Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील काही वर्षांपासून कधी प्राध्यापकांच्या प्रलंबित पगाराला घेऊन चर्चेमध्ये राहणारे राजीव गांधीं अभियांत्रिकी महाविद्यालय हे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)लोनारे रायगड यांच्या वतीने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भोंगळ कारभारामुळे चर्चेत आले आहे.

     

    या विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून नाहक त्रासाला समोर जावं लागतं आहे त्यामुळे विविध प्रश्नांना घेऊन राजीव गांधीं महाविद्यालयाचे विद्यार्थी युवासेना कडे धाव घेत त्यांना होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानापासून न्याय मिळवून द्यावे या मागणीला घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ यामध्ये महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष तेजस अल्लावार, वतन मादर, अक्षय उपगनलावार, रोहन आंबटकर, हेमंत गोरे, अनिकेत मानकर ,अथर्व कर्चे, विशाल कुलसंगे, वैभव किनाके व इतर विद्यार्थी मित्र इत्यादी हे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना सचिव पुर्व विदर्भ इंजि निलेश बेलखेडे यांना भेटले व सदर विषयावर एक निवेदन त्यांनी दिले. यापुर्वी सुद्धा निलेश बेलखेडे यांनी या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवुन दिलेले असल्याने विद्यार्थ्यांनी बेलखेडे यांच्या कडे या प्रश्नांना सोडविण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली.

     

    यामध्ये १) काही विद्यार्थ्यांचा मागील वर्षीच्या पास म्हणून आलेला निकाल विद्यापिठाच्या सिस्टम अपडेटमुळे चक्क सहा महिने तर काहिंचा एक वर्षानंतर नापास म्हणून आलेला आहे व त्यांना आता त्या विषयांची परिक्षा द्यावी लागणार आहे म्हणजे अश्या विद्यार्थ्यांना remedial परिक्षेची संधी पासून सुद्धा विद्यापिठाच्या चुकीमुळे वंचित राहावे लागले आहे . २)काहि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका ७-८महिने कालावधी झाल्या नंतरहि अजून आलेल्या नाही. ३)अंतिम वर्षातील विद्यार्थी पास होऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हि त्यांच्या गुणपत्रिका, डिग्री वेळेवर न मिळाल्याने त्यांना समोरच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी वंचित राहावे लागत आहे. ४) नियमीत सत्राची परिक्षेचा निकाल लागून अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या फेरतपासनीचा निकाल न लागता त्यांना remidial चा फाॅर्म भरून परिक्षा द्यावी लागत आहे यामध्ये शैक्षणिक नुकसान सोबतचं आर्थिक भृंदड सुद्धा त्यांच्यावर पडआहे. ५) विद्यार्थ्यांचा मागील सेमिस्टर चा सप्लिमेंट चा निकाल आतापर्यंत लागलेला नाही त्यामुळे समोर च्या शैक्षणिक सत्रामध्ये ते पोहोचले कि नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर असून अभ्यास कसा करायचा या संभ्रमात विद्यार्थी पडले आहे. ६) विद्यापिठाच्या पोर्टलच्या चुकांमुळे काही विद्यार्थी विद्यापिठाच्या criterion नुसार विद्यार्थी हा समोरच्या सत्रासाठी pramote असून सुद्धा तो पोर्टल वर Not Pramoted दर्शवितो आहे. ७) आॅनलाईन पद्धतीने पेपर्स मुल्यांकन होत असून चुकिचे पेपर चेक होणे इत्यादी.

     

    अश्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना समोरे जावे लागत असून यासंदर्भात काही दिवसांपूर्वी निलेश बेलखेडे यांच्या वतीने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य प्रशांत पोटदुखे, रजिस्ट्रार व महाविद्यालयीन डिन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता महाविद्यालय आपल्या वतीने या समस्येवर प्रयत्न करीत असून विद्यापिठ महाविद्यालयाच्या कुठल्याही मेल ला योग्य उत्तरे देत नसून याबाबत विद्यापीठ फारसं गंभीर नाही असे एकंदरित दिसून आले. त्यावेळी निलेश बेलखेडे यांनी या सर्वाच निराकरणाची जबाबदारी हि महाविद्यालयाची असून फक्त मोबाईल वर, मेल द्वारे हे प्रश्न सुटणार नसून महाविद्यालयाच्या वतीने विद्यापिठात रायगड येथे एक शिष्टमंडळ पाठवून तिथे विद्यापीठ कुलगुरू यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढून विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक शोषण थांबवावे असे सांगितले त्यावेळी महाविद्यालयाच्या वतीने हे मान्य करण्यात आले परंतु अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नाही.

