Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, असे विचार राज्याचे वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

     

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीकरीता पर्यटन वाहनांचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., राहूल पावडे, देवराव भोंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

     

    गतवर्षी देश-विदेशातील जवळपास 3 लाखांच्या वर पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी आले, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा प्रकल्पातील सोयीसुविधा उत्तम व्हाव्यात, यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले असून सिंगापूरच्या आर्किटेक्चरला डिझाईन बनविण्याचे काम देण्यात आले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुंदर टायगर सफारी ताडोबाची राहील, यासाठी आपण प्रयत्नशील आहो. अतिशय महत्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यामुळे टायगर सफारीकरीता गाड्या टप्प्याटप्प्याने बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्पात आज सहा गाड्यांचे लोकार्पण होत आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार:

    चंद्रपूर जिल्ह्यात राहणा-या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांनाही ताडोबाची व्याघ्र सफारी व्हावी, त्यांना वनांचे निरीक्षण जवळून करता यावे तसेच पर्यावरणाचा अभ्यास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमांतर्गत मोफत वनपर्यटन, व्याघ्र दर्शन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना ताडोबासह राज्यातील इतर अभयारण्यात वन व वाघ्र पर्यटनाचे मोफत नियोजन करण्यात येणार आहे.

    नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवीन क्रुझर वाहनांसाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी

    ताडोबा वन्यजीव कोअर विभागात जिप्सी व कॅन्टर वाहनाद्वारे पर्यटक सफारीचा आनंद घेतात. कोअर विभागातील बरेच रस्ते एकेरी व छोटे असल्याने कॅन्टर वाहन जाण्यास अडचण निर्माण होते. तसेच या वाहनांच्या आवाजामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे कँटरद्वारे सफारी करणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने नऊ आसनाचे क्रुझर पर्यटन वाहन सुरू करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (2022-23) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत क्रुझर वाहन खरेदी करण्यासाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाला.
    नवीन क्रूझर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही वाहने मोहर्ली गेटवरून पर्यटकांसाठी नियमीत उपलब्ध राहतील. या वाहनांसाठी बुकींग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बुकींग मशीनद्वारे क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.

    महसूल विभागासाठी 10 नवीन बोलेरो :

    महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी 10 नवीन बोलेरो गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

  • चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट मधील कामगारांचे विरुगिरी आंदोलन मागे

    चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट मधील कामगारांचे विरुगिरी आंदोलन मागे

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून 2 डिसेंम्बर ला आंदोलन सुरू केले होते.

    2 डिसेंम्बर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास प्रशासनाच्या मध्यस्तीने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

     

    स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले होते.

     

    आम्हाला गोळ्या घाला मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली होती, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी कंपनी प्रबंधन, कामगार व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

     

    रात्री 10 वाजता स्वतः सपोनि हर्षल एकरे हे बॉयलर वर चढले आणि कामगार व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये संवाद घडवून आणला, जिल्हाधिकारी गौडा यांनी कामगारांना आंदोलन मागे घेण्यास विनंती करीत सोमवारी कंपनी प्रबंधन व कामगार या दोघांमध्ये बैठक घेत सुधारित वेतनाचा निर्णय लावू असे आश्वासन कामगारांना दिले असता जिल्हाधिकारी गौडा यांच्या विनंतीला मान देत कामगारांनी आपले विरुगिरी आंदोलन मागे घेतले.

     

    सोमवारी बैठकीत काय तोडगा निघणार किंवा नाही त्यानंतर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू अशी प्रतिक्रिया आंदोलनकारी सूर्यकांत चांदेकर यांनी दिली.

     

  • तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

     

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

     

    अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

     

    आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

  • चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

     

    चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे.

     

    अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे,सुरज तोतडे सरपंच ,पांढरकवडा, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम,पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, भटालीचे सरपंच किसन उपरे,माजी उपसरपंच संजय टिपले , रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, गोविंदा बल्की, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टाँगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.

     

    धरणे आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी करत मागण्या पुर्ण न झाल्यास 15 जानेवारी 2024 रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
    यावेळी उपस्थित नेत्यांनीही बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच 2017 पासून प्रलंबित असलेला विषय आता मार्गी लागला आहे.

