Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • इको-प्रो चे घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य मधील कर्मचारी नियुक्ती करिता “मानवी साखळी सत्याग्रह”

    इको-प्रो चे घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य मधील कर्मचारी नियुक्ती करिता “मानवी साखळी सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर: इको-प्रो तर्फे हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी, नववे सत्याग्रह करीत घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य घोषित होऊन अनुक्रमे पवणे सहा तर पावणे तीन वर्ष होऊन सुद्धा पदस्थापना न झाल्याने अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी तसेच दोन्ही अभयारण्य मधील पर्यटनाचे मॉडल गावाच्या संपूर्ण विकासाभिमुख बनविण्याची मागणीकरिता आज “मानवी साखळी सत्याग्रह आंदोलन केले.

     

    जिल्हात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुर्व-उत्तर दिशेकडील अत्यंत महत्वाच्या वन्यप्राणी भ्रमणमार्गात ५ वर्षाआधी (२३ मार्च २०१८) घोषीत झालेले ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनक्षेत्रातील ‘घोडाझरी अभयारण्य’ व ताडोबाच्या दक्षिणेकडील वन्यप्राणी भ्रमणमार्गात मध्य चांदा वनविभाग अंतर्गत असलेल्या वनक्षेत्रातील ‘कन्हारगांव अभयारण्य’ २ वर्षाआधी (२१ मार्च २०२१) घोषीत होउन सुध्दा अदयाप वन्यप्राण्याच्या दृष्टीने व्यापक वन्यजीव व्यवस्थापनाच्या कामास सुरूवात झालेली नाही. सोबतच सभोवतालच्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने, येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुध्दा कार्यास सुरूवात झालेली नाही. कारण यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ म्हणजे अधिकारी-कर्मचारीचे पद वर्ग करण्यात आलेली असली तरी त्यावर कर्मचारी यांची नियुक्ती अदयापही करण्यात आलेली नाही. यामुळे वन्यप्राणी व्यवस्थापन, अभयारण्या सोबतच या परिसरातील गांवाचा सुध्दा विकास खुंटला आहे.

     

    घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य दोन्ही ताडोवा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर व्यवस्थापनाकडे हस्तांतरण करून, याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. कन्हारगांव अभयारण्य घोषीत होउन दोन वर्ष अधिक काळ लोटुन सुध्दा पदे वर्ग करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांची पदस्थापना अदयाप करण्यात आलेली नाही. कन्हारगांव अभयारण्याकरीता एकुण ४६ पदाची गरज असतांना गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील ११ पदे वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ४ पदाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. तर उर्वरीत ३५ पदाबाबत काहीच निर्णय नाही. घोडाझरी अभयारण्याकरीता एकुण २१ पदांवर अधिकारी-कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता असताना पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी सर्व पदे रिक्तच आहे. दोन्ही अभयारण्ये ताडोबा बफर कडे व्यवस्थापनासाठी असले तरी मुख्यालयापासुन अंतर बरेच लांब असल्याने या अभयारण्याचे कार्यालय अभयारण्यलगतच्या तालुकाच्या ठिकाणी करणे आवश्यक असुन घोडाझरी करीता ‘नागभीड’ तर ‘कन्हारगांव’ करीता गोंडपिपरी संयुक्तीक ठरेल.

     

    दोन्ही अभयारण्य पर्यटनाचे स्वरूप सहजीवन निर्माण करणारे असावे

    चंद्रपूर जिल्हयात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असुन त्याची किर्ती सर्वदुर आहे. पर्यटन सुध्दा मोठया प्रमाणात सुरू असुन हमखास वाघांचे हमखास दर्शन करीता ओळखले जाते. घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य मध्ये पर्यटनाचे वेगळे मॉडल निर्माण करण्याची संधी असुन जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संर्घर्षाच्या पार्श्वभुमीवर जे वन्यप्राणी व गावकरी यांचेतील सहजीवन अधिक योग्य प्रकारे विकसीत होउ शकेल. आज जिल्हयात मानव-वन्यप्राणी शिगेला पोहचला आहे. वाघ, वन्यप्राणी व वनविभाग पर्यायाने शासन यांचेविषयी नकारात्मक भावना वाढीस लागत आहे. या अभयारण्याच्या परिसरातील गावांचा सर्वागीण विकासात या पर्यटनाचा हातभार पुर्णतः असावा या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.