     

    हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बनलेलं आहे कि विद्यार्थी पालकांची आर्थिक लुट करण्यासाठी बनलेलं आहे यावरून रोष व्यक्त करित युवासेना सचिव निलेश बेलखेडे यांनी येत्या काही दिवसांत याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभीर्य समजून शिष्टमंडळ पाठवून त्यांना या चुका निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर युवासेना च्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन तिव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना सचिव इंजि.निलेश बेलखेडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • करवाढीमुळे नागरिक संतापले, सरपंच व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले

    करवाढीमुळे नागरिक संतापले, सरपंच व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे आज बुधवारी घडली.

     

    नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतीत आज बुधवारी ग्रामसभा आयोजीत केली होती. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली त्यापैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्याबाबत चर्चा करून त्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकामध्ये संताप उफाळून आला. करवाढ होत असल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी सरपंच, ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले. तब्बल साडेतीन तास ही मंडळी कुलूपबंद होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस देवपायली येथे पोहचले. पोलीसांनी नागरीकांना समजावले. त्यानंतरच नागरिकांनी कुलूप उघडले सरपंच सचिव सदस्यांची सुटका केली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या देवपायली ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी 7 नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती, परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी घेण्यात आली. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली.

     

    ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टीवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच नागरिक चांगलेच संतापले. त्यामूळे नागरीकांनी सरपंच सचिवासह गग्राम पंचायत सदस्यांना कार्यालयाला कुलूप लावून डांबण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वांची सुटका करण्यात आली. आता 4 डिसेंबला पुन्हा देवपायलीत पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

     

    सरपंचांच्या परवानगीने पाणीपट्टी व मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, अशी माहिती ग्रामसेवक प्रशांत दोडके यांनी दिली. नागरीकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने करवाढ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
    पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. त्यामुळं त्यांनी सर्वांची सुटका केली. या प्रकरणात कुणीच तक्रार न केल्याने पोलीसांनी कारवाई केली नाही. सध्या गावात शांतता आहे. पुढील ग्रामसभा 4 डिसेंबरला होणार आहे. ग्रामपंचायतीने मागणी केल्यास ग्राम सभेला पोलिस बंदोबस्त पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून द्यावी – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून द्यावी – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते. त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी उद्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपत असल्याने आजच्या स्थितीत हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

     

    एकीकडे आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे. करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले आहे. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली आहे.

     

    एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. अजूनही असंख्य शेतकरी वंचित आहेत. करीता दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सलग एक महिना मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

     

    सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

     

    याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

     

    अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

     

    सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

     

    चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेचे 30 नोव्हेम्बरला आयोजन

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेचे 30 नोव्हेम्बरला आयोजन

    News34 chandrapur

    मुंबई – अप्रतिम मीडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद’ येत्या गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न होत आहे.

    आगामी १० वर्षांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या माध्यमातून राबवायच्या ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – २०३२ शाश्वत विकास देण्याच्या दिशेने’ या भव्य कार्यक्रम मालिकेची माहिती दिली जाणार आहे.

