Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

    News34 chandrapur

    प्रतिनिधी | गुरू गुरनुले

    मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे.
    यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.

     

    शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या : शेतकऱ्या वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

     

    गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात शेतकऱ्यांचे तुकडे करुन जागीच ठार केले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली.

     

    सदर घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता दरम्यान घडली असून घटनेची माहिती वनविभागाला कळताच घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे, आर. एफ .ओ. राजेश घोरुडे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार व अनेक ग्रामस्थ तसेच क्षेत्र सहाय्यक खणके, मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले, एफ.डी.सी. एम.चे कर्मचारी कूमरे, गवई, कर्मचारी दाखल झाले असुन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडुन मृत्यदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

     

    मृतदेह हाती लागताच उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आले, वनविभागाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 30 हजार रुपयांची मदत केली. परंतु शेतशिवांरातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. यापूर्वी मौजा चीचाळा येथील गुऱ्हे चांरण्यासाठी नेलेल्या दोन इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

  • अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली

    News34 obc vs maratha

    चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

     

    जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

     

    त्यानंतर 17 सप्टेंबर ला ओबीसी संघटनांचा महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र टोंगे यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधी दखलही घेतली नसल्याने आता आंदोलनाचे काय होणार? हा मोठा प्रश्न ओबीसी संघटनांना पडला आहे.

     

    टोंगे यांच्या आंदोलनाला विविध संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे,  21 सप्टेंबरला भारत राष्ट्र समितीने टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले.

     

    भारत राष्ट्र समितीने दिला टोंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    मागील 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    Bharat rashtra samiti chandrapur
    टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समितीने दिला पाठिंबा

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या सर्व रास्त व प्रमुख मागण्यासाठी मागील 11 दिवसापासून रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.

     

    भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत चर्चा केली याप्रसंगी सचिन भाऊ राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपस्थित होते. ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे.

     

    भूषण फुसे असेही म्हणाले की शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.

     

    याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका ब्रिजवर युवकांचा धिंगाणा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात ओव्हर स्पीड वाहनांच्या थरार बाबत ऑगस्ट महिन्यात News34 ने बातमी प्रकाशित केली होती मात्र त्याकडे वाहतूक नियंत्रक शाखेने दुर्लक्ष केले, मात्र शहरात आता दुचाकी सह चारचाकी वाहनाचा 21 सप्टेंबर ला रात्री 12 वाजताच्या सुमारास ओवरस्पीड थरार बघायला मिळाला.

     

    गुरुवार 21 सप्टेंबरला रात्री 12 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH34BB1100 हे वेगाने रामनगर पोलीस स्टेशन कडून वरोरा नाका उड्डाणपूलावर (बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल) आले, उड्डाणपूल वरील आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या वळणावर या वाहनाने वेगात वळण्याचा प्रयत्न केला असता चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले, आणि सदर चारचाकी वाहन तब्बल 3 वेळा पलटी खात पुलावर कोसळले.

     

    या वाहनात 3 युवक असल्याची माहिती आहे, विशेष म्हणजे रात्रीची वेळ असल्याने काही युवक व नागरिक पुलाच्या त्या भागावर फिरायला येत होते, त्याचवेळी हे वाहन अतिवेगात वळण घेत असताना पलटी झाले सुदैवाने नागरिक वेळीच सावध झाल्याने जीवितहानी झाली नाही.

     

    चंद्रपूर शहरात अनेक अल्पवयीन मुले आपली दुचाकी अशीचं अतिवेगात चालवीत दुसऱ्यांना नुकसान पोहचणार असे कृत्य करतात मात्र आता चारचाकी वाहन धारक सुद्धा चित्रपटाप्रमाणे आपण हिरो असल्यासारखे दर्शवित वाहन अतिवेगात चालविण्याचे प्रकार करीत आहे.

     

    अपघातानंतर काही युवकांनी तात्काळ वाहनाकडे धाव घेत त्या 3 युवकांना बाहेर काढले, ते युवक किरकोळ जखमी झाले अशी माहिती आहे.

     

  • चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.

     

    मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना सुद्धा पैश्याचे प्रलोभन देत त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होती.

     

    सोबतच या कामात आरोपी महिलेने आपल्या फ्लॅट मधील रूम चा वापर देह व्यवसाय साठी करीत होती, रामनगर पोलिसांनी मारलेल्या धाडीत हे सर्व घबाड उघडकीस आले.

     

    रामनगर पोलिसांनी या देहव्यापर चालविणाऱ्या महिलेवर कलम 3, 4, 5, व 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

     

    देहविक्री करणाऱ्या 3 महिलांना स्त्री आधार केंद्र मूल रोड चंद्रपूर मध्ये ताब्यात देत 2 महिलांना अटक करण्यात आली.