     

    आज ताडोबात येणारे पर्यटकांचा सर्वाधिक पैसा हा रिसोर्ट व निवास व्यवस्थेवर खर्च होतो, ताडोबाला सफारी बुकीगचे मिळणारे फि ही एकच स्त्रोत असतो. एखादया पर्यटकाच्या एकुण खर्चाच्या तुलनेत कमी असतो, सर्वाधिक खर्च हो रिसोर्ट व जिप्सी यावर खर्च होतो. खरेतर रिसोर्ट, जिप्सी यामधुन येणारा पैसा सभोवतालच्या सर्व इको डेव्हलपमेंट समीती चे एक मॉडल तयार करून त्याचे कमुनीटी होम स्टे व रिसोर्ट व कमुनिटी जिप्सी असल्यास या पर्यटनातुन येणारा सर्व प्रकाराचा पैसा या संपूर्ण गावातील युवकांना रोजगार तसेच गांव विकासासाठी वापर करणे संयुक्तीक ठरणार आहे. या पर्यटनातून फक्त नी फक्त “गांव आणी गावकरी” यांचा विचार होणार असल्याने येत्या काळात या ‘हिरवे उदयोग/प्रकल्प असणारे अभयारण्यकडे पाहण्याचा दृष्टीकोनात बदल येणार व सहजिवन प्रस्थापित करण्यास नक्कीच यश मिळेल.

     

    आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या नवव्या दिवशी, इको-प्रो तर्फे नववे सत्याग्र/ आंदोलन करीत घोडाझरी व कन्हारगांव हे घोषीत झालेले अभयारण्यांना नवसंजीवणी देण्यास, या भागातील गांवाचा विकास करण्यास तात्काळ पद नियुक्ती करण्यासाठी, आणी या अभयारण्याच्या पर्यटन विकासातुन गांवाचा विकास साधणारा लोकाभिमुख पर्यटन मॉडल बनविण्याचे मागणीकरीता ‘मानवी साखळी सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. यात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रकाश निर्वाण, राजू हाडगे, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, बंडू दुधे, प्रितेश जीवने, जितेंद्र वाळके, भूषण ढवळे, सचिन धोतरे, सुनील मिलाल, निलेश दौडकर, लोकेश भलमे, भारती शिंदे, योजना धोतरे, शारदा काहिलकर, विशाखा लिपटे आदी सहभागी होते.

  • मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे.

     

    जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

     

    जरांगे हे मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरुवातीपासून या मागणीला विरोध केला. चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. याची दखल घेत सरकारने २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, मुख्य सचिव व ओबीसी संघटनांची बैठक घेतली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार नाही, असे सांगितले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविले होते.

     

    मागण्यापूर्तीच्या अनुषंगाने लेखी पत्रही दिले होते. हे सारे घडत असतानाही जरांगे पाटील आता नवी मागणी करू लागले आहेत. त्यांच्या मागण्यांचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी खुशाल करावी. तसे आरक्षणही लढा देऊन मिळवावे. आमचा विरोध ओबीसींमधून आरक्षणाला आहे. तो अजूनही कायम आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागून आहे. समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातील तथ्यही लवकरच बाहेर येईल. ओबीसी समाज या अहवालातील बाबींकडे लक्ष ठेवून आहे, असेही सचिन राजुरकर यांनी मटले आहे.

  • चंद्रपुरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

    चंद्रपुरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    सदर महोत्सवात भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येत असुन शहरातील जिल्हा स्टेडियम,चांदा पब्लीक स्कूल परिसर, सेंट मायकल स्कूल,प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका इत्यादी परिसराचे सौंदर्यीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे. लवकरच विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भिंतीचित्र महोत्सवातील स्पर्धकांना देशभरातील लोकांना आपल्या कलेचा परिचय देण्याची संधी प्राप्त होत आहे.

