Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आदिवासीबहुल व मागास समजला जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात देश-विदेशातील नामांकित विद्यापिठे, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच फेलोशीप याबाबत पुरेसी माहीती नाही. दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर करणारी शिक्षणयात्रा सुरु केली आहे.

     

    शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर, जागृत बहुद्देशीय संस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकिल, नुकतेच ब्रिटीश सरकारने चेव्हनिंग गोल्ड पुरस्काराने सन्मानित केलेले ॲड.दीपक चटप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या शिक्षणयात्रेची सुरुवात नुकतीच संविधान दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या उपस्थितीतीत करण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या शिक्षण यात्रेचे समन्वयक म्हणून मुख्यमंत्री फेलो राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर हे भूमिका पार पाडत आहे.

     

    लंडनमध्ये कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशात अनेक संधी दीपकला उपलब्ध झाल्या आहेत. या संधीतून वैयक्तिक आर्थिक संपन्नता येईल मात्र शिक्षणाचा उपयोग तळागाळातील घटकांना व्हावा म्हणून त्यांनी विधी, शिक्षण व धोरणनिर्मिती क्षेत्रात रचनात्मक काम करण्याचे ठरविले आहे.

     

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्याचा संकल्प या यात्रेतून असल्याचे मत समन्वयक अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिन ते २६ जानेवारी २०२४ गणतंत्र दिन या दोन महिन्याच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह विदर्भातील १२ वी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचून देश-विदेशात पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशीप बाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘शिक्षण यात्रा : एज्युकेशन टू इम्पावरमेंट’ या कृतीयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबाबत देश विदेशात उपलब्ध शिष्यवृत्ती, कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक क्षमता व कौशल्ये आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

     

    या शिक्षणयात्रेतून येणाऱ्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज होतील व शैक्षणिक चळवळ तयार होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केले. सुमती फाऊंडेशन, जागृत संस्था यांचे विशेष सहकार्य या यात्रेला लाभले आहे. त्यासोबतच पाथ फाऊंडेशन, पाॅलीलाॅ नेटवर्क फाऊंडेशन, सत्यशोधक कलेक्टीव, संकल्प फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या विशेष सहकार्याने शिक्षणयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात उच्चशिक्षणाची चळवळ चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील विद्यार्थी-युवकात निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

     

    मी लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेवून नुकताच भारतात परतलो आहे. विदर्भातील विद्यार्थी क्षमतावान आहे. मात्र माहितीचा अभाव, पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाबाबतची निरुत्साहता विद्यार्थ्यांत वाढताना दिसते. शिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेणे मला महत्वाचे वाटले.

    – ॲड.दीपक चटप
    आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर, यु.के

  • विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा – सहसचिव आनंद पाटील

    विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा – सहसचिव आनंद पाटील

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतीमध्ये सदर यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने प्रत्येक यंत्रणेने यात गांभिर्याने काम करावे, अशा सुचना केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी आनंद पाटील यांनी दिल्या. तत्पुर्वी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्यांनी तीन गावांना भेटी दिल्या व गावक-यांशी संवाद साधला.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकार विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

     

    या यात्रेच्या माध्यमातून विविध विभागांनी स्वत:हून लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगून सहसचिव आनंद पाटील म्हणाले, आपल्यापर्यंत लाभार्थी येण्याची वाट पाहू नका. जिल्ह्यात ज्या ठिकाणी या यात्रेचा चित्ररथ जाईल, तेथे संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी भेटी द्याव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर योजनेचा लाभ मिळालेल्या किमान तीन लाभार्थ्यांचे मनोगत घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा यात समावेश करावा तसेच योजनेचे व्हीडीओ क्लिप करून ते यात्रेदरम्यान दाखवावे. यात्रा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात किती लाभार्थी होते, आणि उपक्रम झाल्यानंतर किती लाभार्थ्यांना लाभ दिला, त्याचीही आकडेवारी आतापासून गोळा करा.

     

    पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारकडून विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 17 महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे.

     

    सदर योजनेत काय – काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात 7 ते 10 चित्ररथ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट ठरवावे. गावस्तरावरील लोकांना बँकांच्या विविध योजनांची माहिती तसेच बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती द्यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

     

    यावेळी सादरीकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात 825 ग्रामपंचायती असून 1836 गावे आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता नोडल अधिका-यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावर त्याचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले.

