Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चिमूर येथील शहीद बाबूराव शेडमाके चौकात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चिमूर येथील शहीद बाबूराव शेडमाके चौकात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अंन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण अचानक आंदोलन मागे घेण्यात आले होते.

     

    आज दिनांक १० जानेवांरी रोजी शहीद बाबूराव शेडमांके चौकात स्टरिंग छोडो आंदोलन करण्यात आले.
    नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे.

     

    अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

     

    त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. आज दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता पासून शहीद बाबूराव शेडमांके चौकात स्टरिग छोडो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकारी सोबत चर्चा करून मध्यस्ती केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

  • चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झाले असून हा कायदा तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरुवात केली आहे.

    10 जानेवारीला शहरातील वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन चालकांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, या रॅलीत जिल्हाभरातून वाहन चालक सामील झाले होते.

     

    हिट अँड रन हा कायदा सर्वांसाठी लागू आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्या हातून अपघात घडला तर 7 लाख दंड तर 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, जर हा कायदा परत घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.

     

    या आंदोलनात जय संघर्ष चालक मालक संघटना, लाल बावटा वाहन चालक मालक व इतर संघटना सामील झाल्या होत्या.

  • खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने क्रीडा संकुले उभारण्यात आली. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलन मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर पूर्णविराम मिळाला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून मतदारसंघातील तीनही तालुक्याला एकूण 25 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून लवकरच ही विकासकामे सुरू करण्यात येणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सिंदेवाही सावली व ब्रह्मपुरी अश्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मात्र क्रीडा साहित्य व इतर सोयी सुविधा अभावी आणि खेळाडूंना आपल्या खिलाडी वृत्तीचे प्रदर्शन करणे अवघड जाते. अश्या अनेक प्रतिभावंत खेळाडू व त्यांची प्रतिभा सर्वांपुढे यावी तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करावे या उदांत हेतूने राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील तीनही तालुक्यातील क्रीडा संकुलनामध्ये प्रलंबित असलेली विकास कामे याची मागणी रेटून धरत खेळाडूंकरिता पूर्णपणे शक्ती पणाला लावून शासनाकडून 25 कोटीचा निधी मंजूर करून आणला.

     

    यात सिंदेवाही येथील क्रीडा संकुला पाच कोटींचा विकास निधी प्राप्त झाला असून सिंथेटिक हॉकी टर्फ प्रेक्षक गॅलरी, बास्केटबॉल कोर्ट दुरुस्ती व चेनलिंग फेंसिंग क्रीडांगण समपातळीकरण 200 मीटर धावपथ दुरुस्ती, धावनपथाच्या एका बाजूला प्रेक्षक गॅलरी विथ रुपी पाणी व्यवस्था क्रीडा साहित्य आदी कामांचा समावेश आहे.तर ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुल मध्ये एकूण सात कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक इंनडोर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोरिंग बास्केटबॉल कोर्ट सिंथेटिकरण चेंज प्रेक्षक गॅलरी विथ रुपींग खेळांची मैदानी क्रीडा साहित्य विद्युतीकरण व अन्य विकास कामांचा समावेश आहे. तर सावली येथील क्रीडा संकुल मध्ये होऊ घातलेल्या विकास कामांकरिता एकूण 12 कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात बॅडमिंटन हॉल, ऑफिस, जिम हॉल, 400 मीटर धावनपत फुटबॉल मैदान संरक्षण भिंत कबड्डी ,खो-खो ,व्हॉलीबॉल मैदाने, क्रीडा साहित्य फर्निचर, पाणी सुविधा, अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.

     

    ब्रह्मपुरी मतदार संघातील या तीनही तालुक्यांमध्ये विकास कामांकरिता एकूण 25 कोटी असा मोठा विकास निधी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मिळाला असून ग्रामीण खेळाडूंना मैदानी स्पर्धा व स्पर्धा पूर्वतयारी याकरिता अधिकाधिक भाव मिळणार आहे. तसेच लवकरच तीनही क्रीडा संकुलनामध्ये विकास कामांना सुरुवात होणार असून खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    News34 chandrapur

    रमेश निषाद

    बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली.
    आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याबाबत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    या बाबत माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले.
    घटनास्थळी पाहणी केली असता वाघाचे हल्यात शामराव रामचंद्र तिडसुरबार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्यावेळी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात आले.

     

    सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.

  • नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

     

    नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

    दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

     

    या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

  • भोपाळचां नीरज सोलंकी ठरला चिमूर क्रांती मॅरेथॉनचां विजेता

    भोपाळचां नीरज सोलंकी ठरला चिमूर क्रांती मॅरेथॉनचां विजेता

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    नवीन वर्षाचे औचित्य साधून श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने चिमूर क्रांती मॅरेथॉन दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

     

    श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखऊन श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथील पटानगनातून दौड स्पर्धेला सुरुवात केली. बालाजी मंदिर ते पिंपळनेरी वॉर्ड पाच किलोमीटर व पिंपळनेर वॉर्ड ते बालाजी मंदिर पाच किलोमीटर अशी दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेत राज्यासहित विविध राज्यातून १९० सप्रधक सहभागी झाले होते. चिमूर मॅरेथॉन स्पर्धेतील खुल्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक भोपाळ येथील नीरज सोलंकी यांनी प्राप्त केला. आणि रेल्वे क्लबचे नागराज बुरसूने यांनी दुसरा. भोपाळ येथील उपेंद्र पाल यांनी तिसरा. नागपूर येथील राजन यादव यांनी चौथा. तर नाशिक येथील अंकित कुमार यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.

