Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

    News34 chandrapur

    चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाबापुर येथे चंद्रपूरच्या कैलास ने भव्य असा कोंबडा बाजार थाटला, त्याबाबत News34 ने वृत्त ही प्रकाशित केले होते, 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने कोंबडा बाजारावर धाड मारली मात्र ही कारवाई नाममात्र असल्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या धाडीत बाजाराला कारणीभूत असलेल्या 5 कोंबड्याना अटक करण्यात आली आहे.

     

    चंद्रपुरातील सट्टा किंग म्हणून नामवंत असलेल्या कैलास ने काही सहकाऱ्यासोबत जिवती येथील पहाडावर कोंबडा बाजाराचा भव्य असा संसार थाटला.

    कैलास ने चंद्रपुरात सट्टा या कौशल्यपूर्ण खेळात गुणवत्ताप्राप्त कामगिरी केल्यावर सरळ महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील भारी, बाबापुर येथे कोंबडा बाजार सुरू केला, याठिकाणी रमी, कट पत्ते, झेंडी-मुंडी असे विविध मैदानी खेळ (लुप्त झालेले) खेळण्यात येत होते.

     

    एका डावाची नाळ म्हणून कैलास दररोज लाखो रुपये कमवत आहे, याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर सुद्धा पोलिसांना याचा सुगावा लागला नाही, बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या प्राणाची बाजी लावत (सायंकाळी सर्व खेळाडू घरी गेल्यावर) धाड मारली, मात्र यावेळी अनेक चारचाकी वाहने व खेळाचा मुख्य नायक कैलास तिथे उपस्थित होता त्यांना अटक न करता वारंवार कायदा व सुव्यवस्था भंग करणारे व त्या बाजारात भांडणारे कोंबड्याना काही निष्पाप लोकांसहित अटक करण्यात आली, ही कारवाई म्हणजे मी मारल्या सारख करतो तू रडल्यासारखं कर अशी होती.

     

    या कोंबडा बाजारातील मुख्य आरोपी (कैलास वगळता) बाजारात भांडणारे कोंबडे होते की काय ? अशी अवस्था अटक केल्यावर कोंबड्याची झाली, अटक कारवाई नंतर त्या कोंबड्यांचे काय झाले असेल? (कुणाच्या पोटात तर गेले नाही न?) असा प्रश्न इथे उपस्थित होतो. विशेष म्हणजे दिवसभर सुरू असलेल्या या बाजारावर सायंकाळी कारवाई का करण्यात आली?

     

    भांडणाऱ्या कोंबड्यानी पोलिसांना वारंवार चकमा दिला मात्र अखेर ते पोलिसांच्या हाती लागलेच, पण हा कोंबडा बाजार पुन्हा सुरू होणार आहे हे नक्की, कारण कैलास अभि जिंदा है !

    सदर कारवाई नाममात्र आहे याबाबत News34 जवळ सबळ पुरावे आहे, बातमीच्या पुढील भागात कैलासचा तो वजनदार साथीदार कोण? त्याबाबत महत्वाचा खुलासा….वाचत रहा….. News34

  • चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

    चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – 2 दिवसांनी तो वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये रुजू होणार होता मात्र त्यापूर्वीचं त्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, ही घटना 13 डिसेंबर ला घुग्घुस येथे घडली.

     

    13 डिसेंबर बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय स्मित श्याम पगडी हा युवक आपल्या मित्रांसोबत चारचाकी वाहन क्रमांक MH29BC 8276 ने बेलोरा कडे जात होता, वाहनाचा वेग जास्त असल्याने अचानक वाहनावरून स्मित चे नियंत्रण सुटले आणि वाहन वेगात झाडाला आदळले, या अपघातात स्मित पगडी चा जागीच मृत्यू झाला.

