Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रोच्या वतीने हिवाळी अधिवेशन निमित्त सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृंघले अंतर्गत आज सहाव्या दिवशी सहावे आंदोलन ‘सराय’ बचाव सत्याग्रह” करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रो संस्थेसह शहरातील अनेक संस्था व इतिहास अभ्यासक यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. येथे इको-प्रो कडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले होते. ‘जागतीक वारसा दिन’ १८ एप्रील २०१८ पासुन ‘सराई स्वच्छता सराय इमार अभियानाची’ सुरूवात करून सलग १५ दिवस या संपुर्ण इमारतीची स्वच्छता इको-प्रोच्या सदस्यांनी केली होती. या स्वच्छता सत्याग्रह माध्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिका व शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीची छत पडल्याची घटना घडली होती, याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

     

    या ऐतिहासिक इमारतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेउन या ऐतिहासिक ब्रिटीशकालिन वास्तुच्या इमारती मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे ‘ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र’ तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील या ऐतिहासिक इमारतीच्या ठिकाणी असे माहीती केंद्र तयार झाल्यास चंद्रपूरात येणाछया पर्यटकांना, नागरीकांना, विदयार्थ्यांना एकाच ठिकाणी शहरातील सर्वच ऐतिहासिक वास्तु, त्यांचे अंतर, इतिहास, कसे जावे याबाबत सविस्तर माहीती मिळु शकते. यामुळे शहरातील पर्यटन विकासाच चालना मिळेल. यासोबतच यामुळे या इमारतीचे सवर्धन सुध्दा शक्य आहे.

     

    सरायचा इतिहास

    या सराय इमारतीचे बांधकाम 1921 ते 1927 या दरम्यान पुरातन इमारतीचे भुमीपुजन २ ऑक्टो 1921 रोजी संपन्न झाले होते. स्वांतत्रपुर्व काळात स्वातंत्रलढयातील अनेक पुढारी येते थांबलेले आहेत. स्वांतत्रंलढयाच्या अनेक घटनांचे साक्षिदार असलेली ही इमारत आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न’ आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

    या सत्याग्रह मागणी नुसार सराय वास्तू चे संवर्धन, दुरस्तीचे काम, परिसर विकास करून घाण, दुर्गंधी दूर करणे, सदर इमारत चंद्रपूर पर्यटन माहिती केंद्र तयार करणे या आहेत, याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आज इको-प्रो तर्फे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या “सराय बचाव सत्याग्रह आंदोलन मध्ये धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, सचिन धोतरे, सुरज कावळे, आकाश घोडमारे, चंदू ओशाखा, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण ढवळे, रोहित तळवेकर, भारती शिंदे, हर्षाली खारकर, महिमा मोहूर्ले आदी सहभागी होते.

  • सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री असताना राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती दुर्बल घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अमलात आणली. यामुळे मागासवर्गातील अनेक नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र अल्पावधीतच सरकार गेल्याने ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील बहुतांश नागरिकांची घरकुलांची मागणी प्रलंबित होती. ही मागणी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित झाले असून सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

     

    राज्यात विविध समाजासाठी समाजवार पद्धतीने घरकुल योजनांची शासनाने आखणी केली आहे. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी कार्यरत नव्हती. या प्रवर्गासाठी राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टी कोणातून विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्या हेतू व समाजातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पहिल्याच टप्प्यात ब्रह्मपुरी मतदार संघात जवळपास 3 हजार घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र अडीच वर्षाचा काल लोटताच सरकार बदलले आणि अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले.

     

    नागरिकांच्या मागणीचा विचार लक्षात घेत वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणे हेतू विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वस्त न बसता वारंवार शासन दरबारी मागणी रेटून धरल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सावली तालुक्यातील कापसी, जिबगाव, लोंढोली, चांदली (बुज) बोरमाळा चीज बोडी हिरापूर उसेगाव पारडी कवटी चीचबोडी ,साखरी, घोडेवाही, चक पिरंजी, अंतरगाव चिंचोली, तांबेगडी मेंढा, सामदा ,मोखाडा खेडी, थेरगाव, बेलगाव, व्याहाड (बुज) या 23 गावातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची शासन दरबारी धडपड व सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा तसेच उपरोक्त लाभ घेणाऱ्या गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत हे या यशाचे फलित असून सावली तालुक्यातील 873 लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व इतर पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्‍या ५ वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी केली.

     

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागतो आहे.

     

    सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येते. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविलेली आहे.

