Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर बाबत 18 सप्टेंबर ला News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला होता, याबाबत 13 व्हिडीओ गेम पार्लरचा अहवाल प्रशासनाने नाकारला असून यासोबत जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार अशी चिन्हे आहेत.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम च्या नावाने सुरू असलेल्या जुगाराचा News34 ने पंचनामा करीत बातमी प्रकाशित केली होती, सदर बातमीने चंद्रपूर पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते, प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर ची तपासणी सुरू केली, अनेकांचे परवाने नूतनीकरण झाले नसल्याची माहिती उघडकीस आली होती.

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर धाडी मारल्या, मंजूर असलेल्या व्हिडीओ गेम मशीन सोबत अधिकच्या मशीन पोलिसांना आढळून आल्या होत्या, पोलीस व प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू केला होता.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर धारकांची बैठक बोलावली व 15 ऑक्टोबर पर्यंत परवाण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले, कालावधी संपल्यावर पोलीस विभागाने अहवाल व परवाना नूतनीकरण नाकारले, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे व्हिडीओ गेम पार्लर संचालकांचे धाबे दणाणून गेले.

     

    प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आता जिल्ह्यातील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई होणार अशी माहिती दिली आहे.

  • समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळा

    समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुलचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, कांग्रेस विचारसरणीचे सेवादलाचे मुल तालुका प्रमुख श्री. नामदेवराव बाबाची गावतुरे (डॉक्टर राकेश गावतुरे यांचे वडील आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचे सासरे) यांचा वां ८५ वाढदिवस अनेक आपतेष्ट, कार्यकर्त्यांच्या आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

     

    कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. गावतूरे काकाजिंनी गरिबीतून कुटुंबाची प्रसंगी समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करून असा मौलिक सल्ला आपल्या कार्यकाळात दिला यात शशिकला काकूंचा मोलाचा वाटा असल्या बद्दल त्यांचे कौतुक केले.

     

    त्याचबरोबर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, दीपक पाटील वाढई, प्रल्हादजी कावळे सर, उमाजी दादा मंडलवार ,प्रा. गुलाब मोरे, प्रा.कऱ्हाडे, डॉ. सचिन भेदे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ .बंडू रामटेके समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोणबले, सहितिक प्रब्रह्मानंद मडावी, नीपचंदजी शेरकी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिनांक 20 नोव्हेंबर 1938 रोजी बाबाजी पाटील गावतुरे व सौ भागाबाई गावतुरे यांच्या पोटी नामदेवरावांचा जन्म झाला त्या काळात शिक्षणाच्या सोयी गावात नसल्यामुळे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शिक्षणात खंड पडला पण शिक्षण घेण्याची आवड आणि संघर्ष करण्याचं साहस असल्यामुळे मुल येथील चरखा संघ वस्तीगृहात काम करून स्वतःची उपजीविका कमवून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

     

    गांधीजींच्या महान स्वदेशीच्या विचाराने प्रेरित होऊन दररोज सकाळ – संध्याकाळी सूत कातणे सुताच्या गोंद्या कापड विणण्यासाठी देणे व तेच खादीचे वस्त्र वापरणे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झाला होता. इसवी सन 1960 मध्ये आपण एका वर्षाचे अखिल भारतीय एखादी ग्रामोदय बोर्डाचे उस्मानाबाद येथे प्रशिक्षण घेतले सिंदेवाही येथे सन 1960 आणि 62 मध्ये ग्रामसेवक पदाचे प्रशिक्षण घेतले व सीरोंचा या अतिदुर्गम भागात ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले 1964 ला शिरोंचा येथील खडतर मुख्यालय सेवा कालावधी यशस्वी रित्या पूर्ण केल्यानंतर आपले स्थानांतर पंचायत समिती मुल येथे झाले व विविध गाव खेड्यांमध्ये आपण आपली प्रामाणिक सेवा दिली.आपले वडील राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असले तरी त्याचा कुठेही बडेजाव केला नाही किंवा आपल्या नोकरीमध्ये त्याचा वापर करून घेतला नाही. शिक्षणासोबतच कबड्डी खो-खो व्हॉलीबॉल या सर्व खेळांमध्ये प्राविण्य मिळवले होते.

     

    1978 मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आणि ब्रह्मपुरी गडचिरोली मुल येथे त्यांनी सेवा दिली आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या सेवा दिल्या निवृत्तीनंतर काँग्रेसचे सेवादलाचे तालुका अध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले तसेच बरेच वर्ष त्यामध्ये सेवा दिली सेवानिवृत्त कर्मचारी संघटना असो पतंजली योग समिती असो भारत कृषक समाजाचे ज्येष्ठ नागरिक संघ मैत्री दल या विविध संघटनांची पदे भूषवली. हरिद्वार येथे योग्य प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण घेऊन मुल येथे अव्याहतपणे कित्येक वर्ष योग्य प्रशिक्षक म्हणून सेवा दिली.