     

    स्मित ला वडिलांच्या जागी वेकोली मध्ये नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र स्मित चा अपघाती मृत्यू झाल्याने आता कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

     

    सदर घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामिण सेवक विविध मागण्या करीता मंगळवारपासून बेमुदत संपावर असून अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन संघटना नई दिल्ली यांच्या आदेशा नुसार संप आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

     

    प्रमुख मागणी याप्रमाणे ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना ८ तास काम,पेन्शन सह सर्व नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे 12, 24 ,36 नुसार वेतन वाढ लाभ, कमलेश केंद्र कमिटीचा रिपोर्ट सकारात्मक शिफारशी लवकर लागू करणे. गटविमा पाच लाख पर्यंत वाढविणे, केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रॅज्युटी सूत्र लावून ग्रॅजुटीमध्ये वाढ करणे, 180 दिवसापर्यंत सुट्टी साठवून त्या सेवानिवृत्तीच्या वेळेस रोखीने देणे, ग्रामीण डाक सेवक च्या कुटुंबांना वैयक्तिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध पुरविणे, केंद्रीय कर्मचाऱ्या याप्रमाणे वार्षिक वेतन वृद्धी तपावत दूर करणे, व सर्व शाखा डाक घराना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना गतिशील करण्याकरीता लॅपटॉप ,प्रिंटर आणि ब्रॅडबँड नेटवर्क सुविधा प्रदान करणे. यासारख्या विविध मागण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन न्यू दिल्ली यांच्या निदर्शनानुसार चंद्रपूर /गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण शाखाडाक सेवक बेमुदत संपावर गेलेले आहे.

     

    जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक युनियनचे पद्माकर टोंगे, मुरलीधर बोडखे,पांडुरंग कोहपरे ,शंकर निवलकर, धोंडू मुसळे, रामदास गोहोकर,राजू धोटे, संदीप डाखरे, सुनील भोपये, समाधान खोब्रागडे, विभा सहारे, भारती करंडे, राजू सातपुते, शिवाजी गंध गुडे, बाबुराव बोंडे, चंदू बोभाटे आधी सह सर्वच ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपात सहभागी झाले आहे.

  • चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    News34 chandrapur
    चंद्रपूर : शहरातील विविध पाच चौकात फाऊंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आज 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताचे दरम्यान जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिमात्मक आंदोलन करून जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक हॉटेल अधिकाऱ्यांना मनपा इमारती च्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्यात आले.

     

    या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी,सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम, अरुण येरगुडे, वसंता जाधव, प्रवीण अत्तेरकर, सुनील ढेकले, घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, इमदाद शेख, सुभाष फुलझेले, प्रफुल सतभये, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
    फाउंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार आयुक्त बिपिन पालीवाल व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे.

     

    आमदार, पालकमंत्री व विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही ?

     

    धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी फाऊंटेन लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात फाउंटेन लावून धूळ कमी करण्याचा करण्याचा जावईशोध चंद्रपूर मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी लावला. आज पर्यंत मनपातील करोडो रुपयांचे जवळपास पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उजेडात आणले. एकाही घोटाळ्याचे विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.

  • विधानसभेच्या सभागृहात भडकले चंद्रपूरचे आमदार जोरगेवार

    विधानसभेच्या सभागृहात भडकले चंद्रपूरचे आमदार जोरगेवार

    News34 chandrapur

    नागपूर/चंद्रपूर – राज्याला वीज पुरविण्यासाठी जगातील सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एनर्जी आम्ही तयार करतो. याचा परिणामही आम्हाला सोसावा लागत आहे. देशातील सर्वात प्रदूषित जिल्हात आमचे नाव आहे. मात्र आम्हाला याचा मोबदला मिळत नसेल तर हा अन्याय आहे. असे म्हणत राज्याला वीज देऊन आम्ही काय पाप करतोय काय? अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलताना संताप व्यक्त केला आहे.

