Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

    उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरट गावाजवळ 10 डिसेंबर च्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या ट्रक ला मागून दुचाकीने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला.

     

    31 वर्षीय विजय श्रवण साहू रा. घुग्घुस निवासी असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे, तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे, कामावरून तो वणी येथून आपल्या घरी घुग्घुस येथे परत येत होता.

     

    रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5144 ने विजय आपल्या गावी कामावरून परत येत होता, पुरट गावाजवळ रस्त्याच्या मध्ये शाह कोल कंपनीचा ट्रक क्रमांक MH34AB6710 बिघाड झाल्याने उभा होता, मात्र ट्रक ला मागे लाईट नसल्याने विजय ला रस्त्याच्या मध्ये उभा असलेला ट्रक दिसला नाही त्यामुळे त्याची दुचाकी सरळ ट्रक मध्ये घुसली.

     

    या धडकेत विजय चा जागीच मृत्यू झाला, अपघात झाल्यावर विजय चा मृतदेह ट्रक च्या मागील बाजूस पडला होता, सकाळच्या सुमारास नागरिक बाहेर फिरायला निघाले असता त्यांना विजय चा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, पहाटे 4 वाजता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उचलत पंचनामा केला.

     

    चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बोल्ट नसला की RTO विभाग तात्काळ चालान मारत मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे, शाह कोल कंपनीचा ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहन चालकाने ट्रक रस्त्याच्या मध्ये उभा केला, त्या ट्रक ला इंडिकेटर, टेल लाईट नव्हते जर हे लाईट ट्रक ला असते तर हा अपघात घडला नसता.

  • जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे “झोपा काढा सत्याग्रह”

    जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे “झोपा काढा सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यानाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी या मागणीला घेऊन सोमवारी इको- प्रोच्या सदस्यांनी ‘झोपा काढा सत्याग्रह’ करीत शासन-प्रशासन व जनप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे.

     

    शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेमध्ये अरुंद रस्ते आहे. विशेष म्हणजे, जटपुरा गेटपरिसरात वाहतुकीची कोंडी होते. यात वाहनधारकांना प्रदूषणाचाही मारा सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना आजार होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येते. अनेकवेळा वाहन समोर जाण्याची कोणतीही शास्वती नसते. अधिक काळ वाहनांची गर्दीमुळे निघणारा धुरामुळे वाहनधारकांचा जीव गुदमरत असतो, त्यामुळे येथील समस्या कायमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी करीत इको- प्रोच्या सदस्यांनी गांधीगिरी करीत आज “झोपा काढा सत्याग्रह” केले. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांचे माध्यमाने विधान मंडळ अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री यांना तर पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदने देण्यात येणार आहे.

     

    जटपूरा गेटवर इको-प्रोच्या सदस्यांनी यापूर्वी सुद्धा वेगवेगळे आंदोलन केले असून, अनेकदा पाठपुरावा केलेला आहे, यासोबतच अनेक संस्था संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. अनेक वर्षापासून जटपुरागेटच्या वाहतूक समस्या सोडविण्यास पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी आहे. परंतु आजपर्यंत यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशन निमित्त इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन श्रूंखलेमध्ये आज तिसऱ्या दिवशी केलेल्या प्रतिकात्मक “झोपा काढा सत्याग्रह” निमित्ताने येत्या काळात या मागणी करिता तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा इको प्रो तर्फे देण्यात आले आहे.

     

     

    इको-प्रोच्या वतीने अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सदर सत्याग्रह करण्यात आले या ‘झोपा काढा सत्याग्रह’ मध्ये नितीन रामटेके, अब्दुल जावेद, ओमजी, वर्मा, अनिल अडगुरवार, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, आकाश घोडमारे, सूरज कावळे, भूषण ढवळे, खुशबू जैस्वाल, नेत्रदीपा चिंचोलकर, रोहित तळवेकर आदी उपस्थित होते.

  • ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

    ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – आधुनिक युगामध्ये जुन्या रूढी परंपराना तिलांजली देत सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेने कार्य करीत असुन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी देखील गगनभरारी घेतली आहे. हाच उदात्त हेतू साधत ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा दर्शनीय उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला.

