Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरातील दुर्लभ रक्तगटदात्याची गडचिरोली जिल्ह्यात धाव आणि…

    चंद्रपुरातील दुर्लभ रक्तगटदात्याची गडचिरोली जिल्ह्यात धाव आणि…

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रक्तदान म्हणजे महादान, या दानाने अनेक नागरिकांचा जीव वाचविण्यात येतो, असेच एक महान कार्य चंद्रपुरातील रक्तमित्र रिंकू कुमरे यांच्या माध्यमातून झाले आहे.

     

    गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात राहणारी गर्भवती 30 वर्षीय सौ. नविता दुर्गे यांना डिलिव्हरी च्या वेळी रक्ताची गरज भासली मात्र त्यांचा रक्तगट दुर्लभ AB negative असल्याने वेळेवर कुठे मिळाला नाही.

    एकाचवेळी 2 जीवांचा प्रश्न डॉक्टरांच्या समक्ष उभा होता, आता पुढे काय करायचं असा विचार सर्वांच्या मनात आला, ही बाब चंद्रपुरातील रक्तमित्र रिंकू कुमरे यांच्या कानी आली, त्यांनी तात्काळ दुर्लभ AB निगेटिव्ह रक्त गट असलेल्या पडोली येथील विपीन कोंगरे यांच्याशी संपर्क साधला, रिंकू यांनी तात्काळ विपीन ला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले, आणि रक्तदान करीत विपीन यांनी दोघांचा जीव वाचविला.

     

    रिंकू कुमरे व विपीन कोंगरे यांच्या संवेदनशिलपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

    चंद्रपूर जिल्ह्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

    News34 chandrapur

    चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे पतीने आपल्या चौथ्या पत्नीची किरकोळ वादात दगडाने ठेचून हत्या केली, ही घटना शुक्रवारी रात्री 24 नोव्हेम्बरला घडली, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली, मात्र या हत्याकांडात 2 मुली आईविना पोरक्या झाल्या.

     

    नगरपंचायत भिसी प्रभाग क्रमांक १७ येथील आरोपी सोमेश्वर रामा बानकर वय ४९ वर्षे याने किरकोळ भांडणातून दगडाने पत्नीच्या डोक्यावर व छातीवर वार करीत झोपेतच निर्घुण हत्या केली. व मृतदेह कपड्याने झाकून ठेवला.

     

    सदर दुर्दैवी घटना शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर घडलेली आहे. शनिवारला सकाळी सहा वाजता चे सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. भिसी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

     

    हत्या झालेल्या पत्नी चे नाव करूणा उर्फ शितल सोमेश्वर बानकर वय २७ वर्षे आहे. मृतक शितलचे सासर व माहेर भिसी येथीलच आहे. आरोपी सोमेश्वर बाणकर याची मृतक करुणा उर्फ शितल ही चौथी पत्नी असून पहिल्या व तिसऱ्या पत्नीचा घटस्फोट झालेला होता. यातील दुसरी पत्नी एकाएकी मरण पावली होती तर चौथ्या पत्नीची सोमेश्वर ने निर्घुण हत्या केली.

     

    मृतक करुणाच्या वडीलाने पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. नंतर माहेरी भिसी येथे करुणा वर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक करुणा उर्फ शितलच्या पश्चात दोन व सात वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. वडिलांनी आईची हत्या केल्यामुळे दोन्ही चिमुकल्या आईविना पोरक्या झालेल्या आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात भिसीचे ठाणेदार प्रकाश राऊत यांचे नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जंगम करीत आहेत. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

    संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस स्वतंत्र भारतासाठी मोठा ऐतिहासिक दिवस होता. तो समस्त भारतीयांसाठी सोनेरी क्षण सुध्दा होता. संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला याच दिवशी संविधान सोपविले होते व संविधान सभेने विधीवत स्वरुपात स्वीकारत देशाला संविधान समर्पित केले. या संविधानाने लोकशाहीची पुनर्स्थापना करीत देशात समानता, न्यायहक्क, बंधुभाव दिला आहे. आज संविधान हा राष्ट्रीय दिन म्हणुन साजरा होत असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सांगतानाच उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

     

              प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2015 मध्ये संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेवून भारतीय संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण केली आहे असे ते म्हणाले. सुरुवातीला हंसराज अहीर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहुन संविधानाप्रती सन्मान व निष्ठा राखण्याचे सर्वांना आवाहन केले.

     

              याप्रसंगी खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रवि गुरनूले, धम्मप्रकाश भस्मे, अॅड. राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार, सविता कांबळे, रेणुका घोडेस्वार, स्वप्निल कांबळे, राहुल सुर्यवंशी, शीलाताई चव्हाण, शीतल गुरनुले, श्याम कनकम, किरण बुटले, राहुल सुर्यवंशी, स्वप्निल मुन, दिनकर सोमलकर, राजेश थुल, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लिवार, रवि लोणकर, राजेंद्र खांडेकर, प्रलय सरकार, अनिल सुरपाम, चंदन पाल, चांद सय्यद, अमित निरांजने, जहीर रजा, विक्की मेश्राम, राहुल नगराळे, जितेंद्र वाकडे, सुनिल महातव यांचेसह भाजपा पदाधिकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

     

    २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली.

     

    राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

     

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले, उपअभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे, विधी अधिकारी अनिलकुमार घुले,अनिल बाकरवाले, डॉ.अमोल शेळके,संतोष गर्गेलवार,प्रगती भुरे, सारिका शिरभाते,वैष्णवी रिठे,सारंग निर्मळे,विजय भुरकुंडे, विकास दानव, प्रदीप पाटील,नरेंद्र जनबंधू, गुरुदास नवले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  • अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    News34 chandrapur

    कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.

     

    विविध आरोग्य विकार तपासले गेले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माणिकगड तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड युनिट हॉस्पिटलच्या प्रभारी डॉ.सौ.रुपाली यादव व त्यांच्या संघाने शिबीर यशस्वी केले. यासोबतच चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. सूरज, डॉ. ट्विंकल आणि त्यांच्या संपूर्ण संघाने कर्करोग, रक्तदाब आदी आजारांवर निदान केले.

     

    रोगांचे निदान करून ग्रामस्थांना सल्ला देण्यात आला. शिबिरादरम्यान सर्व ग्रामस्थांची विविध प्रकारे चाचणी करण्यात आली तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना योग्य ते समुपदेशनही करण्यात आले. विविध सहाय्यक कर्मचारी आणि माणिकगढच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी केल्यानंतर औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आणि पुढील उपचार आवश्यक असलेल्या आजारांसाठी रुग्णांना योग्य सल्लाही देण्यात आला.

     

     

    या मोफत वैद्यकीय शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.रुपाली यादव यांनीही महिलांमध्ये निरोगी शरीर आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे ज्ञान वाढवले. या कार्यक्रमात पंचायतीचे नागरिक, आघाडीच्या कार्यकरत्यांनी सहभाग घेतला तरया शिबिराला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी. एस.आर. च्या संघाने अथक प्रयास केलेत.

  • चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.

     

    या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ३ एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे करणार आहेत.

     

    काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
    चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. याची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला. उर्वरीत मागण्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला.

     

    याप्रसंगी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थांक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक राजेश महाजन, युवा नेते राजू डोंगे, प्रवीण बांदुरकर, अजित फाळके, विजय खंगार, मंगेश मंगाम, शशिकला इंगोले, गीता आडे, ललिता आत्राम, सरिता सुर, कविता सुफी, प्रमोद नगोसे, संदीप कुमरे, महेश मोरे, प्रशांत झाडे, लता इंदुरकर,गोरू थैम, तन्वीर शेख, छोटू धकाते, सचिन पचारे, शिवा कोंबे व परिसरातील ग्रामपंचायत मा.सरपंच, उपसरपंच,सदस्य व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते.

     

    यावेळी कंपनीकडून मिळणारे पुनर्वसन अनुदानात वाढ करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधीत गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) गावातील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऑप्शन फार्म भरतेवेळी घराच्या मिळणाऱ्या मोबदल्याचे विवरण देण्यात यावे व घराचे दर फलक लावण्यात यावे, गावातील पुनर्वसन होणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यासारखी 750 दिवसाची कृषीमजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना नौकरी किंवा नौकरी ऐवजी एकमुस्त 15 लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कंपनी मधील कार्यरत कामगारांना HPC वेतन लागू करण्यात यावे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा, कर्नाटका एम्टा माईन्स ते कोंढा गावालगत असणाऱ्या कोल साईडींगमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे लगतच्या गावांतील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच कोळशाच्या दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीमुळे लगतच्या शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

     

    ज्याप्रमाणे जिएमआर व वर्धा पॉवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांची कृषी विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जी नुकसान भरपाई झाली ती दिली. त्याच धर्तीवर कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दयावी व भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या, या कंपनीने प्रकल्पबाधीत गावांच्या विकासाकरिता आजपावेतो कुठलाही सिएसआर निधी खर्च केला नाही.या सीएसआर निधीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना स्कूल बस देण्यात यावी या मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली.

     

    तसेच पीकनुकसान भरपाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने रोडचे मजबुतीकरण, धुळीवर नियंत्रण, ट्रक वाहतूक ओव्हरलोड न करणे व सुरक्षित करणे, परिसरातील ग्रामपंचायतींना सुमारे १ कोटींचा सामाजिक दायित्व निधी देणे, कोंढा कढोली व चोराळा येथील स्मशानभूमी निर्माण करणे, एम्टा मधील कार्यरत कंपन्यांच्या कामगारांची सविस्तर लिस्ट संपूर्ण माहितीसह देणे, त्यात स्थानिकांना प्राधान्य देणे, सायडिंग जवळच्या १२ व्यक्तींना सेवेत सामावून घेणे, ९ आश्रित विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना रोजगार देणे, शेतकऱ्यांसाठी ओव्हर बर्डन चा वापर करून अप्रोच रोड निर्माण करणे, २००५ ते २०१४ पर्यंत प्रलंबित देयकांसाठी भुगतान करणे, तसेच प्रकल्पबाधित गावांचे सरपंचांसोबत मासिक बैठक घेणे त्यात स्वतः गौरव उपाध्याय किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहतील या सर्व बाबी स्वीकृत केल्यावरच आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

  • चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऑनलाईन युगात मैदानी खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपुरात होत असलेली २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला.

     

    मथुरा व्हॉलीबॉल स्पोर्टींग क्लब तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना व चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर येथे २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३ (मुले व मुली) या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते.

     

    यावेळी अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, डॉ. अनिल शिंदे, प्रा. रवी झाडे, प्रशांत दानव, क्लबचे अध्यक्ष अभय बद्दलवार, सचिव प्रकाश मस्के, पुरुषोत्तम पंत आदींची उपस्थिती होती.

     

    या स्पर्धेत राज्यातील विविध विभागातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार अडबाले म्हणाले की, व्हॉलीबॉल हा एक उत्तम खेळ आहे. हा खेळ खेळल्याने खेळाडूंमध्ये सहकार्य, संघभावना, संयम, लवचिकता यासारख्या गुणांचा विकास होतो. ऑनलाईन युगात शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व वाढले आहे. चंद्रपुरात होत असलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंसाठी एक चांगली संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही खेडाळूंना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभाचे संचालन प्रफुल पुलगमकर यांनी केले. या स्पर्धा २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे.

    ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.

     

    25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा नाका चौकातून ट्रक क्रमांक Mh04 DK 6344 हा मूल रोडच्या दिशेने निघाला मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रक चा रिव्हर्स गियर लागल्याने ट्रक अतिवेगात मागच्या बाजूने यायला लागला, मागे असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेने गेला, यामध्ये 3 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

     

    ट्रक चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रक मागच्या बाजूने सरळ नेला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

    मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत आहे, याला जबाबदार काही वाहतुकीचे नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक तर मोठ्या प्रमाणात वाढत असलेले अतिक्रमण आहे.

  • मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    News34 chandrapur

    मूल – साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.

     

    या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत . त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार, २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार २०१९ ला योग समितीच्या वतीने जाहीर सत्कार २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.

     

    साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांचे सामाजिक कार्य अपूर्व आहे . २००२ पासून त्या बालसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात.

     

    पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले, वृंदा पगडपल्लीवार, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारवार, गणेश मांडवकर, विजय लाडेकर, नामदेव पीजदूरकर, परमानंद जेंगठे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे, रामकृष्ण चनकापुरे, सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.