     

     

    जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शासनाला पाठवला होता. त्याआधारे महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर या विषयाचा पाठपुरावा केला. जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यात इमारतीचा अडसर ठरू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर येथील नवीन विस्तारीत न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्दा आता निकाली निघाला आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल चंद्रपुरातील विधी वर्तुळातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

     

    12 कोर्ट हॉल आणि अद्ययावत यंत्रणा :

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण 12 कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्ययावत यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधांचा मेळ बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण, अग्नीशमन यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, वातानुकुलित यंत्रणा, वाढीव क्षमता असलेले उद्वाहन (लिफ्ट), सीसीटीव्ही, पॉवर बॅकअप आदींची तरतूद कामांतर्गत करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, सोबतच नवोदीत अभिवक्त्यासाठी आसनाच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाणार आहे.

  • हा रस्ता माझ्या बापाचा, चंद्रपुरात आनंद मेळा धारकाची मुजोरी

    हा रस्ता माझ्या बापाचा, चंद्रपुरात आनंद मेळा धारकाची मुजोरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लहान मुले व नागरिकांच्या मनोरंजनासाठी चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर नुकतंच आनंद मेळा सुरू झाला आहे, मात्र या मेळा धारकाने सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण केल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

     

    नोव्हेंबर महिन्यापासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर आनंद मेळा सुरू झाला, मात्र या मेळा धारकांनी आपली मुजोरी सुरू करीत चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण केले आहे, विशेष बाब म्हणजे वाहतूक व चंद्रपूर पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर अतिक्रमणसाठी केला.

     

    चांदा क्लब मैदानाच्या आत सुरू असलेल्या या मेळ्यात येणारे नागरिक आत वाहन पार्क करतात मात्र मैदानाच्या बाहेर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये यासाठी वाहतूक पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर करून चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तब्बल 100 मीटर वर दोरीच्या साहाय्याने मेळा धारकाने अतिक्रमण केले आहे.

     

    वाहन पार्क न करू दिल्याने अनेक नागरिकांसोबत मेळा धारकाचे अनेकदा भांडण सुद्धा झाले आहे, मात्र आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मुजोर भूमिका मेळा धारकाने घेतली आहे.

    चंद्रपूर-नागपूर मार्गावर आधीच अतिक्रमणामुळे अनेक अपघात घडले असताना वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून मेळा धारक आपली मुजोरी करत असल्याने हा रस्ता माझ्या बापाचा आहे असे दर्शवित आहे.

     

    शहरात पुन्हा अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुजोर आनंद मेळा धारकावर पोलीस व वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार काय? की मेळा धारकाच्या मुजोरीला प्रशासन आशीर्वाद देणार? वाहतूक पोलिसांनी मेळा धारकाला चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण करण्याची रीतसर परवानगी दिली आहे काय? प्रशासन त्या अतिक्रमण धारकाला पाठीशी घालत आहे काय? असे अनेक प्रहन यावेळी उपस्थित झाले आहे.

  • चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  चांदा फोर्ट ते गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. 2 दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पून्हा एकदा चर्चेला आला आहे.2008 ते 2023 पर्यंत एकूण 6 वाघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने रेल्वे विभागाकडे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा अहवाल पाठविला असून वन्यजीव रक्षणाससाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.याबाबत रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दाखविल्याने येत्या काळात रेल्वेच्या धडकेने होणारे वन्यजीव मृत्यू थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. चंद्रपूरच्या बाबपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. येथून नागभीड ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. येथून वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. वाघ, बिबट, हरण, रानगवा, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा यात समावेश आहे. रेल्वे मार्ग ओलांडत असताना अनेकदा रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो, हा एक गंभीर विषय आहे.

    पाच वर्षांत 6 वाघ 2 बिबट्यांचा मृत्यू
    ============

    2018 पासून 2023 पर्यंत चंद्रपूर येथील रेल्वे मार्गावरील अपघातात तब्बल 6 वाघ आणि 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर वनवृतातील 3 तर वन विकास महामंडळाच्या क्षेत्रातील 3 वाघांचा समावेश आहे.नोव्हेंबर 2018 मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वाघीण देखील जखमी झाली. यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला, 21 ऑक्टोबर 2022 ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला, 27 नोव्हेंबर 2023 ला नागभीड बाळापूर रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला. तर 8 ऑक्टोबर 2019 मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला तर 7 मार्च 2023 ला जीवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता.