     

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हासह वीज उत्पादक जिल्हांना वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, हातमाग उद्योगांमध्ये  काम करणा-या कामगारांसाठी सरकारने २०० युनिट विज मोफत करण्याचा निर्णय केला आहे. हा निर्णय कौतुकास्पद आहे. आता याच धर्तीवर वीज उत्पादन करुन प्रदुषण सहन करत असलेल्या वीज उत्पादक जिल्हांना घरगुती वापराची दोनशे युनिट विज मोफत देण्यात यावी, चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात वनआच्छादन असतांनाही प्रदूषित जिल्हांची यादी काढल्यास पहिल्या पाच प्रदूषित जिल्हात चंद्रपूरचे नाव असेल असे ही ते यावेळी म्हणाले.

     

    आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो म्हणून हे प्रदुषण आम्हाला सहन करावे लागत आहे. राज्याला आम्ही विज देतोय म्हणजे पाप करतोय काय? आम्ही उत्पादन केलेली वीज आम्हाला स्वस्त का नाही? अशा शब्दात त्यांनी यावेळी संताप व्यक्त करत चंद्रपूर जिल्ह्यासह वीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी व उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    विशेष म्हणजे वीज उत्पादन जिल्ह्यांना २०० युनिट पर्यंत घरगुती वापराची वीज मोफत देण्यात यावी ही मागणी चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली आहे.

     

    या मागणीसाठी राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, ऊर्जामंत्री यांना निवेदन दिले आहे. सदर मागणीसाठी त्यांनी मागील वर्षीच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर चंद्रपूर येथून ३ हजार मोटर सायकलचा मोर्चा धडकवला होता. या मोर्चाने राज्याचे लक्ष सदर मागणीकडे वेधले होते. मात्र या रास्त मागणीसंदर्भात यंदाच्या अधिवेशनातही कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने आमदार जोरगेवारांचा संताप पाहायला मिळाला. आता या मागणीसाठी वीज उत्पादक जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी समोर येतील का ? या कडे लक्ष राहणार आहे.

     

    हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरण मधील अनेक समस्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले असून येथील लाईनमनच्या समस्या  सोडविण्यात याव्यात, गडचिरोली जिल्हा लोहखनिजाचे समृद्ध आहे. तेव्हा गडचिरोली लगत असलेल्या चंद्रपूर जिल्हा लोहखनिजावर आधारित उद्योग सुरु होइल यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, लघु उद्योगांना इंधन पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खान महामंडळाचा वेकोली सोबत इंधन पूरवठा करार करणे आवश्यक आहे.चंद्रपूर येथील लघु-उद्योगांना सन 2017-18 पर्यंत कोळशाचा नियमित पुरवठा होत होता. परंतु सन 2022-23 मध्ये या आर्थिक वर्षामध्ये मार्च 2023 पर्यंत केवळ 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कोळसा उपलब्ध झाले आहे.

     

    सदर लघु-उद्योगांना कोळशाचा वापर इंधन म्हणून होत असल्याने नियमित कोळसा पुरवठा होऊन चंद्रपुरातील लघु-उद्योगांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ विभागासोबत प्रलंबित असलेला एफएसए (FSA) करार तातडीने करण्यात यावा, चंद्रपूर येथील फेरो अलॉय प्लांट येथील कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक S-1 ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे येथील कामगारांना औद्योगिक S-1 वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारा

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याची शासनाने घोषणा केली आहे. यासाठी चंद्रपूरात जागाही आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या ठीकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  वसतिगृह  तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे घोषित करण्यात आलेले ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह  तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

  • “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” राबविण्यासाठी जुनोना गावात ‘बिबट-ग्राम-सत्याग्रह’ आंदोलन

    “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” राबविण्यासाठी जुनोना गावात ‘बिबट-ग्राम-सत्याग्रह’ आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ तीव्र झालेला असून, यात वाघ, बिबट, अस्वल अन्य वन्यप्राणी कडून जंगलात तसेच गावात होणारे हल्ले रोखण्याकरिता जिल्हा परिषदेची गावा-गावात राबविली जाणे आवश्यक असलेली प्रलंबित “बिबट समस्या मुक्त ग्राम योजना” राबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनच्या पाचव्या दिवशी पाचवे आंदोलन इको-प्रो कडून जुनोना गावात करण्यात आले.

     

     

    बंडू धोतरे यांचे नेतृत्वात सकाळी जुनोना गावात येथे बिबटचा वावर असलेल्या वस्तीत जाऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. एके ठिकाणी काही गावकरी यांना जमा करून बिबट गावात येणाचे कारणे विषयी माहिती देण्यात आली. बिबट गावात आल्यावर, गावकरी वर हल्ले झाल्यावर, बिबट्यास जेरबंद करणे यापेक्षा बिबट गावातच येणार नाही याकरिता काय केले पाहिजे. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या माध्यमाने काय काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून बिबट गावात येणार नाही यासाठी “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” प्रभावी ठरणार असल्याची माहिती देत ही योजना प्रत्येक बिबट समस्या असलेल्या गावात प्राधान्याने राबविली गेली पाहीजे याचे महत्व सांगितले.

     

    2018 पासून सुरू आहे पाठपुरावा…

     

    2018 पासून विविधस्तरावर पाठपुरावा करून, वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी, मंत्री यांचेकडे सुद्धा सादरीकरण झालेले आहे. जिल्हयातील वाघ-मानव संघर्ष यावर ‘राज्यस्तरीय अकरा सदस्यीय तांत्रिक समिती’ तयार करण्यात आलेली होती, या अहवाल मध्ये सुद्धा बिबट समस्यांमुक्त ग्राम योजनेची शिफारस करण्यात आली, सोबतच राज्यस्तरीय ‘बिबट-मानव संघर्ष’ यावर सुद्धा तयार करण्यात आलेल्या समितीने शिफारस केलेली आहे. या दोन्ही अहवालास ‘राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ’ ने अहवाल मंजूर केलेला आहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रायोगिक ठरणार आहे, मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली दिसून येत नाही आहे.

     

    बिबट किंवा वाघ मानव संघर्ष मधला फरक व योजनेचे महत्व

    जंगलात आत गेल्यावर किंवा शेतशिवारात वाघ आल्यास वाघ कडून मानवावर हल्ले होतात. मात्र बिबटयाकडून होणारे हल्ले ‘बिबट’ थेट गावात येत असल्याने गावात मानवावर हल्ले होतात. बिबट गावात खाद्यासाठी म्हणजे शिकार करण्यास येतात, प्रामुख्याने बिबट कुत्री-डुकरी जे उकरिड्यावर, अस्वच्छतेमुळे वाढणारी प्राणी आहेत याकडे आकर्षित होतात. यांची संख्या गावातील अस्वच्छता यामुळे वाढत असते. यांची शिकार करण्यास बिबटचे वावर नेहमीच जंगलव्याप्त किंवा जंगलालगतच्या गावात असल्याने गावकरी, लहान मुले यांचे जीव धोक्यात येतात. यावर उपाय म्हणून बिबट गावात येणाची कारणे शोधून दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमाने “बिबट समस्यामुक्त ग्राम योजना” प्रस्तावित असून या अंतर्गत अश्या ग्रामपंचायतना स्वच्छता विषयक कामांना आवश्यक कामाकरिता निधीची पुरवीने व कार्य करणे आवश्यक आहे.

     

    या योजने विषयी व्यापक जागृती व शासन-प्रशासन कडून राबविण्याच्या दृष्टीने बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी करीता “बिबट-ग्राम-सत्याग्रह” करण्यात आले, यावेळी बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, धर्मेंद्र लुनावत, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, सुन्नी दुर्गे, रोहित तळवेकर, मेघश्याम पेटकुले, योजना धोतरे, सुभाष टिकेदार सहभागी झाले होते.

     

    बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी व गावे बिबट पासून भयमुक्त करण्यास गावागावात जागृती केली जाणार असून येत्या काळात या मागणीकरिता तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.