     

    विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून लवकरात लवकर सदर शिष्यवृत्ती मंजुर करावी तसेच मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, यासाठी प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर यांना विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत सामावून घेण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्‍यानंतर चालू हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्‍थित करून सदर गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता ओबीसी मंत्री मा. श्री अतुल सावे जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न झाली. संघटनेच्या १० पैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या.

     

    उर्वरीत मागण्यासंबंधीदेखील लवकरच सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची आधार योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक कर्जासंबंधी तरतूद, विश्वकर्मा योजना, महाज्योती योजना यासंबंधीच्या मागण्या सदर बैठकीत मान्य करण्यात आल्या. शिक्षण, उद्योग विश्वास प्रगतीची आस असलेल्या ओबीसी बांधवांकरिता ही मोठी आनंददायी बाब आहे.

     

    या बैठकप्रसंगी माजी मंत्री डॉ परीनय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विद्यार्थी अध्यक्ष श्वृषभ राऊत, परमेश्वर राऊत, रामदास कामडी,श्रीहरी सातपुते, ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे ओबीसी सचिव सौ. वनिता वेद सिंहल, ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    बैठकीनंतर रात्री उशिरा डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते चिमूर येथील दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेले अक्षय लांजेवार , व अजित सुकारे यांच्या अन्नत्याग आंदोलन निम्बु शरबत पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी चिमुरात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

    News34 chandrapur

    चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाबापुर येथे चंद्रपूरच्या कैलास ने भव्य असा कोंबडा बाजार थाटला, त्याबाबत News34 ने वृत्त ही प्रकाशित केले होते, 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने कोंबडा बाजारावर धाड मारली मात्र ही कारवाई नाममात्र असल्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या धाडीत बाजाराला कारणीभूत असलेल्या 5 कोंबड्याना अटक करण्यात आली आहे.

     

    चंद्रपुरातील सट्टा किंग म्हणून नामवंत असलेल्या कैलास ने काही सहकाऱ्यासोबत जिवती येथील पहाडावर कोंबडा बाजाराचा भव्य असा संसार थाटला.

    कैलास ने चंद्रपुरात सट्टा या कौशल्यपूर्ण खेळात गुणवत्ताप्राप्त कामगिरी केल्यावर सरळ महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील भारी, बाबापुर येथे कोंबडा बाजार सुरू केला, याठिकाणी रमी, कट पत्ते, झेंडी-मुंडी असे विविध मैदानी खेळ (लुप्त झालेले) खेळण्यात येत होते.

     

    एका डावाची नाळ म्हणून कैलास दररोज लाखो रुपये कमवत आहे, याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर सुद्धा पोलिसांना याचा सुगावा लागला नाही, बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या प्राणाची बाजी लावत (सायंकाळी सर्व खेळाडू घरी गेल्यावर) धाड मारली, मात्र यावेळी अनेक चारचाकी वाहने व खेळाचा मुख्य नायक कैलास तिथे उपस्थित होता त्यांना अटक न करता वारंवार कायदा व सुव्यवस्था भंग करणारे व त्या बाजारात भांडणारे कोंबड्याना काही निष्पाप लोकांसहित अटक करण्यात आली, ही कारवाई म्हणजे मी मारल्या सारख करतो तू रडल्यासारखं कर अशी होती.

     

    या कोंबडा बाजारातील मुख्य आरोपी (कैलास वगळता) बाजारात भांडणारे कोंबडे होते की काय ? अशी अवस्था अटक केल्यावर कोंबड्याची झाली, अटक कारवाई नंतर त्या कोंबड्यांचे काय झाले असेल? (कुणाच्या पोटात तर गेले नाही न?) असा प्रश्न इथे उपस्थित होतो. विशेष म्हणजे दिवसभर सुरू असलेल्या या बाजारावर सायंकाळी कारवाई का करण्यात आली?

     

    भांडणाऱ्या कोंबड्यानी पोलिसांना वारंवार चकमा दिला मात्र अखेर ते पोलिसांच्या हाती लागलेच, पण हा कोंबडा बाजार पुन्हा सुरू होणार आहे हे नक्की, कारण कैलास अभि जिंदा है !

    सदर कारवाई नाममात्र आहे याबाबत News34 जवळ सबळ पुरावे आहे, बातमीच्या पुढील भागात कैलासचा तो वजनदार साथीदार कोण? त्याबाबत महत्वाचा खुलासा….वाचत रहा….. News34

  • चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

    चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – 2 दिवसांनी तो वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये रुजू होणार होता मात्र त्यापूर्वीचं त्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, ही घटना 13 डिसेंबर ला घुग्घुस येथे घडली.