     

    वनविभागाने सुचविल्या उपाययोजना
    =============
    वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी वनविभागाने काही पर्यायी सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी खुरटे जंगल आहे त्या रेल्वे रुळाच्या बाजूने सुरक्षा जाळी, लावण्यात यावे, प्राण्यांना येण्याजाण्यासाठी भूमिगत मार्ग काढण्यात यावे, रेल्वे रुळाच्या बाजूला निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरून तिथे पाणी पिण्यासाठी वन्यजीव फिरकणार नाही, वळणरस्त्यावर रेल्वेची गती कमी करणे आदी उपाय योजना सुचविल्या आहेत.

     

    रेल्वे विभागाने केले दुर्लक्ष
    =============
    2018 मध्ये वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातील वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक झाली. यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजना सांगितल्या मात्र तेव्हा रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

     

    आता रेल्वे विभाग सकारात्मक
    ===============
    मंगळवारी सकाळी एका वाघाच्या बछड्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात किती वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल देण्यात आला. याबाबत आता रेल्वे विभाग सकारात्मक असून वरीष्ठ पातळीवर लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
  • विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील काही वर्षांपासून कधी प्राध्यापकांच्या प्रलंबित पगाराला घेऊन चर्चेमध्ये राहणारे राजीव गांधीं अभियांत्रिकी महाविद्यालय हे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)लोनारे रायगड यांच्या वतीने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भोंगळ कारभारामुळे चर्चेत आले आहे.

     

    या विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून नाहक त्रासाला समोर जावं लागतं आहे त्यामुळे विविध प्रश्नांना घेऊन राजीव गांधीं महाविद्यालयाचे विद्यार्थी युवासेना कडे धाव घेत त्यांना होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानापासून न्याय मिळवून द्यावे या मागणीला घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ यामध्ये महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष तेजस अल्लावार, वतन मादर, अक्षय उपगनलावार, रोहन आंबटकर, हेमंत गोरे, अनिकेत मानकर ,अथर्व कर्चे, विशाल कुलसंगे, वैभव किनाके व इतर विद्यार्थी मित्र इत्यादी हे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना सचिव पुर्व विदर्भ इंजि निलेश बेलखेडे यांना भेटले व सदर विषयावर एक निवेदन त्यांनी दिले. यापुर्वी सुद्धा निलेश बेलखेडे यांनी या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवुन दिलेले असल्याने विद्यार्थ्यांनी बेलखेडे यांच्या कडे या प्रश्नांना सोडविण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली.

     

    यामध्ये १) काही विद्यार्थ्यांचा मागील वर्षीच्या पास म्हणून आलेला निकाल विद्यापिठाच्या सिस्टम अपडेटमुळे चक्क सहा महिने तर काहिंचा एक वर्षानंतर नापास म्हणून आलेला आहे व त्यांना आता त्या विषयांची परिक्षा द्यावी लागणार आहे म्हणजे अश्या विद्यार्थ्यांना remedial परिक्षेची संधी पासून सुद्धा विद्यापिठाच्या चुकीमुळे वंचित राहावे लागले आहे . २)काहि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका ७-८महिने कालावधी झाल्या नंतरहि अजून आलेल्या नाही. ३)अंतिम वर्षातील विद्यार्थी पास होऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हि त्यांच्या गुणपत्रिका, डिग्री वेळेवर न मिळाल्याने त्यांना समोरच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी वंचित राहावे लागत आहे. ४) नियमीत सत्राची परिक्षेचा निकाल लागून अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या फेरतपासनीचा निकाल न लागता त्यांना remidial चा फाॅर्म भरून परिक्षा द्यावी लागत आहे यामध्ये शैक्षणिक नुकसान सोबतचं आर्थिक भृंदड सुद्धा त्यांच्यावर पडआहे. ५) विद्यार्थ्यांचा मागील सेमिस्टर चा सप्लिमेंट चा निकाल आतापर्यंत लागलेला नाही त्यामुळे समोर च्या शैक्षणिक सत्रामध्ये ते पोहोचले कि नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर असून अभ्यास कसा करायचा या संभ्रमात विद्यार्थी पडले आहे. ६) विद्यापिठाच्या पोर्टलच्या चुकांमुळे काही विद्यार्थी विद्यापिठाच्या criterion नुसार विद्यार्थी हा समोरच्या सत्रासाठी pramote असून सुद्धा तो पोर्टल वर Not Pramoted दर्शवितो आहे. ७) आॅनलाईन पद्धतीने पेपर्स मुल्यांकन होत असून चुकिचे पेपर चेक होणे इत्यादी.