     

    सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार कीर्तीकुमार भांगडिया. पोलिस निरीक्षक मनोज गभने. नगर परिषद मुख्याध्यापिका डॉ सुप्रिया राठोड यांचे हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चाच्या पदाधीकऱ्यानी अथक परिश्रम घेतले

  • 43 इंच उंचीची पंगनूर गाय आपण बघितली काय?

    43 इंच उंचीची पंगनूर गाय आपण बघितली काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरात सध्या जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. यात विविध प्रकारचे पशुधन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून यात पंगनूर या गाईची प्रजाती अकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही गाय अवघी साडेतीन ते चार फूट इतकी असून दुधाळ गाय म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षातुन तीन हजार लिटर दुध देण्याची क्षमता आहे.

     

    3 जानेवारी पासून सुरू झालेल्या कृषी महोसत्वाचा आज शेवटचा दिवस, मागील 4 दिवसापासून कृषी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, बचत गटाचे स्टॉलवर अनेक शेतकरी व नागरिक भेट देत आहे, आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून सध्या 43 इंचीची पंगणुर गाय नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चला तर मग या विशिष्ट प्रजातीविषयी आपण जाणून घेऊया.

     

     

    ही आहेत गायीचे वैशिष्ट्य

    गायीच्या प्रजाती तेथील भौगोलिक वातावरणानुसार जडणघडण होत असते. पंगनूर ह्या गाईच्या प्रजाती आंध्र प्रदेश येथील आहे. विशेषतः तिरुपती क्षेत्रातील पहाडी भागात ही प्रजाती आढळून येते. कृषी विषयक कामे तसेच दूध उत्पादनासाठी देखील उपयोग होतो.

    तिरुपती बालाजी मंदिरात मिळतो प्रसाद

    तिरुपती बालाजी मंदिर हे जगप्रसिद्ध असून दररोज येथे लाखो भाविक येत असतात. या भाविकांना जो प्रसाद वाटला जातो तो ह्या पंगनूर गाईच्या तुपापासून बनलेला असतो. त्यामुळे ह्या गाईला अध्यात्मिक महत्त्व देखील प्राप्त झाले आहे.

     

    धोक्यात आलेली प्रजाती

    ह्या प्रजातीचे संवर्धन अपेक्षितरित्या झाले नसल्याने ह्याची संख्या आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे ही प्रजाती आता धोक्यात आली असून केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे.

     

  • खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

    प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.

     

    कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन‌ स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.

     

    ढिसाळ नियोजनाची खिचडी?

    खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या चांदा ॲग्रो 2024 या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

     

    विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला मिलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूर येथे आणण्यात आली, जी क्रेन द्वारे मैदानात उतरविण्यात आली. याबाबत चंद्रपुरकरांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळाली. पहाटे 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात झाली.

     

    6 हजार 750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. विविध विभागातील कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे मदत करीत होते. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वच उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी म‍िलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 म‍िलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी म‍िलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित चांदा ॲग्रो 2024 मध्ये शेफ विष्‍णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे म‍िलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पूर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली. त्‍यासाठी ते १० फूट व्‍यासाची, ५ फूट कढई, सुमारे ५०० किलो लाकूड वापरण्यात आले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली आहे. नागपुरातील महाल भागात खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे या मागणीसाठी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डिलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना ६ हजार ५०० किलो खिचडीचा नैवेद्य अर्पण केला होता.

     

    चांदा ॲग्रो 2024 मध्ये करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष श्री. राहुल पावडे, श्री. प्रकाश धारणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्तश्री विपिन पालीवाल यांनी देखील ही खिचडी बनवताना विष्णू मनोहर यांच्या सोबत संवाद साधून उत्सुकतेने सर्व माहिती घेतली.

     

    खिचडीचे शिस्तबद्ध वाटप

    7 हजा किलोपेक्षा जास्त झालेली या खिचडीचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावली व खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी सुद्धा विविध स्टॉल लावून आलेल्या प्रत्येकाला खिचडी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल अशी व्यवस्था यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून श्री. विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