     

    सदर गुन्ह्याची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे व गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोउपनी मधुकर सामलवार सह पोलीस कर्मचारी यांनी केली.

  • ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    टोंगे यांच्या समर्थनार्थ ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी “भीक द्या भीक द्या… सरकार ला भीक द्या…” मागणी करत भीक मांगो सत्याग्रह गांधी चौकते गोल बाजार येथे ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृह,आधार योजना, विदेश शिष्यवृत्ती या मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबर, ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर तर्फे मुसळधार पावसात भीक मांगो सत्याग्रह करण्यात आले.मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.

     

    राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग गंभीर नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित आहेत. अनेक विदयार्थ्यांनी वसतिगृह सुरु होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे.मात्र अजूनही वसतिगृह सुरु झाले नाही.

     

    चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.52% च्या वर असलेल्या कष्टकरी ,अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही.त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह च्या माध्यमातून सरकार साठी भीक मागितली व मिळालेली भीक सरकारला पाठविण्यात आली.

     

    याची दखल घेऊन सरकारने न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांनी दिला. यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके,जिल्हामहासचिव ऍड.विलास माथनकर,भाविक येरगुडे,,मनीषा बोबडे ,प्रलय म्हशाखेत्री,अक्षय येरगुडे,गीतेश शेंडे उपस्थित होते.

     

    सरकार जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही.ओबीसी विदयार्थ्यांच्या योजनेसाठी सरकारकडे निधी नाही.आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे तीव्र आंदोलन करत आज टोंगे यांच्या उपोषण स्थळी ओबीसी युवकांनी समर्थ संकल्पनेतून मुंडण आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांचा निषेध व्यक्त करत महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडण करत निषेध व्यक्त केला.स्थळी विनायक बांगडे, नंदू नागरकर, सुभाष गौर,राजेश बेले, देवा पाचभाई, सुनीता लोढिया,ऍड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.

     

    अन्नत्याग उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने ओबीसी युवकाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम उमटतील -सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

     

    ओबीसी संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक

    राज्य सरकारला देणार अखेरचा इशारा

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे ओबीसींच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन याबाबत दिनांक 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ , सर्व ओबीसी संघटना , सर्व जातीय संघटनाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

     

    चंद्रपूरच्या ताडोबा मार्गावरील तुकुम येथील मातोश्री सभागृहामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी, ओबीसीतील विविध जातींच्या संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले.

    महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी अखेरचा इशारा देण्याचे हेतुने या बैठकीच्या आयोजन करण्यात आलेआहे , तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

  • पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

    या मथळ्याखाली बातमी प्रकाशी होताच पोलीस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ दुर्गापूर पोहचताचं त्या अवैध बार वर धाड मारली, या धाडीत तब्बल 25 बॉटल सहित 3 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मेश्राम नामक बार चालकांवर कारवाई करीत मेश्राम ला दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

     

  • चंद्रपुर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लरच्या परवान्याची तपासणी होणार

    News34 impact

    चंद्रपूर – जिल्ह्यात सुरू असलेले नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

     

    News34 च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले, पार्लर संचालक यांच्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्याने पोलिसांनी मशीन जप्त केल्या.

     

    आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुद्धा प्रशासनाला जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याचे आदेश पोलीस व तहसीलदार यांना दिले आहे, यासाठी त्यांनी पथक तयार केले असून 15 ऑक्टोबर च्या आता तपासणीचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहे.

     

    हे असतील तपासणी पथकातील प्रमुख सदस्य

    पोलीस स्टेशन रामनगर हद्द – तहसीलदार व पोलीस निरीक्षक

    शहर पोलीस स्टेशन, दुर्गापूर, पडोली, बल्लारपूर व इतर तालुक्यात पोलीस निरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक व तहसीलदार हे या समितीचे प्रमुख सदस्य असतील.

    पथकाचे काम काय?

    व्हिडीओ गेम पार्लर च्या परवान्याच्या जागेत बदल झाला काय?

    परवण्यातील नमूद वेळ पाळतात काय?

    परवान्यात दर्शविलेल्या संख्ये इतकी मशीन पार्लर वर लावण्यात आली की अतिरिक्त मशीन लावण्यात आले?

    पार्लर मध्ये इतर काही अवैध व्यवसाय चालतात काय?

    परवान्याच्या अटी-शर्तीचे भंग होत आहे काय?

