Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” राबविण्यासाठी जुनोना गावात ‘बिबट-ग्राम-सत्याग्रह’ आंदोलन

    “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” राबविण्यासाठी जुनोना गावात ‘बिबट-ग्राम-सत्याग्रह’ आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ तीव्र झालेला असून, यात वाघ, बिबट, अस्वल अन्य वन्यप्राणी कडून जंगलात तसेच गावात होणारे हल्ले रोखण्याकरिता जिल्हा परिषदेची गावा-गावात राबविली जाणे आवश्यक असलेली प्रलंबित “बिबट समस्या मुक्त ग्राम योजना” राबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनच्या पाचव्या दिवशी पाचवे आंदोलन इको-प्रो कडून जुनोना गावात करण्यात आले.

     

     

    बंडू धोतरे यांचे नेतृत्वात सकाळी जुनोना गावात येथे बिबटचा वावर असलेल्या वस्तीत जाऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. एके ठिकाणी काही गावकरी यांना जमा करून बिबट गावात येणाचे कारणे विषयी माहिती देण्यात आली. बिबट गावात आल्यावर, गावकरी वर हल्ले झाल्यावर, बिबट्यास जेरबंद करणे यापेक्षा बिबट गावातच येणार नाही याकरिता काय केले पाहिजे. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या माध्यमाने काय काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून बिबट गावात येणार नाही यासाठी “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” प्रभावी ठरणार असल्याची माहिती देत ही योजना प्रत्येक बिबट समस्या असलेल्या गावात प्राधान्याने राबविली गेली पाहीजे याचे महत्व सांगितले.

     

    2018 पासून सुरू आहे पाठपुरावा…

     

    2018 पासून विविधस्तरावर पाठपुरावा करून, वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी, मंत्री यांचेकडे सुद्धा सादरीकरण झालेले आहे. जिल्हयातील वाघ-मानव संघर्ष यावर ‘राज्यस्तरीय अकरा सदस्यीय तांत्रिक समिती’ तयार करण्यात आलेली होती, या अहवाल मध्ये सुद्धा बिबट समस्यांमुक्त ग्राम योजनेची शिफारस करण्यात आली, सोबतच राज्यस्तरीय ‘बिबट-मानव संघर्ष’ यावर सुद्धा तयार करण्यात आलेल्या समितीने शिफारस केलेली आहे. या दोन्ही अहवालास ‘राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ’ ने अहवाल मंजूर केलेला आहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रायोगिक ठरणार आहे, मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली दिसून येत नाही आहे.

     

    बिबट किंवा वाघ मानव संघर्ष मधला फरक व योजनेचे महत्व

    जंगलात आत गेल्यावर किंवा शेतशिवारात वाघ आल्यास वाघ कडून मानवावर हल्ले होतात. मात्र बिबटयाकडून होणारे हल्ले ‘बिबट’ थेट गावात येत असल्याने गावात मानवावर हल्ले होतात. बिबट गावात खाद्यासाठी म्हणजे शिकार करण्यास येतात, प्रामुख्याने बिबट कुत्री-डुकरी जे उकरिड्यावर, अस्वच्छतेमुळे वाढणारी प्राणी आहेत याकडे आकर्षित होतात. यांची संख्या गावातील अस्वच्छता यामुळे वाढत असते. यांची शिकार करण्यास बिबटचे वावर नेहमीच जंगलव्याप्त किंवा जंगलालगतच्या गावात असल्याने गावकरी, लहान मुले यांचे जीव धोक्यात येतात. यावर उपाय म्हणून बिबट गावात येणाची कारणे शोधून दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमाने “बिबट समस्यामुक्त ग्राम योजना” प्रस्तावित असून या अंतर्गत अश्या ग्रामपंचायतना स्वच्छता विषयक कामांना आवश्यक कामाकरिता निधीची पुरवीने व कार्य करणे आवश्यक आहे.

     

    या योजने विषयी व्यापक जागृती व शासन-प्रशासन कडून राबविण्याच्या दृष्टीने बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी करीता “बिबट-ग्राम-सत्याग्रह” करण्यात आले, यावेळी बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, धर्मेंद्र लुनावत, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, सुन्नी दुर्गे, रोहित तळवेकर, मेघश्याम पेटकुले, योजना धोतरे, सुभाष टिकेदार सहभागी झाले होते.

     

    बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी व गावे बिबट पासून भयमुक्त करण्यास गावागावात जागृती केली जाणार असून येत्या काळात या मागणीकरिता तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.

