Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

     

    या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

     

    43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

     

    आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :

     

    दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

     

    शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :

     

    कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

     

    कृषी प्रदर्शन :

     

    शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

     

    300 च्या वर स्टॉल :

     

    दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.

  • सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात.

     

    मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाहनचालक संघटनेने केले आहे.

     

    पत्रकार परिषदेला विनोद चांदेकर, कॉमे्रड प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाठे, विजय पवार, नितीन कोलारकर, सचिन वनकर, राजू काळे आदी उपस्थित होते.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  • चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

    चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर: येत्या 3 जानेवारी, 2024 पासून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या गावामध्ये आम आदमी पार्टीची संवाद सभा घेण्यात येईल. ही सभा जिल्हा परिषद सर्कलच्या नावावरती असणाऱ्या प्रमुख गावातील मुख्य चौकात व मोक्याच्या ठिकाणी घेण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.

     

    या अभियानामार्फत स्थानीय शेती संबंधीच्या विषयांबद्दल शेतकऱ्या बरोबर संवाद साधण्यात येईल.या सभेत शेती संबंधित विषयांवर चर्चा होईल. सभेत तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव, पीक विमा प्रक्रिया सुरळीत करणे, जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई, सिंचन व्यवस्था, कर्जमाफी, 24 तास शेती करीत वीज देणे या विषयांवर चर्चा होईल. या अभियानाची सुरुवात 3 जानेवारी रोजी होणार आहे. या अभियानात खालील विषयांचा समावेश करण्यात आला आहे:

     

    * तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव. स्वामीनाथन आयोग लागू करून उत्तपादनन खर्चच्या दुप्पट भाव देण्यात यावे.
    * पीक विमा प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी त्याचे पैसे त्वरित देण्यात यावे.
    * जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई योग्य मोलाची व योग्य वेळी करण्यात यावी. त्याचबरोबर सरकारकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी.

     

    * विदर्भातील निम्म्याहून अधिक भाग हा कोरडवाहू आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील योग्य ती सिंचन व्यवस्था बनलेली नाही. विधर्भातील 105 सिंचनाचे प्रोजेक्ट त्वरित पूर्ण करण्यात यावे.

    * कर्जमाफी करण्यात यावी, सरकार ने सरसकट पूर्ण सातबारा कोरा करावा.

    * 24 तास शेती करीत वीज देण्यात यावी.

    चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानात खालील गावांमध्ये सभा होणार आहे:

    * दुर्गापूर
    * बोर्डा – जूनोना
    * ऊर्जानगर
    * पडोली – ताडाळी
    * घुघुस
    * नाकोडा – मारडा

    बल्लारपूर तालुका
    * विसापूर – बामणी
    * पळसगाव – कोठारी

    भद्रावती तालुका
    * चंदनखेडा – मुधोली
    * कोकेवाडा – नंदोरी
    * पाटाळा – माजरी
    * कोठा – घोडपेठ

    ब्रम्हपुरी
    * नान्होरी – नवरगाव
    * पिंपळगाव – मालडोंगरी
    * खेड मक्ता – चावघान
    * गांगलवाडी – मेंडकी
    * आवडगाव – मुंडजा

    राजुरा
    * गोवारी – सास्ती
    * चुनाला – विरुर
    * आर्वी – पाचगाव
    * देवाडा – डोंगरगाव

    जिवती
    * पाटण – शेनगाव
    * खडकीरायपूर – पुडियाल मोहदा

    कोरपना
    * कोडासी पुंज – भोयगाव
    * ऊपरवाही – नांदा
    * येरगव्हान – परसोडा

    गोडपिपरी
    * करंजी – खराडपेठ
    * विठ्ठलवाडा – तळोधी
    * तोहगाव – धाबा

    पोंभूर्णा
    * देवाडा खुर्द – केमारा
    * चिंतलधाबा – घोसरी

    मुल
    * राजोली – मारोडा
    * जुनासुरला – बेंबाळ
    * केलझळ – चींचाळा

    सींदेवाही
    * नवरगाव – पळसगाव जाट
    * गुंजेवाही – लोन वाही
    * रत्नापूर – शिवनी
    * मोहाडी नले – वासेरा

    नागभिड
    * कानपा – मोशी
    * पारडी – बाळापुर गुंज
    * गोविंदपुर तळोधी बाळापुर
    * गिरगाव – वाढोना

    चिमूर
    * भिसी – आंबोली
    * शंकरपुर – डोमा
    * सिरपुर – नेरी
    * मुरपार तुकुम – खडसंगी
    * मसाळ बुंज – मदनापुर

    वरोरा
    * खांबाडा – चिकणी
    * टेंबुर्डा – अंबामाक्ता
    * नागरी – माढेली
    * चुरुरखुटी – सलोरी
    * शेगाव बूंज – बोर्डा

    या अभियानातून आम आदमी पार्टी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेईल आणि त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल.

