Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश चोखारे

    चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले होते परंतु त्यावर काही तोडगा न निघाल्याने आज दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

     

     

    चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे. अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

     

    बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, किशोर वरारकर, मुन्ना साव, भटालीचे सरपंच किसन उपरे, रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टोंगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, वैभव शेंडे, अतुल मोहित्कर, आकाश जुंघरे, पवन चकंनापुरे, ईश्वर आखारे, राहुल शेंडे, प्रशांत सरोकार, सुधाकर वरारकर, रंगराव पवार, संतोष बंदुरकर, अकुंश कौरासे, पराग राजुरकर, संजय टिपले, सुमित भगत, शकर देशमुख, विनोद नाळे, राजू टेकाम, धनंजय शेंडे, दिनेश घागरगुंडे, प्रवीण मांढरे, संजय टिपले, सिद्धार्थ कवाडे, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.

     

     

    आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी यावेळी केली आहे.
    बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना करण्यात आली.

     

  • राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    News34 chandrapur

    नवी दिल्ली/चंद्रपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

     

    बैठकीत, सर्व प्रतिनिधींनी विशेषतः राहुल गांधी यांच्याशी ओबीसींची जातनिहाय प्रगणना, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती लागू करणे यासारख्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी हे प्रश्न सोडवण्याची कटिबद्धता व्यक्त केली. देशातील ओबीसी समाजातील 70 कोटी लोक कर म्हणून जीएसटी भरतात, मात्र त्या तुलनेत त्यांना त्यांचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच हा समाज त्याच जागी अडकून राहिला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व परिस्थितीत ओबीसींची जात जनगणना करण्याचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी याबाबत आपली कटिबद्धता दर्शवली.

     

    बैठकीत विविध राज्यातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली, जी राहुल यांनी लक्षपूर्वक ऐकली. बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही.ईश्‍वारय्या, सामाजिक क्रांती आघाडीचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग यादव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, हंसराज जंगीड , अमेरिका मधून आलेले हरी ईपन्नापली, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक प्राध्यापक अनिल यादव, बीसी वेलफेअर अशोसीएशन तेलंगाणाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, प्रा सुरज मंडल, प्रा सुधानशू ,विभा पटेल, डॉ विजय भास्कर यांच्यासह एकूण देशातील 37 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

  • विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे वय 17 वर्ष ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

     

    यावेळी त्यांनी नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल त्वरित हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच सदर मार्गावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेस वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

    त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात जावून रहदारीस होणारा अडथळा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

     

    याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय चहांदे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, महावितरणचे अभियंता सिध्दांत रामटेके, अभियंता दिनेश हनवते, न.प. विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, अभियंता हटवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी सभापती नेताजी मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, मुन्ना रामटेके, सुरज मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती.

  • रिल्स पर होगी कार्रवाई? उपक्षेत्र प्रबंधक ने कहा कारवाई तो होगी

    रिल्स पर होगी कार्रवाई? उपक्षेत्र प्रबंधक ने कहा कारवाई तो होगी

    News34 chandrapur

    चंद्रपुर – हाल ही में वेकोलि कर्मचारी के तबादले के दिन कार्यालयीन कर्मियों ने कामकाज के समय रील बनाई, जो कि सरकारी नियमो को ताक पर रखते हुए बनाई गई।

     

    एक कार्यालय से दूसरे वेकोलि विभाग के कार्यालय में महिला कर्मी का तबादला हुआ था, इस तबादले को थोड़ा मजाकिया बनाने की चाहत और सोशल मीडिया पर व्हायरल होने की चाह रखनेवाले महिला कर्मियों ने वेकोलि कार्यालय में रील बनाई, उसके बाद यह रील सोशल मिडियापर व्हायरल हुई थी।

     

    यह मामला News34 ने उजागर किया था, खबर प्रकाशित होते ही यह रील कार्यालयीन कामकाज के दौरान बनाई ऐसी चर्चा हुई लेकिन रील बनाने की अनुमति वेकोलि ने दी थी? रील बनाने की जगह की अनुमति वेकोलि ने दी थी? यह सभी सवाल अब उठने लगे है।

     

    जिन महिला कर्मियों ने रील बनाई उन पर अब कार्रवाई होगी या नही? इसके बारे उपक्षेत्र प्रबंधक से बात करने पर उन्होंने कहा कि फिलहाल जांच चल रही है, उसके बाद कारवाई की जाएगी।

     

    व्हायरल होने की चाह रखनेवाले महिला कर्मी वेकोलि प्रबंधन द्वारा कार्रवाई होने के बाद बाबुल की दुआएं लेकर ही जाएगी।

  • महाराष्ट्र वनविभागाचा डंका साता समुद्रापार

    महाराष्ट्र वनविभागाचा डंका साता समुद्रापार

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने गत काळात वनमंत्री म्हणून 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आला. ही केवळ एक योजना नव्हती तर झाडे कापणा-या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण व्हावे, हा उदात्त हेतु त्यामागे होता. वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून राज्यात 2550 चौ.कि.मी.चे हरितआच्छादन वाढले. महाराष्ट्राचा वन विभाग नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे.

