Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • महावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आमदार किशोर जोरगेवार

    महावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विज ही मानवी गरज बनली आहे. त्यामुळे विज पुरवाठा करणा-या यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. अशात आपण उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल पाहिजे. महावितरणमध्ये लाईनमॅनसह इतर अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरल्या गेली पाहिजे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. महावितरण कार्यालय येथे एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्या प्रमूख उपस्थितीत महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाऊर्जा या सरकारी कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    सदर बैठकीला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, महानिर्मितीचे संचालक संजय मारूडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता गिरिश कुमारवार, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित होते.

     

    चंद्रपूर हा विज उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे येथील वीज सेवा उत्तमच असली पाहिजे. विज ग्राहकांशी आपली वागणूक सौजन्यपूर्ण असली पाहिजे. त्यांच्या अडचणींचे निराकरण तात्काळ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल पाहिजे. कमी मनुष्यबळ असूनही चांगली सेवा देण्यासाठी महावितरण ओळखली जाते. आपण निर्माण केलेली ही ओळख कायम ठेवण्यासाठी परिश्रम घ्या. येथे अनेक पदे रिक्त आहेत. यात विद्युत सेवेचा मुख्य भाग असलेल्या लाइनमॅनचे जवळपास 50 हुन अधिक पदे रिक्त आहेत. ती भरण्याच्या दिशेने तातडीने प्रयत्न व्हावेत अशा सुचनाही या बैठकीत बोलाताना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

     

    वडगाव प्रभागात विद्युत पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता वडगाव येथे सब स्टेशन सुरु करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
    सध्या विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी झाले आहे. हे नक्कीच महावितरणचे यश आहे. मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करता येईल या दिशेने आपले प्रयत्न असले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

     

    विद्युत शॉक लागण्याच्या घटनांवर अद्यापतरी आपण पुर्णत: अंकुश मिळवू शकलेलो नाही त्यामुळे आता विद्युत शॉकवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक विद्युत ग्राहकांकडे सुरक्षा यंत्र महावितरणने स्वखर्चातून लावण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • 19 नोव्हेंबरला गावा-गावात जागतिक शौचालय दिन साजरा करा – सीईओ विवेक जॉन्सन

    19 नोव्हेंबरला गावा-गावात जागतिक शौचालय दिन साजरा करा – सीईओ विवेक जॉन्सन

    News34 chandrapur

    चंद्रपुर – दरवर्षी ”19 नोव्हेंबर ” हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. त्यानुसार  19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.

     

              स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे .यासाठी  19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे.

     

    चंद्रपुर जिल्हा शाश्वत स्वच्छते च्या अनुषंगाने मार्गक्रमण करित असुन, जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी,मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे.

     

    या अनुषंगाने 19 नोव्हेंबर ला जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

    शौचालय दिनाला जागतीक पातळीवर महत्व प्राप्त झालेले असुन, सुरक्षित आरोग्या करीता स्वच्छता खुप महत्वाची आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावा – गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक कर्तव्य म्हणुन समोर यावे.

    –         विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर.

  • बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी – डॉ.अभिलाषा बेहरे

    बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी – डॉ.अभिलाषा बेहरे

    News34 chandrapur

    मूल – भारताच्या स्वातंत्रलढ्यात आदिवासी शहिदवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर होते .बिरसा मुंडाचे उलगुलांन म्हणजे सामान्य जनतेच्या विद्रोहाचे प्रतीक होते.त्यामुळेच समस्त बहुजन समाजाचे ते आदर्श आहेत असे प्रतिपादन जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती मूल च्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.

     

    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. वासुदेव आत्राम ,उदघाटक म्हणून प्रा. विजय लोनबले ,प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.समीर कदम तसेच मुख्य अतिथी मा. डॉ.राकेश गावतुरे, मा. प्रब्रम्हानंद मडावी मा. मुकेश गेडाम, मा.प्रियंका गेडाम.मा. अशोक येरमे यांचीही समायोचित भाषणे झाली

     

    कार्यक्रमाची सुरुवात गुजरी चौक गोटूल येथील सल्ला-शक्ती स्थळाची पारंपरिक पूजा करून भव्य रॅली कन्नमवार सभागृहापर्यंत काढण्यात आली.

     

    त्यानंतर प्रबोधन कार्यक्रम पार पडले.महिलांनी स्वागतगीत तर वंदनगीत चिदानंद सीडाम आणि गौरव सिडाम यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संचलन अरविंद मेश्राम तर आभार तेजस मडावी यांनी मानले.

