Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून प्रथमच मराठीत तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा गॅझेटिअरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित झाले आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना ठेवण्यात आले होते. बल्लारपूर येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

     

    चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकिंग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्यात आल्याचे गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले.

     

     ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेनिमित्त देशभरातून येणा-या खेळाडूंना चंद्रपुरचे वैभव, सांस्कृतिक वारसा व इतिहास तसेच प्रेक्षणीय स्थळांची माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेनुसार ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ ही हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचेही प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात करण्यात आले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    News34 chandrapur

    गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) गुरुवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्यानंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली. तारडाचे शिवसेना (उबाठाचे) सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

     

    स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रेती तस्करी केल्या जात आहे.जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची(३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लक नव्हता मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत स्टॉक व्यतिरिक्त पुन्हा नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.

     

    नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली.शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळावरून पळ काढला.

     

     

    जखमींच्या बयानानुसार ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे, आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

     

    या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सरपंच तरुण उमरे हे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे व विशेष बाब म्हणजे पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासहित दोघांवर गुन्हे दाखल केले आहे, सदर प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

     

    याबाबत गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आरोपी स्वप्नील काशीकर हे सध्या पसार झाले आहे त्यांना पकडण्यासाठी पथक निघाले आहे, महत्वाची बाब म्हणजे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की ज्यावेळी हा वाद मारहाण झाली त्यावेळी मी तिथे नव्हतो याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे देखील आहे, मला या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    ठाणेदार राजगुरू यांना कदाचित काशीकर यांची लोकेशन मिळत नसेल अन्यथा पोलीस विभाग मोबाईल लोकेशन घेऊन सुद्धा आरोपीना अटक करतात, फक्त गोंडपीपरी पोलीस याला अपवाद ठरली आहे, जिल्ह्यात अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे,  प्रशासनाच्या संमतीने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे, प्रशासनाची संमती असल्याशिवाय अवैध वाळू माफिया इतकी हिम्मत करु शकत नाही.

  • मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंम्बरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल मुनगंटीवार यांचं भरभरून कौतुक केले.

     

    उदघाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दास, पद्मश्री बहाद्दूर सिंग चव्हाण, ललिता बाबर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदींची उपस्थिती होती.

     

    स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.

     

    यावेळी धावपटू हिमा दास यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभूतपूर्व आयोजनाबद्दल आभार मानले, सोबतच सर्व खेळाडूंना खेळात आपल्या राज्याचे नाव उंचवावे असे आवाहन केले.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या भूमीत आपण आपल्या राज्याचे नाव उंचवायला आले आहेत इथं आल्यावर वाघाची वृत्ती आपल्यात आणा, आपण विविध राज्यातून आलात मात्र राज्यसहित व देशाचं नाव आपण सर्वांनी पुढे न्यावे असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

     

    मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गवगवा केला, देशात मागील 50 वर्षात जे झालं नाही तसा विकास पंतप्रधान मोदी यांनी केला आहे, पंतप्रधान मोदी यांचे फिट इंडिया स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, व पुढे मिशन ऑलम्पिक चे ध्येय आपण पुढे ठेवावे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तालुका ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन, हे मुनगंटीवार यांना चांगलेच जमले, मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला या शब्दात शिंदे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांचं कौतुक केले.

    आयोजित स्पर्धा उदघाटन प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

     

     

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाला अधिकाऱ्यांनी लावला बट्टा

    खेळाडूंचा काढता पाय
    पाहुण्यांचे भाषण लांबताच खेळाडू बाहेर निघाले

    आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे भाषण लांबल्याने खेळाडूंनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. धावपटू हिमा दास यांच्या भाषण दरम्यान खेळाडूंनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केले हे विशेष.

     

    पोलिसांवर भरोसा नाय का?