     

    विनोबांच्या सर्वोदय आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला पेन्शन संघटना मूलचे अध्यक्षपदी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चे सचिव म्हणून आजही आपण कार्यरत आहात आपल्या सामाजिक कार्यासोबतच खेड्यापाड्यात राहून सुद्धा आपल्या मुलांना आपण उच्च विद्या विभूषित बनवले आणि एकाला डॉक्टर एकाला इंजिनिअर आणि एकाला उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी बनविले. याचा गावतुरे कुटुंबासोबत समाजालाही आज अभिमान आहे.

     

    अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ .राकेश गावतूरे यांनी केले तर नामदेवराव गावतूरे यांची जीवन गौरव गाथा सन्मानपत्र डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी वाचून दाखविले. संचालन एड. मोहुर्ले यांनी केले. सोहळ्याला तीन तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक ,समाज बांधव उपस्थित होते.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चैतन्य व भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांचा दुर्दैवी व अकाली मृत्यू झाला. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या नांदगाव येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

     

    यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, चंद्रपूर तालुका काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल,अनिता बोबडे यांची उपस्थिती होती.

     

    मोठ्या वडिलांचे अंतिम विधीनंतरचे कार्य पार पडण्यासाठी अख्खे कुटुंब व नातेवाईक वर्धा – इरई नदीच्या संगमावर गेले. तेथे मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम घेतला. अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावाजवळ वर्धा – इरई नदीच्या संगमावर रविवारी घडली. हि घटना दुर्दैवी असून यातून पोडे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.

  • चंद्रपुरात ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन

    चंद्रपुरात ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नाटक हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील विविध समस्या सुध्दा या माध्यमातून सोडविल्या जातात. चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात विखुरलेली झाडीपट्टी रंगभूमी हे या परिसराचे सांस्कृतिक वैभव आहे. चंद्रपूरातील कलावंतांनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करत अटकेपार झेंडे रोवले आहेत. त्यांचा कलाविष्कार उत्तरोत्तर यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा देत या विभागाचा आमदार म्हणून  कलावंतांच्या सोबत सदैव आहे व राहील तसेच चंद्रपूरच्या नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी ग्वाही आ. किशोर जोरगेवार यांनी दिली.

     

    ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा स्थानिक प्रियदर्शिनी नाट्यगृहात २० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. दीपप्रज्वलन आणि घंटानाद करून आ. जोरगेवार यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले .यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ . विद्याधर बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय पवार, स्पर्धेचे परीक्षक श्री सुहास जोशी, सौ प्रतिभा पाटील, श्री संजय दखणे यांची उपस्थिती होती.
    कलावंत मंडळीनी पुरस्कारांच्या मागे न धावता उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना देण्यावर भर द्यावा व चंद्रपूरची रंगभूमी अधिक समृध्द करावी असे मत प्रा. डॉ विद्याधर बन्सोड यांनी व्यक्त केले. यावेळी श्री संजय पवार , परीक्षक श्री सुहास जोशी यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
    उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध व्हावी , कलावंत , तंत्रज्ञ यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच त्यात यश येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमाचे संचालन स्पर्धा समन्वयक श्री सुशील सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीनिवास मुळावार यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर हम चंद्रपूर या संस्थेने अमेय दक्षिणदास लिखित चैताली बोरकुटे  कटलावार दिग्दर्शित द कॉन्शन्स या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला नाट्यरसीक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
  • जिलेबी वाटप – बीआरएस च्या आंदोलनाची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा

    जिलेबी वाटप – बीआरएस च्या आंदोलनाची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अश्याच एका आंदोलनातून बिआरएसने जिल्हाचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखळले आहे. या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. हा प्रश्न घेत बिआरएसने गांधीगीरी करीत सरकारचे चिमटे काढले.