     

    सहसचिवांच्या तीन गावांना भेटी : विकसीत भारत संकल्प यात्रेचे नियोजन, गावागावात होणारी अंमलबजावणी पाहण्यासाठी सहसचिव आनंद पाटील यांनी टेमुर्डा (ता. वरोरा), नंदोरी (ता. भद्रावती) आणि सोनेगाव (ता. चंद्रपूर) या तीन गावांना भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला.

     

    यात्रेत समाविष्ट असलेल्या योजना : पी.एम. स्वनिधी योजना, पी.एम. विश्वकर्मा, पी.एम. उज्वला, पी.एम. मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया – स्टँड अप इंडिया, आयुष्मान भारत, पी.एम. आवास (शहरी), स्वच्छ भारत अभियान (शहरी), पी.एम. ई-बस सेवा, अमृत योजना, पी.एम. जनऔषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर योजना, खेलो इंडिया, आर.सी.एस. उडाण आणि वंदे भारत ट्रेन्स व अमृत भारत स्टेशन स्कीम.

  • अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात प्रत्यक्ष मोका चौकशी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांना सोबत घेऊन करण्यात यावे. यात धान पीक तूर कापूस पीक याचा प्रामुख्याने समावेश करावा अधिकाधिक धान पीक उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला जास्त बसला आहे.

     

    आता धान पीक कापणी केले असून आलेल्या पाण्याने धा सरदड्या जमिनीला चीपकुन गेल्या आहेत. अजूनही कापणी होताच आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे, धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पीकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

     

    त्यामुळे धान कापूस तूर इतर पिके कडधान्य पीक नुकसानच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मोका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने. सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात मान. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार यांचे मार्फत आज दि.२८/१२/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. आपला मुल तालुका हा केवळ एका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुबाला साभाळणे अडचणीचे झाले आहे. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न कसे करावे.

     

    पहिलेच कर्ज बाजारी असताना पुन्हा कुठून कर्ज घ्यावे या विवंचनेत सापडले आहेत. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतक-याना नुकसान लवकारत लवकर भरपाई मिळवून दयावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्ष २०२४ चा पीक विमा काढला असून कंपनीने विम्याचे पैसे जमा केले आहे. तेव्हा विमा कंपनीला शासनाने आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकरी यांचे त्वरित पाहणी व पंचनामे करून तात्काळ तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुका काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

     

    निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती व संचालक घनश्याम येणुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, आ.भा.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, संचालक संदीप कारमवार, मनोज ठाकरे, युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कवार, सदस्या समता बंसोड, अन्वर शेख, नंदकिशोर मडावी, औद्योगिक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, सुशी सरपंच अनिल सोनुले , संचालक हसन वाढई, मनोज, यांचेसह कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त व शेतकरी बांधव उपस्थित होते.

     

    काँग्रेसने निवेदन देताच शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश

    मुल तालुका कांग्रेस शेतकऱ्यांच्या अवकाळी आकस्मिक पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व विमाचे पैसेही त्वरित मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना, तहसीलदार यांचे मार्फतिने निवेदन देताच महाराष्ट्र शासनाने लगेच अवेळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश क्र.सी एल एस-२०२३/प्रं. क्र.२६०/म.३ दिनांक २८/११/२०२३ अन्वये तात्काळ आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहे.

  • चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बेलगाम वाहतूक व वाढत असलेल्या अतिक्रमनावर चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने आता कंबर कसली आहे, शहरातील ट्रायस्टार हॉटेल चौक ते वरोरा नाका चौकातील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या असून येत्या काही दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

     

    मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत असून आतापर्यंत अनेकांनी अपघातात जीव गमावला आहे, सतत वाढणारे अपघाताबाबत News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल घेत वाहतूक नियंत्रण विभागाने अतिक्रमण हटविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

     

    वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर महानगरपालिका व उप प्रादेशिक परिवहन विभाग आता या वाढत असलेल्या अतिक्रमनावर संयुक्त रित्या कारवाई करणार आहे.

