Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृघले अंतर्गत आज सातव्या दिवशी चंद्रपुरच्या प्रदुषणमुक्ती करीता तसेच सिटीपीएसचे कालबाहय प्रदुषीत संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची तसेच चंदीगडच्या धर्तीवर ‘एअर प्युरीफायर टॉवर’ शहरात उभारण्याच्या मागणीसह अन्य मागण्या शासनाकडे करीत ‘‘प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालय व अधिकारी यांना (एमपीसीबी) साकडं घाला सत्याग्रह’’ आंदोलन करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहर राज्यातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या यादीत वरच्या स्थानावर असल्याने, राज्याच्या विजेची गरज सोबतच खनिजांची गरज पुर्ण करून चंद्रपूरकरांच्या वाटयाला कायम प्रदुषण, आजार हेच मिळाले आहे. चंद्रपूरचे प्रदुषण कमी व्हावे म्हणुन वेळोवेळी अनेक आंदोलने, पाठपुरावा तसेच जनहित याचिकाच्या माध्यमाने अनेक संस्था-संघटना लढत असतात मात्र याकडे हवे तसे लक्ष शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दिसुन येत नाही. प्रदुषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नोटीसा देणे, बॅक गॅरन्टी जप्त करणे या पलिकडे काही होताना दिसत नाही. यासाठी राज्यातील शहरा-शहरातील प्रदुषणाची तीव्रता बघता, बाधीत जनतेच्या हिताचा, आरोग्याचा विचार करता भविष्यात प्रदुषण विरोधात कार्यवाहीचे स्वरूप व अंमलबजावणी बाबत शासनाने वाढत्या प्रदुषणाविरोधात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

     

    2006 पासुन चंद्रपूरच्या प्रदुषणाबाबत अनेक अॅक्शन प्लान आले मात्र अमलबंजावणी हवी तशी झालेली नाही. अलिकडे जिल्हातील व शहरातील नदयाचे जलप्रदुषणाची समस्या गंभीर आहे. नागरी सांडपाणी पासुन तर उदयोगीक प्रदष्ुाीत पाणी सर्रास नदयात प्रवाहीत केले जात आहे. तसेच जिल्हयातील तलावाची स्थिती सुध्दा गंभीर असुन जलप्रदुषण ठिकठिकाणी होत आहे. यासाठी सुध्दा कृती आराखडे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाची जवाबदारी आहे, नगर विकास विभागाची जवाबदारी आहे. मात्र याबाबत कृती होताना दिसत नाही. यापुर्वी इको-प्रो ने शहरातील प्रदुषणाविरोधात ‘अन्नत्याग सत्याग्रह’, धरणे आंदोलन, पदयात्रा तसेच जनहित याचीकाच्या माध्यमाने सिटीपीएस संच क्रमांक 1 व 2 साठी लढा दिलेला आहे. रेलवे मालधक्का प्रदुषण विरोधातही संघर्ष केलेला आहे. भविष्यात प्रदुषणाच्या मागण्यासंदर्भात इको-प्रो सत्याग्रह आंदोलनाच्या भुमीकेत असणार आहे.

     

    महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे चंद्रपूरकरास प्रदुषणाच्या त्रासापासुन मुक्त करण्यास थातुरमाथुर उपाययोजना करण्यापेक्षा आवश्यक व कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीकरीता व प्रदुषणमुक्तीच्या मागण्यासाठी आज इको-प्रो तर्फे प्रतिकात्मक आंदोलन करीत विविध मागण्याकरीता एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रह’ करण्यात आले, येत्या काळात या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

     

    आज करण्यात आलेल्या एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रहाच्या मागण्या मध्ये सिटीपीएस कालबाहय संच क्रमांक 3 व 4 तात्काळ बंद करण्यात यावे, सिटीपीएस संच क्रमांक 5, 6 व 7 सुध्दा जुने संच होणारे प्रदुषण नियत्रणात आणुन टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचा कार्यक्रम जाहीर करणे, चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणसाठी चंदीगडच्या धर्तीवर महानगरपालिकेकडुन प्रस्तावित ‘एअर प्युरीफायर टॉवर’ ला त्वरीत मंजुरी प्रदान करावी, वायु प्रदुषण व नदी प्रदुषण कृती आराखडयाची संबधीत विभागाकडुन त्वरीत अंमलबजावणी करणे, सिटीपीएस/वेकोली परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे काढुन त्याठिकाणी सौर उर्जा प्रकल्प दोन्ही उदयोगाने सुरू करणे, चंद्रपूरात प्रदुषणाने बाधीत नागरीकांचे तपासण्या, उपचाराकरीता मोफत व प्रभावी योजना राबविणे, चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने तसेच इतर प्रदुषीत नगर पालिका क्षेत्रात ‘हवा गुणवत्ता दर्शविणारी यंत्रणा’ उभारावी, महाराष्ट्र महानगरपालीका व नगर परिषद (सुधारित) कायदा 1994 मधिल कलम 67-अ नुसार ‘पर्यावरण सध्यस्थिती अहवाल’ त्वरीत तयार करावे, जिल्हा पर्यावरण समीती घोषीत करून नियमित सभा व कार्यान्वीत करणे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.