     

    आताही भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य करार भारतातील चार राज्यात राबविण्यात येत असला तरी महाराष्ट्र यात अव्वल राहील व आपल्या वनविभागाचा डंका जर्मनीमध्येसुध्दा वाजेल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

     

    वन अकादमी येथे भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पांतर्गत वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षणार्थ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, कॅम्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभिता विश्वास, या प्रकल्पाचे जर्मनीतील संचालक डॉ. अलेजांद्रो वॉन बेर्ट्राब, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, डॉ. कुंदन आदी उपस्थित होते.

     

    महाराष्ट्र – जर्मनी यांच्यात द्विपक्षीय सहकार्य करार झाल्याचे घोषित करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात पर्यावरण विषयक संशोधन व प्रशिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कराराची अंमलबजावणी उत्तम व्हायला पाहिजे. चंद्रपूर येथील वन अकादमी ही देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था आहे. याच संस्थेत आज महत्वाचा करार होत असून अतिशय शास्त्रशुध्द नियोजन आणि प्रशिक्षण या वनअकादमीत व्हावे.

     

    जगातील 193 देशांपैकी 14 देशामध्ये वाघ आहे त्यातील 65 टक्के वाघ भारतात आहे, आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे येथून पराक्रमी मानसिकता घेऊन जावी. उत्तमातील उत्तम काम करून या कराराला पूर्णपणे यशस्वी करू तसेच महाराष्ट्राच्या वनविभागाचा झेंडा जर्मनीमध्ये रोवू, अशी ग्वाही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

     

    पुढे ते म्हणाले, निव्वळ धनाने काम होत नाही तर त्यासाठी हिरवे मनसुध्दा लागते. या कराराच्या माध्यमातून उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याचा संकल्प करा.

     

    पर्यावरणाचा –हास हे आज जगातील सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. संपूर्ण ब्रम्हांडात केवळ पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. मात्र आज मनुष्याकडूनच पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे महाकाय राक्षस आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे वनांच्या संरक्षणाची सर्वाधिक जबाबदारी वन अधिका-यांवर आहे. आई आणि वनराईच्या सेवेचे मुल्यांकन सर्वाधिक असून मातेचे तसेच मातीचेही कर्ज आपल्यावर आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीचे संगोपन, संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

     

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य कराराचे डीजीटल पध्दतीने उद्घाटन, सौर उर्जा कुंपन योजनेचे उद्घाटन तसेच माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.प्रास्ताविकात वनबलप्रमुख म्हणाले, जागतिक पातळीवर वनांचे महत्व वाढले आहे.

     

    वातावरणात 64 टक्के कार्बन डॉयऑक्साईड असून त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. या कराराच्या माध्यमातून वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षण करून हवेतील कॉर्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जमिनीचा पोत सुधारणे, शेती, वनजमीन आणि पाणी साठा असलेल्या जमिनीचा विकास करणे आणि स्थानिक लोकांना उपजिविकेचे साधन म्हणून प्रशिक्षित करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    यांना मिळाला सौर उर्जा कुंपनाचा लाभ : उध्दवराम पाटणकर, रविंद्र गावडे, मारोती तायडे, सुरेश कुईटे, सचिन जमदाळे, दिवांजी गिरडकर, आशा गिरडकर, दिलीप भोयर, गणपती उपरे, विनय डोंगरे यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सौर उर्जा कुंपण वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

     

    10 जिल्ह्यातील ग्रामस्थांना लाभ : वने, वनक्षेत्र पुनर्संचयित व जतन आणि संरक्षित करण्यासाठी रिकॅप फॉन एन.डी.सी. प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि नंदुरबार या 10 जिल्ह्यांतील 94278 हेक्टर वन व वनेत्तर क्षेत्राचे पुनर्संचयित प्रस्तावित आहे. त्यामुळे 11 लक्ष 57 हजार 189 ग्रामस्थांना लाभ होणार आहे.

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा न्यायालयात झालेल्या मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार दिली आहे.