     

     

    चंद्रपूर वरोरा नाका चौक ते ट्रायस्टार हॉटेल मार्गावर शोरूम धारकांचे दुचाकी वाहन, फास्टफूड सेंटर, पार्किंग नसलेले जिम अश्या अनेक प्रतिष्ठान मुळे शहरात अपघात घडत आहे, त्यामुळे वाहतूक विभागाने अतिक्रमण करीत असलेल्या प्रतिष्ठानाला नोटीस बजावले आहे, अतिक्रमण काढा अन्यथा कारवाईला तयार रहा अश्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहे.

  • कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी/चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या वाहतूक व्यवस्था बेलगाम झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यावर आता ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी कायम आहे, चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आम्ही कायद्याला न भिणारे अशी स्वतःची ओळख ट्रॅव्हल्स धारक निर्माण करीत आहे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केला असता उलट त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

     

    रविवारी गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स MH49 AT 3625 ही रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती, रेल्वे फाटक उघडले मात्र ट्रॅव्हल्स धारकाने वाहन एक साईड दाबल्याने इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग नव्हता, त्यामुळे रेल्वे फाटक येथे जाम झाला, तितक्यात ब्रह्मपुरी चे ठाणेदार सुधाकर अंभोरे हे आपल्या कुटुंबासहित ब्रह्मपुरी च्या दिशेने येत होते.

     

    अंभोरे यांना वाहतूक खोळंम्बली असल्याचे निदर्शनास आल्यावर ते वाहनाच्या खाली उतरले, त्यांनी तात्काळ ट्रॅव्हल्स चालकाला वाहन पुढे नेण्यास सांगितले मात्र चालकाने त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली, ठाणेदार अंभोरे हे साध्या गणवेशात होते, तरीसुद्धा त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट मुजोर चालकाने त्यांना शिवीगाळ केली.

     

    ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स पुढे थांबविण्यास सांगितली मात्र चालक त्यांचं ऐकायला तयार नव्हता, अंभोरे यांनी वाहतूक पोलिसाला याबाबत सूचना केल्या, ट्रॅव्हल्स ख्रिस्तानंद चौकात थांबली, आणि ठाणेदारांनी चालकाला शिस्त घडवली.

     

    चौकात नेमकं काय घडलं? ठाणेदार अंभोरे काय म्हणाले?

    वाहतूक व्यवस्था खोळंम्बली होती, मी त्या चालकाला ट्रॅव्हल्स पुढे नेण्यास सांगितली मात्र मलाच त्याने उलट शिवीगाळी करणे सुरू केले, मी सामान्य नागरिक प्रमाणे त्याच्याशी बोललो मात्र त्याने शिवीगाळी देत उलट उत्तर दिले, मी पोलीस आहे हे त्यांना कळले नाही, पण सामान्य नागरिकांसोबत हे ट्रॅव्हल्स धारक असेच वागत असतील.

     

    मी त्यांचं वाहन पुढच्या चौकात थांबविले, तितक्यात वाहनातून खाली उतरताना चालकाला लागले, त्याला वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगितले. मात्र तो मुजोरी करीत असल्याने त्याला खाकीचा दम दाखवीत कानशिलात लगावली असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले.

     

    कोण आहे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे?

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पदी असताना त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घातला होता, अनेक आव्हानात्मक गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला, शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी असताना सुधाकर अंभोरे यांच्या शिस्तीची चर्चा चहूबाजूने होते, त्यांच्या हद्दीत गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत होता.

     

    गुन्हा कुणी केला तर तो कोणत्या पक्षाचा? किंवा प्रतिष्ठित व्यक्ती नसून तो फक्त गुन्हेगार आहे, अशी कायद्याची बाजू नेहमीच अंभोरे घेत होते, कायद्यापुढे सर्व समान हे वक्तव्य ते नेहमी करायचे.

     

    ब्रह्मपुरी मध्ये घडलेला हा प्रसंग अनेकांनी त्यांची चूक दर्शविली मात्र विशेष बाब म्हणजे पोलीस जेव्हा फायबर लाठी ने मारतात तर ते कधी डोक्यावर मारत नाही, अनेकांनी अंभोरे यांनी चालकाला दांडूक्याने मारहाण केली असा उल्लेख बातमीमध्ये आला आहे, दांडू पोलीस विभागातून अनेक वर्षापूर्वी हद्दपार झाला, आता फायबर लाठी ने त्याची जागा घेतली आहे.