     

    जिल्हात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात बीआरएसने आज ( सोमवार ) राज्यमार्गाचा प्रश्न घेत अनोखे आंदोलन केले.या राज्यमार्गाचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज भूमिपूजनाला पाच वर्ष झालेत मात्र मार्गाचे काम अपूर्ण आहे.या मार्गाने तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील वीस गावातील नागरिक ये जा करतात.मार्गांवर अनेक ठिकाणी गिट्टी पसरविली आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेला आहे. यामुळे मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. अनेकांच्या जीव गेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

     

    या मार्गाच्या प्रश्न महत्त्वाचा असतानाही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही.हा प्रश्न घेत आज बीआरएसने आंदोलन केले.धाबा बसस्थानक चौकात भारत राष्ट्र समितीचे नेते भूषणजी फुसे यांचा नेतृत्वात गांधीगिरी आंदोलन झाले.पाच वर्षाचा कालावधी घेऊन अतिशय उत्कृष्ट मार्ग केला,असा उपहासात्मक टोला करीत फुसे यांनी सरकार,आमदार आणि प्रशासनाचे जिलेबी वाटून चिमटे काढलेत.

     

    आंदोलनात मोठ्या संख्येने गोंडपिपरी तालुक्यातील जनता उपस्थित होती. आंदोलनाचे नेतृत्व भूषण भुसे यांनी केले.आंदोलनात राकेश चिलकुरवार, सन्नी रेड्डी, सुरज उपरे, इस्लाम शेख, उमाकांत वाघमारे, सुभाष हजारे, महेंद्र ठाकूर यांनी लोकप्रतिनिधीवर ताशेरे ओढले .गोंडपिपरी तालुक्यातील बीआरएसचे देवानंद डोंगरे, अरुण बोरकर, रमेश बोरकर आंदोलनात उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या चंद्रपूर शहरातील अपघाताच्या मालिकेत 12 नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाही. त्याचा परिणाम आज पायदळ चालणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.

     

    सप्टेंबर महिन्यात नागपूर रोडवर शिक्षिकेचा अपघात, त्याचदिवशी सायंकाळी आदर्श पेट्रोल पंप समोर दुचाकी अपघात, बंगाली कॅम्प चौकाआधी ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकाच दिवशी शहरात 3 नागरिक अपघातात ठार झाले होते.

     

    त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाबूपेठ येथे बापलेकाचा मृत्यू, रामसेतू पुलाजवळ 2 युवकांचा मृत्यू, नागपूर रोडवरील विद्या निकेतन शाळेसमोर 2 युवकांचा मृत्यू, नगीनाबाग येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू, नोव्हेम्बर महिन्यात वरोरा नाका चौकात युवकाचा अपघातात मृत्यू तर आज 20 नोव्हेम्बरला पायदळ चालणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

     

    2 महिन्यात तब्बल 12 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, महामार्गावर होणारे अपघात आता शहरापर्यंत पोहचले आहे, अपघात होण्याची कारणे News34 ने आधीच प्रकाशित केली होती, त्या वृत्तांनंतर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्टंट करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करीत स्वतःची पाठ थोपटली.

     

    शहरातील मार्गावर वाढणारे अतिक्रमण, अतिवेगात दुचाकी वाहन चालविणारे युवक व अल्पवयीन मुले यांच्यावर परिवहन विभाग व वाहतूक विभागाचे लक्ष नाही, त्यामुळेचं शहर अपघातयुक्त बनले आहे.

     

    20 नोव्हेम्बरला शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोरून छत्तीसगड निवासी 32 वर्षीय टिकम पटेल हे पायदळ जात असताना आंध्रप्रदेश डेपो मधील बस क्रमांक AP01Z0084 ही चंद्रपूर बस स्थानक कडे अतिवेगात जात असताना एसटी बस पटेल हा बसच्या मागील चाकात अडकला, या अपघातात पटेल यांचा जागीच मृत्यू झाला.

    रामनगर पोलिसांनी बस चालक 52 वर्षीय स्वामीदास गोदरी ला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

  • चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.

     

    बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    शनी मंदिर परिसरात तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

     

    कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे.

     

    वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.

     

    बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे, सदर दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात 2 पिंजरे वनविभागाने लावावे अशी मागणी करण्यात आली, वाघाचा बंदोबस्त न केल्यास राजू कुडे यांनी वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

     

    20 नोव्हेम्बरला घडलेल्या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, याठिकाणी दररोज नागरिक मॉर्निंग वॉक करायला जातात.

  • चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ऑक्टोबर पासून सुरू झालेले रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून 16 नोव्हेम्बरला वरोरा नाका चौकात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

    जटपुरा प्रभागातील नगीनाबाग येथे राहणारा 27 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा रस्ते अपघातात नाहक बळी गेला.

     

    गुरुवारी रात्री 10 ते साडेदहा वाजताच्या सुमारास सोहेल हा आपल्या मित्रांसोबत दुचाकी वाहन क्रमांक Mh34 BJ5111 ने घराकडे जात होता, वरोरा नाका चौकापूर्वी असलेले जिम व फास्ट फूड सेंटर समोर ट्रक ला ओव्हरटेक करतेवेळी सोहेल यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक क्रमांक RJ 11 GB 0726 ला धडकला, यामध्ये सोहेल चा मृत्यू झाला, अपघात झाल्यावर अनेकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली मात्र पोलीस 45 मिनिटे उशिरा पोहचली, यावेळी महिला डॉक्टरने सोहेल ला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाचू शकला नाही.

     

    चंद्रपूर शहरात मागील महिन्यापासून सुरू झालेल्या अपघाताच्या मालिकेतील 8 वा बळी होता, या अपघाताला कारणीभूत कोण आहे? यावर उपाययोजना कधी होणार? नागरिकांचे नाहक बळी अजून किती दिवस? प्रशासनाने अपघाताची गंभीर दखल घेत यावर ठोस नियंत्रण करण्याची गरज आहे.

  • क्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

    क्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणाऱ्या गोंडपिपरी -पोडसा राज्यमार्गावरील धाबा -गोंडपिपरी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. अद्यापही काम पूर्णतःवास गेलेले नाही. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. या मार्गाच्या प्रश्नाला घेऊन बीआरएसचे नेते भूषण फुसे सोमवारला अनोखे आंदोलन करीत आहे. या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग राजुरा विधानसभा क्षेत्रात येतो. भुसे यांनी पुकारलेला एल्गार विद्यमान आमदारांना चांगलाच झोमणारा ठरणार आहे.

     

    पाच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धाबा गोंडपिंपरी मार्गाचे भूमिपूजन केले.

     

    आज पाच वर्षे झाले तरी बारा कि.मी. अंतराच्या हा मार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या मार्गावर अधून मधून अपघाताच्या घटना घडत असतात. अपघाताच्या घटना काहींना जीव गमावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाला घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासना संदर्भात कमालीचा संताप जनतेत दिसून येत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी ठोस पाऊल उचलले नाही. अश्यात बीआरएसचे नेते भूषण फुसे या मार्गाचा प्रश्न घेऊन उदयाला ( सोमवार ) आंदोलन करीत आहेत. धाबा बसस्थानक परिसरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलन चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने जनता सहभागी होणार असल्याचे फुसे यांनी सांगितले.

  • चंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

    चंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

    News34 chandrapur

    विसापूर ( चंद्रपूर ): बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन आज रविवार ( दि.१९ ) दुपारी २ वाजता दरम्यान वर्धा – इराई संगमावर गेले. दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते.त्यांना वाचविण्यासाठी उपसभाती गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली.दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही मनाला चटका लावणारी व ह्रदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) जवळ वर्धा – इराई नदीच्या संगमावर घडली.

     

    बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील राहणारे व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), त्यांचा एकुलता मुलगा चेतन गोविंदा पोडे ( १६ ) व त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे ( १७) असे वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळालेयाची नावे आहेत.

     

    गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यां समोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान शोध मोहिमेत सायंकाळी ५.४५ वाजता गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे याचे प्रेत नावाड्यानी बाहेर काढले.अन्य दोघांच्या प्रेताचा शोध मोहीम सुरु आहे.
    नांदगाव ( पोडे ) येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी वृदापकाळाने निधन झाले होते.

     

    आज रविवारी त्यांच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी कुटुंबीय वर्धा – इराई नदीच्या संगमावर दुपारी १ वाजता गेले होते. पूजा अर्चना करून अस्थी विसर्जन करण्यात आले. त्यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे हे नदी पात्राच्या पाण्यात पोहत होते.त्यावेळी गोविंदा पोडे यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर या,म्हणून आवाज दिला.त्यावेळी ते बाहेर निघत असताना वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

     

    मुलगा व भाचा यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदी पात्रात उडी घेऊन त्यास वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला.मात्र ते देखील कुटुंबातील अन्य सदस्यासमोर वाहत्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.
    या घटनेची माहिती होताच चंद्रपूरचे एस.पी.रवींद्रसिहं परदेशीं, बल्लारपूर पोलीस निरीक्षक निरिक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिहं राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डा.कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

     

    दोघांचे प्रेत बाहेर काढले

    चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे,त्यांचा मुलगा चेतन पोडे व भाचा गणेश उपरे यांना वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळाली. या दुर्दैवी घटनेतील मृतक गोविंदा पोडे यांच्या मुलाचे प्रेत शोध मोहिमे दरम्यान सायंकाळी ५. ४५ वाजता चेतन याचा तर सायंकाळी ६.४५ वाजता भाचा गणेश उपरे यांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.