     

    अश्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना समोरे जावे लागत असून यासंदर्भात काही दिवसांपूर्वी निलेश बेलखेडे यांच्या वतीने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य प्रशांत पोटदुखे, रजिस्ट्रार व महाविद्यालयीन डिन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता महाविद्यालय आपल्या वतीने या समस्येवर प्रयत्न करीत असून विद्यापिठ महाविद्यालयाच्या कुठल्याही मेल ला योग्य उत्तरे देत नसून याबाबत विद्यापीठ फारसं गंभीर नाही असे एकंदरित दिसून आले. त्यावेळी निलेश बेलखेडे यांनी या सर्वाच निराकरणाची जबाबदारी हि महाविद्यालयाची असून फक्त मोबाईल वर, मेल द्वारे हे प्रश्न सुटणार नसून महाविद्यालयाच्या वतीने विद्यापिठात रायगड येथे एक शिष्टमंडळ पाठवून तिथे विद्यापीठ कुलगुरू यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढून विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक शोषण थांबवावे असे सांगितले त्यावेळी महाविद्यालयाच्या वतीने हे मान्य करण्यात आले परंतु अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नाही.

     

    हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बनलेलं आहे कि विद्यार्थी पालकांची आर्थिक लुट करण्यासाठी बनलेलं आहे यावरून रोष व्यक्त करित युवासेना सचिव निलेश बेलखेडे यांनी येत्या काही दिवसांत याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभीर्य समजून शिष्टमंडळ पाठवून त्यांना या चुका निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर युवासेना च्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन तिव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना सचिव इंजि.निलेश बेलखेडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • करवाढीमुळे नागरिक संतापले, सरपंच व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले

    करवाढीमुळे नागरिक संतापले, सरपंच व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे आज बुधवारी घडली.

     

    नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतीत आज बुधवारी ग्रामसभा आयोजीत केली होती. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली त्यापैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्याबाबत चर्चा करून त्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकामध्ये संताप उफाळून आला. करवाढ होत असल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी सरपंच, ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले. तब्बल साडेतीन तास ही मंडळी कुलूपबंद होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस देवपायली येथे पोहचले. पोलीसांनी नागरीकांना समजावले. त्यानंतरच नागरिकांनी कुलूप उघडले सरपंच सचिव सदस्यांची सुटका केली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या देवपायली ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी 7 नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती, परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी घेण्यात आली. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली.

     

    ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टीवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच नागरिक चांगलेच संतापले. त्यामूळे नागरीकांनी सरपंच सचिवासह गग्राम पंचायत सदस्यांना कार्यालयाला कुलूप लावून डांबण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वांची सुटका करण्यात आली. आता 4 डिसेंबला पुन्हा देवपायलीत पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

     

    सरपंचांच्या परवानगीने पाणीपट्टी व मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, अशी माहिती ग्रामसेवक प्रशांत दोडके यांनी दिली. नागरीकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने करवाढ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
    पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. त्यामुळं त्यांनी सर्वांची सुटका केली. या प्रकरणात कुणीच तक्रार न केल्याने पोलीसांनी कारवाई केली नाही. सध्या गावात शांतता आहे. पुढील ग्रामसभा 4 डिसेंबरला होणार आहे. ग्रामपंचायतीने मागणी केल्यास ग्राम सभेला पोलिस बंदोबस्त पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून द्यावी – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून द्यावी – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते. त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी उद्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपत असल्याने आजच्या स्थितीत हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

     

    एकीकडे आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे. करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले आहे. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली आहे.

     

    एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. अजूनही असंख्य शेतकरी वंचित आहेत. करीता दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सलग एक महिना मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.