     

    अंभोरे हे वर्दीत नसतानाही आपलं कर्तव्य पार पाडत होते, जिथे चुकते तिथेचं कायदा खुपते, हेच या प्रकरणात घडलं आहे. ट्रॅव्हल्स चालकाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे, आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुन्हेगारी नावापुरती उरली आहे, पोलीस निरीक्षक अंभोरे यांची उचलबांगडी लवकर व्हावी या हेतूने ही तक्रार केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा विधानसभेतील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. येथील शेती ओलिताखाली आली पाहिजे. याकरिता या भागात दिंडोरा प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्याकाळात या प्रकल्पाकरिता शेतजमिनी देखील अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रकल्प अडकला आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यास भाग पाडू असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे.

     

    वरोरा तालुक्यातील दिंडोरा प्रकल्पाकरिता 100 कोटी रुपयांची पुरक मागणी चंद्रपूर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेली होती. यासंदर्भात दिवंगत खासदार बाळू धानोरकर व विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सत्तातरानंतर हा प्रश्न थंड बस्त्यात पडला. परंतु या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

     

    चंद्रपूर जिल्हîाच्या वरोरा तालुक्यातील सोईट दिंडोरा या गावाजवळ 14193 हेक्टर सिंचन क्षमतेचा दिंडोरा बॅरेज या प्रकल्पासाठी स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पत्र क्र. ३०४९/२०२२ दि- २९-११-२०२२ अन्वेय 100 कोटींची पुरक मागणी केली होती. तसेच पत्र क्र. ३१३५/२२ दि. १५-१२-२०२३ अन्वेय वरोरा, वाणी व हिंगणघाट येथील आमदारांसह उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. परंतु शेतजमीन अधिग्रहित करून देखील हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याकरिता या अधिवेशनात हा प्रश्न लावून शासनाला करण्यास बाध्य करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

  • 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2036 ला भारतात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 ते 31 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वर्ष 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

     

    स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार दरवर्षी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यंदा 14 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा, 17 वर्षाखालील मुले/मुली पटना बिहार व 19 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ला मिळाला आहे.

     

    याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत आयोजनाबाबत माहिती दिली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की ही स्पर्धा देशातील खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयार व्हावे आमचा मानस आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धेबाबत प्रेरणा मिळेल.

     

    4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 26 डिसेंम्बर ला नोंदणी च्या माध्यमातून होणार असून 27 डिसेंम्बर ला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असून उदघाटन कार्यक्रमात देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 3 हजार खेळाडू, 200 तांत्रिक अधिकारी, पंच, 500 स्पोर्टींग स्टाफ, स्वयंसेवक व जवळपास 500 पालकांचा सहभाग असणार आहे.

     

    आयोजित ऐथलीट खेळांमध्ये हॅमर थ्रो, हाय जम्प, लॉंग जम्प, जेव्हलीन थ्रो असे विविध खेळ होणार आहे.

    आयोजित स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील विविध भागात एलईडी टीव्ही द्वारे होणार आहे.

     

    राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करीत रायगड किल्ल्यापासून ते मंत्रालय पर्यंत व दुसऱ्या टप्प्यात गेट वे ऑफ इंडिया पासून ते चंद्रपूर जिल्ह्यात या मशालीचे आगमन होणार आहे, यादरम्यान रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातून मशालीचे आगमन होत असताना भव्य स्वागत व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     

     

    आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत 20 मैदानी बाबीचा समावेश आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून विविध स्कुटर रॅली, टॉर्च रॅली व शोभायात्रा काढत क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा समावेश करून जिल्ह्यात क्रीडा वातावरण तयार करणार आहे.

     

     

    विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षक व बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मोफत ताडोबा जंगल सफारीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

     

    ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या राज्य व देशातील खेळाडूंची मिशन ऑलम्पिक ची तयारी आहे अशी माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना आयोजनाबाबत समस्या उदभवू नये यासाठी नागपूर एअरपोर्ट, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बस स्थानक वरून बसेसची व्यवस्था, डिजिटल बुक, चॅट बॉट व टोल फ्री क्रमांकची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.या राजाला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाला साधं राशन कार्ड काढण्यासाठी कार्यालयाचा शंभर चकरा माराव्या लागल्यात. हा प्रकार चंद्रपूर जिल्हात घडला. हा प्रकार लक्ष्यात येताच बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांना राशन कार्ड मिळवून दिले. घरच्या कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहात होते. ही वाताहत येथील लोकप्रतिनिधीना दिसू नये ही मोठी शोकांतिका आहे.