    आयोजित उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूरकर, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सौ. किरण विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे,  न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नंदु नागरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार, कुस्तीगीर संघाचे सचिव मुर्लीधर टेकुलवार, विजय नडे, मतीन कुरेशी, राजेश सोलापन, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, गजानन शिरसागर, चंद्रशेखर पडगिलवार, नरेंद्र गाडगिलवार, विनोद दिवटे, चंद्रशेखर पडगिलवार यांची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की,  आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून 600हुन अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे. तर देशाच्या पारंपारिक क्रिडांपैकी एक असलेल्या कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप सोडणाऱ्या विजेत्यांना राष्ट्रीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा यामागील मुळ हेतू असुन जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी व वैद्यकीय नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी नगरीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी कटीबध्द आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
    सुत्रसंचलन सुरज मेश्राम, प्रास्ताविक विनोद दिवटे, आभारप्रदर्शन संजय कुमरे यांनी केले.

    महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे पुजन

    ब्रम्हपूरी येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात येणार असलेल्या महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे विधीवत पूजन कार्यक्रम राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
    यावेळी त्यांनी शक्तीची देवता बजरंगबली हनुमानजींच्या मुर्तीची सुध्दा पुजा केली.
    याप्रसंगी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, तहसीलदार उषा चौधरी, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    शहरातुन निघाली कुस्तीपटुंची रॅली

    ब्रम्हपूरी शहरातील मुख्य मार्गावरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कुस्तीपटुंना सहभागी करत रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व सलग दोनदा महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवणारे शिवराज राक्षे यांनी केले.
    यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ह्या उपस्थित होत्या.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

    चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

    उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली जात आहे आज राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर व उपविभागीय अधिकारी राजुरा तसेच जिवतीचे तहसिलदार यांनी उपोषणाला भेट दिली उपस्थित शेतकय्रांना मार्गदर्शन करून उपोषण कर्त्यांसी संवाद साधला, चर्चा केली मात्र मुख्य मागणी जमिनीच्या पट्टयांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही जोपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री उपोषण स्थळी भेट देऊन जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न निकाली काढणार नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.

     

    मागील चार दिवसांपासून जिवती येथे सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी जिवती शहर व इतर काही कडकडीत बंद करून विविध गावांतील शेकडो शेतकरी, शेतकरी पुत्र,व संपूर्ण व्यापारी बांधवांनी रॅली काढून प्रमुख मागण्या पुर्ण करण्यासाठी नारेबाजी करत उपोषण स्थळी भेट देत शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केले.उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध गावातून आलेल्या शेतकरी बांधवांना उपस्थित तरूण शेतकरी पुत्रांनी आपल्या तिव्र भावना मांडल्या.

     

    पिढ्यांन पिढी पासून वास्तव्यास असलेल्या शेतकरी बांधवांना जमिनीचा मालकी हक्क व त्यांच्या इतर मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विधानसभेत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करून जिवती तालुक्यातील प्रमुख मागण्या निकाली काढण्यात यावे यासाठी विनंती केली.जर शासन प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शेतकरी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरेल.शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर होणाऱ्या परिणामांस शासन प्रशासनच जबाबदार असेल आणि येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण तालुक्याचं बहिष्कार करण्यात येईल असा इशारा सुध्दा यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी दिले.

     

    सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मण मंगाम, शब्बीर जागीरदार, मुकेश चव्हाण, विनोद पवार, प्रेम चव्हाण, विजय गोतावळे, दयानंद राठोड हे शेतकरी पुत्र अन्नत्याग बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.आंदोलन कर्त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र शासन प्रशासनाने जमिनीच्या पट्ट्यांच्या या मुख्य मागणीलाच बघल ठेवत असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध केला व आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे जमा करणार आहेत.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ला चंद्रपुरात येऊन 20 दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आश्वासन देऊन आंदोलन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नसल्यामुळे दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून दुसऱ्या टप्प्याचे अन्न त्याग आंदोलन सुरू झाले.

     

    राष्ट्रीय महासंघाचे आंदोलन तीव्र होत चालले असून अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी साखळी उपोषण सोबत भीक मांगो आंदोलन घेण्यात आले. चिमूर येथील तहसील कार्यालय परिसरातील व्यवसाईकाकडून राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम लेंडे. जिल्हा उपाध्यक्ष राजू हीवजे. तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे यांचे नेतृत्वात पैसे रुपात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आर्थिक रुपात जमा झालेला निधी राज्य सरकार कडे जमा करणार असल्याची माहिती आंदोलन दरम्यान देण्यात आली.