     

    तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, दोन अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सचे काम करण्यात आले. हे काम करोडो रुपयांचे आहे. या कामात बिल्डिंग मेंटेनन्स, टाइल्स लावणे, कलर करणे यासोबत अनेक कामे करण्यात आली होती. मात्र, या दोन वर्षातच या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

     

    तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, संपूर्ण लावण्यात आलेले टाइल्स अनेक ठिकाणावरून निघून खाली पडले आहेत. अनेक ठिकाणच्या टाइल्स निघण्याच्या तयारीत आहेत. टाइल्सच्या आत मध्ये मटेरियल लोकल क्वालिटीचे वापरल्यामुळे ही टाइल्स भिंतीला चिपकवण्यात आलेली नाहीत. तसेच, भिंतीचा कलर कामात सुद्धा लोकल कॉलिटी चे पेंट मारले असल्यामुळे ते पेंट सुद्धा भिंतीवरून उघडत चाललेले आहे.

     

    राईकवार यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. आज परत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं.

     

    त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्याबद्दल त्यांना आश्वासित केले आहेत. कुलगुरूंनी दिलेले आश्वासन ते पाळतील ही अपेक्षा आहे. परंतु हा प्रश्न तात्पुरत्या सोयीने सुटणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जेवण, प्रवेश व हॉस्टेल तिन्ही मोफत राहील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली आणि आता मात्र त्यांच्याकडून पैसे मागत असल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे. माननीय राष्ट्रपती महोदया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आलेल्या असताना कुलगुरू यांनी राष्ट्रपतींच्या समक्ष जाहीरपणे बोलताना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला एकही रुपया लागणार नाही असे उदगार काढलेले आहे. परंतु कुलगुरू बोललेले शब्द पाळत नाहीत असा वारंवार अनुभव येत आहे.

     

    अनेक विद्यार्थी कुलगुरूंच्या उदासीन धोरणामुळे शिक्षण सोडून जेवण मिळणार नाही म्हणून गावाला परत जात आहे. ही बाब विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसाठी चांगली नाही.
    गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की कशासाठी हेच कळत नाही?. एकीकडे “विद्यापीठ आपल्या गावी” योजना सुरू केल्याची शाबासकी मिळविली जाते मात्र दुसरीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न चार दिवसापासून सुटू शकत नाही.

     

    त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा आम्हाला विद्यापीठात येऊन विद्यापीठाला विद्यार्थ्यांसह घेराव घालावा लागेल असा इशारा सिनेट सदस्य , प्रा. निलेश बेलखेडे,प्रा डॉ दिलीप चौधरी, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत, अजय लोंढे, दीपक धोपटे, यांनी दिला आहे.

  • चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

     

    कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले असून आज सर्व अर्ज नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

     

    इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, शिवा राव, शंतनू धोटे, दिनेश चोखारे, डॉ.हेमंत खापणे दिलीप माकोडे यांचा समावेश आहे.

     

    सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर हे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

  • चंद्रपूर महानगरपालिकेचा 542 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प

    चंद्रपूर महानगरपालिकेचा 542 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.

     

    केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानाची शासन निर्णयान्वये सन 2021-22 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनर्जीवन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्याच्या 18236.39 कोटी प्रकल्प किमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पांतर्गत कार्य सर्वेक्षण, मलनि:स्सारण प्रणाली, गृह सेवा कनेक्शन, रस्ता पुनर्रसंचयित करणे, रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे, राष्ट्रीय महामार्ग 9 आणि नाला क्रॉसिंग एकूण 7, पंपिंग मशिनरी, सीवरेज पंपिंग स्टेशन, सीवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे असणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी विहितकालावधीत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा, प्रकल्पव्यवस्थापन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन विकास व व्यवस्थापन सल्लागार यांची संयुक्तरीत्या राहील.

     

    अमृत 2.0 अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करावी. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास लागू राहतील.

     

    शहरात 233 किलोमिटरची पाईप लाईन

    पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरात 233 किलोमिटर पाईप लाईन मलनिःसारण करण्यासाठी होणार असून यातून शहरातील 54 हजार घरांना जोडणी होणार आहे.

  • आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    Mla Disqualification result  चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. Mla Disqualification result

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा संताप 

    यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व त्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर थेट आक्षेप घेतला आहे.

    गिऱ्हे यांनी म्हटले आहे की, जर अध्यक्षांना शिवसेनेची २०१८ ची घटना (ज्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली) अमान्य असेल आणि ती घटनाबाह्य ठरवली असेल, तर त्याच घटनेवर आधारित पक्षप्रमुखांनी दिलेला ‘ए-बी’ फॉर्म घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार २०१९ मध्ये निवडून आले, हे कसे काय घटनाबाह्य ठरवले जात नाही? अध्यक्षांनी एकाच घटनेचे दोन वेगवेगळे निकष लावले आहेत. एकीकडे २०१८ ची घटना नाकारायची आणि दुसरीकडे त्याच घटनेच्या आधारावर निवडून आलेल्या आमदारांची वैधता मान्य करायची, हा न्याय विसंगत आहे. नार्वेकर यांच्या निकालावर आम्ही हा कायदेशीर प्रश्न उपस्थित करतो.