Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    News34 chandrapur

    चिमूर –  वन विभागाच्या जंगलातून अवैध रेती उपसा करणाऱ्या चालत्या तरक्टर वरून मजदुर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास मुरपार मार्गावर घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

     

    चिमूर तालुक्यातील मुरपार – पीटीचूआ जंगलातील मुरपार मार्गावर अवैध रेती उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टर वरून आकाश धनराज सोंनटक्के हा युवक ट्रॅक्टर वर बसून असताना चालत्या गाडीतून खाली पडल्याने ट्रॉलीचे मागचे चक्के त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदना करिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    प्राप्त माहितीनुसार नाना मेश्राम यांचे मालकीचे बिना नंबर च्या ट्रॅक्टरने ट्रॅक्टर चालक रोशन रमेश जाधव रोज रात्री अवैध रेती उत्खनन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जास्तीत जास्त रेती उत्खनन करण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची माहिती मृत्काच्या नातेवाईकांनी दिली.

     

    मृतक आकाश धनराज सोनटक्के हा युवक 22 वर्षाचा असून आई वडिलांना एकटाच मुलगा होता. वडील अपंग असल्याने व आई शेतमजुरी करीत असल्याने उदरनिर्वाह भगविण्याकरिता आकाश नाना मेश्राम यांचे ट्रॅक्टर वर अवैध रेती उपसा करण्याचे काम करत होता.

     

    आकाशच्यां जाण्याने आई वडिलांवर संकट कोसळले आहे पण अवैध रेती उत्खनन बंद झाले नाही तर पुन्हा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. आता तरी महसूल प्रशासन. वनविभाग जागे होईल का.! की पुन्हा बळी घेण्याची वाट बघणार.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असून नर वाघ आहे.

     

    त्यावेळेस मोक्का पंचनामाच्या वेळी घटनास्थळी वन्यजीव प्रेमी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, बंडू धोत्रे एनटीसीए प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी, यांच्या उपस्थित मध्ये मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता शिंदेवाही वन विभागाच्या लकडा डेपोमध्ये नेण्यात आले व बातमी लिहे पर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.

     

    शव विच्छेदन डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ.शालिनी लोंढे पशुधन विकास अधिकारी शिंदेवाही, डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही, यांनी केले समोरील तपास सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, यांचे मार्गदर्शनात विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे करीत याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली अशी माहिती आहे.

  • चंद्रपुरातील दारू दुकानासमोर भजन आंदोलन करणार – राहुल देवतळे यांचा इशारा

    चंद्रपुरातील दारू दुकानासमोर भजन आंदोलन करणार – राहुल देवतळे यांचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हयाची दारूबंदी हटल्यावर जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आली होती, आधीच्या तुलनेत सध्या दुप्पट दारू दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आजही दारू दुकान मालक प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करीत नाही.

     

    त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या दारू दुकानासमोर मी भजन आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.

     

     

    सध्या शहरात दारू दुकानात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार सुरू करण्याची वेळ सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा मात्र ही वेळ दारू दुकान मालक पाळत नाही, त्यामुळे हे तात्काळ कुठेतरी थांबायला हवं यासाठी राहुल देवतळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सहित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री याना निवेदन दिले जर त्यानंतर दारू दुकान मालकांनी वेळेचे नियम पाळले नाही तर आम्ही राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे दारू दुकानासमोर भजन आंदोलन करू असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात देवतळे यांनी दिला आहे.

  • मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    News34 chandrapur

    वरोरा – वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे.
    खड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यां मध्ये वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

     

    असाच प्रकार नंदोरी येथील पंकज जैन खदानीच्या परिसरात घडला असुन नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखे चे ढिगारे खचून पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

     

    यामध्ये मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जन स्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय 60, व मुलगा योगेश जंगेल वय 27 यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृतक बाहेरील राज्यातील असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना झाली असल्याचे समजते.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः एक महिन्याच्या आत मध्ये येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार प्रतिभाताई धानोकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज देणारी आणि शेतकऱ्यांना अडी अडचणीच्या काळात सांभाळून घेणारी बँक आहे. मात्र, याला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अपवाद आहे. सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे .आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत होत्या. परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना, देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या सहा वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरवव्यवहाराचा कळस गाठला आहे. 2023 ला झालेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. बँकेच्या सहा संचालकावर आणि पाच कर्मचाऱ्यावर गुन्हे देखील दाखल केलेले आहे, आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली.

