Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर : इको-प्रो च्या हिवाळी अधिवेशन निमित्त एक दिवस एक आंदोलन सुरू असून आज चवथ्या दिवशी, चवथे आंदोलन चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी असलेल्या झरपट व इरई नदीच्या संवर्धनाच्या मागणिकरिता या दोन नद्यांच्या संगमावर “नदी वाचवा सत्याग्रह” करण्यात आला.

     

    चंद्रपूर शहराच्या जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे झरपट व इरई या नद्याला अवकळा आल्या आहेत, प्राचीन काळी या नद्यांच्या काठावर लोकपूर, इंदूपुर व गोंड काळात चंद्रपूर शहर वसले, ते या नद्यांच्या प्रदेश पाहूनच, प्रचंड पुराचा धोका असताना सुद्धा ही शहरे वसली, मात्र गोंड काळात या नद्यांच्या पुरापासून वाचविण्यासाठी संपूर्ण शहराला वेढा बांधून किल्ला परकोट भिंत बांधली. या नद्यांच्या काठावर प्राचीन अंचलेश्वर, महाकाली मंदिर देवस्थान आहेत. कधीकाळी या शहराचे वैभव असणारे, आज या नद्या मात्र शहरातील सांडपाणी वाहून नेणारी तसेच उद्योगिक प्रदूषित जल वाहून नेणारी नद्या राहिल्या आहेत.

     

    2022 व 2023 ला नद्यांचे सर्वेक्षण मध्ये या जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा व पैनगंगा या नद्या प्रदूषित आहेतच, यापेक्षा गंभीर स्थिती मात्र झरपट व इरई या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची झालेली आहे. खरे तर झरपट व इरई या नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत, या नद्यांचे उगम जंगल भागातून झाले असले, स्वच्छ प्रवाह उगमापासून असला तरी शहरात येताच उद्योग आणि नागरी वस्तीमुळे या प्रदूषित पाणी वाहून नेतात. नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये असे ग्रीन ट्रिब्युनल चे आदेश असताना, विविध अकॅशन प्लॅन, कृती आराखडे असताना सुद्धा ते फक्त कागदावरच आहेत.

     

    आज करण्यात आलेल्या नदी संवर्धन सत्याग्रह आंदोलन मध्ये इरई-झरपट नद्यांचा कृती आराखडयाची अंमलबजावणी केव्हा?, ‘चंद्रपूर शहराची जीवनदायिनी की ‘प्रदूषित नाला’, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम केव्हा राबविणार?, दूषित व सांडपाणी नदीत सोडणे केव्हा थांबणार?, नदीत जाणारे प्रत्येक नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र केव्हा लागणार?, उद्योगाचे सोडले जाणारे सांडपाणीवर प्रक्रिया केव्हा होणार?, नदी पात्रातील अतिक्रमण केव्हा थांबणार?, नद्यांचे खोलीकरण केव्हा होणार?, नदी पात्रा लगतचे ओव्हर बर्डन समस्या केव्हा दूर होणार? या झरपट व इरई नद्या संवर्धन विषयक मागण्याचे फलक हातात घेऊन “वाचवा वाचवा नद्या वाचवा”, मुक्त करा, मुक्त करा, प्रदूषणापासून नद्या मुक्त करा”, “झरपट-इरई नदी कृती आराखडा ची अंमलबजावणी करा” आदी घोषणा देत इको-प्रो सदस्यांनी नदी पात्रात उभे राहून आंदोलन केले.

     

    इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रमोद देवांगण, सुरज कावळे, स्वप्नील मेश्राम, भूषण ढवळे, चंदू ओशाखा, अमित कुमरे, धीरज शेंडे, लोकेश भलमे, योजना धोतरे, प्रगती मार्कंडवार, प्रज्ञा नवले, लक्ष्मी गोखरे, हर्षाली खारकर, करिश्मा बुऱ्हाण, नेत्रदीपा चिंचोलकर, आकांशा गाऊत्रे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोषणाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

  • हिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असच एक शक्तीपीठ माता महाकालीच मंदिर चंद्रपूरात असुन या मंदिराच्या विकासासाठी शासनाने पूढाकार घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून मंदिराच्या विकासकामात अडथळा असलेल्या पूरातत्व विभागाच्या जाचक अटींकडेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

     

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पूरवणी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा माता महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा सभागृहात उचलला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात माता महाकाली मंदिराचे 500 वर्ष पूरातन मंदिर आहे. तर 2 हजार वर्षा पुर्वीची येथे माता महाकालीची मुर्ती आहे.