     

    स्पर्धेत मुंबई,नागपूर,सांगली,सोलापूर,अहमदनगर,पांढरकवडा,हिंगोली,वर्धा, आरमोरी, जळगाव,यवतमाळ,गोंदीया,चिमुर, गोंडपिंपरी, चिचपल्ली, बल्लारशाह, वरोरा, हिंगणघाट, चंद्रपूर इत्यादी शहरातील एकुण २७४ स्पर्धक सहभागी झाले असुन वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकार सुद्धा सहभागी झाले आहेत. उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना धनादेशाद्वारे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. मनपातर्फे सर्व स्पर्धकांच्या निवास व जेवणाची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली असुन सौंदर्यीकरण स्थळी नेण्यास वाहने,पेंट,ब्रश,बसण्यास बेंचेस इत्यादी तसेच वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

     

    उदघाटन प्रसंगी स्पर्धकांना स्पर्धा साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपअभियंता विजय बोरीकर,डॉ.अमोल शेळके, सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे,संतोष गर्गेलवार,चैतन्य चोरे,विकास दानव, साक्षी कार्लेकर, मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने स्पर्धक व नागरिक उपस्थीत होते.

    मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रांद्वारे संवाद साधणाऱ्या भिंती आपण तयार करून दाखविल्या आहेत. शहरात थंडीचा कडाका वाढत आहे अश्या वेळेस राज्यातल्या एका टोकावरच्या शहरात येऊन आपण स्पर्धेत भाग घेत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. संपुर्ण राज्यातील कलावंतांच्या कलांनी चंद्रपूर शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितच वाढ होईल अशी आशा करतो – आयुक्त विपीन पालीवाल

  • विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

     

    बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

  • अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष मोबदला व स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा

    अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष मोबदला व स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष निधी मोबदला मिळावा, स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा, या मागणीकरिता लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकार व्दारे एकुण ९३६ हेक्टर आर जमिन ही कोळसा खाणीकरिता अलॉट करण्यात आलेली आहे. त्यापैकी 128 हेक्टर आर शेतजमिन अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकारच्या स्पेशल प्रोव्हिजन अॅक्ट 2015 अन्वये हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. व उर्वरीत 808 हेक्टर आर जमिन संपादीत करावयाची आहे.

     

    याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, उर्वरीत 808 हेक्टर जमिन संपादीत करत असतांना शेतकरी व गावक-यांमध्ये समन्वय साधुन त्यांना त्यांच्या मागणीनुसार शेतजमिनीचा २५ – ३० लक्ष रुपये एकरी मोबदला व कंपनीमध्ये स्थायी नोकरी मिळालीच पाहिजे हि आमची आग्रही मागणी आहे.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो कंपनीकडून सेंट्रल कॉलरी कंपनी नागपूर (डागा) या आस्थापनेवर जुने प्रकल्पग्रस्त 16 कामगार कार्यरत होते, आमच्या मागणी नुसार त्यांना स्थायी नोकरीत सामावुन घेतले व सानुग्रह मदत म्हणुन प्रत्येकी 7 लाख रूपये दिल्याबद्दल कंपनीचे कौतुक केले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, सदर प्रकल्पात बेलोरा या गावची संपुर्ण शेतजमिन संपादीत होत असल्याने बेलोरा गावाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे व त्यासंदर्भाने पुनर्वसन करार करण्यात यावा.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

  • प्रलंबित सौर ऊर्जा कुंपण योजना राबविण्याकरिता इको-प्रो चे शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह

    प्रलंबित सौर ऊर्जा कुंपण योजना राबविण्याकरिता इको-प्रो चे शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वन्यप्राणी कडून होणारे शेतपिक नुकसान टाळण्यासाठी प्रलंबित राज्यव्यापी “सौर ऊर्जा कुंपण योजना” राबविण्याची तसेच प्रत्येक शेतकरीला लाभ देण्याच्या मागणिकरिता इको-प्रो चे “शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह” आज चंद्रपूर वनवृत्त कार्यालय समोर करण्यात आले. सत्याग्रह आंदोलन नंतर इको-प्रो तर्फे मागणीचे निवेदन मुख्य संरक्षक यांचे मार्फत शासनाला देण्यात आले.

     

    यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्याग्रह करण्यात आले यात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, भारती शिंदे, प्रितेश जीवने, सचिन धोतरे, सुधीर देव, अतुल इंगोले, प्रकाश निर्वाण, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा सहभागी झाले होते.