     

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदानंद सीडाम,मिथिलेश गेडाम,यश मडावी,मुकेश कनाके,नितीन कनाके, महेश आत्राम, गौरव सीडाम,राकेश कनाके, महेश आत्राम,विकी कुमरे तसेच बिरसा मुंडा बचत गट,राणी हिराई गट इत्यादींनी सहकार्य केले.

  • अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

    अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात आलेला आहे.

     

    यावेळी रत्नाकर चटप (ग्रा.प सदस्य नांदा तथा अखिल भारतीय सरपंच संघटना जिल्हा सचिव) व बाळकृष्ण काकडे (उपसरपंच आवरपुर) हे दोघे आमरण उपोषण करीत असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

     

    कंपनीच्या सी एस आर निधी मधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा ठपका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे . कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी.

     

    स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा .कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी आय टी आय विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी . गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी . इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाते दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना ट्रेनिंग म्हणून घेण्यात यावे, वाढते प्रदूषण बंद करावे दिवसेंदिवस कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर अपेंडिक्स हर्निया त्वचेचे रोग असे विविध आजार होत असताना दिसत असून अनेकांनी यामध्ये आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.

     

    कंपनीच्या प्रदूषणामुळे झाल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. यावरती कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही मात्र, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी कंपनी खेड करीत आहे. ही समस्या त्वरित निकाली काढावी सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे. ते त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक पवित्र घेत असून दत्तक गावातील नांदा, बीबी, आवरपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी,पालगाव तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    आमरण उपोषण आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांचा जाहीर पाठिंबा

    चंद्रपूर : जिल्ह्यातील आवरपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 13 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला.

    Ultra tech cement company avarpur
    सरपंच संघटनेच्या आंदोलन मंडपात ओबीसी नेते राजेश बेले, आंदोलनाला दिला पाठिंबा

    आवारपुर कंपनीच्या दत्तक गावांमध्ये आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सन 2020 ते 2023 या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. यामुळे गावातील आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली.

    मात्र कंपनी प्रशासनाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी चौक नांदाफाटा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी मागण्यात आलेली मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  • २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने केली आहे.

     

    या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर पासून राज्यभरात कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून मागणी मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

     

     

    संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक काम करत आहेत.परंतु शासनाकडून संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६ हजार रूपये मानधनात एक हजार रुपये वाढ केली.

     

    आज महागाईच्या काळात ७ हजार रूपयाच्या मासिक मानधनात संगणक परिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही. गतवर्षी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

     

    त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र काहीच निर्णय घेण्यात न आल्याने रज्यासंघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

     

    अशा आहेत मागण्या: ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकाना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,संगणक परिचालकाना तत्काळ २० हजार मासिक मानधन देणे,नव्याने सुरू केलेली टार्गेट सिस्टीम रद्द करणे अशा मागण्या घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.

     

    संगणक परिचालकांचा जास्त अंत न बघता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबत निर्णय घ्यावा.: धनराज रामटेके तालुकाध्यक्ष म.रा.स.परिचालक संघटना मुल

  • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8 हजार 238 पदांची बंपर भरती

    स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8 हजार 238 पदांची बंपर भरती

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिकांसाठी बंपर भरती सुरू आहे. SBI ने लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करणारी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ८२३८ पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ३५१५ पदे सर्वसाधारण, १२८४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी ७४८, ओबीसीसाठी १९१९ आणि EWS साठी ८१७ पदे राखीव आहेत.

     

    या पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे, तर अर्ज करण्याची संधी ७ डिसेंबरपर्यंत राहील. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. लक्षात घ्या की उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, तुम्हाला त्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.

     

    पदवी उत्तीर्ण उमेदवार SBI लिपिक भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

     

    SBI लिपिक भरती अंतर्गत, उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतील. प्राथमिक परीक्षा 100 गुणांची असेल, त्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाईल. तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील, ज्यासाठी 2 तास 40 मिनिटे वेळ असेल.

  • त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.

     

    पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

     

    या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे:

     

    सिंकदराबाद – दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२, ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६, जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे.

     

    या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर – वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

     

  • न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) समिती बरखास्त करा – सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

    न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) समिती बरखास्त करा – सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील समाजात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री यांनी सन २०२३ च्या पहिल्या अर्थसंकल्प अधिवेशनात मराठा समाजास कुणबी- मराठा, मराठा- कुणबी प्रमाणात देण्यासाठी अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ मे २०१३ ला समिती स्थापन केली होती.