     

    या शक्तीपीठात चंद्रपूर नव्हे तर देशभरातून वर्षभर लाखो भाविक दर्शनाला येत असतात. मात्र पूरातत्व विभागाच्या अटिमुळे या मंदिराचा विकास झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने दिलेले 59 कोटी रुपये अखर्चित आहे. पैसे असुनही केवळ पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे या मंदिराच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सोबतच महाकाली यात्रा परिसरात अनेक मोकळ्या जागा आहेत मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र बैठक घेत हा यात्रा परिसर विकसित करावा अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली.

     

    महानगर पालिका आणि नगर पालीका क्षेत्रात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 700 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या विभागातून चंद्रपूर महानगर पालिका आणि नवनिर्मित घुग्घूस नगर परिषद साठी शासनाने निधी दयावा तसेच वैशिष्टपूर्ण विभागात दोनशे कोटी रुपयांना निधी आहे. यातुनही चंद्रपूरच्या विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.
    नागपूर करीता अतिवृष्टीसाठी सरकारने 100 कोटी रुपये राखीव केले आहे. चंद्रपूरातही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे येथे चारदा पूर आला परिणामी अनेक भागातील पायाभूत सुविधा पूर्णपणे खराब झाल्यात त्यामुळे चंद्रपूरात सुद्धा आपण निधी द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    पदांची भरती करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करा

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरात मंजूर झाले आहे. या विद्यालयाची इमारत तयार होत आहे. सध्या सदर मेडीकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पदभरती करुन ते नव्या इमारतीत सुरु करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

  • हृदयाचे व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत

    हृदयाचे व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत

    News34 chandrapur

    चंद्रपूर: अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा तरुण आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. हातात पैसा नाही आणि कुटुंबाचं भविष्य असलेला तरुणही आजारी. अशा परिस्थितीत विवंचनेत सापडलेल्या पालकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. संकटात सापडलेल्या आईवडिलांची अवस्था ना. श्री. मुनगंटीवार यांना बघवली नाही. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली आणि तरुणवर मुंबईतील पंचतारांकित इस्पितळात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तरुणसाठी देवदूत ठरलेल्या ना. मुनगंटीवार यांचे आभार मानताना अंबोरे कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.

     

     

    गोंडपिपरी येथे राहणारा तरूण साहेबराव अंबोरे (वय २२) हा मूळचा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी. गेल्या १६ वर्षांपासून अंबोरे कुटुंब गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे. तरूणच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच बेताची आहे. त्यामुळे ते भंगाराचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. तरूणला लहानपणापासून हृदयाचा त्रास आहे. २००६ मध्ये त्याचावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. परंतु पुढील औषधोपचाराचा खर्च तरूणच्या आईवडिलांना पेलवत नव्हता. अशात तरुणची प्रकृती खालावत गेली व त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. २०१८ पासून त्याच्या त्रास खूप जास्त वाढला. आपल्या पोटच्या गोळ्याला तडफडताना बघून तरुणच्या आईवडिलांना काय करावे ते सूचत नव्हते. अशात त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्याशी संपर्क साधला. तरुणला वाचविण्यासाठी एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, याची पूर्ण जाणीव बोडलावार यांना होती. त्यांनी तरूणच्या आईवडिलांना तातडीने ना. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे नेले.

     

    आपली कैफियत सांगत असताना तरूणच्या आईवडिलांचा कंठ दाटून आला. ना. श्री. मुनगंटीवार यांनी तरुणच्या पालकांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला. तरुणच्या आईवडिलांचे थरथरणारे हात हातात घेऊन आपण पूर्ण शक्तीने मदत करेन असा शब्द ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. आणि केवळ शब्द देऊन थांबतील ते ना. श्री. सुधीर मुनगंटीवार कसे. त्यांनी तात्काळ आरोग्य सहाय्यक सागर खडसे यांना यासंदर्भात मदत करण्याच्या सूचना दिल्या.