     

    मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये शेतकरी-शेतपिक संकटात तर सहजीवन कसे शक्य होईल

    चंद्रपूर जिल्हयात मानव वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला असुन यात मनुष्यहाणी, वन्यप्राण्याकडुन पाळीव जनावरांची शिकार सोबतच शेतपीक नुकसानीची समस्या मोठी आहे. वनव्याप्त, वनालगतच्या शेतीच नाहीतर सर्वच शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला असुन रानडुक्कर व रोही मुळे शेतपीक नुकसानीत प्रचंड वाढ झालेली आहे. चंद्रपूर जिल्हासह संपुर्ण विदर्भात वनालगतच्या शेतशिवारात वन्यप्राण्यांकडुन होणारे शेतपीक नुकसान वाचविण्याकरीता मोठया प्रमाणात तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात येत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर या जिल्हयात अनेक वाघ व वन्यप्राणी मृत्युच्या घटना समोर आलेल्या आहेत. या घटनेमुळे या शेतकÚयावर वनविभागकडुन व विदयुत विभागकडुन सुध्दा करण्यात आलेल्या कायदेशीर कार्यवाहीला सामोरं जावे लागत आहे. त्याशिवाय अनेक शेतकरी व शेतमजुर सुध्दा या विदयुत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने मृत होण्याचा घटना होत आहेत. शेतकरी बांधवाची अवस्था ‘एकडे आड तिकडे विहीर’ अशी होत असते. शेतकरी बळीराजा आणी जंगलाचा राजा वाघ दोन्ही सुरक्षित राहणार तरच सहजिवन शक्य होइल, याकरीता इको-प्रो चे प्रयत्न चालविले जात आहे.

     

    सौर ऊर्जा कुंपण प्रभावी उपाय

    शासन व वनविभाग सुध्दा याबाबत गंभीर आहे मात्र कार्यवाही तत्परतेने होणे गरजेचे आहे. वाघांचा व वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या वनव्याप्त तसेच वनालगतच्या शेतशिवारात शेतपीक संरक्षणासाठी विदयुत प्रवाह सोडल्याने होणारे वन्यप्राणी मृत्यु रोखण्यासाठी, तसेच शेतपीक नुकसान वाचविण्याच्या दृष्टीने प्रभावी असेलेले ‘सौर उर्जा कुंपन’ योजना राबविण्याची गरज आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मागील 8-10 वर्षापासुन सदर ‘सौर उर्जा कुंपन’ अनुदान तत्वावर देण्यात आल्याने येथील शेतपीक नुकसान आणी विदयुत तारेचे कुंपण लावण्यावर नियंत्रण आले आहे, आणी या योजनेचे चांगले परीणाम दिसुन येत आहे. मात्र ही समस्या फक्त बफर क्षेत्रात नसुन जिल्हयात सर्वत्र असताना, सोलन कुपंनाची मागणी असताना फक्त बफर, काॅरीडोर मधील क्षेत्र करीताच नाहीतर प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरीपर्यत ही योजना पोहचली पाहीजे. मात्र अनेक वर्षापासुन वनविभागाची ही महत्वपुर्ण योजना मात्र प्रलंबीत आहे.

     

    व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनेसुध्दा शेतकरी बांधवाची शेतपीक नुकसानीची समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणुन बफर च्या धर्तीवर चंद्रपूर जिल्हयासह विदर्भातील सर्वच जिल्हयात ‘शेतपीक वाचविण्याच्या दृष्टीने’ वनव्याप्त शेतकरीकरीता ‘मागेल त्यास सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्वावर राबविण्यात यावे अशी मागणी इको-प्रो संस्थेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी इको-प्रो तर्फे बरेचदा पाठपुरावा व आंदोलन सुध्दा करण्यात आले मात्र अदयापही अनेक शेतकरी, अनेक गावात, जंगलापासुन लांब असलेले गांवात सुध्दा ही समस्या असंताना ते सुध्दा शेतकरी यापासुन वंचीत आहे. परीणामतः शेतकरी, गावकरी यांची वन्यप्राणी व वनविभाग यांचे प्रती नकारात्मक भावना दिवसागणीक वाढ होताना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन शासनाची प्रलंबीत ‘सौर उर्जा कुंपण योजने’चा लाभ प्रत्येक शेतकरीला देणे अत्यंत महत्वाचे आहे. यात बफर, काॅरीडाॅर वनक्षेत्र नाही, जंगल नाही अशा भागात सुध्दा शेतपीक नुकसान तृणभक्षी प्राणीकडुन होत असल्याने प्रत्येक शेतकरीला लाभ देण्याची मागणी आहे.

