Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले 

    मुल – केंद्र सरकार गरीब व गरजु लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना माञ गावातील सरपंच यांनी चक्क नातेवाईक व धनधांडग्याना लाभ देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सिंतळा येथील जनतेनी केला आहे.

     

    पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या सिंतळा येथील गरीब व गरजू लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक पात्र असलेल्यानी प्रयत्न केला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आपली मनमानी कारभार करून पात्र असलेल्या अनेकांना डावलून आपल्या नातेवाईक व आर्थिक दृष्टया सक्षम असेलल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावात होणारी ग्रामसभा नाममात्र घेवुन कुठल्याही आपल्या मर्जीतील लाभ दिला जात आहे.

     

    त्यामुळे अनेक जण घरकुल योजनेपासुन वंचित होताना दिसत आहेत.तरी देखील तहकुब झालेल्या ग्रामसभेत सरपंच, सचिव व सदस्यांनी नमो घरकुल योजनेच्या यादीत हेराफेरी करून स्वतःच्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनानी केला आहे. गावात अनेक जणांचे पडके घरे असताना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

     

    याबाबत चौकशी करून खऱ्या लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा अशी आर्त हाक पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आली असून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी अशी मागणी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी सरपंच जनार्दन भूरसे, व गावातील अन्याय ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

  • केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना
    मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.
    कोणताही वाहन चालक जाणून बुजून अपघात करीत नाही.

     

    कळत नकळत सुद्धा अपघात होतात ही वस्तूस्थिती आहे. म्हणून अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात. परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे स्वतःच्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

     

    आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा असल्याने असा कायदा रद्द करावा अशी मागणी काळी पिवळी ट्रक्स संघटना व चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

    (गाडी चालक मालक संघटनेला तालुका काँग्रेसचा पाठिंबा)

    मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या काळी पिवळी व चालक मालक संघटनेच्या समस्त चालक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करून याबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

     

    ही मागणी रास्त असून चालकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून मुल तालुका काँग्रेसने कांग्रेस नेते जिल्हा सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात पाठींबा दर्शविला आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक संदीप कारंमवार ,संदीप मोहबे उपस्थित होते.

  • संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तुम्हा आम्हाला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केल होत. मात्र आता देशात आता एका विशिष्ट विचारधारेचे गुलाम बनविण्याचे काम सुरू असुन हे प्रचंड विघातक आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने बहाल केला आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या संविधानाचा कवच तोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पण आपल्याला तो प्रयत्न हाणुन पाडायचा आहे. कारण संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

     

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित श्रीमंत देवाजीबापु खोब्रागडे यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधन सभा कार्यक्रमात ते बोलत होते.
    यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन नेते अशोक निमगडे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील आंबेडकरी विचारवंत रंजित मेश्राम व भिमराव वैद्य हे हे होते.
    प्रमुख अतिथी म्हणून प्रविण खोब्रागडे, अॅड. राम मेश्राम, रोहीदास राऊत, मारोतराव खोब्रागडे, नंदु खणके, दौपदा डोर्लीकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
    पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवाजीबापु खोब्रागडे हे चंद्रपूरातील एक धनाढ्य व्यक्तिमत्त्व होते. पण त्यासोबत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची श्रीमंती मोठी होती. म्हणूनच त्यांना चंद्रपुरचे पहीले आमदार, बल्लारपूरचे पहीले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या प्रारंभापासून त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत ते निष्ठेने सोबत राहिले.
    त्यांनी आपला मुलगा राजाभाऊ खोब्रागडे यांना बॅरिस्टर बनवून बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आदेशित केले. एकंदरीत खोब्रागडे पितापुत्रांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरात 16 आॅक्टोंबर 1956 रोजी धम्मदीक्षा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाजीबापु खोब्रागडे हे होते. त्यावरून त्यांची महानता अधोरेखित होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  • चांदा एग्रो 2024 चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

    चांदा एग्रो 2024 चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात भाजीपाला संशोधन केंद्र मान्यतेचा कागद हाती आला. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार असल्याचा आनंद आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

     

    चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म.रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विनीता व्यास, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.

     

     

    चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे, असा विचार गत महिन्यातच आला. त्यानुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली. त्यासाठी मी कृषीमंत्री श्री. मुंडे यांचा व्यक्तिश: आभारी आहे.

     

    पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसीत झाले तरी शेतमाल हा मातीतच पिकविला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबु शेती, वनशेती, रानभाजी शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून 1 रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र हे जगात एकमेव उदाहरण आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतक-यांना राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून यात पशुप्रदर्शनी, 6750 किग्रॅ खिचडीचा विक्रम, 43 इंचाची पुंगनुर गाय, नोंदणी केलेल्या शेतक-यांना लकी ड्रॉ द्वारे शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीसे, सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण आहे. राज्याचा वित्तमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी 20 लक्ष रुपये देण्याचा निर्णय सर्वप्रथम आपणच घेतला, असेही त्यांनी सांगितले.

     

    85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा – कृषीमंत्री मुंडे

    केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतक-यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतक-यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतक-यांपैकी 85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतक-यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे.