     

    आज इको-प्रो तर्फे संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या सत्याग्रह मध्ये नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजु काहीलकर, अब्दुल जावेद, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, कुणाल देवगीरकर, प्रितेश जीवने, सुधीर देव, भारती शिंदे, चित्राक्ष धोतरे आदी सहभागी होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/नागपूर – चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दारु दुकानांना परवाणा देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

     

    चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आली आहे. याला आता दोन वर्ष पुर्ण होत आले. चंद्रपूरात दारु बंदी असताना सर्रासरित्या अवैध दारु विक्री सुरु होती. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध दारुविक्रीच्या व्यवसायात गुंतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील दारुबंदी उठविण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हाची दारु बंदी हटविली होती. त्यानंतर अनेक दारु दुकानांना परवाणा देण्यात आला. मात्र यात नियमांची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप झाला. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

    दरम्यान आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मागच्या सरकाने दारु बंदी उठविण्याचा चांगला निर्णय घेतला होता.

     

    दारुबंदी झाली तेव्हा 350 परवाने चंद्रपूर जिल्हात होते. दारुबंदी उठल्या नंतर अडिच वर्षात 733 परवाण्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी 75 मीटर पर्यंत शाळा नसावी, धार्मीक स्थळ नसावे ही अट असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात नवे परवाणे देण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात अनेक आंदोलने झाली आहे. यात महिलांच्या भावना तिव्र आहेत. त्यामूळे दारु दुकानांना नव्याने परवाणा देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरातील बालाजी वाॅर्ड गोपालपुरी, आनंदनगरात मागील अनेक वर्षांपासून खुले असलेल्या सुमारे दोन एकर भूखंडांवर बेकायदेशीर लेआउट तयार करण्यात आला. त्यामध्ये नियमानुसार रस्ता व सार्वजनिक कामांसाठी ओपन स्पेस ठेवला नाही. त्यामुळे हा लेआउट रद्द करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि.१२) महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.

     

    गोपालपुरी, आनंदनगरातील ही जागा ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे किल्ल्याच्या वैभवाला धोका निर्माण होऊ शकतो. या जागेत दरवर्षी इरई नदीच्या पुराचे पाणी शिरते. या जागेवर राऊत कुटुंबीय, तसेच इतर संबंधितांनी नुकतेच लेआउट तयार केले. १०० रुपयांच्या नोटरीवर प्लॉट विक्री सुरू केल्याने विकत घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होत आहे.

     

    या लेआउटमध्ये फक्त १८ फूट रुंद रस्त्यासाठी जागा सोडण्यात आली. नियमानुसार नाली, ओपन स्पेस आणि समाज मंदिरासाठी जागाच ठेवली नाही. बांधकामे उभी झाल्यास येणाऱ्या काळात तेथील नागरिकांची गैरसोय होणार असून, महानगरपालिकेचीही फसवणूक होणार आहे. त्यामुळे हे लेआउट रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तक्रारीतून केली आहे.

  • विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या स्वराज्य वक्ता अकादमीविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील गांधी चौक,मिलन चौक जयंत टॉकीज तसेच मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर प्रशिक्षण देण्यासंबंधी माहिती असलेली भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना १२ डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने स्वराज्य वक्ता अकादमी, प्रशिक्षक समीर लेनगुळे यांच्यावर  महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत,गांधी चौक हे शहराचे मुख्य ठिकाण असुन तेथे दीपस्तंभ उभारलेला आहे. त्या जागेवरच संबंधितांनी भिंतीपत्रके लावली त्यामुळे शासकीय निधीचेही नुकसान झाले.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

    पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

    News34 chandrapur

    नागपूर :- नागपूर अधिवेशनात अनेक मोर्चे येतात. सध्या २७ हजार ग्रामपंचायत संगणक चालक आले आहेत. त्यांची लहान मुलं आली आहेत. पोलीस पाटलांचा मोर्चा आहे. परंतु सरकारचे कोणीही प्रतिनिधी गेले नाहीत. या मोर्चातील प्रतिनिधींशी चर्चा करून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

     

    नागपूर येथे संगणक चालक, पोलीस पाटील यांचा आलेला मोर्चा व मागण्याबद्दल माहिती देताना विधानसभेत श्री. वडेट्टीवार बोलत होते.

     

    श्री. वडेट्टीवार म्हणाले, सरकारने मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली पाहिजे. ते सोलापूरहून आले आहेत. इतक्या थंडीत पोरांना घेऊन बसले आहेत. पोलिस पाटलांचा मोर्चा निघाला आहे. त्यांनी भेटायला वेळ मागितली आहे. त्यांच्या मानधनात, निवृत्ती वेतनात वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

  • व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांनी दिले आदेश

    व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांनी दिले आदेश

    News34 chandrapur

    नागपूर : – अमरावती शहरी भागातील व्हीएमव्ही कॉलेज परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचा मुद्दा अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात नुकताच उपस्थित केला दरम्यान या संदर्भात राज्याचे वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले . यांची तत्कळ दखल घेत अमरावती व्हीएमव्ही भागातील बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला निर्देशित केले आहे.

     

     

    अमरावती शहरी भागातील व्हीएमव्ही परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असून रहिवाशी भागातही बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या संदर्भात आ.सौ . सुलभाताई खोडके यांनी मागील ८ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक भागात वन कर्मचाऱ्यां समवेत भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची सूचना केली . यावेळी बिबट्याचा शोध न लागण्याने नंतर दहा दिवसांनी पुन्हा मणिपूर लेआऊट भागात बिबट्याने उपद्रव घातला असल्याने एकच खळबळ उडाली असता आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी डीएफओ मिश्रा यांच्याशी संपर्क साधून बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक तैनात करून प्रभावी व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देखील केली.

     

    दोन महिन्यापासून बिबट्या पकडण्याबाबत वन विभागाने प्रभावी कार्यवाही केली नसल्याने तो बिबट्या व्हीएमव्ही परिसरातच तळ ठोकून असल्याने स्थानिक विद्यार्थी , नागरिक व महिला यांचे घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. रात्रीला बिबट्या व्हीएमव्ही परिसरात संचार करत असल्याने यापासून जीवितहानी उद्भभवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरत बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वन विभागाला आदेशित करण्याची मागणी केली.

     

    तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन अमरावती मधील बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी अमरावती वन विभागाला आदेश देण्यात यावे, सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून ट्रँग्युलायझर च्या साहाय्याने बिबट्याला अटकाव घालण्याची विनंतीपूर्वक मागणी केली, यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित आदेश काढण्या संदर्भात निर्देशित केले असता अमरावती वन विभाग उपवनसंरक्षक कार्यालयाने याबाबत कार्यवाहीला घेऊन हालचाली सुरु केल्या आहेत.

  • चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रोच्या वतीने हिवाळी अधिवेशन निमित्त सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृंघले अंतर्गत आज सहाव्या दिवशी सहावे आंदोलन ‘सराय’ बचाव सत्याग्रह” करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रो संस्थेसह शहरातील अनेक संस्था व इतिहास अभ्यासक यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. येथे इको-प्रो कडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले होते. ‘जागतीक वारसा दिन’ १८ एप्रील २०१८ पासुन ‘सराई स्वच्छता सराय इमार अभियानाची’ सुरूवात करून सलग १५ दिवस या संपुर्ण इमारतीची स्वच्छता इको-प्रोच्या सदस्यांनी केली होती. या स्वच्छता सत्याग्रह माध्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिका व शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीची छत पडल्याची घटना घडली होती, याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

     

    या ऐतिहासिक इमारतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेउन या ऐतिहासिक ब्रिटीशकालिन वास्तुच्या इमारती मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे ‘ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र’ तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील या ऐतिहासिक इमारतीच्या ठिकाणी असे माहीती केंद्र तयार झाल्यास चंद्रपूरात येणाछया पर्यटकांना, नागरीकांना, विदयार्थ्यांना एकाच ठिकाणी शहरातील सर्वच ऐतिहासिक वास्तु, त्यांचे अंतर, इतिहास, कसे जावे याबाबत सविस्तर माहीती मिळु शकते. यामुळे शहरातील पर्यटन विकासाच चालना मिळेल. यासोबतच यामुळे या इमारतीचे सवर्धन सुध्दा शक्य आहे.