     

    या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व सेवाभावी व्यक्तींचा अप्रतिम गौरव देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड, राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ; खासदार हेमंत पाटील,आमदार श्री संजय शिरसाट प्रवक्ते शिवसेना, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार यामिनी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

     

    सकाळी उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतजी कराड, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, श्री अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री श्री संदिपान भुमरे रोहयो मंत्री, श्री विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधानपरिषद, मुख्य सचिव श्री मनोज सौनिक, अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी नेते; सर्वश्री आमदार रोहित पवार,आशिष जयस्वाल,सत्यजित तांबे, प्रशांत बंब; मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, श्री. विनय सहस्रबुद्धे माजी खासदार आधी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

     

    या परिषदेमध्ये खालील प्रमाणे तीन चर्चासत्रे होणार आहेत. पहिले सत्र – शासकीय योजना लोकसहभाग आणि एस डी जी सिद्धी(सहभाग : श्री प्रवीण परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र, श्री सौरभ विजय प्रधान सचिव नियोजन विभाग, राज्य शासन, श्री राधेश्याम मोपलवार उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक एम एस आर डी सी, जे इ चौधरी अप्पर संचालक सांख्यिकी व नियोजन विभाग; डॉ. विजय आहेर, संचालक सांख्यिकी विभाग.

     

    दुसरे सत्र – एस डी जी साठी स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक संघटनांची भूमिका उदाहरण छत्रपती संभाजीनगर (सहभाग : डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री संदिपान भुमरे, पालकमंत्री, छत्रपती संभाजी नगर, श्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विधान परिषद, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, प्रवक्ते शिवसेना, श्री मुकुंद भोगले, अध्यक्ष संभाजीनगर फर्स्ट, आमदार प्रदीप जयस्वाल श्री विवेक देशपांडे उद्योजक, श्री बी एस खोसे संस्थापक, अध्यक्ष मराठवाडा एन्व्हायरमेंटल क्लस्टर, आस्तिक कुमार पांडे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, श्री रणजीत कक्कड माजी अध्यक्ष संभाजीनगर फर्स्ट), विकास नवाळे, मुख्याधिकारी, एरंडोल नगर परिषद जिल्हा जळगाव; आणि तिसरे सत्र – शाश्वत विकास ध्येयांसाठी विकास पत्रकारितेचे महत्त्व : स्थानिक वार्ताहर व विशेष तज्ञ पत्रकारांचे योगदान(श्री विनायक पात्रुडकर, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, श्री अनिरुद्ध अष्टपुत्रे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, श्री प्रमोद डोईफोडे, अध्यक्ष मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ; वसंत भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ; श्री अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, श्री एस एम देशमुख किरण नाईक राजा आदाटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती; संदीप काळे संस्थापक अध्यक्ष व्हाईस ऑफ मेडिया; कुमार कदम, ज्येष्ठ पत्रकार; यमाजी मालकर संपादक, थिंक पॉझिटिव्ह; यदु जोशी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधीस्वीकृती समिती; डॉ.माधव सावरगावे, साम टीव्ही मराठवाडा प्रतिनिधी; बालाजी सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) यांचा विशेष सहभाग असणार आहे.

  • ग्रेटा एनर्जी लिमिटेड कंपनीकडून नवउद्योजकाची फसवणुक

    ग्रेटा एनर्जी लिमिटेड कंपनीकडून नवउद्योजकाची फसवणुक

    News34 chandrapur

    चंद्रपुर :- मुल येथील ग्रेटा एनर्जी लि. कंपनीने फ्लाय अँश हॅंन्डलींग कामाचा पाच वर्षाचा करार सुशिक्षित बेरोजगार गणेश पुलगमवार यांना देवून देखील करारानुसार काम न दिल्यामुळे कंपनीकडून 27 लाख रूपये तसेच याव्यतिरिक्त शारिरीक व मानसिक त्रासापोटी 50 लक्ष रुपए अतिरिक्त नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यात येण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

     

    मूल तालुक्यातील आकापुर एमआयडीसी मध्ये सुरु असलेल्या ग्रेटा एनर्जी लि. कंपनी प्रकल्पात अनेक नवउद्योजक सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे काही कामे मिळाली होती. त्यातच फ्लाय अँश हॅंन्डलींगचे काम अथक प्ररिश्रमानंतर राजुरा येथील गणेश पुलगमवार यांना मिळाले होते.

    सन 2018 मध्ये कामाच्या सुरुवातीला कंपनीने अँश हॅन्डलींगसाठी दरमहा 1.20 लक्ष रुपए देत होती. करारानुसार 1 वर्ष हे काम सुरळीत चालले.