     

    राष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना सुद्धा आयोजकांनी खाजगी बाऊन्सर लावले, भाषण लांबल्याने खेळाडू बाहेर जात असताना बाऊन्सर त्यांच्या मार्गावर आडवे होत त्यांना खाली बसवीत होते. या प्रकाराने काही खेळाडू अक्षरशः घाबरून गेले होते, त्यांनी बाहेर निघण्यासाठी दुसरा मार्ग निवडला.

     

    भविष्यातील हे मोठे खेळाडू आणि हे नियोजन?
    National athletic
    कार्यक्रम संपल्यावर खेळाडूंना माल वाहतूक करणाऱ्या वाहनात नेण्यात आले

    कार्यक्रम संपला, नागरिक घरी निघाले, पाहुणे आपल्या मार्गावर निघाले मात्र अश्यातच माल वाहतूक करणाऱ्या वाहनात स्पर्धेत सहभागी खेळाडूंना नेण्यात आले, आहो कुणी जनावरांना सुद्धा असे नेत नाही, आणि आपले अधिकारी त्यांना अशी वागणूक देतात हे बरं नाही, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेतली मात्र आयोजन समिती मधील जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी काही प्रमाणात कार्यक्रमाला बट्टा लावलाचं

  • चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे.

    दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी उपस्थित केला आहे. हि निविदा काढण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला असून, चंद्रपूरच्या जनतेचा पैसा इतर ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार आयुक्त विपीन पालीवाल यांना कोणी दिला, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी ही निविदा काढण्यात आली, असा आरोप केला आहे.

    चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी जावक क्रमांक: चंशमनपा/विद्युत्त/२०२३/३१० दिनांक : २२/१२/२०२३ नुसार ई-निविदा सुचना काढली आहे. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, जि. चंद्रपूर यांचे वतीने खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई निविदा पद्धतीच्या पंजीबद्ध कंत्राटदाराकडून/फर्मकडुन ई निवीदा मागविण्यात आल्या. निवीदेच्या विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/१२/२०२३ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील कामाचे नाव चंद्रपुर व बल्लारपूर शहरात ४ एल.ई.डि. स्क्रिन उभारणीचे काम असे दाखविण्यात आले आहे. ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक दिनांक २२/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ ला दु. १२.०० वाजेपर्यंत आणि ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक दिनांक २८/१२/२०२३ ला दु. ३.०० वाजता असे नमूद आहे. ही जाहिरात एका स्थानिक दैनिकांत देण्यात आली आहे.

     

    राईकवार यांनी सांगितले कि, चंद्रपूर महानगरपालिका आणि बल्लारपूर नगरपालिका या दोन स्वतंत्र संस्था आहेत. कोणतेही काम करताना सीमेच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यांनी केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी हा निविदा काढली. या निविदामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिजोरीवर वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे अवास्तव खर्च टाळण्यासाठी ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राईकवार यांनी केली आहे.

  • चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

    चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील राखीव सवलतीच्या दिवसातून ही सवलत मंजूर करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन व त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असेही जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशात नमूद आहे.

  • चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

    चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आपल्या श्वान पथकातील निवृत्त झालेल्या श्वानांचा निरोप समारंभ आयोजित करीत या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली आहे.

     

    दिनांक 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस दलातील बॉम्बशोधक पदकाचे श्वान ग्रेसी आणि सिंबा हे आपली सेवा कार्यकाल निभावून यशस्वीपणे पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले.

     

    त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता यासाठी त्यांचे सर्व मित्र म्हणजेच पोलीस दलातील श्वान पथकाचे(डॉग Squad) सदस्य श्वान पवन, हरी ,अर्जुन, मंगल ,बोल्ट ,मेरी ,व्हिक्टर ,मेस्सी , आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या शानपथकात दाखल झालेले रियो आणि कोको हे हजर होते.

     

    त्यांचे हँडलर देखील विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी गृह पोलीस उपाधीक्षक गृह श्रीमती राधिका फडके राखीव पोलीस निरीक्षक श्री नवघरे श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील हे यावेळी उपस्थित होते.