  • केंद्र सरकारने सर्वासाठी शेतीचे धोरण घोषित करावे

    केंद्र सरकारने सर्वासाठी शेतीचे धोरण घोषित करावे

    News34 chandrapur

    • यवतमाळ – सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करा व शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांना नियमाकुल करा अशी मागणी घेऊन शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत मा. द्रोपदी मुर्म (राष्ट्रपती)राष्ट्रपती भवन – दिल्ली सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरीब हटाव नारा देऊन भूमिहीनांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी सिलिंग चा कायदा अमलात आणला, नंतर पाडीत जमिनी पेरा व देशाचे उत्पन्न वाढवा अश्या विविध उपक्रमाची सुरवात केली तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलेल्या घोषणामुळे देशातील महसूल व वन विभागाच्या पडीक जमिनी नियमानुकूल करण्यासाठी तत्कालीन संयुक्त परोगामी आघाडी सरकारचे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळाने पुढाकार घेऊन ” महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून दि. २८ नोव्हेंबर १९९१ रोजी” गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला त्याची अंबलबजावणी असमाधाकारक झाली, त्यामुळे बहुतांश लोकांना त्याचा फायदा झालेला नाही, मात्र केंद्रसरकारणे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम २००६ जाहीर केला परंतु वनहक्काच्या कायद्यामध्ये विशिष्ट स्वरूपाच्या अटी व शर्ती असल्यामुळे वनहक्क कायद्याचा फायदा वनभूमीधारकांना झालेला नाही म्हणून प्रत्यक्ष वनभूमी वर कब्जा आहे परंतु ७/१२ अभिलेखात नाव नाही.

     

    त्यामुळे शासनाचा विविध योजना पासून भूमि पासुन वंचित राहावे लागत आहे. म्हणून यापूर्वी केंद्रसरकार कडून सर्वासाठी घरे २०२२ हे धोरण घोषित केल्यामुळे तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने पुढाकार घेऊन सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची अंबलबजावणी करणे करिता ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून बेघर लोकांना गावठाण व ईक्लास जमिनीवर निवासा करिता केलेले अतिक्रमण नियमानुकुल होऊन प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाच्या विविध योजनेतून हक्काच्या घराचा लाभ मिळाला त्याच धरतीवर केंद्रसरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून राज्यातील शेतीचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी संसदभवन दिल्ली येथे येथे संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार “महालक्षवेधी मोर्चा” काढण्यात येईल असे निवेदनातून माहिती दिली आहे.

     

    अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८l सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार वनजमिनीवर वहीती दि. १३ डिसेंबर २००५ पूर्वी पासून असल्याचा आणि ३१ डिसेंबर २००७ रोजी ताबा सिध्द करणारा पुरावा वन हक्क मिळणे करिता आवश्यक आहे. परंतु वनजमिनीवर सन २००५ पूर्वी पासूनचा कब्जा आहे. परंतु पुरावा नाही त्यामुळे बहुतांश वनजमीन धारकांचे दावे अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे केंद्र सरकारकडून वनहक्काच्या कायद्यात सुधारणा करून सुधारित अधिनियम घोषित करावा. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ चे कलम २ (ण) नुसार दिनांक १३ डिसेंबर २००५ पूर्वी किमान ३ पिढ्यापासून मुख्यतत्वे करून वनात राहनारा आणि उपजीविकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वनजमिनीवर अवलंबून असल्याबाबत पुरावा आवश्यक आहे परंतु पुराव्या अभावी वन जमिन धारकांचे दावे अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सुधारित अधिनियम घोषित करण्यात यावा.

     

    मा. सर्वोच्च न्यायालयाने सन २०११ साली गायरान जमिनी इतर कारणा करिता वापरावर निबंध टाकले आहेत त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की, गावातल्या राखीव जमिनी फक्त केंद्र व राज्यशासनाच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्याव्यात इतर कोणत्याही व्यक्ती, संस्था यांच्या प्रकल्पाकरिता अश्या जमिनी वापरात आनु नये असे स्पष्ट आदेश असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी जमिनीच्या हक्कापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे. केंद्रसरकारने सर्वांसाठी घरे २०२२ धोरण घोषित केले त्याच धरतीवर केंद्र सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करावे अन्यथा दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी संसदभवन दिल्ली येथे महालक्षवेधी मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.

     

    या सर्व मागण्यांचे निवेदन राजेंद्र नाईकवाडे (संस्थापक अध्यक्ष) शामादादा कोलम ब्रिगेड तथा जिल्हाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना डॉ. रेखा कैलास खंदारे(राष्ट्रीय कार्याध्यक्ष)मानवी हक्क सुरक्षा दल भारती पवार राळेगाव तालुकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना इंदिराबाई बोंदरे(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )शामादादा कोलम ब्रिगेड तथा महिला जिल्हाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना, उरकुडा गेडाम (जेष्ठनेते) बिगर सातबारा शेतकरी संघटना नारायण पवार(कळंब तालुकाध्यक्ष) बिगर सातबारा शेतकरी संघटना अर्जुन काळे राळेगाव तालुका सचिव बिगर सातबारा शेतकरी संघटना मीना पवार महिला अध्यक्ष, बिगर सातबारा शेतकरी संघटना, भाई जगदीशकुमार इंगळे(केंद्रीय कार्यध्यक्ष) दलित पँथर (संस्थापका अध्यक्ष) बिगर सातबारा शेतकरी संघटना मानवी हक्क सुरक्षा दल आदी निवेदन देते वेळी उपस्थित होते.