     

    यावेळी रामभाऊ खुडसिंगे. प्रभाकर लोथें. प्रभाकर पिसे. श्रीकृष्ण जिल्हारे. श्रीहरी सातपुते. रामदास कामडी. नागेंद्र चट्टे. अविनाश अगडे. सविता चौधरी. भावना बावनकर. दुर्गा सायम. मंगला बोरकर शेवंता बोरकर. मीना चौधरी. रेखा मोहिनकर प्रीती दीडमुठे. प्रमिला ठाकरे व बहुसंख्यांक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात ( दि. 9 डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच  सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव, गिरीश भालचंद्र, पांडुरंग भोसले, भगवान फड, प्रशांत काळे आदी उपस्थित होते.

     

    लोक न्यायालयासाठी चंद्रपूर मुख्यालयात 7 तसेच तालुका न्यायालयात 21 असे एकूण 28 पॅनल तयार करण्यात आले होते. या लोक न्यायालयामध्ये 10 हजार 55 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 17 हजार 680 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 27 हजार 735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 342 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तर 1 हजार 337 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 2 हजार 679 प्रकरणी निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईत 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 70 लक्ष 80 हजार वसूल करण्यात आले. भूसंपादनाची एकूण 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याबाबत 71 लक्ष 65 हजार 857 रुपये नुकसान भरपाई संबंधित पक्षकारास अदा करण्यात आली. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 5 प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीअंती एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला.

    धनादेश अनादरीत प्रकरणांपैकी 61 प्रकरणे ज्याची रक्कम रुपये 53 लाख 58 हजार 819 निकाली काढण्यात आली. लवाद वसुलीची 27 प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्याची रक्कम रुपये 1 कोटी 38 लक्ष 79 हजार 192 वसूल करण्यात आली. औद्योगिक न्यायालयातील पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

  • ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात करण्यात येणार आहे.
    सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत.
    स्पर्धेचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूर चे आमदार अभिजीतजी वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबाले , शहरातून निघणाऱ्या प्रमुख रॅलीचे आकर्षण सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराजजी राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोकजी रामटेके, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. देवेशजी कांबळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशजी फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
    @कार्यक्रमावली
    10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होईल.
    11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पासून कुस्तीला सुरुवात
    12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.

     

  • थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

     

    7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, पप्पू शेख, अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

     

    यावेळी यामिनी कामडी, दुर्गा निवटे, विजया तरारे, सुनीता सहारे, कपिला चावरे, सुनीता मुरकुठे, रेखा चाचारकर, मंदा रंधये, पुज्या नन्नावरे व शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ज्या जन्मदात्यांनी कठीण परिश्रम घेऊन मुलांना वाढवले. त्यांना काय हवं, काय नको याचे लाड पुरवले. त्यांना योग्य शिक्षण दिले आणि त्याच शिक्षणाच्या भरवशावर दोन्ही मुले शासकीय सेवेत लागली. मात्र जेव्हा वयोवृद्ध पालकांचा सांभाळ करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या निष्ठुर मुलांनी पाठ फिरवली. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या पर्यंत पोचले आणि त्यांनी या मुलांना दणका दिला. या दोन्ही मुलांना आपल्या आईवडीलांचा निर्वाह खर्च उचलण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

    मेघराज माधव पिंपळशेंडे (७१) आणि त्यांच्या पत्नी हे पोंभुर्णा येथे राहतात. त्यांची दोन मुले आहेत. सत्यपाल पिंपळशेंडे आणि सचिन पिंपळशेंडे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही शासकीय सेवेत रुजू आहेत. या वयात या वयोवृद्ध दाम्पत्याची विसावा घेण्याची नातवंडांसोबत मज्जा करण्याची वेळ. मात्र, यांपैकी दोन्ही मुलांनी त्यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. उलट त्यांना पालकच नको आहेत. त्यांनी आपल्या पालकांचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार दिला.