    हे सर्व रीतसर तपासून पथकातील सदस्यांनी मुद्देनिहाय तपासणी करीत संयुक्तरित्या अहवाल 15 ऑक्टोबर च्या आत जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे लिखित आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

     

    विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून सदर व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पार्लर चालक हे राजकीय पक्षाशी जुळून असल्याने त्यांनी अनेक नियमबाह्य कामे करीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे.

    News34 च्या बातमीनंतर आता या नियमबाह्य कामाला काही प्रमाणात चाप बसणार हे निश्चित झाले आहे.

  • अवैध दारू व जुगार बंद करा

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचायत अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध धंद्यावर आढा घालण्यासाठी तिन्ही गावातील महीला दारु, सट्टा, जुगार बंदीसाठी कंबर कसली आहे.

    दारुबंदीचे समितीचे अध्यक्ष व सचिव यांची निवड केल्या नंतर त्यांनी आपला मोर्चा पेंढरी तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत कडे वढवला. ग्रामपंचायत पदाधिकारी व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांना दारू, सट्टा, जुगार बंद करण्यासाठी महिलांना सहकार्य करावे लागेल असा आग्रह केला. तिन्ही गावातील महिलांचा आग्रह बघून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व एकोप्याने गाव दारू, सट्टा, जुगार मुक्त करण्याचे ठरविण्यात आले. महिलांनी गावात फेरी काढून अवैध गोरखधंदा बंदीवर ची जनजागृती केली.

     

    यावेळी पेंढरी (कोको.) गावचे सरपंच तारा अरविंद राऊत, उपसरपंच निशांत चंद्रकांत शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देवाजी गुरनुले, राजेंद्र भैसारे यांचा सहभाग होता.

  • युवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – जी.आर. क्रिष्णा येथील ठेकेदार (व्हिनस सर्व्हिसेस) हे नेहमीच काम करणाऱ्या आपरेटर व ड्रायव्हर यांना धमकी देत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने सर्व 20 से 22 ऑपरेटर व्हिनस सर्व्हिसेस यांचेवर उपासमारीची पाळी आली असून त्यांच्या त्रासापाई वैतागले आहेत.

     

    करीता त्यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार मुल यांचेकडे दिला आहे.

    कंपनीच्या काम करीत असताना वाहनांना काही वेळ आराम असताना त्याच वेळेस ऑपरेटर आराम करताना अशाच वेळी ठेकेदाराने त्यांचे फोटो काढून कंपनीच्या वरिष्ठ एच आर साहेबांना पाठउन ड्युटीमद्ये गैरहजरी लावतात कंपनीमध्ये राब – राब राबवून जरा तरी जगायचे कसे हा सर्व ऑपरेटर व ड्रायव्हर बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे.

     

    ते असे वागतात कि तुम्हाला आम्ही कंपनीमधुन काढुन टाकू असे एक ते दोन वेळा नसून वारंवार करतात आणि आम्हाला पक्या शिव्या देतात आम्हाला काही झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

    याकरिता आपणास विनंती आहे की जी आर क्रिष्णा येथील ठेकेदार ( विनस सर्विसेस ) याध्यावर योग्य ती कारवाई करावी व ही समस्या दूर न झाल्यास आमरण उपोषणास करण्यात येईल व या मागणीसाठी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी. असा इशारा भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी दिला आहे.

  • बाबूपेठ परिसरात मृतदेह मिळाल्याने खळबळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील नार्मल स्कुल वॉर्ड बाबूपेठ परिसरात 18 सप्टेंबरला डीएड कॉलेजवळ राहणारे सुनील मिश्रा यांना परिसरात घाण वास येत असल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता घराजवळ त्यांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

    त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के हे बाबूपेठ भागात पोहचले, मिश्रा यांच्या घरापासून तब्बल 15 फूट अंतरावर खुल्या जागेतील खड्ड्यात झाडाच्या खाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.

    सदर अनोळखी इसमाचे प्रेत हे सडलेल्या अवस्थेत होते, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.

    मृतक इसमाचे वर्णन

    मृतकाचे वय अंदाजे 45 वर्ष ,बांधा मजबूत उंची 5 फूट 4 इंच अंगात गुलाबी रंगाचा फुलशर्ट, काळ्या रंगाचा ,फुल पॅन्ट, लाल व काळया रंगाच्या पट्ट्याचा टी-शर्ट ज्यावर खिसा असलेला, काळया रंगाची अंडरवियर ज्यावर Lux Cozi कंपनी असे घातलेला मिळून आला.

    तरी सदर मृतकाची ओळख असल्यास व त्याचे बाबत काहीही माहिती असल्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे ठाणेदार एस. आर. राजपूत मोबाईल 8087031261 तसेच psi विजय मुके मोबाईल क्रमांक 9923401065 यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.