  • बल्लारशाह ते दुर्ग, हावडा पर्यंत रेल्वे गाड्या धावतील

    बल्लारशाह ते दुर्ग, हावडा पर्यंत रेल्वे गाड्या धावतील

    News34 chandrapur

    बल्लारपुर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, येथे बल्लारशाह रेल्वे विभागाचे मुख्य जंक्शन आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेवरून बल्लारशाह ते दुर्ग, हावडा, जबलपूर या गाड्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली, त्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

     

    चर्चे दरम्यान श्रीनिवास सुंचुवार यांनी ट्रेन क्र. 08803 बल्लारशाह-गोंदिया, गाडी क्र. 08801 बल्लारशाह-गोंदिया किंवा ट्रेन क्र. 07819 बल्लारशाह-गोंदिया या तीनपैकी एक ट्रेन दुर्ग जंक्शन पर्यंत वाढवण्याची नितांत गरज आहे, कारण छत्तीसगडमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात राहतो. बंबळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक डोंगरगडावर येतात.

     

    गाडी क्र. 22620 चेन्नई- बिलासपूर ते हावडा वाढवण्याची विनंती केली कारण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने बंगाली समुदाय स्थायिक आहे. गाडी क्र. 15231 बरौनी-गोंदिया एक्स्प्रेस बल्लारशाहपर्यंत वाढवण्याबाबत विनंती करण्यात आली कारण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिक मोठ्या संख्येने येथे स्थायिक आहेत.
    गाडी क्र. 22174 जबलपूर – चांदाफोर्ट पूर्वीप्रमाणे सुरू करून बल्लारशाहपर्यंत वाढवण्याची विनंती, ही गाडी चांदाफोर्ट येथे पोहोचायची आणि एक तासानंतर निघायची.

     

    बल्लारशाहपर्यंतच्या मुदतवाढीचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच गाडी क्र. 08804 गोंदिया_बल्लारशाह बल्लारशाह येथे वेळेवर न पोहोचल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना होणारा त्रास पाहता ही गाडी निर्धारित वळे वर चालवण्याची गरज आहे.

     

    दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दक्षिण पूर्व मध्य रेलवे चे मंडल रेल प्रबंधक सौ सुनीता त्रिपाठी, सीनियर डीसीएम दिलीप सिंह अन्य अधिकारी उपस्थिति होते.

    या शिष्टमंडळात श्रीनिवास सुंचूवार यांच्यासह ज्ञानेंद्र आर्य यांचा समावेश होता.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

    चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

    जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बाबापूर या गावी कैलास चा कोंबडा बाजार थाटात सुरू करण्यात आला आहे.

     

    यादिवशी खेळा जुगार

     

    आठवड्यातील रविवार, बुधवार व शुक्रवारी हे तीन दिवस जुगाराचे खास आहे, यादिवशी तेलंगणा, व इतर जिल्ह्यातील शौकीन व्यक्ती कोंबडा बाजारात दाखल होत, विविध जुगार खेळत असतात.

     

    सुविधा काय?

    कोंबडा बाजारात एंट्री झाल्यावर आपल्याला झेंडी मुंडी, कट पत्ता, रमी असे विविध जुगार खेळायला मिळतात, कोंबडा झुंझित हरणाऱ्या कोंबड्याची मेजवानी सुद्धा मिळते, सोबत दारु व चखण्यात नॉन व्हेज ची सुविधा, चंद्रपुरातील कैलास ने जुगार खेळायला येणाऱ्या खेळाडूसाठी चांगली व्यवस्था केली आहे, जुगार खेळायला आल्यावर कुणीही उपाशी पोटी जाऊ नये याची संपूर्ण व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.

     

    रविवार हा दिवस कैलास साठी मोठा दिवस आहे, यादिवशी तब्बल 300 वाहने त्याठिकाणी येतात, वाहने लावायला जागा नसते, मात्र कैलाश च्या उत्तम नियोजनामुळे खेळाडूंना कसलाही त्रास त्याठिकाणी होत नाही हे विशेष.

     

    सट्टा किंग चंद्रपुरातील कैलास.…..

    कैलास हा चंद्रपूर शहरात राहतो, कैलास ने शहरातील अनेक भाग सट्टा पट्टीने गाजविले आहे, भिवापूर, दुर्गापूर, पडोली असे विविध भागात कैलास ने सट्टा सुरू करीत नावलौकिक मिळविले, आता थेट कोंबडा बाजार सुरू करून त्या बाजाराचा स्वागताध्यक्ष म्हणून कैलास ला मोठा मान मिळाला आहे.

     

    ह्या कोंबडा बाजाराबाबत माहिती असून सुद्धा भारी पोलीस काही करीत नाही हे म्हणजे लईचं भारी आहे.