     

    सरायचा इतिहास

    या सराय इमारतीचे बांधकाम 1921 ते 1927 या दरम्यान पुरातन इमारतीचे भुमीपुजन २ ऑक्टो 1921 रोजी संपन्न झाले होते. स्वांतत्रपुर्व काळात स्वातंत्रलढयातील अनेक पुढारी येते थांबलेले आहेत. स्वांतत्रंलढयाच्या अनेक घटनांचे साक्षिदार असलेली ही इमारत आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न’ आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

    या सत्याग्रह मागणी नुसार सराय वास्तू चे संवर्धन, दुरस्तीचे काम, परिसर विकास करून घाण, दुर्गंधी दूर करणे, सदर इमारत चंद्रपूर पर्यटन माहिती केंद्र तयार करणे या आहेत, याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आज इको-प्रो तर्फे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या “सराय बचाव सत्याग्रह आंदोलन मध्ये धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, सचिन धोतरे, सुरज कावळे, आकाश घोडमारे, चंदू ओशाखा, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण ढवळे, रोहित तळवेकर, भारती शिंदे, हर्षाली खारकर, महिमा मोहूर्ले आदी सहभागी होते.

  • सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री असताना राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती दुर्बल घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अमलात आणली. यामुळे मागासवर्गातील अनेक नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र अल्पावधीतच सरकार गेल्याने ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील बहुतांश नागरिकांची घरकुलांची मागणी प्रलंबित होती. ही मागणी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित झाले असून सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

     

    राज्यात विविध समाजासाठी समाजवार पद्धतीने घरकुल योजनांची शासनाने आखणी केली आहे. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी कार्यरत नव्हती. या प्रवर्गासाठी राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टी कोणातून विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्या हेतू व समाजातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पहिल्याच टप्प्यात ब्रह्मपुरी मतदार संघात जवळपास 3 हजार घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र अडीच वर्षाचा काल लोटताच सरकार बदलले आणि अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले.

     

    नागरिकांच्या मागणीचा विचार लक्षात घेत वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणे हेतू विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वस्त न बसता वारंवार शासन दरबारी मागणी रेटून धरल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सावली तालुक्यातील कापसी, जिबगाव, लोंढोली, चांदली (बुज) बोरमाळा चीज बोडी हिरापूर उसेगाव पारडी कवटी चीचबोडी ,साखरी, घोडेवाही, चक पिरंजी, अंतरगाव चिंचोली, तांबेगडी मेंढा, सामदा ,मोखाडा खेडी, थेरगाव, बेलगाव, व्याहाड (बुज) या 23 गावातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची शासन दरबारी धडपड व सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा तसेच उपरोक्त लाभ घेणाऱ्या गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत हे या यशाचे फलित असून सावली तालुक्यातील 873 लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व इतर पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्‍या ५ वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी केली.

     

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागतो आहे.

     

    सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येते. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविलेली आहे.

     

    विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून लवकरात लवकर सदर शिष्यवृत्ती मंजुर करावी तसेच मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, यासाठी प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर यांना विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत सामावून घेण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्‍यानंतर चालू हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्‍थित करून सदर गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता ओबीसी मंत्री मा. श्री अतुल सावे जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न झाली. संघटनेच्या १० पैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या.

     

    उर्वरीत मागण्यासंबंधीदेखील लवकरच सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची आधार योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक कर्जासंबंधी तरतूद, विश्वकर्मा योजना, महाज्योती योजना यासंबंधीच्या मागण्या सदर बैठकीत मान्य करण्यात आल्या. शिक्षण, उद्योग विश्वास प्रगतीची आस असलेल्या ओबीसी बांधवांकरिता ही मोठी आनंददायी बाब आहे.

     

    या बैठकप्रसंगी माजी मंत्री डॉ परीनय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विद्यार्थी अध्यक्ष श्वृषभ राऊत, परमेश्वर राऊत, रामदास कामडी,श्रीहरी सातपुते, ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे ओबीसी सचिव सौ. वनिता वेद सिंहल, ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    बैठकीनंतर रात्री उशिरा डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते चिमूर येथील दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेले अक्षय लांजेवार , व अजित सुकारे यांच्या अन्नत्याग आंदोलन निम्बु शरबत पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी चिमुरात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.