     

    जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत द्यावी, सर्व शासकीय योजना व पीक नुकसानीचे अनुदान देण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी केली होती.तसे त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे सरकार आणि प्रशासनाचे अक्षरश दुर्लक्ष झाले आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिंचोली येथील महादेव लोंढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कुटुंबाकडे सादर राशन कार्डही नव्हतं. राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्राची पूर्तता त्यांच्या कुटुंबांनी केली. मात्र तरीही कार्ड मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पायापिट केली. तरीही त्यांना कार्ड मिळालं नव्हतं. त्यांनी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. फुसे यांनी पाठपुरावा करून त्यांना राशन कार्ड मिळवून दिल.

     

    जिल्ह्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतातील पीक हातात न आल्याने बँकेच्या व इतर सावकारांच्या कर्जाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. तालुकास्तरावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आवश्यक मदत पुरविण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. दप्तर दिरंगाईमुळे यांची कागदपत्रे पुढे पाठविली जात नाही. यामुळे त्या परिवाराला असंख्य हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

     

    दरम्यान शेतकऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार होते. त्यामुळे निराधार योजना आणि इतर उपजीविकेच्या व मदतीच्या योजना तत्काळ राबवायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही शेतकरी आत्महत्या प्रकरण घडले, त्याची त्वरित चौकशी करून त्या कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत पुरवावी. त्यावर असलेले कर्ज व त्याची कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी फुसे यांनी यावेळी केली.

  • आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    News34 chandrapur

    मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.

     

    तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे. असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

     

    मुल- सावली तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली होती. त्यावेळेला महावीकास आघाडीचे शासन असताना कृषी मंत्री श्री. दादा भुसे, आमदार तथा पालक मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रत्यक्ष मुल – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले होते तशीच परिस्थिती यावषी सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत.

     

    दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येतच असतात. यावर्षी सुरवातीलाच धांनाला २८०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. परंतु आता आलेल्या पाण्यामुळे धानाची पोत ओली झाली तर मात्र कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही. कारण तांदूळ लाल होतात. म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेऊन रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे. हीच परिस्थिती कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची आहे.

     

    कापसाचे बोंड वेचण्यााठी आली असताना अचानक आकस्मिक पाऊसाने कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अशा प्रसंगी शासनाने, मा. पालक मंत्र्याने, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व शासनाकडे तसा अहवाल त्वरित सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा खरीप पिकाचे विमा काढला असून शासनानेच विमा कंपनीला तसे आदेश देऊन शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला लावावी आणि शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल – सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

  • वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

    वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चांदा फोर्ट गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

     

    चंद्रपूर गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ आज सोमवारी सकाळी रेल्वे लाईनवर कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती जवळील गावातील नागरिकांना होताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. कामगारांनी सदर घटनेची माहिती नागभीड वनविभागाला दिली.

     

    वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना त्याला धडक लागली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. वन्पाण्यांचे जीव वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

    याआधी सुद्धा घडल्या घटना

    15 नोव्हेंबर 2018 ला बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत 3 वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, या घटनेनंतर वनविभागाने रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेचा वेग कमी करण्यास सांगितले होते, मात्र ऑक्टोबर 2019 मध्ये पुन्हा बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

     

    27 नोव्हेम्बरला उघडकीस आलेली घटना कशी घडली?

    1 डिसेंबर ला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार आहे, या संदर्भात आढावा घेण्यासाठी DRRM नमिता त्रिपाठी यांचा सोमवारी दौरा होता, त्रिपाठी यांना घेण्यासाठी गोंदियावरून पहाटे चांदा फोर्ट साठी स्पेशल गाडी निघाली होती, या विशेष रेल्वेने पहाटे 3 वाजताच्या सुमारास किटाळी-मेंढा जवळ वाघाच्या बछड्याला धडक दिली. या धडकेत बछड्याचा जागीच मृत्यू झाला.