     

    मनोज जरांगे पाटील यानी उपोषण सुरु झाल्यानंतर ७ सप्ते. २०२३ ला फ़क्त मराठवाडा जिल्ह्यातील ७ सप्टेंबर २०२३ – कुणबी -मराठा, मराठा- कुणबी प्रमाणपत्र देणासाठी समिती स्थापन करण्यात आली. नंतर पुन्हा ३ नोव्हेंबर २०२३ ला संपूर्ण मराठा ज्यांचे कडे निजाम कालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे ,निजामकालीन झालेला करार, निजाम संस्थानिकांनी दिलेल्या सदनी, राष्ट्रीय दस्तावे, वैयक्तिक व प्रशासकिय तपासणी करून पात्र लोकांना कुणबी-मराठा व मराठा- कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला,परंतु महाराष्ट्र राज्यात घटनात्मक राज्य मागावर्गीय आयोग असतांना मा.न्या.संदीप शिंदे समिती का नेमण्यात आली, आणि ही समिती फक्त ओबीसी असलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी असलेल्या दस्तऐवजाची तपासणी का करत आहे ? मंडल आयोगातील एकूण २७२ जाती मंडल आयोगात होत्या नंतर ४०० जाती राज्य आयोगाच्या शिफारशीनुसार मागाससवर्गीय ठरल्या नंतर ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आल्या ,मग असे असताना सरकारने वेगळी न्या. शिंदे समिती का नेमण्यात आली.

     

    याकरिता न्या. शिंदे समिती बरखास्त करावी व मराठा समाजाचा मागासलेपणा राज्य मागासवर्गीय आयोगा कडून करावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे.

  • चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसेच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच, मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले, पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसऱ्याची रेष पुसणार नाही स्वतःची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे.’कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘१५ नोव्हेंबर १८७५ ला त्यांचा जन्म झाला आणि अवघे २५ वर्षांचे आयुष्य ते जगले. त्यातही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १९४२ ला भारत छोडो आंदोलन झाले, पण खरा एल्गार बिरसा मुंडा यांनी केला. ‘अंग्रेजो अपने देश वापस जाओ… हमारा देश हमारा राज’ अशी गर्जना त्यांनी दिली. भारतीयांच्या मनात त्यांनी हा भाव पोहोचवला,’ असे ते म्हणाले.

     

    समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचे होते. त्यांच्यात शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यावेळी जर्मन मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागला. पण दुर्दैवाने या शाळेने सर्वांत मोठी अट ठेवली ती म्हणजे धर्मांतरण करण्याची. बिरसा मुंडा यांनी काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलेही. पण एक दिवस शाळेतील एका शिक्षिकेने जेव्हा त्यांच्या समाजासाठी अपशब्द वापरले तेव्हा बिरसा मुंडा उठले आणि त्यांनी एल्गार केला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी जबरदस्तीने लागलेला धर्मही सोडला. आज विविध देश भारताच्या प्रगतीकडे वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांच्या संघटना भारतात विषारी विचार पसरवत आहेत. पण बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेत आपण सावध राहिले पाहिजे.’ यावेळी त्यांनी अशोक तुमराम व त्यांच्या संपूर्ण टीमचे पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी अभिनंदन केले.

     

    आदिवासी समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत

    आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. पण २००५ मध्ये आदिवासींच्या आरक्षणावर मी विधीमंडळात चर्चा उपस्थित केली. तेव्हा माझ्याविरोधात मोर्चा निघाला. कारण मी आदिवासी समाजाची बाजू घेतली होती. ज्या समाजाने वनामध्ये, पर्यावरणामध्ये देव बघितला, त्या समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत असताना कोणतीच ताकत माझे काहीच बिघडवू शकत नाही, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

     

    तीच खरी आदरांजली ठरेल

    आदिवासी तरुणांना संधी दिली तर ते कधीही मागे राहणार नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक देणगीचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी समाजातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला केले. ज्यावेळी आपण आदिवासी समाजातील इंकम टॅक्स भरणाऱ्या शंभर तरुणांचा सत्कार याच ठिकाणी करू ती खरी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली असेल आणि तोच खरा लोकार्पण सोहळा असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ‘हजारो मंजिल का सफर हम पुरा कर सकते है… एक कदम आगे चलना होगा…’ या ओळींच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आवाहन केले.