     

    2020 मध्ये देखील बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आरोग्याचे कारण दाखवून पाल्यांना अनुकंपतत्वावर नोकरी दिली. तसेच खरेदी घोळ झाल्याने दोन संचालकांना म्हणजे एकूण सात संचालकावर गुन्हे दाखल झाले. या बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे. 3.97 कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यांनुसर नोटीस देखील बजावल्या गेल्या. बँकेतील सीईओ कल्याणकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेचा पदभार त्यांच्याकडे आहे. रिझर्व बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही. परंतु रिझर्व बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये सीओवर असणाऱ्या दोन गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळांनी लपवली आणि रिझर्व बँक व नाबार्डची यांनी देखील फसवणूक केली. या संदर्भात देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. परंतु त्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या लक्षवेधी नोटमध्ये या बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख केला आहे. त्यात नोकर भरतीचा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, सीईओवर गुन्हे दाखल असतानाही त्यांची नेमणूक, बँकेचा एनपीए वाढणे, बँकेच्या किरायाच्या जागेवर शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे खर्च करणे, संगणक खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करणे, शेतकरी भवनसाठी जास्त वेळ घेणे, शेतकऱ्यांच्या सहकार संस्थांना मतदानाचा अधिकार नाकारणे, शेतकरी कल्याण निधीचा वापर सर्रास करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.

     

    सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या बँकेच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला स्टे उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ नेमले जाईल. त्यावेळी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई केली जाईल.”असे मंत्री म्हणाले.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वळसे पाटील यांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

  • धक्कादायक – चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता

    धक्कादायक – चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता

    news34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये महिलांची काढलेली विवस्त्र धिंड शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी आहे. मात्र, अनेक दिवसाचा कालावधी लोटून अजूनही त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही.”

     

    चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्यात 3500 अधिक 16 ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का?” असा सवाल करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “फेसबुक व्हाट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशा प्रकरणातून महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

     

    “अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा सरस्वती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो त्यामुळे खरच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का असा प्रश्न त्यांनी केला.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लवकरच शक्ति कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.”

    चंद्रपूर येथील कोळसा उद्योगातून एका निष्पाप महिलेची हत्या राजुरा येथे घडली. देखील अशी प्रकरणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

  • चंद्रपूरसह वरोरा, मुल, पोंभुर्णा एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार

    चंद्रपूरसह वरोरा, मुल, पोंभुर्णा एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार असून, नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्य देणार असे आश्वासन उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिली.

     

    चंद्रपूर बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना भेटून याबाबत निवेदन दिले. यावेळी पवन अगदारी उपस्थित होते.

     

    चोखारे यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अलिकडच्या काळात जिल्ह्याची ओळख पुसली जात आहे. जिल्ह्यातील उद्योग कमी होत आहेत. त्या तुलनेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा, राजुरा, तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले नाहीत. बहुतांश एमआयडीसी परिसर ओसपडल्याचे दिसून येत आहे.

     

    चंद्रपूर शहर उद्योगांचे शहर आहे. कोळसा खाणी, वीज केंद्र, एमईएल, असे कारखाने शहराच्या सभोवताल आहेत. तरीही जिल्ह्याचे स्थान आणि वाढती बेरोजगारी टाळण्यासाठी शहरासाठी दाताळा मार्गावर एमआयडीसीची उभारणी करण्यात आली आहे. या एमआयडीसीतही काही उद्योग उभे झाले आहेत. मल्टीऑर्गनिक हा उद्योग सोडला तर डोळ्यात भरण्याएवढा मोठा उद्योग या परिसरामध्ये नाही. काही उद्योग एमआयडीसीत दिसत असले तरी अनेक जमिनी अद्यापही रिकाम्या आहेत.

     

    उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर स्वस्तात भूखंड मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी विविध एमआयडीसीत भूखंड घेतले. आश्चर्याची गोष्ट अशी की या भूखंडधारकांचा उद्योग भूखंड बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही अशा एमआयडीसीचा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एमआयडीसीत काहीच दिसून येत नाही.

     

    शासनाला विविध शहरातील एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर ज्यांनी ज्यांनी येथील भूखंड बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. भूखंड परत घेतल्यानंतर नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा अशी विनंती चोखारे यांनी केली.

    या विनंतीवर बोलताना उद्योग मंत्री उदयजी सामंत म्हणाले की, योग्य ती चौकशी करून स्थानिकांना प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सविस्तर चर्चा झाली.

  • आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.

     

    कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.

  • चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.

     

    दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

     

    यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.

  • खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकवीताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर – काम्पा मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

     

    चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही.

     

    या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत. आज दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंक्ररपुर येथे उपचार सुरू आहे.

     

    या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी डॉ सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला. बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले