Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • मनोज जरांगे यांना वाघाच्या जिल्ह्यातून ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचं आव्हान

    मनोज जरांगे यांना वाघाच्या जिल्ह्यातून ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचं आव्हान

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभर मराठा आरक्षणाला घेवून जो असंवैधानिक मागणीचा उन्माद मांडलेला आहे, त्यास पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा क्रांतीभूमीतून उत्तर देण्याचे कार्य विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनातून ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींनी ओबीसी बचाव परिषदेतून आज (दि.१७) ला येथे केले आहे.

     

    ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर महाराष्ट्र पेटवू, ओबीसींच्या संयमाची व शांततेची परीक्षा घेवू नका, ओबीसी खडा तो सरकारसे बडा हे लक्षात ठेवा, व जरांगेला जशास तसे उत्तर देवू, जरांगेला अटक करा, असे ओबीसी बचाव परिषदेने ठणकावून सांगितले आहे.

     

    राज्यस्तरीय ओबीसी बचाव परीषद आज (दि.१७) ला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या परिषदेत ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींची वज्रमूठ बांधण्यात आली.

     

    जरांगे हे त्यांच्या सभांमधून बेताल वक्तव्य करीत आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका वारंवार बदलत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागत आहे. हे सर्व प्रकार असंवैधानिक आहेत. त्यामुळे ओबीसी बचाव परिषदेत मनोज जरांगे यांच्या बेताल, द्वेशपूर्ण व ओबीसी नेत्यांच्या तथा राज्य सरकारच्या विरोधातील वक्तव्याचा जाहीर निषेध करून ठराव घेण्यात आला. राज्य सरकारच्या ओबीसीबद्दलच्या काही निर्णयाचे व भूमिकेचे अभिनंदन करून ठराव घेण्यात आले तर राज्य व केंद्र सरकार संबंधित मागण्यांचे ठराव घेण्यात आले, सोबतच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज एकमताने उभा राहील, असेही ठरले.

     

    ओबीसी बचाव परिषदेत प्रामुख्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत महाराष्ट्र ओबीसींना दहा लाख घरे बांधून देण्याचा निर्धार, बार्टी, सारथी, व महाज्योती यांना देण्यात येणाऱ्या निधीत एकसारखेपणा आणल्याबद्दल, ओबीसींच्या विविध योजनांसाठी ३३७७ कोटी रुपयांची भरीव तरतूद, ७२ पैकी ५२ वसतिगृह तात्काळ सुरू केली, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना, यासाठी राज्य सरकारचे अभिनंदन तर ओबीसी योद्धे रविंद्र टोंगे, प्रेमानंद जोगी, विजय बल्की, अक्षय लांजेवार, अजित सुकारे यांचे अभिनंदन आदी अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले आहे.

     

    सोबतच राज्य व केंद्र शासनाशी संबंधित मागण्यांचे ठराव देखील घेण्यात आले आहे. ज्यात, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करू नये, बिहारच्या धरतीवर ओबीसी जातनिहाय जनगणना सर्व्हे करावी व ओबीसींना २७% आरक्षण द्यावे, ओबीसी शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वांग्मय दहा रुपये मध्ये उपलब्ध करून द्या, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकार सोबत पार पडलेल्या बैठकीतील इतिवृत्त मधील सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलावे, महाराष्ट्र शासनाने ओबीसींचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी मेगा नोकर भरती त्वरित सुरू करावी, एससी,एसटी प्रमाणे शासकीय सर्व योजना ओबीसी शेतकऱ्यांना देखील १००% सवलतीवर राज्यात सुरू करा, खाजगी उद्योगधंद्यात व उपक्रमात ओबीसी समाजासाठी आरक्षण लागू करा, प्रत्येक तहसील व जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची व्यवस्था करण्यात यावी, शेतमाल खरेदी करण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव निश्चित करून एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्यात यावी, शामराव पेचे आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसीतील कमकुवत जातींसाठी विदर्भ मराठवाडा व इतर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, दिनांक ४ मार्च २०१९ च्या सुप्रीम कोर्टाचे आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरिता संविधानाच्या कलम 243 डी (६) व कलम 243 सी (६) मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलियरची अट त्वरित रद्द करण्यात यावी, तोपर्यंत नॉन क्रिमिलियर मर्यादा वीस लाख रुपये करण्यात यावी, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोपरान्त भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, केंद्रात व राज्यात एससी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सबसिडी योजना लागू करण्यात यावी, ओबीसी व सर्वच शेतकरी तथा शेतमजुरांना साठ वर्षे वयानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. हे सर्व ठराव राज्य व केंद्र सरकारला पाठविण्याबाबत ठरले आहे.

     

    यावेळी ओबीसी समाजातील बहुतांश जातसमुदायातील प्रतिनिधी उपस्थित होते. ओबीसीतील तेली, माळी, धनोजे कुणबी, तिरळे कुणबी, खेडूले कुणबी, खैरे कुणबी, मुस्लिम, धोबी, लोहार, मेरू शिंपी, पद्मशाली, कुंभार, गानली, भावसार, कोळी, भोई, नाभिक, सोनार, मयात्मज सुतार, गवळी, बेलदार, कापेवार, बारई, कलार, वंजारी, लिंगायत, धनगर, कुरमार, गोलकर आदी अनेक जातसमूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण रेल्वे समस्यांवर सखोल चर्चा

    चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण रेल्वे समस्यांवर सखोल चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर/यवतमाळ- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या व रेल्वेशी संबंधीत अन्य विषयांवर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 13 डिसेंबरला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सोयी व सुविधांबाबत होत असलेला त्रास व  गैरसोयीबाबत सविस्तर चर्चा केली.

     

    या चर्चेप्रसंगी रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, डीआरयूसीसी सदस्य पुनम तिवारी, गौतम यादव प्रभूती उपस्थित होते. या भेटीमध्ये हंसराज अहीर यांनी काजीपेठ पुणे ट्रेन नं. 22151/52 प्रतिदीन सुरू करण्यात यावी, बल्लारशाह वरून मुंबईकरीता दररोज ट्रेन सुरू करावी. नंदीग्राम एक्सप्रेस स्ट्रे नं. 11401/402 ही गाडी आदीलाबादहून व्हाया नांदेड मुंबईला जाते ती आदीलाबाद वरून बल्लारशाहपर्यंत विस्तारीत करण्यात यावी. दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721/22 निजामुद्दीन येथून हैद्राबाद पर्यंत चालविण्यात येत आहे ही गाडी हैद्राबादला 19 तास उभी असते त्यामुळे या गाडीचे सोलापूरपर्यंत विस्तारीकरण केल्यास नागपूर वर्धा, चंद्रपूर, वर्धा, बल्लारशाह, कागजनगर, मंचेरीयल, रामगुंडम, काजीपेठ जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना चांगली सुविधा होईल असेही अहीर यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बल्लारपूर पिटलाईनचे काम पुर्ण झाल्याने चंद्रपूर व विदर्भातील रेल्वे प्रवास्यांना रेल्वेच्या मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यास रेल्वे प्रशासनास मोठा वाव असल्याचे हंसराज अहीर यांनी चर्चेदरम्यान मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले.

     

    चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक बंगाली बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या राज्यात किंवा स्वगृही येणेजाणे करण्यास चंद्रपूर ते हावडा ही थेट गाड नसल्याने या दोन्ही जिल्ह्यातील बांगाली बांधवांना नागपूर किंवा गोंदीया येथून ट्रेन पकडावी लागते त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बंगाली बांधवांकरीता चेन्नई-बिलासपूर ट्रेन नं. 22620 हावडापर्यंत विस्तारीत करण्यात यावी. किंबहूना नांदेड सांतरागाच्छी ट्रेन नं. 12767/68 चंद्रपूर वरून चालविण्यात यावी. किंवा ट्रेन नं. 11447/48 जबलपूर-हावडा ही ट्रेन बल्लारशाह पर्यंत विस्तारीत करून सदर ट्रेनचा धांबा चांदाफोर्ट स्टेशनवर देवून या समाजाला न्याय द्यावा असेही अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चेवेळी सांगीतले. या भेटीत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेविषयक अनेक महत्वपुर्ण बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

     

    केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबतची सदर भेट अत्यंत फलदायी झाली असून रेल्वेमंत्र्यांनी येत्या महिनाभरात या सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेऊ असे अहीर यांना आश्वासीत केले. यावेळी श्री. मौर्या रेल्वे बोर्ड सदस्य तथा कार्यकारी निदेशक कोचिन हे सुध्दा उपस्थित होते. त्यांनीही या न्याय मागण्या संदर्भात सकारात्मक भूमिका मांडत या सर्व मागण्यांच्या पुर्ततेकरीता लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

  • चंद्रपुरात रक्तगटावरून कामगार संघटना आमनेसामने

    चंद्रपुरात रक्तगटावरून कामगार संघटना आमनेसामने

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या लालपेठ येथील उपविभागीय कार्यालयात 16 डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास कामगार संघटनांनी चांगलाच गोंधळ घातल्याने वेकोली व्यवस्थापनाची चांगलीच भंबेरी उडाली होती.

     

    मागील काही दिवसापासून वेकोलीच्या लालपेठ येथील क्षेत्रीय रुग्णालयात वेकोली कर्मचारी गंभीर आजारावर उपचार घेत आहे, दोन दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, त्याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना O Positive रक्त आणा अशी चिठ्ठी पण दिली मात्र रक्त आणण्यास गेलेल्या नातेवाईकांना ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला O नाहीतर A Positive रक्त द्यावे लागेल कारण त्यांचा रक्तगट A POSTITIVE आहे, हे ऐकताच नातेवाईक वेकोली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संतापले त्यांनी तात्काळ त्याठिकाणी इंटक कामगार संघटनेला याबाबत माहिती दिली.

     

    संघटनेचे सदस्य त्याठिकाणी दाखल होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करू लागले होते, मात्र रुग्णालयातील कर्मचारी दुसऱ्या संघटनेचे असल्याने HMS संघटनेने कर्मचाऱ्यांची बाजू घेणे सुरू केले, आणि कार्यालय परिसरात दोन्ही संघटना एकमेकांविरुद्ध नारेबाजी करू लागले.

     

    शेवटी उपविभागीय वेकोली अधिकाऱ्याला मध्यस्ती करावी लागली, कारवाईचे आश्वासन मिळाले मात्र दुसऱ्या संघटनेणें यावर आक्षेप घेतला आता यावर वेकोली महाव्यवस्थापक काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे, कारण असे प्रकार याआधी सुद्धा घडले आहे.

  • योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेसोबत जोडा व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

     

    वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

     

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, गत 9 वर्षात जे काम झाले आहे, आणि भविष्यात केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी जे काम करणार आहे, अशा बाबींची माहिती या संकल्प यात्रेतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. सोबतच महत्वाच्या विविध शासकीय योजनांचा लाभसुध्दा या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे या यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. योजनांपासून वंचित असलेल्यांना यात सहभागी करावे. विकसीत भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरात 3200 एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सदर व्हॅन 65 हजार गावांमध्ये आणि 5 हजार शहरात गेली असून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत 1 कोटी 80 लक्ष लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहे.

     

    पुढे श्री. पुरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला 102 पेट्रोलपंप होते, आज 131 पेट्रोलपंप आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात 3 लक्ष 34 हजार एल.पी.जी गॅस कनेक्शन होते. ती संख्या आज चंद्रपूर जिल्ह्यात 6 लक्ष 32 हजार झाली असून जिल्ह्यातील 34495 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014 मध्ये देशात 14 कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन होते. आता 2023 मध्ये हा आकडा 32 कोटींवर पोहचला आहे. सन 2014 पर्यंत केवळ 1 लक्ष 5 हजार नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता, तर 2014 पासून 2023 पर्यंत ग्रामीण आणि शहरी मिळून 4 कोटी नागरिकांना आवास योजनेंतर्गत घरकूल देण्यात आले आहे. गत सरकारमध्ये देशातील 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती तर आज 2023 पर्यंत 6 लक्ष 50 हजार गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तसेच देशात आजच्या घडीला 50 कोटींपेक्षा जास्त लोकांचे बँकखाते काढण्यात आले आहे. तसेच आज जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, भविष्यात ती तिस-या क्रमांकावर पोहचणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     

    विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

     

    केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यात 6 हजार रुपयांचा थेट लाभ, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सेवा आदी योजनांचा यात समावेश आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून चित्ररथ आल्या दारी येत आहे. गावातील लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसीत भारत हा संकल्प आहे. जग बदलविण्यासाठी आपणही संकल्प करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मिशन शौर्य, मिशन जयकिसान, मिशन ऑलंपिक, अयोध्येच्या राममंदिरासाठी काष्ट, नवीन संसद भवनासाठी चंद्रपूरचे लाकूड अशा अनेक बाबी करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असल्यामुळे विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 273 ग्रामपंचायतींमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा गेली आहे. यात एकूण 1 लक्ष 42 हजार 595 नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान 17558 कुटुंबाची आरोग्य तपासणी, 2557 जणांची उज्वला गॅस कनेक्शनकरीता नोंदणी, 6300 जणांना आयुष्मान भारतचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

     

    सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षवेधी ने 5 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षवेधी ने 5 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्रातील सैनिक स्कूल चंद्रपूर येथील अनुसूचित जाती – जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. याबाबत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्‍याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

     

    सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्‍य पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी १२ डिसेंबर २०२३ रोजी सभागृहात केली होती.

     

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागत होता.

     

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नामुळे या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर तातडीने कारवाई होऊन तीन दिवसात सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामुळे सदर विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळेल व पुढेही शिष्यवृत्ती मिळत राहील. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळेल आणि त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहील.

     

    आमदार अडबाले यांच्या प्रश्‍नामुळे हा ५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न निकाली निघाल्‍याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांचे सैनिकी स्‍कूल चंद्रपूर पालक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

  • चंद्रपुरातील ओबीसी बचाव परिषदेने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती

    चंद्रपुरातील ओबीसी बचाव परिषदेने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी रविवारी ओबीसी बचाव परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वामध्ये संभ्रम असून त्यांनी या परिषदेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्यातही अशोक जीवतोडे यांच्या स्वयंघोषित नेतृत्वाबाबत आता सोशल मीडियावर टीका देखील केली जात आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देऊ नये यासाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण केले होते.
    यात जिल्ह्यातील सर्व नेतृत्व एकवटले असताना
    या आंदोलनाकडे अशोक जिवतोडे यांनी सपशेल पाठ फिरवली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमरण उपोषणाला भेट देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी आंदोलन यशस्वी होत असल्याचे पाहून अशोक जिवतोडे आंदोलन स्थळी आले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली होती. जिल्ह्यात अनेक ओबीसी लोकप्रतिनिधी आहेत. मात्र अशोक जिवतोडे जिल्ह्याचे एकमेव ओबीसींचे कैवारी असल्याचे बाऊ करत आहेत.

     

    चिमूर येथे आठ दिवस अजित सुकारे आणि अक्षय लांजेवार हे आंदोलन करत होते. मात्र या ओबीसीच्या आंदोलनाला अशोक जिवतोडे यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही. आता मात्र जिवतोडे स्व केंद्रित ओबीसी बचाव परिषद घेत आहे. त्यामुळे या परिषदेकडे ओबीसी बांधव संशयाने बघत आहेत. अशोक जिवतोडे यांच्या भूमिकेबाबत अनेक ओबीसी नेत्यांनी आता फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. या परिषदेकडे फारसे कोणी फिरकणार नाहीत केवळ आपल्या हाताखालचे खासगी कार्यकर्ते या दिमतीला राहील अशी शक्यता आहे. जीवतोडे यांनी केवळ स्वतःला मोठे दाखविन्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आहे.

     

    रवीच पाडतोय अशोकला अंधारात

    रवी म्हणजे सूर्याचे काम हे प्रकाश देने आहे. मात्र काही रवी हे अंधारात ठेवण्याचे काम करीत आहे. आपल्या नेतृत्वाला दिशा देण्याचे काम करण्याऐवजी वेगळेच काम सुरू आहे. मात्र दुर्दैवाने नेतृत्वाला देखील आपल्या दिव्याखालचा अंधार दिसून येत नाही आहे. मी सांभाळून घेतो, मॅनेज करतो असे म्हणून हा रवी आपल्याच पोळ्या शेकून घेत आहे. याचा मोठा फटका भविष्यात नेतृत्वाला बसणार आहे.

  • चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील वरोरा नाका,प्रियदर्शिनी चौक,जिल्हा परिषद समोरील परिसर,जटपुरा गेट तसेच डॉ.आलुरवार हॉस्पीटल परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची तसेच फ्लॅटची जाहिरात करणारी रिद्धी बिल्डर्सची माहिती असलेली पॉम्पलेट्स व स्टिकर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांना १३ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    News34 chandrapur

    पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, सोबतच चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र त्यांच्या विधानसभा मतदार संघातील पोम्भूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे, त्या समस्या दूर करा अन्यथाया आंदोलनाचा करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पवन बंकावार यांनी प्रशासनाला दिला आहे.

     

    ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात निपुण व्हावे यासाठी पोम्भूर्णा येथे क्रीडा संकुलाचे निर्माण करण्यात आले मात्र देखभाली दुर्लक्ष होत असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मैदानावर येणाऱ्या मुलांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

     

    मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पवन बंकावार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात क्रीडा संकुल असलेल्या समस्येवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये क्रीडा संकुल सकाळी व सायंकाळी 5 वाजता सुरू करण्यात यावा, लाईट पहाटे 5 वाजता सुरू करण्यात यावे, पूलअप साठी सिंगल बार व डबल बार लावण्यात यावा, रनिंग ट्रक दुरुस्त करावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, एक केअर टेकर ठेवण्यात यावा अश्या विविध मागण्याचे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बंकावार यांनी तहसीलदार व तालुका क्रीडा अधिकारी यांना दिले.

     

    प्रशासनाने तात्काळ क्रीडा संकुल असलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    निवेदन देतेवेळी पवन बंकावार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पोंभुर्णा, छत्रपती कस्तुरे, प्रशांत गोंगले, गौरव चंदेल, प्रमोद ढाक, सूरज ढोले, अज्ञान कुरेशी, लोकेश गावरे, स्वप्नील गोरांतवार, रितेश कोटरांगे आदि उपस्थित होते.

  • मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    News34 chandrapur

    नागपूर :- दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष २०२१-२०२२ मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची मागणी सभागृहा समक्ष लावून धरली.

     

    मुंबई पोलीस भरतीमधील निवड यादीतील हजारो उमेदवार हे नागपूर अधिवेशनावर आंदोलनाला बसले असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला.

     

    गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे असतांना सुद्धा पोलीस भरती होत नसल्याने पोलीस विभागावर कामाचा ताण येत आहे. मुंबई पोलीस दलात तब्बल २६ हजार पर्यंत शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस विभागाने १० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता , मात्र ७०७६ पदांची भरती राबविली म्हणजे ७० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली . हि भरती प्रक्रिया १०० टक्के नसून त्यामध्ये अजूनही ३ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत . तसेच त्यावेळी प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांची कागद पत्रे पडताळणी व पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले . परंतु त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नसून त्यांची वयोमर्यादा संपत असल्याने त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत आमदार महोदयांच्या वतीने सभागृहाला अवगत करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री -देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.

     

    तसेच वर्ष २०२२ व २०२३ मधील पोलीस भरतीतील अजूनही पदे रिक्त असल्याने मुंबई पोलीस दलावर खूप ताण निर्माण होत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा निवड यादीत समावेश करून त्यांना संधी देण्यात यावी , जेणेकरून उमेदवारांना न्याय मिळेल व पोलीस दलावरील ताण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई पोलीस भरती २०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती कधी देणार ? व त्यांची पोलीस भरती कधी करणार ? असा प्रश्न आमदार महोदयांच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला.

     

    यावर सभागृहासमक्ष उत्तर देतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , ज्यांची निवड झाली आहे ,त्यांची वयोमर्यादा संपणार नाही , प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवत असून एक -एक बॅच आपण तयार करून प्रक्रिया पूर्ण करत आहोत . मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे प्रतीक्षा यादी एका वर्षाच्या वर राहत नसल्याने त्यांना घेता येत नाही . मात्र ज्यांची थेट निवड झाली त्यांना चिंता करण्याची गरज नसून त्यांना शंभर टक्के नोकरी मिळणार असल्याचे गृहमंत्री महोदयांनी सभागृहात स्पष्ट केले.

     

    तसेच मुंबई पोलीस भरती २०२१-२२ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्राची तपासणी झाली असल्याने त्यांचे वैद्यकीय पडताळणी करून पोलीस विभागात संधी देण्याच्या मागणीचे पत्र सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. यावर सर्व बाबीने पडताळणी व तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले .

  • केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला आहे. स्वतः पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10 हजार नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला.

     

    महात्मा फूले नविनीकरण उर्जा व पायाभूत तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रित) आणि चंद्रपूर महानगर पालिका मिळून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरबांधणी प्रस्तावासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग वनसभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य लेखाधिकारी डी.सी.पाटील, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे संचालक अशोक जोशी, वैज्ञानिक संजय बालमवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून प्रधान सचिव दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

     

    चंद्रपूर महानगर पालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती या घटकांतर्गत घरकुल बांधणे प्रस्तावित आहे. यासाठी म्हाडाच्या अखत्यारीत नवीन चंद्रपूर येथे मौजा कोसारा, खुटाळा येथे जागा उपलब्ध आहे. या साईटवर घरकुल बांधण्याकरीता महाप्रित आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यात 12 एप्रिल 2023 रोजी सामंजस्य करार झालेला आहे.

     

    चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महाप्रीत व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 10 हजार घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात जागा नसलेले भाडेकरू तथा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सदर योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. याकरीता नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लक्ष 50 हजार रुपयांचे अनुदान तसेच बांधकाम कामगार म्हणून 2 लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.