     

    13 डिसेंबर बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय स्मित श्याम पगडी हा युवक आपल्या मित्रांसोबत चारचाकी वाहन क्रमांक MH29BC 8276 ने बेलोरा कडे जात होता, वाहनाचा वेग जास्त असल्याने अचानक वाहनावरून स्मित चे नियंत्रण सुटले आणि वाहन वेगात झाडाला आदळले, या अपघातात स्मित पगडी चा जागीच मृत्यू झाला.

     

    स्मित ला वडिलांच्या जागी वेकोली मध्ये नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र स्मित चा अपघाती मृत्यू झाल्याने आता कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

     

    सदर घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामिण सेवक विविध मागण्या करीता मंगळवारपासून बेमुदत संपावर असून अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन संघटना नई दिल्ली यांच्या आदेशा नुसार संप आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

     

    प्रमुख मागणी याप्रमाणे ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना ८ तास काम,पेन्शन सह सर्व नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे 12, 24 ,36 नुसार वेतन वाढ लाभ, कमलेश केंद्र कमिटीचा रिपोर्ट सकारात्मक शिफारशी लवकर लागू करणे. गटविमा पाच लाख पर्यंत वाढविणे, केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रॅज्युटी सूत्र लावून ग्रॅजुटीमध्ये वाढ करणे, 180 दिवसापर्यंत सुट्टी साठवून त्या सेवानिवृत्तीच्या वेळेस रोखीने देणे, ग्रामीण डाक सेवक च्या कुटुंबांना वैयक्तिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध पुरविणे, केंद्रीय कर्मचाऱ्या याप्रमाणे वार्षिक वेतन वृद्धी तपावत दूर करणे, व सर्व शाखा डाक घराना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना गतिशील करण्याकरीता लॅपटॉप ,प्रिंटर आणि ब्रॅडबँड नेटवर्क सुविधा प्रदान करणे. यासारख्या विविध मागण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन न्यू दिल्ली यांच्या निदर्शनानुसार चंद्रपूर /गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण शाखाडाक सेवक बेमुदत संपावर गेलेले आहे.

     

    जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक युनियनचे पद्माकर टोंगे, मुरलीधर बोडखे,पांडुरंग कोहपरे ,शंकर निवलकर, धोंडू मुसळे, रामदास गोहोकर,राजू धोटे, संदीप डाखरे, सुनील भोपये, समाधान खोब्रागडे, विभा सहारे, भारती करंडे, राजू सातपुते, शिवाजी गंध गुडे, बाबुराव बोंडे, चंदू बोभाटे आधी सह सर्वच ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपात सहभागी झाले आहे.

  • चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व ईको-पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

    सदर आंदोलनात वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड सहित पोलीस कर्मचारी व उपविभागीय अधिकारी इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते, आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू झाले, 2 दिवस पोलिसांनी संयम बाळगला मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवले.

     

    विशेष म्हणजे आदिवासी समाज बांधवांना ठिय्या आंदोलन करण्यासाठी घेऊन आलेले कार्यकर्ते तिथून पळाले होते,

     

    बुधवारी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रकरण चिघळणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील ४ लोकांना व आंदोलनातील २६ लोकांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

     

    यावेळी पोलिसांनी ३७ व ईतर २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचेवर कलम १४१, १४३, १४७,१४९,३४१,३५३,१०९,१८८ व भादवी सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले.

    पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयातील आंदोलना दरम्यान जगन येलके व ईतर १२ लोकांवर ३०७ व ३५३ व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यातील चार लोकांना पोलिसांनी आंदोलनस्थळी ताब्यात घेतले.

     

    यात गणेश परचाके,दर्शन शेडमाके,कांताबाई मडावी, दिनेश गेडाम यांचा यात समावेश आहे.सदर अटकेतील चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत ९ लोकांसहित जगन एलके याना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

  • चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    News34 chandrapur
    चंद्रपूर : शहरातील विविध पाच चौकात फाऊंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आज 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताचे दरम्यान जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिमात्मक आंदोलन करून जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक हॉटेल अधिकाऱ्यांना मनपा इमारती च्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्यात आले.

     

    या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी,सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम, अरुण येरगुडे, वसंता जाधव, प्रवीण अत्तेरकर, सुनील ढेकले, घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, इमदाद शेख, सुभाष फुलझेले, प्रफुल सतभये, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
    फाउंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार आयुक्त बिपिन पालीवाल व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे.

     

    आमदार, पालकमंत्री व विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही ?