     

    आदिवासींची प्रगती थांबवू शकत नाही

    अशोक तुमराम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दुःखद घटना घडली. त्यांच्या धर्मपत्नी जमुना तुमराम यांचे निधन झाले. अशोक तुमराम यांनी आपले दुःख काही क्षण बाजुला ठेवून समाजासाठी इथे उपस्थित झाले. समाजासाठी झटणारे असे लोक असतील तर आदिवासी समाजाची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    आदिवासी समाजासाठी…

    मी अर्थमंत्री झाल्यानंतर श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाचा निर्णय केला. दुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी गावांना पायाभूत सुविधांसाठी निधीच मिळत नसताना मी अर्थसंकल्पात साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि २ हजार ८९५ आदिवासी गावांना हा निधी थेट पोहोचवला. याचा फायदा तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झाला. तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचे ७२ कोटी रुपये आदिवासींना बोनसच्या रुपात देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, याचा ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

     

    आदिवासी तरुण होणार पायलट

    चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.‘एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास ५० लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे ४८ लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी ५० टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

     

    वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम

    मी मंत्री नसतानाही केंद्राकडे पाठपुरावा करून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढले. आता त्यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम चंद्रपुरात होणार आहे. २५ कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. पण विदर्भातील सर्वांत उत्तम स्टेडियम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. २०३६च्या अॉलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्याचे काम या स्टेडियमच्या माध्यमातून होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    तीनशे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह

    आपण एकाच ठिकाणी नव्हे तर जील्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी वसतिगृहांना मान्यता घेतली. चंद्रपूरचे वसतीगृह बांधून तयार आहे. पोंभूर्णा आणि सावलीलाही आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह होणार आहे. बल्लारपुरजवळील ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहे. आणि याठिकाणी दरवर्षी तिनशे आदिवासी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता ३०० मुलींचे वसतीगृह करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • NRHM कर्मचा-यांच्या आंदोलनस्थळी महिला कर्मचा-यांनी आमदार जोरगेवार यांना केले औक्षवंत

    NRHM कर्मचा-यांच्या आंदोलनस्थळी महिला कर्मचा-यांनी आमदार जोरगेवार यांना केले औक्षवंत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन एन. आर. एच. एम. च्या कर्मचा-यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरु केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपल्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी पुर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

     

    यावेळी एन.आर. एच. एम. च्या महिला कर्मचा-यांनी भाऊबीज करत आमदार किशोर जोरगेवार यांचे औक्षवंत केले. कर्मचा-र्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी एक बैठक आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करेल हीच भाऊ म्हणून ओवळणी राहील असे यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व आंदोलनकर्त्या कर्मचा-यांसह दिवाळीचा फराळ केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र उमाटे, डाॅ. तिरथ उराडे, अतुल शेंद्रे, डाॅ. अक्षय बुर्लावार, डाॅ. दीपक भट्टाचार्य, वनिता मेश्राम, डाॅ. विनोद फुलझेले, ललिता मुत्तेलवार, डाॅ. तुषार आगडे, जया मेंदळकर, अश्विनी येंबरवार, प्रफुल रासपल्ले, रुपेश हिरमठ, मित्रंजय निरंजने यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती.

     

    राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शहरी, ग्रामीण व एन यु एच एम अंतर्गत कार्यरत तसेच एन एच एम कंत्राटी कर्मचा-यांना वयाची अट शिथिल करुन नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरनात्मक निर्णय घेण्यात यावा, विशेष भरती मोहिम दर सहा महिण्यांनी राबविण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एच. आर पाॅलिसी त्वरित लागु करण्यात यावी, एम एच एम अतंर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफ योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्यांना घेऊन एन.आर.एच.एम. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

    NRHm worker protest
    महिला कर्मचाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांचं केलं औक्षवंत

    चंद्रपूरातही जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनर्त्यांची भेट घेतली. एैन दिवाळीत तुमचे आंदोलन सुरु आहे. तुम्ही दिवाळी साजरी केली नाही. त्यामुळे मी स्वतः दिवाळीचा फराळ करण्यासाठी आपल्याकडे आलो असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आपल्या मागण्या रास्त आहे. सरकारकडेही याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावर तोडगा निघावा यासाठी मी सुध्दा प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य सेवा बळकट झाली पाहिजे. हे करत असतांना हि सेवा देणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांच्याही समस्या सुटाव्यात ही भावना आपली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळावा ही आमची जबाबदारी आहे. अधिवेशनात आपला विषय नक्कीच मांडणार आहे. पण त्यापुर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपली भेट घडवून आणण्यासाठीही माझे प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी प्रसंगी म्हणाले.

     

    आज आपण महिला भगीणींनी भाऊबीज साजरी करत मला औक्षवंत केले. त्यामुळे भाऊ म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या बहिणींना रस्त्यावर दिवाळी साजरी करावी लागत असेल हे दुर्भाग्य आहे. मात्र आपण चिंता करु नका हा भाऊ प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. यावेळी आंदोलनकर्ते अधिकारी आणि कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.