     

    जीवन-मरणाशी संघर्ष

    स्वत: जातीने लक्ष घालत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तरुणच्या उपचारासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली व त्याला मुंबईला रवाना केले. अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. सुरेश जोशी यांनी तरुणच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यासाठी जवळपास 19 लक्ष रुपयांचा खर्च आला. शस्त्रक्रियेनंतर तरुणची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जीवन मरणाशी संघर्ष करीत असलेल्या आपल्या लेकराला स्वस्थ पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांनी देवदुतासारखे धावून आलेल्या ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

  • शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे

    शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – आजच्या प्रगतशील यांत्रिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली व पुढेही होत राहील.परंतु मानवाचा अन्नदाता, पालनकर्ता असणारा शेतकरी अनेक वर्षापासून धडपडतो याच कारण आणूनही कृषी क्षेत्राची प्रगती झाली नाही. पूर्वीपेक्षा शेती तोट्यात चालली आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. यासाठीच नॅनो टेक्नॉलॉजी एक अभिनव प्रयोग विवा मार्ट इंडिया प्रायव्हेट ली. च्या माध्यमातून विकसित केला असून विषमुक्त शेती – रोगमुक्त भारत ही संकल्पना शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल व शेतीचे सोबतच मानवाचे आरोग्य दीर्घकाळ टिकेल.

     

    यासाठी आपल्या मुल नगरात प्रथमच किसान सेंद्रिय शेती दुकान खास शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आला असून विषमुक्त जीवन,रोगमुक्त जीवन जगायचे असेल तर रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती करावे विष मुक्त शेती,रोग मुक्त भारत करावे असे अमूल्य मार्गदर्शन व्हिवा मार्ट शेती माहिती तंत्रज्ञ संजय येगारे परभणी यांनी केले.

     

    मुल येथील प्रगतशील अनुभवी उत्कृष्ठ शेतकरी श्री.भगवान ढोरे यांनी सर्वात प्रथम मुल येथे ताडाळा रोड येथे किसान सेंद्रिय शेती दुकान सुरु केले असून याचे उद्घघाटन मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गुरु गुरनूले यांचे शुभहस्ते करण्यात आले. उद्घघाटन प्रसंगी पूर्वीच्या पालेभाज्या ,भाजीपाला आणि धान्य शेणखताच्या आधारावर पौष्टिक ताकदपूर्न होते परंतु आता अनेक रोगांना निमंत्रण देणारे धान्य व भाजीपाला खात आहोत.म्हणून आपले आयुष्य कमी झाले. करीता यापुढे रासायनिक खतांचा वापर न करता १०० टक्के ऑर्गनिक असलेला प्रोडक्ट वीवा किसान डेव्हलपरचा वापर करा असे शेतकऱ्यांना सांगितले.

     

    याप्रसंगी विदर्भ प्रमुख प्रतीक्षा कुंभारे, अजय आंबटकर, नंदकिशोर भांडेकर, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, डेव्हिड खोब्रागडे, गंगाधर बुटले, प्रगत शेतकरी गजावंत निकोडे, कैलास डोंगरे,बबन निमगडे,विनोद कुळमेथे, सुरेश लाडसे, सचिन तोडसाम, अजय चावके, यांचेसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंगेश भांडेकर यांनी केले.

  • भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले होते. शासनाने परीक्षा शुल्कात देखील वाढ केली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाण्याकरिता अधिकच्या आर्थिक भुर्दंड भावी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरळ सेवा परीक्षेसाठी मोठ्या शहरात तरुणांना जाण्याठी मोफत बस सेवा देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली.

     

    या निवेदनात आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, सरळ सेवा परीक्षेसाठी राज्यातील अनेक तरुण मोठ्या शहरात जातात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोठ्या मेहनतीची आवश्यकता असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना या परीक्षेसाठी जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे या तरुणांना मोफत बस सेवा देण्याची मागणी त्यांनी केली.

     

    या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी असेही म्हटले की, महाराष्ट्रात कुठेही परीक्षा देण्याकरिता बस प्रवास मोफत करावा. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळेल. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ही मागणी स्वागतार्ह आहे. या मागणीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना मोठा फायदा होईल.

  • महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

    महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे दुसरी किताब महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा दर्शनीय उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 हून महिला कुस्ती पटूंनी विद्यानगरी ब्रह्मपुरी गाठत आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय आयोजित स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 224 महासंग्राम चांगलाच रंगला. यात सहभागी स्पर्धकांनी आपला अनुभव व संपूर्ण ताकदीनिशी सामन्यात रंगत आणली. कुस्तीपटूंच्या विविध डावपेचांचा थरार उपस्थित दर्शकांनी अनुभवला. व ब्रह्मपुरीकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

     

    सकाळपासूनच आयोजकांमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार कुस्ती सामन्यांच्या लढती वयोगटांनुसार घेण्यात आल्या. यात 50 किलो गटातील लढती मध्ये गौरी पाटील कोल्हापूर (विजयी)विरूद्ध इशा धोंगडे बुलढाणा, इशिता मनोहरे नागपूर(विजयी) विरूद्ध सोनी राठोड धुळे, अमृता यादव मुंबई (विजयी) विरूद्ध प्रियदर्शनी अमरावती, दुर्गा शिरसाट, संभाजीनगर (विजयी) विरूद्ध सायली यादव रत्नागिरी, नंदिनी साळुंके कोल्हापूर(विजयी) विरुद्ध प्रणाली झंजाडे भंडारा,
    ज्ञानेश्वरी पुणे (विजयी) विरुध्द प्राची सावंत सातारा
    भारतीय टेकाडे अकोला(विजयी) विरूद्ध स्नेहल पवार धाराशिव, मनीषा सेतार ठाणे (विजयी)विरूद्ध माया जाधव नाशिक

    53 किलो गटातील लढती 

    आदिती शिंदे पुणे(विजयी) विरूद्ध पल्लवी बांगळी सांगली, साक्षी इंगळे पुणे (विजयी) विरुध्द सोनाली गिरगे संभाजी नगर, रशिका राणे कल्याण(विजयी) विरूध्द स्वाती धावडे रत्नागिरी, स्वाती शिंदे कोल्हापूर (विजयी)विरुद्ध सोनम वाकडे ठाणे, किर्ती गुडघे धुळे(विजयी) विरूद्ध हैसा शिवरे ठाणे, पुनम गाडे अहमदनगर(विजयी) विरूध्द वृषाली खंडेराव बुलढाणा
    रुतुजा पवार सातारा(विजयी ) विरूद्ध अमृता भाकरे ठाणे

    55 किलो गटातील लढती 

    साक्षी शिंदे धुळे(विजयी) विरूद्ध सुरभी पाटील रायगड
    धनश्री फंड(विजयी) विरुध्द नेहा चौगुले कोल्हापूर
    साक्षी कारू नागपूर(विजयी) विरूद्ध आचल वाघमारे अमरावती, पल्लवी सुपनर सोलापूर (विजयी)विरूद्ध जयंती शाम नागपूर, स्मिता पाटील कोल्हापूर(विजयी) विरूद्ध ऐश्वर्या सणस ठाणे, प्रतिक्षा खोडकर पुणे(विजयी) विरुध्द दिक्षा तायडे पुणे बुलढाणा
    धनश्री चौधरी संभाजीनगर (विजयी)विरूद्ध उज्वला पाटेन यवतमाळ, तुलसी पाखरे वाशिम (विजयी)विरूद्ध करिश्मा चौधरी मुंबई
    57 किलो वजनगट
    अश्विनी अग्रजे बीड(विजयी) विरूद्ध प्रेरणा अकोडकर अकोला, तनू जाधव चंद्रपूर (विजयी)विरूद्ध अंकिता कोळेकर सोलापूर, सिमरण कोरी मुंबई(विजयी) विरुद्ध उर्जिता मेटके वाशिम, अलिशा कांबळी कोल्हापूर(विजयी) विरुद्ध निलम शिरसाट नाशिक,
     सेजल पाटील रायगड(विजयी) विरूद्ध प्रियंका कंची
    असे विविध वयोगटातील महिला कुस्तीपटूंचे सामने पार पडले.
    सकाळपासूनच महिला कुस्तीपटूंचे सामने बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विद्यानगरी ब्रह्मपुरी शहराला सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व क्रीडा असा चौहेरी वारसा लाभला असून तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे ,आरोग्य शिबिरे, आणि अनेक सामाजिक कार्याचे आयोजन करत एक सच्चा जनसेवक व मनकवडा लोकप्रतिनिधी ते सहृदय नेता अशी ख्याती मतदारसंघासह संपूर्ण राज्यात मिळवली आहे.
    कुस्ती स्पर्धेत दिग्गज महिला कुस्तीपटूंचा सहभाग
    नगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर भाग्यश्री फंड, नाशिक येथील राष्ट्रीय ब्रांझ पदक विजेती सोनाली मंडलिक, सांगली येथील पहीली महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती विजेती प्रतिक्षा बागडी, राष्ट्रीय पदक विजेती अमृता पुजारी (कोल्हापूर), रौप्यपदक विजेती संजना बागडे, खेलो इंडीया रौप्यपदक विजेती वैष्णवी कुश्यापा ह्या प्रमुख महिला पहिलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपले कसब पणाला लावणार आहेत. तसेच इतर गटांमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेती स्वाती शिंदे सुध्दा खेळणार आहे.
    सबज्युनिअर गटात 40 किलो ते 73 किलो पर्यंतचे वजन गटात
    92 लढती झाल्या.
    सिनीअर गटात 50 ते 72 किलो  व महिला महाराष्ट्र केसरी गटात 65 ते 76 किलो वजन गटात
    132 लढती झाल्या.
    आयोजित स्पर्धेत बंकट यादव स्पर्धा प्रमुख तांत्रिक समिती, पंचप्रमुख नवनाथ ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेत न्यायदानाचे काम करत आहेत.
  • जम्मू-कश्मिरविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – हंसराज अहीर