  • नवीन शिक्षण धोरणातून ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा – डॉ. सुखदेव थोरात यांचे मत

    नवीन शिक्षण धोरणातून ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा – डॉ. सुखदेव थोरात यांचे मत

    News34 chandrapur

    चंद्रपूर: प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करून नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतून संविधानाला छेद देऊन कोवळ्या वयापासूनच मुलांमध्ये ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा असल्याचा आरोप यूजीसी चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केला.
    स्थानिक प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात दिनांक 17 रोजी विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषद संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उद्घाटन सत्रात (आॅन लाईन) बोलत होते.

     

    शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शिक्षण संघर्ष समन्वय समितीचे मुख्य समन्वयक रमेश बीजेकर होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष नेत्ररोग तज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे होते यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी विचार पिठावर धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ताभाऊ हजारे, समता सैनिक दलाचे खुशाल तेलंग, मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अनवार अली, पुरोगामी ग्रामीण पत्रकार संघाचे किशोर पोतनवार, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉक्टर सतीश कन्नाके, राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे दीपक जेऊरकर, गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष चमकोर सिंग बसरा आदिंची उपस्थिती होती.

     

    पुढे बोलताना थोरात म्हणाले की केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना ते संसदेसमोर चर्चेला ठेवले नाही आणि ते अत्यंत कमी वेळात लोकांवर लादले. या धोरणातील अनेक तरतुदींमुळे ओबीसी, एस सी एसटी समुहातील विद्यार्थी तसेच मुलींना शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धोरणाचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यकर्त्यांपर्यंत या धोरणाचे धोके व दष्परिणाम पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून जो चुकीचा अजेंडा राबविला जात आहे त्याबाबत विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना शिक्षण बचाव समन्वय समितीचे निमंत्रक रमेश बीजेकर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण हक्क कायद्यामुळे केजी टू पीजी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा आहे. असे असताना केंद्र सरकारने 2020 मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडविले आहे. ज्यांच्याकडे पैसा तोच शिक्षण घेऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणारा हा कायदा आहे. त्यामुळेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाला सर्व स्तरातून विरोध होत आहे. शिक्षण वाचविण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध चळवळीच्या माध्यमातून शासनाचा हा अजेंडा आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

     

    प्रास्ताविक व भूमिका डाॅ. राकेश गावतुरे यांनी केले. उद्घाटन सत्राचे संचालन ऍड प्रशांत सोनूले आभार भास्कर मून यांनी मानले. परिषदेला विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर संतोष सुरडकर गुन्हा विद्यापीठ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची चिरफाड केली आणि बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यासाठी आणि 85 टक्के समूहाला शिक्षणा पासून दूर करण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण कसे कारणे विठ्ठल याची मीमांसा केली तर वाशिमचे रेणुकादास उबाळे यांनी शिक्षण हक्क कायद्याचा विवाह केला आणि तो कायदा सुद्धा पूर्णतः शिक्षणाला न्याय देणारा नसला तरी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्या कायद्याला विपरीत असे धोरण कसे आखले गेले याचा उलगडा केला तसेच डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्त्रियांच्या शिक्षणावर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम कसा होईल याची मीमांसा केली आणि एकूणच समाजावर याचा विपरीत प्रमुख परिणाम कसा होईल हे स्पष्ट केले.

     

    या सत्राचे अध्यक्ष भाषण करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिराचंद बोरकुटे यांनी असा असेवैधानिक शैक्षणिक धोरण राबवणाऱ्या सरकारला उचलून टाकले पाहिजे असे आवाहन उपस्थित यांना केले सत्राचे सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्राध्यापक माधव गुरणुले यांनी केले
    तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये डॉक्टर सचिन भेदे यांनी भारतीय शिक्षणाचा इतिहास हा सुद्धा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण हे प्रतिक्रांतीचे लक्षण आहे अशी मीमांसा केली गडचिरोलीतील प्रसिद्ध आदिवासी आंदोलक देवाजी तोफा यांनी भावा नाटे मावा सरकार ची संकल्पना उद्धत केली आणि आपल्याच सरकारला आपणच निवडून दिलेले असताना आपले सरकार आपल्या गावात का असू नये असा प्रश्न केला आणि सरकार जर आपलेच आहे तर इथल्या जल जंगल जमीन या संपत्तीवर जनतेचाच अधिकार आहे हे स्पष्ट केले या परिषदेत एकूण 14 ठराव घेण्यात आले आणि ते आबाजी मतदानाने मंजूर करण्यात आले ठराव वाचन सामाजिक कार्यकर्ता जितेश कुळमेथे यांनी केले.