    या अभियानात आम आदमी पक्षाच्या जिल्हा स्तरावरील नेते, कार्यकर्ते व सदस्य सहभागी होतील. या अभियानातून आम आदमी पक्ष शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

  • नववर्षाच्या पूर्व संध्येला विजासन लेणी येथे घडला धक्कादायक प्रकार

    नववर्षाच्या पूर्व संध्येला विजासन लेणी येथे घडला धक्कादायक प्रकार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणी येथे भगवान गौतम बुध्दाच्या प्राचीन मुर्ती आहेत. यापैकी वरील भागात असलेल्या एका मुर्तीला दि. 31 डिसेंबर 2023 चे रात्रीतून अज्ञातांनी भग्न करुन विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

     

    या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नागरिक शांतताप्रिय, जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करणारे आहेत. परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई करून दोषींना अटक करणे आवश्यक आहे.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पोलिस प्रशासनाला तात्काळ दोषींना अटक करण्याची विनंती केली आहे. अन्यथा भद्रावती तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरुन न्यायासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  • नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

    नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

    News34 chandrapur

    घुग्घूस : केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आज घुग्घुस शहरातील सर्व चालकांनी आपले वाहन सोबत घेत सदर कायद्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.

    कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला ठाणेदार आसिफ राजा यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 : 30 वाजेपासून जोरदार निदर्शने केली.

    यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.

     

    केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करवून घेतला यानुसार चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यास चालकाला अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे.

     

    चालक पळून गेला असता व दोषी आठळल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा व सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
    चालकांच्या मते वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.

     

    तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो सात लाख दंड देऊ शकत नाही.
    व सात वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

     

    सदर आंदोलनात काँग्रेस नेते अनिरुद्ध आवळे, अलीम शेख,विशाल मादर,रफिक शेख,व चालक अनंता बिराडे, श्याम तिरगुटला,राजू आसपवार,संतोष भारती,शंहशह शेख,बालाजी पतंगे,विजय बेहेवार,जावेद शेख,नेतूराग,आरिफ खान,अकबर अली,राजेश श्रीवास,मुस्तुफा साहू,शहनवाज खान,हिफाज खान, सयाराम सर्वां,शाम कोंडागुर्ला,मोहरम अली,बुधराज कश्यप व मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते.

  • नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

    नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    विसापूर : बल्लारपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदीवर हडस्ति ते कढोली दरम्यान मोठा पूल आहे. या पुलाखाली चंद्रपूर येथील काही मुले खेळत होते. दरम्यान त्यांना वर्धा नदी पात्रात पोहण्याचे ठरविले.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जुन्या वर्षाला निरोप देताना एकाचा त्यात मृत्यू झाला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

    ही घटना रविवारी सकाळी ११.30वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावाजवळील पुला जवळ घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव जित रवींद्र गावतुरे (१५ ) रा.नगीना बाग चंद्रपूर असे आहे.
    चंद्रपूर येथील काही मुले बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावा जवळच्या पुला खाली व्हालिबाल खेळत होते. यावेळी त्यांच्या सोबत एक मोठा युवक देखील होता.

     

    खेळ खेळल्यानंतर त्यातील चार जणांनी वर्धा नदीत पोहण्याच्या बेत केला.पोहत असताना त्यातील तिघे वर्धा नदीच्या पात्रातून बाहेर आले.मात्र जित्रू गावतुरे हा मुलगा खोल पाण्यात बुडाला. त्याला नदीच्या पात्रातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्याचा वर्धा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.

     

    या घटनेची माहिती बल्लारपूर तहसील प्रशासनाला देण्यात आली.त्यावेळी नायब तहसीदार ठाकरे व नांदगाव ( पोडे ) येथील तलाठी महादेव कन्नाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. दरम्यान गावातील नावाडी व एन डी आर एफ च्या पथकाने त्याचा शोध घेऊन सायंकाळी जितृचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती ,बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांनी दिली.या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहे.

  • त्या दुकान चालकांना आमदार जोरगेवारांनी दिला मदतीचा हात

    त्या दुकान चालकांना आमदार जोरगेवारांनी दिला मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असून पिढीत दुकान मालकांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी तहसील विभाग, महावितरण आणि मनपा च्या अधिका-यांची उपस्थिती होती.

     

    तुकुम येथील मुक्ताई इलेक्ट्रिेकलच्या दुकानाला मध्य रात्रीच्या सूमारास आग लागली या आगीने लगतच्या दोन दुकानांना आपल्या कवेत घेतल्याने तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

     

    शाॅट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमीक अंदाज आहे. दरम्यान आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असुन आगे मागचे कारण समजुन घेतले आहे. अशा प्रसगांवर तात्कळा नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन पथकाने तत्पर राहण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे.