    जम्मू-कश्मिरविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – हंसराज अहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/यवतमाळ- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-कश्मिरला विशेष दर्जा बहाल करणारे अस्थायी 370 कलम सन 2019 मध्ये संसदेची मंजुरी प्राप्त करून हटविले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरूध्द न्यायालयात दाद मागीतली होती.

     

    या प्रकरणात माननिय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय संविधानिक ठरवित ऐतिहासिक निर्णय दिल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या निर्णयाचे स्वागत करून या निर्णया मुळे यापुढे जम्मू कश्मिर राज्यात लोकशाहीची पुनर्स्थापना होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

     

    अस्थायी 370 कलम हटविणे हा सरकारचा निर्णय वैध असल्याचा निवाडा 5 न्यायमुर्तींच्या खंडपीठाने देतांनाच यामुळे भारत सरकारशी जम्मू कश्मिर जुळल्यामुळे हे राज्य मजबुतीने उभे राहील असेही निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. जम्मू कश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करून येथे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश माननिय न्यायालयाने दिल्याने या राज्यात लोकशाही बळकट व चिरंतन होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

  • चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : प्रियदर्शनी चौक,कामगार चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, एसटी वर्कशॉपजवळील शहीद भगतसिंग चौक आणि रामाळा तलावातील फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या सव्वादोन कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उजेळात आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान सोमवारी त्यांनी या घोटाळ्याची तक्रार जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग तसेच एसीबीकडे केली असल्याने आता या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागणार आहेत.

     

    पाच फाउंटेन उभारणीसाठी मनपाने १७ फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीकडे फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम दिले. या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्याने जाणीवपूर्वक प्रशांत मद्दीवार या एजन्सीसाठी सोयीच्या अटी-शर्ती निविदेत टाकण्यात आल्या. जॉइंट व्हेंचरची तरतूद केली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या ८० टक्के काम किंवा ५० टक्के दोन काम किंवा ४० टक्के तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक असतानाही मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी नियम पायदळी तुडवले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशाचे सरसकट उल्लंघन केले.

     

    काम पूर्ण केल्याचे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही प्रशांत मद्दीवार या कंत्राटदाराला पात्र ठरवले. चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून ,अवास्तव दर टाकून तसेच पात्र असलेल्या कंत्राटदाराला टाळून मर्जीतील कंत्राटदारला काम देऊन आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात झालेला आहे. याबाबत संपूर्ण कागदपत्रासह जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मनपाचे आयुक्त बिपिन पालीवाल व या घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

    मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार

     

    चंद्रपूर शहरातील नागरिक धुळीच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला.या निधीतून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. प्रदूषणाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने शुद्ध हवेसाठी किंवा धूळ नियंत्रणाच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारासाठी फवारे लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घेणे आम्ही सुरू केले आहे.त्यांना वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा जनविकास सेनेचा इशारा आहे.

  • चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

     

    दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

     

    आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.