     

    या शब्दाचे अध्यक्षता कुरपणा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर गेडाम यांनी केली आणि केवळ परिषद घेऊन न थांबता त्याच्या पाठोपाठ तळागडातील गाव खेड्यामध्ये ही शिक्षण बचाव मोहीम राबविण्याचे आवाहन श्रोत्यांना केले परिषदेच्या यशस्वीतेसाठी
    भीम आर्मीचे सुरेंद्र भाऊ रायपुरे, अविनाश आंबेकर, विजय मुसळे, प्राध्यापक डहाके, इरफान शेख, अमोल खोब्रागडे, नंदकिशोर शेरकी, वाशिमचे गजानन धामणे,
    एडवोकेट पुनमचंद वाकडे यांनी परिश्रम घेतले.

  • आक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

    आक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 17 डिसेंम्बर ला चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यासाठी पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

     

    मात्र या मेळाव्यापुर्वी एक दुःखद घटना घडली, मेळाव्याला येताना संजय नगर येथे राहणारा युवासेनेचा कार्यकर्ता 29 वर्षीय रवि निषाद चा अपघात झाला, या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    18 डिसेंम्बरला ही बाब आमदार भास्कर जाधव यांना कळली असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत रवि निषाद च्या तब्येतीची विचारपूस केली, त्यावेळी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, रवि च्या उपचारात हलगर्जीपणा नको असे सांगत स्वतः रवि ला 25 हजार रुपयांची रोख रक्कम देत मदत केली, पुन्हा काही मदत लागल्यास सांगा व आपली काळजी घ्या असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. रवीला सध्या नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आमदार जाधव यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचा कार्यकर्त्यांप्रति असलेला संवेदनशीलपणा पुढे आलेला आहे.
    भाषणात आक्रमक असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी दाखविलेला संवेदणशिलपणाची शिवसैनिकात जोरदार चर्चा रंगली होती.

  • चंद्रपुरात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

    चंद्रपुरात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ‘जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. अशा विविध योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवून विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केले.

     

    नियोजन भवन सभागृह येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप कांबळे, महाराष्ट्र भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी भाजपा महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, रवी आसवानी, सूरज पेदुलवार,संजय कंचर्लावार,विशाल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    निराधार योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘संजय गांधी निराधार योजनेची बैठक मी आग्रहाने घ्यायचो. निराधार, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत व ज्यांना सहकार्याची गरज आहे अशा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्परतेने कार्य केले आहे. 2 एप्रिल 2010 ला राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा ‘गरीबो के सन्मान में, भाजपा मैदान मे’ या घोषणेनुसार स्वतःला कामात झोकून दिले. गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 600 रुपयांवरून 1200 रुपये करण्याचे सौभाग्य लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1200 रुपयांचे अनुदान 1500 रुपये केले.

     

    ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले,’ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटूंब प्रमुखांचा (स्त्री/पुरुष) अचानकपणे मृत्यू झाल्यास 2013 च्या अगोदर त्याचे अनुदान 10 हजार रुपये होते. हा प्रश्न केंद्र शासनाशी संबंधित होता. मात्र, केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करून ही मदत 10 हजारांवरून 20 हजार रुपयांवर नेली. गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारे जगातील एकमात्र नेते देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत. कोविडच्या संकटात संपूर्ण देश संकटात होता. त्यावेळी देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करत होते. जगातील श्रीमंत देशांना जे शक्य झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणले आणि कोरोना नियंत्रित करण्यासाठी निःशुल्क लस उपलब्ध करुन दिली.