  • बल्लारशाह ते दुर्ग, हावडा पर्यंत रेल्वे गाड्या धावतील

    बल्लारशाह ते दुर्ग, हावडा पर्यंत रेल्वे गाड्या धावतील

    News34 chandrapur

    बल्लारपुर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, येथे बल्लारशाह रेल्वे विभागाचे मुख्य जंक्शन आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेवरून बल्लारशाह ते दुर्ग, हावडा, जबलपूर या गाड्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली, त्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

     

    चर्चे दरम्यान श्रीनिवास सुंचुवार यांनी ट्रेन क्र. 08803 बल्लारशाह-गोंदिया, गाडी क्र. 08801 बल्लारशाह-गोंदिया किंवा ट्रेन क्र. 07819 बल्लारशाह-गोंदिया या तीनपैकी एक ट्रेन दुर्ग जंक्शन पर्यंत वाढवण्याची नितांत गरज आहे, कारण छत्तीसगडमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात राहतो. बंबळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक डोंगरगडावर येतात.

     

    गाडी क्र. 22620 चेन्नई- बिलासपूर ते हावडा वाढवण्याची विनंती केली कारण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने बंगाली समुदाय स्थायिक आहे. गाडी क्र. 15231 बरौनी-गोंदिया एक्स्प्रेस बल्लारशाहपर्यंत वाढवण्याबाबत विनंती करण्यात आली कारण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिक मोठ्या संख्येने येथे स्थायिक आहेत.
    गाडी क्र. 22174 जबलपूर – चांदाफोर्ट पूर्वीप्रमाणे सुरू करून बल्लारशाहपर्यंत वाढवण्याची विनंती, ही गाडी चांदाफोर्ट येथे पोहोचायची आणि एक तासानंतर निघायची.

     

    बल्लारशाहपर्यंतच्या मुदतवाढीचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच गाडी क्र. 08804 गोंदिया_बल्लारशाह बल्लारशाह येथे वेळेवर न पोहोचल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना होणारा त्रास पाहता ही गाडी निर्धारित वळे वर चालवण्याची गरज आहे.

     

    दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दक्षिण पूर्व मध्य रेलवे चे मंडल रेल प्रबंधक सौ सुनीता त्रिपाठी, सीनियर डीसीएम दिलीप सिंह अन्य अधिकारी उपस्थिति होते.

    या शिष्टमंडळात श्रीनिवास सुंचूवार यांच्यासह ज्ञानेंद्र आर्य यांचा समावेश होता.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

    चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

    जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बाबापूर या गावी कैलास चा कोंबडा बाजार थाटात सुरू करण्यात आला आहे.

     

    यादिवशी खेळा जुगार

     

    आठवड्यातील रविवार, बुधवार व शुक्रवारी हे तीन दिवस जुगाराचे खास आहे, यादिवशी तेलंगणा, व इतर जिल्ह्यातील शौकीन व्यक्ती कोंबडा बाजारात दाखल होत, विविध जुगार खेळत असतात.

     

    सुविधा काय?

    कोंबडा बाजारात एंट्री झाल्यावर आपल्याला झेंडी मुंडी, कट पत्ता, रमी असे विविध जुगार खेळायला मिळतात, कोंबडा झुंझित हरणाऱ्या कोंबड्याची मेजवानी सुद्धा मिळते, सोबत दारु व चखण्यात नॉन व्हेज ची सुविधा, चंद्रपुरातील कैलास ने जुगार खेळायला येणाऱ्या खेळाडूसाठी चांगली व्यवस्था केली आहे, जुगार खेळायला आल्यावर कुणीही उपाशी पोटी जाऊ नये याची संपूर्ण व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.

     

    रविवार हा दिवस कैलास साठी मोठा दिवस आहे, यादिवशी तब्बल 300 वाहने त्याठिकाणी येतात, वाहने लावायला जागा नसते, मात्र कैलाश च्या उत्तम नियोजनामुळे खेळाडूंना कसलाही त्रास त्याठिकाणी होत नाही हे विशेष.