     

    धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी फाऊंटेन लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात फाउंटेन लावून धूळ कमी करण्याचा करण्याचा जावईशोध चंद्रपूर मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी लावला. आज पर्यंत मनपातील करोडो रुपयांचे जवळपास पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उजेडात आणले. एकाही घोटाळ्याचे विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.

  • विधानसभेच्या सभागृहात भडकले चंद्रपूरचे आमदार जोरगेवार

    विधानसभेच्या सभागृहात भडकले चंद्रपूरचे आमदार जोरगेवार

    News34 chandrapur

    नागपूर/चंद्रपूर – राज्याला वीज पुरविण्यासाठी जगातील सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एनर्जी आम्ही तयार करतो. याचा परिणामही आम्हाला सोसावा लागत आहे. देशातील सर्वात प्रदूषित जिल्हात आमचे नाव आहे. मात्र आम्हाला याचा मोबदला मिळत नसेल तर हा अन्याय आहे. असे म्हणत राज्याला वीज देऊन आम्ही काय पाप करतोय काय? अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलताना संताप व्यक्त केला आहे.

     

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हासह वीज उत्पादक जिल्हांना वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, हातमाग उद्योगांमध्ये  काम करणा-या कामगारांसाठी सरकारने २०० युनिट विज मोफत करण्याचा निर्णय केला आहे. हा निर्णय कौतुकास्पद आहे. आता याच धर्तीवर वीज उत्पादन करुन प्रदुषण सहन करत असलेल्या वीज उत्पादक जिल्हांना घरगुती वापराची दोनशे युनिट विज मोफत देण्यात यावी, चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात वनआच्छादन असतांनाही प्रदूषित जिल्हांची यादी काढल्यास पहिल्या पाच प्रदूषित जिल्हात चंद्रपूरचे नाव असेल असे ही ते यावेळी म्हणाले.

     

    आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो म्हणून हे प्रदुषण आम्हाला सहन करावे लागत आहे. राज्याला आम्ही विज देतोय म्हणजे पाप करतोय काय? आम्ही उत्पादन केलेली वीज आम्हाला स्वस्त का नाही? अशा शब्दात त्यांनी यावेळी संताप व्यक्त करत चंद्रपूर जिल्ह्यासह वीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी व उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    विशेष म्हणजे वीज उत्पादन जिल्ह्यांना २०० युनिट पर्यंत घरगुती वापराची वीज मोफत देण्यात यावी ही मागणी चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली आहे.

     

    या मागणीसाठी राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, ऊर्जामंत्री यांना निवेदन दिले आहे. सदर मागणीसाठी त्यांनी मागील वर्षीच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर चंद्रपूर येथून ३ हजार मोटर सायकलचा मोर्चा धडकवला होता. या मोर्चाने राज्याचे लक्ष सदर मागणीकडे वेधले होते. मात्र या रास्त मागणीसंदर्भात यंदाच्या अधिवेशनातही कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने आमदार जोरगेवारांचा संताप पाहायला मिळाला. आता या मागणीसाठी वीज उत्पादक जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी समोर येतील का ? या कडे लक्ष राहणार आहे.

     

    हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरण मधील अनेक समस्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले असून येथील लाईनमनच्या समस्या  सोडविण्यात याव्यात, गडचिरोली जिल्हा लोहखनिजाचे समृद्ध आहे. तेव्हा गडचिरोली लगत असलेल्या चंद्रपूर जिल्हा लोहखनिजावर आधारित उद्योग सुरु होइल यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, लघु उद्योगांना इंधन पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खान महामंडळाचा वेकोली सोबत इंधन पूरवठा करार करणे आवश्यक आहे.चंद्रपूर येथील लघु-उद्योगांना सन 2017-18 पर्यंत कोळशाचा नियमित पुरवठा होत होता. परंतु सन 2022-23 मध्ये या आर्थिक वर्षामध्ये मार्च 2023 पर्यंत केवळ 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कोळसा उपलब्ध झाले आहे.

     

    सदर लघु-उद्योगांना कोळशाचा वापर इंधन म्हणून होत असल्याने नियमित कोळसा पुरवठा होऊन चंद्रपुरातील लघु-उद्योगांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ विभागासोबत प्रलंबित असलेला एफएसए (FSA) करार तातडीने करण्यात यावा, चंद्रपूर येथील फेरो अलॉय प्लांट येथील कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक S-1 ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे येथील कामगारांना औद्योगिक S-1 वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारा

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याची शासनाने घोषणा केली आहे. यासाठी चंद्रपूरात जागाही आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या ठीकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  वसतिगृह  तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे घोषित करण्यात आलेले ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह  तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.