॉस केले.

     

    येत्या 2 ते 3 महिन्याच्या आत उड्डाणपूल वरील रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे, मागील अनेक वर्षपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाची मागणी नागरिकांनी केली होती मात्र राजकीय वरदहस्त आलेल्या विशेष व्यक्तीचे दुकान वाचविण्यासाठी अनेकदा उड्डाणपुलाचा प्रस्ताव नाकारल्या गेल्या होत्या.

     

    मात्र काही वर्षांपूर्वी विशिष्ट व्यक्तीचे दुकान प्रशासनाने वाचविले मात्र दुकान वाचले म्हणून शासनाने गरिबांचे कंबरडे मोडून टाकत त्यांच्या घरावर बुलडोजर चालविला, उड्डाणपुलाचे काम सुरू झाले, मागील 4 वर्षांपासून ते काम सतत सुरू आहे, कधी निधीची अडचण तर कधी रेल्वेची या गुंतागुंतीत काम संथगतीने सुरू होते.

     

    या कालावधीत दाताला ब्रिज तयार होऊन सुरू सुद्धा झाला मात्र नेहमीप्रमाणे बाबूपेठ वर संथगतीच्या कामामुळे अन्याय झाला.

     

    4 वर्षांनी काम अखेर पूर्णत्वास येत आहे, आता बाबूपेठ वासी रेल्वे फाटकाला लवकरच राम राम करतील यावर शंका नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोधात भारतीय आझाद कांग्रेस पक्षाचे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२३ पासून वीज दरात वाढ केली आहे. याविरोधात भारतीय आझाद काँग्रेस पक्षाने आघाडी उघडली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. वाढलेले दर रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती, अन्यथा आंदोलनाचा इशाराही निवेदनात राज्य सरकारला देण्यात आला होता.

     

    दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद न मिळाल्याने भारतीय आझाद काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला.  13 सप्टेंबर रोजी गांधी चौक, चंद्रपूर येथे भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले. आणि वाढीव दराबाबत लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा सवाल आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विचारण्यात आला. आणि येत्या काळात हे लोकप्रतिनिधी सरकारला वाढलेले वीजदर मागे घेण्यास भाग पाडतील का? असा प्रश्नही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांनी उपस्थित केला.

     

    कच्छी पुढे म्हणाले की, वाढीव वीज दरामुळे सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाढलेले विजेचे दर मोजावे लागत आहेत. लोकप्रतिनिधींना या सर्व सुविधा मोफत मिळतात. 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनावर चंद्रपूर शहराचे आमदार निवडून आले आणि आश्वासनाचा विसर पडला. वाढलेल्या वीजदरांवरही आमदार किशोर जोरगेवार बोलायला तयार नाहीत, अशी अवस्था झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही सरकारने वाढवलेल्या वीज दरांवर मौन बाळगून आहेत.

     

    कदाचित विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका माहीत नसेल. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा विकासपुरुष म्हणवणारे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही सरकारच्या विरोधात बोलण्याचे टाळत आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व आमदारही वाढीव वीज दरांवर गप्प बसले आहेत. वाढीव वीज दरांबाबत जनहिताच्या मागणीसाठी आवाज उठवणारा पहिला पक्ष भारतीय आझाद काँग्रेस पक्ष आहे.

     

    आम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आता फक्त स्वतःचे हित पाहत आहेत हे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने आता समजून घेतले पाहिजे असे सांगितले. या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. भारतीय आझाद काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो जनहिताच्या मागणीसाठी आवाज उठवतो. आणि यापुढेही सरकारने वाढलेले वीजदर रद्द न केल्यास भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

     

    भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे वाढीव वीज दराबाबत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय आझाद काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने लोक सामील झाले असून भारतीय आझाद काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुब भाई कच्छी यांनी जनहिताच्या मागणीसाठी सरकारला एकदिवस बाध्य करू तोपर्यंत आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

     

    यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब भाई कच्छी, भारतीय आझाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्शद कच्छी, राजा भाई, साबीर हुसेन, गुफरान शेख, अरबाज कच्छी, नदीम कुरेशी, नईम कुरेशी, इर्शाद शेख, सुहास रामटेके, यादव मॅडम, आसिफ रजा, सैफ शेख, आ. फैजल पाशा, रशीक शेख, फैजान शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनात 6 महिन्याचं बाळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न त्याग आंदोलनात साथ दिली.

     

    मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह सुरू करावे, जातनिहाय जनगणना व्हावी अश्या ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलनाचे बंड पुकारले आहे.

     

    11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील मंत्री व जनप्रतिनिधी यांनी पाठ दाखवली आहे.

    दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. भाजपचे देवराव भोंगडे, राहुल पावडे, आशिष ताजने कोरपना, मनोज पोतराज, ओबीसी जनगणना परिषद चे बळीराज धोटे, भावसार समाजाचे डॉ नंदकिशोर मैदळकर व त्यांचे सहकारी, तैलीक समाजाचे, ऍड विजय मोगरे, रघुनाथ शेंडे, बबनराव फंड, प्रकाश देवतळे, डॉ विश्वास झाडे, काँग्रेस ओबीसी सेल चे प्रशांत दानव, उमकांत धांडे, प्रा संजय बेले, जनविकास सेनेचे अध्यक्ष पपू देशमुख, घनश्याम येरगुडे, विमल पिदूररकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन जाहीर केले.