     

    यावेळी निवृत्त होणाऱ्या ग्रेसी आणि सिंबा या सत्कारमूर्तींचा शाल आणि पुष्पहार घालून त्याचप्रमाणे मानाची झूल घालून सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

    त्याच त्याच वेळी सर्व श्वान दोस्ताना मेजवानी देखील देण्यात आली, या समारंभात उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार हे भावुक झालेले होते.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 27 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात आगमन होणार असून ते 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे.

     

    मुख्यमंत्री शिंदे यांचे सायंकाळी 4.45 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता बल्लारपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

  • शाळा परिसरातील तंबाखू विक्री,  सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

    शाळा परिसरातील तंबाखू विक्री, सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

     

    राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गौडा यांनी वरील आदेश दिले.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) राजकुमार हीवरे, आरोग्य विभागाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर उपस्थित होते.

     

     जिल्हाधिकारी यांनी यावेळी सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत विविध बांबींचा आढावा घेतला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहिमेंतर्गत पोलिस व शिक्षण विभागाची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, शिक्षण विभाग समग्रचे समन्वयक सुर्यकांत भडके, उपशिक्षणाधिकारी निखीता ठाकरे, अन्न सुरक्षा अधिकारी जी. शी. सातकर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

  • १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम

    १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

     

    ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे.

     

    यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

     

    व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.

     

    स्पर्धेची रोख पारितोषिके

    एकांकिका स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २,००,०००/- (खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट १,००,०००/-, उत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्तम रू. ५०,०००/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रू. २५,०००/-

     

    बालनाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्कृष्ट रू. ५०,०००/-, उत्तम रू. २५,०००/-, तर तीन उत्तेजनार्थ रू. १०,०००/-

     

    नाट्य अभिवाचन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

    नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

     

    एकपात्री / नाट्यछटा स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्कृष्ट रू. १०,०००/-, उत्तम रू. ५,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. २,५००/-, लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु. १५,०००/-, रु. १०,०००/- , रु. ५०००/- व स्मृतीचिन्ह. बालनाट्य स्पर्धेसाठी रु. ७५००/-, रु. ५०००/-, २५००/- देण्यात येणार आहेत.

     

    तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.

     

    नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवाचा मान मिळालेल्या विभागाचे नाव, केंद्र प्रमुख आणि सहयोगी प्रमुख यांची नावे आणि संपर्क खालीलप्रमाणे :

    विभाग चन्द्रपुर केंद्र प्रमुख डॉ जयश्री कापसे गावंडे ,सहयोगी इरफ़ान शेख़ , जगदीश नंदूरकर असून या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या चंद्रपूर केंद्राची प्राथमिक फेरी दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी या दरम्यान नाट्य संगीत पद गायन स्पर्धा, नाट्यछटा व नाट्य वाचन स्पर्धा, एकांकिका, बालनाट्य इत्यादी स्पर्धा होणार आहेत.

     

    स्पर्धकांनी इरफान शेख संपर्क क्रमांक
    9665413821, जगदीश नन्दुरकर संपर्क क्रमांक
    9545501940, स्वप्निल मेश्राम 8766545955
    यांचेशी संपर्क साधावा.

    जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. यापूर्वी आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे.

     

    करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले होते. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली होती. एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही.

     

    त्यातही नोंदणी मोबाईलवर आनलाईन करुन घेतांना नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून अजूनही हजार शेतकरी नोंदणी पासून वंचित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेत शेतकऱ्यांचे हजार अर्ज येऊन पडले असताना नोंदणी करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ ला संपत आहे. त्यामुळे हजार शेतकरी पुन्हा नोंदणी पासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी शेकडो शेतकरी बांधवांसमोर सांगितले.

     

    यासाठी नोंदणी साठी राहून गेलेले शेतकऱ्यांसाठी परत १५ दिवसाची मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.