Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.

     

    आज 1 ऑक्टोम्बरला सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा कडकडाट होत होता. विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात असल्याने चिचाळा येथील महिला चीचाला शेतशिवारात आपल्या शेतात काम करीत होती, त्याचवेळी चंद्रकला वर वीज कोसळली, त्यामध्ये ती जागीच ठार झाली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. झालेल्या घटनेत दोन महिला जखमी झाले.

     

    या घटनेची माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला देण्यात आली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास प्रशासन करीत आहे.

  • चंद्रपुरात पांढऱ्या वर्दीची धडाकेबाज कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचा बोलबाला आहे, मात्र आजही या तस्करांवर ठोस नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन सपेशल अयशस्वी ठरले आहे. नोकिया चा नवा स्मार्टफोन, 3 दिवसांच्या बॅटरी लाईफ सह, आजच खरेदी करा

     

    30 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील खाकी नाही पण पांढऱ्या वर्दीने सुगंधित तंबाखूच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले.

    चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव हे 30 सप्टेंबरला शहरातील तुकुम भागातील आझाद चौकात वाहन तपासणी मोहीम राबवित होते, तितक्यात चारचाकी वाहन क्रमांक Mh36 AA2443 या वाहनाला वाहतूक पोलिसांनी थाम्बविले, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणीसाठी वाहनचालकला विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

     

    पोलिसांना वाहनचालकावर संशय आला त्यांनी तात्काळ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूचा साठा ईगल, मजा व विमल गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.

    पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव यांनी वाहन वाहतूक नियंत्रक शाखेत नेत याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

     

    या कारवाईत एकूण 8 लाख 96 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली, प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनात मोठं विघ्न

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे गणेश चे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला मात्र रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे.

     

    सावली शहरातील सावली चा राजा, सावली चा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ असे तीन सार्वजनिक गणेश चे विसर्जन दिनांक 30 ला करण्यात आले. तिन्ही गणपती सावली शहराच्या प्रमुख मार्गाने आनंदात,नाचत गाजत विसर्जन स्थळी आले.त्यापैकी राजा व विघनहर्ता हे दोन गणपती हे स्थानिक लहान तलाव मध्ये विसर्जन केले तर एक जय बजरंग बली चा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करण्यासाठी गेले.

     

    गणपती विसर्जन करतांना पाण्याच्या प्रवाहात जवळपास 5 युवक बुडाले मात्र मात्र त्यातून 2 जण निघाले मात्र चांदली येथील गुंडावार बंधू व गुरूदास दिवाकर मोहूर्ले हे वाहून गेले.काही अंतरावर गुरू मोहूर्ले ला पकडले व त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्या गुरुदास मोहूर्ले ला मृत घोषित केले.तसेच गुंडावार बंधू निकेश व संदीप हे अजूनही सापडले नाही.सदर घटनास्थळी सावली पोलीस आहे.मात्र या घटनेने सावली शहर हादरून गेले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

     

    युवकांचा हंबरडा व वाचविण्यासाठी प्रयत्न

    गणपती विसर्जन केल्यावर काही युवक बाहेर आले नाही हे दिसताच युवक हळबळले आणि त्यांना शोधण्यासाठी काही युवकांनी नहरात उड्या मारल्या आणि शोध कार्य सुरू होते मात्र त्यात गुरुदास मोहूर्ले हा युवक सापडला.व गुंडावार बंधू वाहून गेले.

     

    लहान भावासाठी मोठ्याने मारली उडी

    चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू विसर्जन साठी या ठिकाणी होते. नहारात लहान भाऊ संदीप वाहून गेल्याचे कळताच त्याला शोधण्यासाठी मोठ्या भाऊ निकेश ने वाचवण्यासाठी उडी मारली मारली मात्र पाण्याच्या प्रवाहाने दोघेही अजून सापडले नाही.सावली शहरात उसाचा रस (रसवंती)विकण्याचे काम हे करीत असतात.

  • स्वच्छता राखणे हा स्वावलंबनाचा एक भाग, तिला सवय बनवावी : डॉ. अशोक जीवतोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखली जावी, नवीन पिढीने स्वच्छता ही सवय बनवावी, असे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

     

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.

     

    सदर अभियान आज रविवार (दि.०१) ला स्थानिक नागपूर महामार्गावर सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान चालले. डॉ. अशोक जीवतोडे यांचे सोबत करण्यात आलेल्या सदर स्वच्छ्ता अभियाना दरम्यान श्रमदान करून सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात आला व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

     

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो.

     

    यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख-एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, हे विशेष.

     

    यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांचे सह दादा दहेकर, मनोहर गाठे, सचिन दिघाडे, प्रवीण दिघाडे, नितीन कुकडे, प्रकाश गाठे, शामराव बदकुलवार, मधुकर हिरादेवे, शाहू, सतीश बिजेवार, गोपाळ वाटेकर, अनिल काळे, प्रवीण साखरकर, डॉ. आशीष महातळे, रवि देवाळकर, किशोर ठाकरे, रविकांत वरारकर, रवि जोगी, महेश यार्दी, मंजुळा डूडूरे, संदीप कासवटे, जितेंद्र केराम, आदी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

  • युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचा SP कॉलेजला दणका

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या सरदार पटेल महाविद्यालयात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख अडबाले यांच्यामुळे कमी झाला.

     

    30 सप्टेंबरला युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांना महाविद्यालयात होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तक्रार प्राप्त होताच अडबाले SP कॉलेजमध्ये दाखल झाले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा बघितल्यावर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला दरवर्षी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

     

    कारण याठिकाणी अर्ज भरण्यासाठी एकच काउंटर लावण्यात आला आहे, शैक्षणिक वर्षात बाहेरगावातून हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी येतात मात्र महाविद्यालय प्रशासन त्यांची व्यवस्थित सोय करीत नाही, ज्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक सत्राला मुकतात.

     

    विद्यार्थ्यांची समस्या ऐकल्यावर सुर्या अडबाले यांनी प्राचार्यांच्या कक्षात धडक मारत त्यांना या समस्येबाबत अवगत केले, प्रवेश काउंटर वाढविण्याची मागणी प्राचार्याला केली.

     

    विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युवासेनेची आक्रमकता बघता महाविद्यालय प्रशासनाला नमावे लागले, त्यांनी तात्काळ त्याठिकाणी 4 काउंटर सुरू केले.

     

    तात्काळ समस्या दूर होताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचे आभार मानले.

  • अखेर रवींद्र टोंगे यांचं उपोषण मागे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 20 दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्या विविध मागण्या मान्य करीत आंदोलनाची सांगता केली. 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 30 हजार रुपयात

    मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 20 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. Samsung कंपनीचा 5 स्टार वॉशिंग मशीन अवघ्या 28 हजार 490 रुपयात, आजच खरेदी करा

     

    शनिवार सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण पाणी पाजून सोडविले. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात आले.

     

    यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की भाजप सरकारच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाच्या हितासाठी तब्बल 26 शासन निर्णय काढले होते, आज राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी समाज उभा आहे, मात्र आरक्षण मुद्द्यावर दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही अशी सरकारची भूमिका आहे.

     

    सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, झालेली बैठक ही रेकॉर्डवर आहे, आम्ही ओबीसी संघाला शब्द दिला आहे, शब्द पाळला नाही अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही, जातनिहाय जनगणना बाबत बिहार ने पाऊल उचलले असले तरी त्यानंतर त्याचा काय परिणाम येतो ते बघून आपण राज्यात जातनिहाय जनगणनेबाबत काय करता येईल त्यावर नक्की सकारात्मक राहू असे फडणवीस यांनी आश्वाशीत केले.
    ओबीसी समाजातील काही मागण्या आम्ही विसरलो किंवा आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा, त्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होणार.

     

    राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसी अन्नत्याग आंदोलनाला भेट देत आपली शिष्टाई दाखविली, त्यांनतर सरकार व ओबीसी संघटनांची बैठक घडवून आणण्यात मुख्य भूमिका मुनगंटीवार यांनी बजावली.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रविंद्र टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व आमदार किर्तीकुमार भांगडीया, परिणय फुके, सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, पप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.

     

    मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येऊन शहर स्वच्छ करण्यात आले.

     

    विसर्जन सोहळ्यास सहभागी होणारी अनेक मंडळे, लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी गर्दी, खाद्यान्न पदार्थांचे स्टॉल्स यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो विशेषतः रस्त्यावर पडलेल्या कागदी प्लेटस ज्या गर्दीच्या चालण्याने रस्त्याशी इतक्या मिसळतात की त्यांना अक्षरशः खरडुन काढावे लागते. मनपा स्वच्छता कर्मचारी इतक्या वक्तशीर स्वच्छतेचे काम करतात की सकाळी निघालेल्या नागरीकांना कळणार सुद्धा नाही की रात्री इतका कचरा या रस्त्यावर होता.
    यंदाही सकाळी ६ पूर्वीच सर्व रहदारीचे मार्ग स्वच्छ करण्यात आले होते.

     

    विसर्जन स्थळावर १२२ मोठ्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले यातील अखेरच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास सकाळी ८ वाजले होते. यादरम्यान क्रेनद्वारे उचलुन रीतसर विसर्जन करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन चमुने पुर्ण वेळ तैनात राहुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज इत्यादी व्यवस्था सज्ज ठेवल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही.

    ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली गेली असल्याने नदीपात्रात मोठ्या मुर्तीच्या विसर्जनास अडचण गेली नाही. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण उपस्थीत राहुन विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडेल याची खात्री केली. सार्वजनिक गणेश मंडळ,पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व नागरीकांनी विसर्जन सोहळा यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले याबद्दल मनपा प्रशासनाने आभार व्यक्त केले.

  • बावनकुळे साहेब चला ढाब्यावर

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे.

     

    या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध करण्याचा निर्णय डिजिटल मीडिया संस्थेने घेतला आहे. डिजिटल मीडिया संस्थेने “या बावनकुळे धाब्यावर” या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून त्यांनी बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील लोहारा ढाब्यावर रात्री 8:00 वाजता सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला ढाब्यावर पत्रकारांना अनेकदा खाऊ घातला आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

     

    या निमंत्रित मेजवानीला बावनकुळे साहेब आले नाहीत तर मात्र त्यांचा तिथे निषेध करण्यात येईल. येत्या नवरात्रीच्या काळा पासून त्यांच्या जिभे मधून कोणतेही वाईट शब्द येऊ नयेत यासाठी गणेशाने त्यांना सदबुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे.

     

    संस्थेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगाड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

    News34 chandrapur

    चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.

     

    या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.

     

    शनिवार दिनांक सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात शासनाने दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी.

  • चंद्रपुरातील डिजीटल मीडियाच्या महालाईव्ह ला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणाऱ्या चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जन सोहळ्यात यंदा एक नवा प्रयोग बघायला मिळाला. MI Power Bank 20 हजार MAH चे पॉवर बँक फक्त 2149 रुपयात

     

    आजपर्यंत नागरिकांनी राजकीय पक्षाची युती बघितली मात्र प्रथमच चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील 4 News पोर्टल व Youtube चॅनेल ने महायुती करीत श्री गणेश विसर्जन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. JBL चे हेडफोन फक्त 600 रुपयात त्वरा करा

     

    आधी हे थेट प्रक्षेपण होणार कसे असा प्रश्न अनेकांना पडला होता, कारण आजच्या आधुनिक युगात अनेक नवे बदल झाले आहे, स्थानिक वृत्त वाहिनी यांचं प्रस्थापित नेटवर्क सध्या सुरू आहे, शहरातील विविध जागेवर केबल टाकून या वाहिन्या थेट प्रक्षेपण करतात मात्र यावेळी डिजिटल मीडियाने नवा प्रयोग करीत वायरलेस थेट प्रक्षेपण करीत चंद्रपूरकरांची मने जिंकली आहे.

     

    चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील News34, पार्थशर समाचार, DIG News व Mh24x7 यांनी थेट प्रक्षेपणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करीत वायरलेस प्रक्षेपणाचे उत्कृष्ट कार्य केले, व हे काम चंद्रपुरात प्रथमच केल्याचा बहुमान चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने प्राप्त केला आहे.

     

    चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने 28 सप्टेंबर ला सकाळपासून थेट प्रक्षेपणाची सुरुवात केली, हजारो नागरिकांनी चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जनाचा सोहळा एकाचवेळी 4 चॅनेल वर बघितला, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील वाचक वर्गाचे News34 चे संचालक संपादक प्रकाश हांडे, पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू, DIG News चे संपादक गणेश अडलूर व Mh24x7 चे आकाश नामेवार व तरन्नुम शेख यांनी आभार मानले आहे.