     

    पिंपळ शेंडे या वयोवृद्ध दांपत्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. यापूर्वीची जी संपत्ती त्यांच्याकडे होती त्यांची वाटणी देखील त्यांनी मुलांमध्ये केली. त्याच्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर हतबल झालेल्या दांपत्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागितली. त्यांनी आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता मिळण्याबाबत गोंडपिपरी- पोंभुर्णाचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांच्याकडे मुलगा सत्यपाल पिंपळशेंडे, सचिन पिंपळशेंडे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला. त्यांची ही दोन्ही मुले शासकीय नोकरीवर असून, सांभाळ करत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मेघराज यांनी धाव घेतली.

     

    उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी याची गंभीर दखल घेतली. तक्रारीवरून त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीअंती उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दोन्ही मुलांना ज्येष्ठ आई- वडिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रतिमाह निर्वाह भत्ता देण्याचा आदेश पारित केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, नोकरदार मुलांनाही चांगलीच चपराक बसली आहे.

     

    पीडित पालकांना पूढे येण्याचे आवाहन

    उपविभागीय अधिकारी या पदाची सूत्रे हातीच घेताच बालाजी शेवाळे यांनी अनेक उपक्रम राबवले. आपल्या परिसरात चाललेल्या वाळूच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी देखील त्यांनी आदेश काढला होता. अशा पद्धतीची वाळूची तस्करी होत असल्यास केवळ दंडच नव्हे तर फौजदारी कारवाई करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले होते. त्यामुळे या परिसरातील वाळू तस्करी चाप बसला. हे प्रकरण आले असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत योग्य निर्णय दिला आणि पीडित पालकांना न्याय मिळवून दिला. सोबतच त्यांनी आवाहन देखील केले आहे अशा पालकांचा सांभाळ करण्यास मुलं नकार देत असल्यास त्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागण्याचे आवाहन देखील शेवाळे यांनी केले आहे

     

    नियम काय सांगतो

    आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर मूळ नकार देत असतील तर
    निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम ५ पोट कलम (१) नुसार निर्वाह भत्ता मिळण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात दाद मागता येते. यात तथ्य आढळल्यास अर्जदाराला प्रतिमाह भत्ता देण्याचा आदेश दिला जातो. तसेच आदेशाचे पालन न केल्यास एक महिन्याच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

  • चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

     

    2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, मात्र पत्रकारांच्या सतत वृत्ताने पोलिसांना ते कोंबडा बाजार बंद करावे लागले होते, मात्र आता चंद्रपुरातील ” सट्टा किंग” “कैलास” ने थेट जिवती येथील पर्वत गाठत कोंबडा बाजार सुरू केला.

     

    कुठे भरतो जुगारांचा मेळा?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगा असलेलं तेलंगणा व महाराष्ट्र सीमेला जोडणारे जिवती तालुक्यातील मौजा भारी समोर बाबापूर याठिकाणी हा बाजार भरतो.

     

    याठिकाणी जायचं कसं?

     

    राजुरा वरून वाकडी गावी आलं की उजव्या दिशेवरून सरळ 8 किलोमीटर अंतर गाठून भारी येथे जायचं, त्याठिकाणी कैलास आपल्या माणसांसोबत आपलं स्वागत करण्यास उत्सुक असतो.

     

    कोण आहे कैलास?

     

    चंद्रपूर शहरात राहणारा कैलास मागील अनेक वर्षांपासून सट्टा पट्टी चालवितो, पोलिसांना याबाबत जाणीव आहे, 2 वर्षांपूर्वी त्याने दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पेंडाल टाकत सट्टा व जुगार सुरू केला होता, मात्र News34 च्या बातमीनंतर त्याचा जुगार दुर्गापुरातून हटला, आता त्याने थेट जिवती तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर कोंबडा बाजार सुरू केला आहे, कारण सीमेच्या पलीकडील नागरिक मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी त्याठिकाणी येत असतात.

     

    आधी सोशल क्लब च्या नावाने रमी क्लब तर सुरूच झाले आहे आता त्यामध्ये कोंबडा बाजाराने भर दिल्याने जुगार प्रेमींना चांगली पर्वणी मिळाली आहे.

     

    आपल्या कोंबडा बाजारात जायचं असेल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार व रविवार हे 3 दिवसात जावे, बाकी उर्वरित दिवस “कैलास” ने सुट्ट्या घोषित केल्या आहे, कैलास सोबत चंद्रपूर व तेलंगणा येथील काही पार्टनर सोबत असल्याची माहिती आहे.