     

    5 वर्षाचा करार होता. दरम्यान कंपनी प्रशासनाने नवउद्योजक गणेश पुलगमवार यांना वेगवेगळया सबबी लावून त्रास देणे सुरु करुन कंपनीने नंतर अँश हॅन्डलींगचे काम मोफत करण्याचे आदेश दिले. ते ही मान्य करुन 6 महिने हे काम निःशुल्क केले. परंतु कंपनीचे त्रास देणे काही बंद झाले नाही. कंपनीने 3 महिन्यात वीज विभागाची परवानगी, जलपूरवठा यंत्रणा इत्यादी लावून ब्रिक्स प्लांट टाका, स्प्रींकलींग करा असा ससेमीरा लावला.

     

    करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी खूप प्रयत्न केले. परंतु इतर सर्व बाबींची जुळवाजुळव झाली, मात्र वीज विभागाची परवानगी दिलेल्या वेळेत मिळू शकली नाही. त्यामुळे ग्रेटा एनर्जी लि. कंपनीने सदर काम बंद केले. 5 वर्षाच्या कराराचे काम 6 महिन्यात गुंडाळण्यात आले. जेव्हा की, करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी तो पर्यंत प्रचंड परिश्रम करुन कंपनीची अँश हॅंन्डलींग प्रणाली, परिवहन, उपयोग इत्यादी सर्व टृॅक वर आणून दिले होते.

     

    दरम्यान कंपनीच्या कामासाठी करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी जेसीबी, हायवा टृक, ब्रिक्स प्लांट यंत्र सामुग्री, पाणी पुरवठा आणि वीज विभागाचे मिटर इत्यादी सह दैनिक प्रवास असा लाखोंचा खर्च केला. एवढे सर्व केल्यावर अचानक कंपनीने काम हिसकावून घेतले.

     

    दरम्यान करारानुसार 2019 ते 2023 पर्यंत कंपनीने करारकर्ते गणेश पुलगमवार यांच्या कामावर कंपनीने सुमारे 2 कोटी रुपए मुनाफा कमावला त्यातून करारकर्ते पुलगमवार यांना नुकसानभरपाई स्वरुपात 27 लक्ष रुपए परतफेड करावी. तसेच याव्यतिरिक्त शारिरीक व मानसिक त्रासापोटी 50 लक्ष रुपए अतिरिक्त देण्यात यावे. काम अचानक काढून टाकल्याने करारकर्ते गणेश पुलगमवार यांची मानसिक स्थिती सुध्दा बिघडत चालली असल्यामुळे ग्रेटा एनर्जी लि. कंपनीवर करारभंग केल्याप्रकरणी तसेच वेगवेगळया कारणांनी त्रास दिल्याप्रकरणी सदरहूं नुकसानभरपाई तात्काळ मिळवून देण्यात यावी आणि भविष्यात कंपनीत काम करणा-या नवतरुणांसोबत सौहार्द्रपूर्ण व्यवहार करण्याची ताकिद द्यावी, अन्यथा नाइलाजास्तव सदर प्रकरण आम्हाला शिवसेनेच्या पध्दतीने आंदोलन करुन हाताळावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल. अशी मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

  • बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

     

    महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पद्धतीने मुलाचे कार्य पार पाडत आहेत.

     

    हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यन्दा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

    त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखा च्या वतीने डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ वैंकट पंगा तसेच डॉ सीमा शर्मा, डॉक्टर अश्विनी भारत, डॉ सरताज शेख, डॉ देवेंद्र लाडे यांनी स्मृतिचिन्ह देऊन विवेक जॉन्सन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर नेहमीच आपल्या चांगल्या कामात आपल्या सोबत राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही सुद्धा डॉ गावतुरे यानीं यावेळी दिली.

  • वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात चंद्रपूर जिल्हा यावा असे स्वप्न होते. मात्र, याच विकासाला मागील साडेसहा वर्षांपासून साडेसाती लागली आहे. वरोरा – चिमूर रस्ता अर्धवट असल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाचे काम पूर्ण करण्याकरिता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन हा प्रश्न पूर्ण करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

     

    वरोरा – चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ E मध्ये ४२.७५ किमीच्या २८४ करोड रुपयांच्या विकास कामाला दि. ४ मार्च २०१७ ला सुरवात झाली. हे काम ३ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.त्यानंतर सुधारित वाढीव मुदत देऊन ३० जून २०२३ करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता हे काम ९० टक्के पूर्णत्वास असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

     

    मात्र अजूनही ४-५ किमी चार पदरी रोडचे काम बाकी असून रोड साईड ड्रेनेज १ किमी, १ पाईप कल्व्हर्ट, २ मायनर ब्रिजेस, ८ निवारा शेड व पार्किंग, ४.५ किमी स्ट्रीटलाईट व हायमास्ट बाकी असून गत २-३ महिन्यात लहान मोठ्या अपघातात अनेकांनी जीव गमावले तर काहींना कायम अपंगत्व आले. या जीवघेण्या अपूर्ण कामास त्वरित पूर्णत्वास न नेल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

  • मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि याचे स्वरुप अधिक मोठे करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा पुरस्कार वितरण व संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम सोहळा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, काशी सिंग, समीर केने, प्रविण मोहुर्ले, नंदू रणदिवे, किशोर कापगते, प्रभाकर भोयर, चंदू आष्‍टनकर, चंदू मारगोनवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    पुरस्कार विजेत्या गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेतील विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमात ‘बेबस’ चित्रपटाच्या जाहिरात फलकाचे अनावरणही ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. गणराज रंगी नाचतो’ या मुंबई येथील ५० कलावंतांच्‍या भव्‍य संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गेल्यावर्षी मी पहिल्यांदा गणेश उत्सवाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर इथे भाजपच्या वतीने हे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनमोल भाव बघायला मिळतात. एक सूर, एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर असते. त्यावेळी जात-पात-धर्म बघितला जात नाही. चंद्रपूरमध्ये याच भावनेतून हा उत्सव साजरा होत असतो. इथे गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा सगळ्या धर्मांचे लोक सहभागी होतात, याचा मला अभिमान आहे.’ चंद्रपूरचा नागरिक म्हणून देशासाठी आपण या जिल्ह्याचे योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    ‘भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन उभा असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. त्या क्षणाला माझे उर अभिमानाने भरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी लंडनमध्ये जाऊन करार केला तेव्हा चंद्रपूरचा आवाज जगात गौरवाने पोहोचविल्याचा अभिमान वाटला. आता २२ जानेवारीला देशगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराची पुजा करतील तेव्हा त्या मंदिराच्या प्रत्येक दाराचे लाकूड चंद्रपूरचे असेल, याचा प्रत्येक चंद्रपूरकराला अभिमान वाटेल. एवढेच नव्हे तर लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात प्रवेश करताना देशातील प्रत्येक खासदाराला चंद्रपूरच्या लाकडाने तयार झालेल्या मंदिरातून जावे लागेल, ही बाब देखील तेवढीच अभिमानाची आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    राक्षसीवृत्तीचा विरोध

    ‘५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा, राक्षसीवृत्तीचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले.

     

    रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा

     

    ‘राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोगही चंद्रपुरात होणार असल्याचे ते म्हणाले.

     

    क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन

    २७ डिसेंबरला ५ वाजता विसापूरच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

     

    या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम चंद्रपूरकरांनी करावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. त्याचवेळी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन, पशू व मत्स्यसंवर्धन प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील पुरातन मंदिरांसाठी निधी देण्याची घोषणा आपण अलीकडेच केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आकाराला येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, मोरवा येथे तयार सुरू होत असलेला फ्लाईंग क्लब याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

  • राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कार्य करणारे चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटात नुकतेच सामील झालेले राजीव कक्कड हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रियपणे काम करीत आहे.

     

    शहरातील विविध समस्यांना वाचा फोडत ते शासन दरबारी मांडण्याचे काम कक्कड यांनी केले आहे, जिल्हा असो की शहरातील विविध नियोजनात्मक कामाचा त्यांना चांगला अनुभव असून आता ते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची धुरा सांभाळणार आहे.

     

    राजीव कक्कड यांच्या नियुक्तीमुळे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करीत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.