     

    सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे, विविध विषयांवर तिथे चर्चा होत आहे मात्र जिल्ह्यातील कोंबडा बाजारावर चर्चा कधी होणार? ह्या कोंबडा बाजारामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची चिन्हे आहे, कारवाई झाली नाही तर चंद्रपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर /पोम्भूर्णा – धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे तसेच जर लावलेले गुन्हे मागे घेणार नसाल तर आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन सोमवार पासून तालुका कचेरी समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारला आंदोलकांनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनच्या समोर वळवून ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे.या आंदोलनाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहे.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ईको – पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी व विविध मागण्या घेऊन ठिया आंदोलन केले होते.त्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्तावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३०७ व ३५३ कलम मागे घेण्यात यावे यासाठी आदिवासी बांधव आणि संघटना आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी तहसील व पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मागील आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवावर ३०७ व ३५३ कलम लावण्यात आले आहे ते तात्काळ काढण्यात यावे नाही तर आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतले असल्याने प्रकरण चिघळले आहे.

     

    मागील आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनात वनविभाग कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावला, व काही जणांवर 307 व 353 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

    पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला मात्र तपास कार्यात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी तपासकामी सहयोग केला नाही, त्यानंतर सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द झाला अशी माहिती समोर आली असून आता अटक झाली तर सर्व समाज बांधवांना अटक करा अन्यथा दाखल गुन्हे परत घ्या अशी मागणी घेऊन सध्या पोम्भूर्णा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     

    आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून सध्यातरी पोलीस प्रशासन अत्यंत संयम बाळगून प्रकरण हाताळण्याचे काम करीत आहे.

     

    ही बाब योग्य नाही….

     

    गुन्हा न्यायालयात गेला की पुढची कायदेशीर बाजू ही न्यायालय बघतो जर ठिय्या आंदोलन करून गुन्हे मागे होणार असेल तर उद्या प्रत्येकजण गुन्हा करीत पोलीस स्टेशनला घेराव टाकत ठिय्या आंदोलन करणार, प्रशासनाला वेठीस धरणे ही बाब योग्य नाही.

  • चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

    चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये महानगरपालिकेची शाळा आहे. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत असून आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा या शाळेमध्ये, शाळेचे छत कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम आदमी पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ निधी उपलब्ध करून शाळेचे तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याबाबत एक महिन्याचा अलटीमेटम देण्यात आला.

    अशीच शाळा इंदिरानगर प्रभागामधील आम आदमी पक्षाचे युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे यांनी तर डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागातील सिद्धार्थ नगर येथील शाळा आणि जूनोना चौक येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ करणेबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक वर्ष आधीच याबाबत निवेदनातून सुचवून दिल्या होत्या. परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचे कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा इशारा देण्यात आला.

     

    यावेळी आम आदी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, संघटन मंत्री भिवराज सोनी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, सूनील सतभय्या, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    यावेळी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, “शहरात रहदारीच्या ठिकाणी शौचालय नसणे हे स्वच्छ भारत मिशन ला मोठा धक्का आहे. जूनोना चौक हे शहरातील एक प्रमुख चौक आहे. या चौकात हजारो लोकांची वर्दळ असते. मात्र, या चौकात कोणतेही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे शहरातील स्वच्छता देखील बिघडते. आम्ही महानगरपालिकेकडून तात्काळ या चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणी करतो.”

     

    यावेळी बोलताना महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे म्हणाले की, “शहरात अनेक महानगरपालिकेची शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत आहेत. शाळेचे छत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही महानगरपालिकेकडून या शाळांचे तात्काळ नूतनीकरण करण्याची मागणी करतो.”
    आम आदमी पक्षाच्या या अलिमेटममुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता या प्रश्नांवर तातडीने कारवाई करावी लागणार आहे, हे विशेष.

  • शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    News34 chandrapur

    वरोरा :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन हातात आलेले सोयाबीन गेले कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही.

     

    त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि आता अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टेमुर्डा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

     

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.

     

    दरम्यान कर्जमाफी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करू व त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशी घोषणा केली होती परंतु आता हिवाळी अधिवेशनात कुठलाही आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गंभीर नसल्याने व
    यावर्षी झालेली अतिवृष्टी व पूरबुडाई व पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहचावा व ह्या शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारला जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन येत्या मंगळवार नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलनं करण्यात आले.

     

    या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, रेवती इंगोले, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, संजय काटकर, गजू वादाफाळे, मनोज गाठले, राजेंद्र धाबेकर, युगल ठेंगे, धनराज बाटबरवे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे, महेंद्र गारघाटे, रामा डुकसे, अशोक दाते, भदुजी गिरसावळे. सुधाकर ठाकरे,गुलाब गुळघाणे, शेखर कारवटकर इत्यादींनी केले.

  • इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर : इको-प्रो च्या हिवाळी अधिवेशन निमित्त एक दिवस एक आंदोलन सुरू असून आज चवथ्या दिवशी, चवथे आंदोलन चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी असलेल्या झरपट व इरई नदीच्या संवर्धनाच्या मागणिकरिता या दोन नद्यांच्या संगमावर “नदी वाचवा सत्याग्रह” करण्यात आला.

     

    चंद्रपूर शहराच्या जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे झरपट व इरई या नद्याला अवकळा आल्या आहेत, प्राचीन काळी या नद्यांच्या काठावर लोकपूर, इंदूपुर व गोंड काळात चंद्रपूर शहर वसले, ते या नद्यांच्या प्रदेश पाहूनच, प्रचंड पुराचा धोका असताना सुद्धा ही शहरे वसली, मात्र गोंड काळात या नद्यांच्या पुरापासून वाचविण्यासाठी संपूर्ण शहराला वेढा बांधून किल्ला परकोट भिंत बांधली. या नद्यांच्या काठावर प्राचीन अंचलेश्वर, महाकाली मंदिर देवस्थान आहेत. कधीकाळी या शहराचे वैभव असणारे, आज या नद्या मात्र शहरातील सांडपाणी वाहून नेणारी तसेच उद्योगिक प्रदूषित जल वाहून नेणारी नद्या राहिल्या आहेत.

     

    2022 व 2023 ला नद्यांचे सर्वेक्षण मध्ये या जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा व पैनगंगा या नद्या प्रदूषित आहेतच, यापेक्षा गंभीर स्थिती मात्र झरपट व इरई या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची झालेली आहे. खरे तर झरपट व इरई या नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत, या नद्यांचे उगम जंगल भागातून झाले असले, स्वच्छ प्रवाह उगमापासून असला तरी शहरात येताच उद्योग आणि नागरी वस्तीमुळे या प्रदूषित पाणी वाहून नेतात. नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये असे ग्रीन ट्रिब्युनल चे आदेश असताना, विविध अकॅशन प्लॅन, कृती आराखडे असताना सुद्धा ते फक्त कागदावरच आहेत.

     

    आज करण्यात आलेल्या नदी संवर्धन सत्याग्रह आंदोलन मध्ये इरई-झरपट नद्यांचा कृती आराखडयाची अंमलबजावणी केव्हा?, ‘चंद्रपूर शहराची जीवनदायिनी की ‘प्रदूषित नाला’, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम केव्हा राबविणार?, दूषित व सांडपाणी नदीत सोडणे केव्हा थांबणार?, नदीत जाणारे प्रत्येक नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र केव्हा लागणार?, उद्योगाचे सोडले जाणारे सांडपाणीवर प्रक्रिया केव्हा होणार?, नदी पात्रातील अतिक्रमण केव्हा थांबणार?, नद्यांचे खोलीकरण केव्हा होणार?, नदी पात्रा लगतचे ओव्हर बर्डन समस्या केव्हा दूर होणार? या झरपट व इरई नद्या संवर्धन विषयक मागण्याचे फलक हातात घेऊन “वाचवा वाचवा नद्या वाचवा”, मुक्त करा, मुक्त करा, प्रदूषणापासून नद्या मुक्त करा”, “झरपट-इरई नदी कृती आराखडा ची अंमलबजावणी करा” आदी घोषणा देत इको-प्रो सदस्यांनी नदी पात्रात उभे राहून आंदोलन केले.

     

    इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रमोद देवांगण, सुरज कावळे, स्वप्नील मेश्राम, भूषण ढवळे, चंदू ओशाखा, अमित कुमरे, धीरज शेंडे, लोकेश भलमे, योजना धोतरे, प्रगती मार्कंडवार, प्रज्ञा नवले, लक्ष्मी गोखरे, हर्षाली खारकर, करिश्मा बुऱ्हाण, नेत्रदीपा चिंचोलकर, आकांशा गाऊत्रे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोषणाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

  • हिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असच एक शक्तीपीठ माता महाकालीच मंदिर चंद्रपूरात असुन या मंदिराच्या विकासासाठी शासनाने पूढाकार घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून मंदिराच्या विकासकामात अडथळा असलेल्या पूरातत्व विभागाच्या जाचक अटींकडेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

     

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पूरवणी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा माता महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा सभागृहात उचलला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात माता महाकाली मंदिराचे 500 वर्ष पूरातन मंदिर आहे. तर 2 हजार वर्षा पुर्वीची येथे माता महाकालीची मुर्ती आहे.