     

    सट्टा किंग चंद्रपुरातील कैलास.…..

    कैलास हा चंद्रपूर शहरात राहतो, कैलास ने शहरातील अनेक भाग सट्टा पट्टीने गाजविले आहे, भिवापूर, दुर्गापूर, पडोली असे विविध भागात कैलास ने सट्टा सुरू करीत नावलौकिक मिळविले, आता थेट कोंबडा बाजार सुरू करून त्या बाजाराचा स्वागताध्यक्ष म्हणून कैलास ला मोठा मान मिळाला आहे.

     

    ह्या कोंबडा बाजाराबाबत माहिती असून सुद्धा भारी पोलीस काही करीत नाही हे म्हणजे लईचं भारी आहे.

     

    सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे, विविध विषयांवर तिथे चर्चा होत आहे मात्र जिल्ह्यातील कोंबडा बाजारावर चर्चा कधी होणार? ह्या कोंबडा बाजारामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची चिन्हे आहे, कारवाई झाली नाही तर चंद्रपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर /पोम्भूर्णा – धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे तसेच जर लावलेले गुन्हे मागे घेणार नसाल तर आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन सोमवार पासून तालुका कचेरी समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारला आंदोलकांनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनच्या समोर वळवून ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे.या आंदोलनाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहे.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ईको – पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी व विविध मागण्या घेऊन ठिया आंदोलन केले होते.त्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्तावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३०७ व ३५३ कलम मागे घेण्यात यावे यासाठी आदिवासी बांधव आणि संघटना आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी तहसील व पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मागील आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवावर ३०७ व ३५३ कलम लावण्यात आले आहे ते तात्काळ काढण्यात यावे नाही तर आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतले असल्याने प्रकरण चिघळले आहे.

     

    मागील आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनात वनविभाग कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावला, व काही जणांवर 307 व 353 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

    पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला मात्र तपास कार्यात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी तपासकामी सहयोग केला नाही, त्यानंतर सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द झाला अशी माहिती समोर आली असून आता अटक झाली तर सर्व समाज बांधवांना अटक करा अन्यथा दाखल गुन्हे परत घ्या अशी मागणी घेऊन सध्या पोम्भूर्णा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     

    आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून सध्यातरी पोलीस प्रशासन अत्यंत संयम बाळगून प्रकरण हाताळण्याचे काम करीत आहे.

     

    ही बाब योग्य नाही….

     

    गुन्हा न्यायालयात गेला की पुढची कायदेशीर बाजू ही न्यायालय बघतो जर ठिय्या आंदोलन करून गुन्हे मागे होणार असेल तर उद्या प्रत्येकजण गुन्हा करीत पोलीस स्टेशनला घेराव टाकत ठिय्या आंदोलन करणार, प्रशासनाला वेठीस धरणे ही बाब योग्य नाही.

  • शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    News34 chandrapur

    वरोरा :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन हातात आलेले सोयाबीन गेले कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही.

     

    त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि आता अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टेमुर्डा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

     

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.

     

    दरम्यान कर्जमाफी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करू व त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशी घोषणा केली होती परंतु आता हिवाळी अधिवेशनात कुठलाही आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गंभीर नसल्याने व
    यावर्षी झालेली अतिवृष्टी व पूरबुडाई व पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहचावा व ह्या शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारला जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन येत्या मंगळवार नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलनं करण्यात आले.

     

    या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, रेवती इंगोले, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, संजय काटकर, गजू वादाफाळे, मनोज गाठले, राजेंद्र धाबेकर, युगल ठेंगे, धनराज बाटबरवे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे, महेंद्र गारघाटे, रामा डुकसे, अशोक दाते, भदुजी गिरसावळे. सुधाकर ठाकरे,गुलाब गुळघाणे, शेखर कारवटकर इत्यादींनी केले.