     

    गरिबांसाठी 10 हजार घरे

    चंद्रपूर येथील म्हाडामध्ये गरिबांसाठी 10 हजार घरे बांधण्याची मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून गरिबांना अतिशय अल्प दरात घरे उपलब्ध होणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    नागरिकांच्या सेवेसाठी तीन निर्णय

    गरिबांची सेवा करण्यासाठी तीन निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक अडचण व पैशांअभावी गरिबांची नेत्रचिकित्सा होत नाही. याचा विचार करून चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे फिल्म सिटीच्या माध्यमातून आय हॉस्पिटल ऑन व्हिल तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून वस्त्यांमध्ये नागरिकांच्या दारात पोहोचून निःशुल्क नेत्रचिकित्सा केली जाणार आहे. गेल्या वर्षी मुबंईच्या फोर्टीस हॉस्पिटलला लहान मुलांच्या हृदयावर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच यावर्षी 25 लहान बालके ऑपरेशनसाठी मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलला पाठविण्यात आली आहेत. निश्चितपणे हे पुण्य कमविण्याचे भाग्य लाभले, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

     

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्प यात्रा

    गरिबांसाठी असलेल्या योजना व त्या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहोचावी यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसीत भारत संकल्प यात्रा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 12 कोटी शौचालये येत्या नऊ वर्षात बांधून पूर्ण झालीत. 2009 ते 2014 मध्ये सरकार नसताना राजीव गांधी घरकुल योजनेतून 1 लक्ष 50 हजार घरांना मंजुरी दिली होती आणि महाराष्ट्रात फक्त 4 हजार घरे पूर्ण झाली. आज देशामध्ये 4 कोटी घरे मंजूर केली आणि साधारणतः 3 कोटींपेक्षा जास्त घरे बांधून पूर्ण झाली याचा अभिमान आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    महिलांसाठी उज्वला योजना

    देशात 2014 पर्यंत घरगुती सिलेंडरचा वापर करणारे देशात फक्त 14 कोटी कुटुंब होते. आता उज्वला योजनेच्या माध्यमातुन 32 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.

     

    दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग

    दहा वर्षांत दिव्यांगाना 600 ते 700 तीन चाकी सायकल वितरीत करण्यात आले तर चार वर्षांमध्ये 1000 बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल देण्यात आल्या. दिव्यांगांसाठी मोठी योजना करण्यात येत असून या योजनेचा लाभ गोरगरीब दिव्यांग बंधू-भगिनींना होणार आहे. लवकरच ही योजना प्रस्तावित करण्यात येईल. या संदर्भात शासनाने स्वतंत्र दिव्यांग विभाग तयार केला आहे. या माध्यमातून दिव्यांगाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यादृष्टीने कार्य केले जाईल, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

     

    शासन आपल्या दारी

    सर्व जिल्ह्यांमध्धील विविध प्रश्न वेगाने मार्गी लागावे म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गरिबापर्यंत शासन पोहोचेल, अशी ही योजना तयार करण्यात आली असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

    बिलकिस शेख जाकीर शेख, जिजाबाई जेंगठे, निर्मला राजू तपासे, परमानंद दत्ता, प्रियंका त्रिसुळे, रत्नमाला देशभ्रतार, राममुरत बिरबल यादव, सुजाता विश्वास, उर्मिला ठाकूर आदी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावण बाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

  • चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरात 17 डिसेंम्बरला शिवसेनेचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव पक्षाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले.

     

    गडचिरोली दौरा आटोपताच सायंकाळी जाधव चंद्रपुरात पोहचले, शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजप युतीचा इतिहास सांगितला, वर्ष 86-87 मध्ये जेव्हा युती झाली त्यावेळी भाजपला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी शिवसैनिक राबला, आज भाजप दिल्लीच्या तखतवर बसला आहे ते फक्त शिवसेनेमुळे, शिवसैनिक नसता तर राज्यात तुमची बिकट परिस्थिती असती मात्र भाजपने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी-कांग्रेस पक्षासोबत युती करीत सत्ता स्थापन केली पण आपल्या गद्दारानी भाजप सोबत जात ठाकरे साहेबांना धक्का दिला, ते म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादि व कांग्रेस सोबत गेलात म्हणून आम्ही वेगळे झालो मात्र अडीच वर्षे मंत्रिपद घेताना या गद्दाराना लाज वाटली नाही.

     

    कार्यक्रमापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या भव्य बाईक रॅली ने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले, सदर बाईक रॅली शहराचे भ्रमण करीत मातोश्री विद्यालयात कार्यक्रम स्थळी दाखल झाली.

     

    आयोजित कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, युवासेना सरचिटणीस रोहिणी पाटील, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.