     

    या शक्तीपीठात चंद्रपूर नव्हे तर देशभरातून वर्षभर लाखो भाविक दर्शनाला येत असतात. मात्र पूरातत्व विभागाच्या अटिमुळे या मंदिराचा विकास झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने दिलेले 59 कोटी रुपये अखर्चित आहे. पैसे असुनही केवळ पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे या मंदिराच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सोबतच महाकाली यात्रा परिसरात अनेक मोकळ्या जागा आहेत मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र बैठक घेत हा यात्रा परिसर विकसित करावा अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली.

     

    महानगर पालिका आणि नगर पालीका क्षेत्रात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 700 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या विभागातून चंद्रपूर महानगर पालिका आणि नवनिर्मित घुग्घूस नगर परिषद साठी शासनाने निधी दयावा तसेच वैशिष्टपूर्ण विभागात दोनशे कोटी रुपयांना निधी आहे. यातुनही चंद्रपूरच्या विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.
    नागपूर करीता अतिवृष्टीसाठी सरकारने 100 कोटी रुपये राखीव केले आहे. चंद्रपूरातही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे येथे चारदा पूर आला परिणामी अनेक भागातील पायाभूत सुविधा पूर्णपणे खराब झाल्यात त्यामुळे चंद्रपूरात सुद्धा आपण निधी द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    पदांची भरती करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करा

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरात मंजूर झाले आहे. या विद्यालयाची इमारत तयार होत आहे. सध्या सदर मेडीकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पदभरती करुन ते नव्या इमारतीत सुरु करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

  • हृदयाचे व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत

    हृदयाचे व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत

    News34 chandrapur

    चंद्रपूर: अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा तरुण आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. हातात पैसा नाही आणि कुटुंबाचं भविष्य असलेला तरुणही आजारी. अशा परिस्थितीत विवंचनेत सापडलेल्या पालकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. संकटात सापडलेल्या आईवडिलांची अवस्था ना. श्री. मुनगंटीवार यांना बघवली नाही. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली आणि तरुणवर मुंबईतील पंचतारांकित इस्पितळात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तरुणसाठी देवदूत ठरलेल्या ना. मुनगंटीवार यांचे आभार मानताना अंबोरे कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.

     

     

    गोंडपिपरी येथे राहणारा तरूण साहेबराव अंबोरे (वय २२) हा मूळचा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी. गेल्या १६ वर्षांपासून अंबोरे कुटुंब गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे. तरूणच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच बेताची आहे. त्यामुळे ते भंगाराचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. तरूणला लहानपणापासून हृदयाचा त्रास आहे. २००६ मध्ये त्याचावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. परंतु पुढील औषधोपचाराचा खर्च तरूणच्या आईवडिलांना पेलवत नव्हता. अशात तरुणची प्रकृती खालावत गेली व त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. २०१८ पासून त्याच्या त्रास खूप जास्त वाढला. आपल्या पोटच्या गोळ्याला तडफडताना बघून तरुणच्या आईवडिलांना काय करावे ते सूचत नव्हते. अशात त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्याशी संपर्क साधला. तरुणला वाचविण्यासाठी एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, याची पूर्ण जाणीव बोडलावार यांना होती. त्यांनी तरूणच्या आईवडिलांना तातडीने ना. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे नेले.

     

    आपली कैफियत सांगत असताना तरूणच्या आईवडिलांचा कंठ दाटून आला. ना. श्री. मुनगंटीवार यांनी तरुणच्या पालकांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला. तरुणच्या आईवडिलांचे थरथरणारे हात हातात घेऊन आपण पूर्ण शक्तीने मदत करेन असा शब्द ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. आणि केवळ शब्द देऊन थांबतील ते ना. श्री. सुधीर मुनगंटीवार कसे. त्यांनी तात्काळ आरोग्य सहाय्यक सागर खडसे यांना यासंदर्भात मदत करण्याच्या सूचना दिल्या.

     

    जीवन-मरणाशी संघर्ष

    स्वत: जातीने लक्ष घालत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तरुणच्या उपचारासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली व त्याला मुंबईला रवाना केले. अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. सुरेश जोशी यांनी तरुणच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यासाठी जवळपास 19 लक्ष रुपयांचा खर्च आला. शस्त्रक्रियेनंतर तरुणची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जीवन मरणाशी संघर्ष करीत असलेल्या आपल्या लेकराला स्वस्थ पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांनी देवदुतासारखे धावून आलेल्या ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.