     

    पुढे ते म्हणाले, आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लक्ष शेतक-यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, बचत गटाच्या महिला, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार आदींनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली.

     

    जिल्ह्यात दोन मधाचे गाव: चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन यासाठी प्रसिध्द आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्वाचा भाग होईल.

     

    नोंदणी करणा-या शेतक-यांनाच धानाचा बोनस : चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने धानाला 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.

     

    फर्निचर क्लस्टरकरीता 48 कोटी रुपये मंजूर : एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून लाकडावर कोरीव काम करणा-यांसाठी 48 कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे.

     

    नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ, मधाचे गाव म्हणून पिर्ली (ता. भद्रावती) चे उद्घाटन, मिशन जयकिसान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.

     

    यानिमित्त चंद्रपूर शहरातून जटपुरा गेट ते गांधी चौक, गांधी चौक ते नगीना बाग इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, पुरुष, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघाली.

     

    शोभायात्रेनंतर सवारी बंगला येथे प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, ओबीसी नेते, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा २०२४ निवडणुकीतील बहुजनांचे प्रतिनिधी राजेश बेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगीनाबाग सवारी बंगला येथे असलेल्या फुले दांपत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     

    यावेळी राजेश बेले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले या एक महान क्रांतिकारी आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांचे स्थान उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले.

     

    बेले म्हणाले की, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा. आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असेही ते म्हणाले.

     

    या मेळाव्यात बोलतांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
    यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  • मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर :-भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री संजय जी पवार चंद्रपूर यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही परंतु ओबीसी आरक्षणातून देण्यात येऊ नये. असे निवेदन देण्यात आले.

     

    या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, मीनाक्षी अलोने, कांता दखणे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धानेवार, निकेश पेटकर, प्रदीप गोविंदवार,मोहन जिवतोडे,आदी समाज बांधव उपस्थित होते. इतर मागास वर्गात एकूण 346 जाती आहेत त्यात 37 मुस्लिम जाती पण आहेत. राज्यात एकूण ओबीसींची संख्या 27% आहे मात्र आरक्षण 19% देण्यात येत आहे.

     

    ओबीसींना जाती-गणनेनुसार 27% आरक्षण देण्यात यावे हे अपेक्षित होते. त्यात मराठा समाजाचा १० टक्के लोकसंख्येचा भार का सहन करायचा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठा समाजातील १० टक्के लोकसंख्येचा भार ओबीसी आरक्षणावर पडेल व ओबीसी वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आपल्या जीवाची परवाना करता आमरण उपोषण सुरू केले ओबीसींना जागविण्याकरीता आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोतच परंतु ओबीसी नेतेच स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांना विसरलेले दिसतात.

     

    कुठे पोहोचले मनोज जरांगे पाटील, कुठे आहेत रवींद्र टोंगे पाटील. (त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते सांगा कोणासाठी लढायचे)हीच ओबीसींची खरी समस्या आहे. न्यायमूर्ती खत्री आयोग व न्यायमूर्ती बापट आयोगाने आरक्षण नाकारले होतेच. तेव्हा सदर आयोगाचाही विचार होणे गरजेचे आहे. आम्ही मराठा समाजास आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण शासनाने खुशाल द्यावे परंतु ओबीसीच्या कोट्याला न हात लावता आरक्षण देण्यात यावे.

  • नागरिकांना वाहतुकीचे कायदे गुलाबपुष्प देत समजाविले

    नागरिकांना वाहतुकीचे कायदे गुलाबपुष्प देत समजाविले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील अपघातांच्या घटनेवर नियंत्रण यावे यासाठी वाहतूक शाखा शर्थीचे प्रयत्न करीत आहे, विशेष म्हणजे दररोज विविध मोहीम राबवित वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा वाहतूक नियंत्रक शाखा करीत आहे.

     

    आज 2 जानेवारीला पोलीस स्थापना दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग व लायन्स क्लब च्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंत्रक शाखा कार्यालयासमोर वाहन चालकांना वाहतुकीच्या कायद्याबाबत जनजागृती करीत त्यांना पुष्प देण्यात आले.

     

    दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट, चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्ट, रिफ्लेक्टर बाबतीत माहिती देत त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले.

     

    ज्या वाहनांवर रिफ्लेक्टर नाही त्या वाहनांवर रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात आले, चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखेच्या या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र होत आहे.

     

    यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोशन यादव, प्रवीण पाटील सह उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी, लायन्स क्लब चे पदाधिकारी व वाहतूक शाखेचे संदीप जाधव हे उपस्थित होते.

  • चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे. अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

     

    त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे

  • चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

     

    या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

     

    43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

     

    आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :

     

    दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

     

    शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :

     

    कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

     

    कृषी प्रदर्शन :

     

    शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

     

    300 च्या वर स्टॉल :

     

    दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.

  • सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात.

     

    मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाहनचालक संघटनेने केले आहे.

     

    पत्रकार परिषदेला विनोद चांदेकर, कॉमे्रड प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाठे, विजय पवार, नितीन कोलारकर, सचिन वनकर, राजू काळे आदी उपस्थित होते.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..