     

    शाॅट सर्कीटमुळे वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी महावितरणनेही पुढाकार घेत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. याप्रसंगी आगीने नुकसान झालेल्या दुकान मालकांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली असून तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहे.

  • चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडला जेष्ठ चोर

    चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडला जेष्ठ चोर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात 63 वर्षीय वृद्ध हा 2 चोरी प्रकरनात दोषी आढळल्याने शहर पोलिसही चक्रावून गेले.

    चोरीच्या पहिल्या प्रकरणात 26 डिसेंम्बरला शहरातील जटपूरा गेट परिसरातील डॉ.आलूरवार हॉस्पिटलमध्ये ड्युटी करीत रेस्ट रूम मध्ये रेडिओलॉजिस्ट सागर दामिया हे आराम करत होते, मात्र त्यावेळी डॉक्टर आलूरवार यांच्या चेंबर मधून कुणीतरी स्टॅण्ड घड्याळ चोरून नेली, त्यावेळी सीसीटीव्ही तपासली असता एक इसम ती घडी चोरून नेताना आढळून आला, याबाबत दामिया यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

     

    दुसऱ्या घटनेत सुरेश लष्कर हे 24 डिसेंम्बरला राजकला टॉकीज येथे चित्रपट बघण्यासाठी गेले होते, त्यावेळी लष्कर यांनी आपले दुचाकी वाहन पार्क केले होते, चित्रपट बघून झाल्यावर लष्कर हे बाहेर आले असता त्यांची दुचाकी पार्किंग च्या ठिकाणी आढळून आली नाही आपले वाहन चोरी झाले हे समजताच त्यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

     

    तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केलं, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपी 63 वर्षीय इकबाल पंढरपूरवाला याला अटक केली, त्याची चौकशी केली असता डॉ.आलूरवार हॉस्पिटलमधून घड्याळ व राजकला टॉकीज येथून चोरी गेलेले दुचाकी वाहनाची चोरी इकबाल ने चोरी केल्याची कबुली दिली.

     

    पोलिसांनी आरोपिकडून चोरी केलेला माल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपुरातील अधिकारी लावंताय महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना

    चंद्रपुरातील अधिकारी लावंताय महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीला तारडाचे सरपंच तरुण उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे एका महिला ग्रा.पं.सदस्याने विरोध केल्याने वाळू तस्करांनी या तिघांवरही प्राणघातक हल्ला करून जखमी केले. या प्रकरणात शिवसेना (उबाठा) वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकरसह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाला गोंडपिपरीचे एसडीओ, तहसीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे आणि खनिकर्म अधिकारी नैताम तेवढेच जबाबदार असून, या सर्व अधिकाऱ्यांना या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा घाटावरून शासनाचे नियम डावलून रेती उत्खनन सुरू आहे. रेतीघाटधारक अक्षय चांदेकर हे पोकलेन, जेसीबी मशीने रेतीघाट पोखरत आहेत. दररोज रेती तस्करीच्या वाहतुकीमुळे तारडा गाववासीयांची झोप उडाली असून, तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे आणि एका महिला ग्रामपंचायत सदस्यांने नदीपात्राकडे धाव धेत रेती उत्खननाला विरोध केला. यावेळी या तिघांवरही अक्षय चांदेकर आणि त्याच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मास्टर माइंड शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक करण्यात आली तर काशीकर हा फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, हा हल्ला पूर्वनियोजित असून, रेतीघाटधारक अक्षय चांदेकर यांनी महसूलचे अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे यांना हाताशी धरून हा हल्ला केल्याचा आरोप पुष्पा मोरे यांनी केला आहे.

     

     

    चांदेकर यांनी परवानगी मिळालेल्या क्षमतेपेक्षा दहा पट अधिक ब्रासरेतीचे उत्खनन केले आहे. रेती घाटावरील सीसीटीव्ही फूटेज आणि स्टॉक यार्ड, जीपीएस ट्रेकिंग याची चौकशी केल्यास या घाटावरील वाळूचोरीचे मोठे गौडबंगाल उजेडात येणार आहे.

     

    परंतु, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच लावण्यात आले नाही. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनेचे रेतीघाट धारकाकडून रेतीघाट पोकलेन आणि जेसीबीने पोखरला जात असल्याचा आरोप मोरे यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील रेतीघाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू असून, गुन्हेगारी वाढत आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच कुलथा घाटावरील घटना घडली असून, या महसूल अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच सरपंच आणि तंमुस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

     

    अशी होते वाळू तस्करी…

    चंद्रपूर जिल्ह्यात आज असंख्य वाळू तस्कर सक्रिय आहे, नियमाप्रमाणे वाळू घाट घेतल्यावर 1 हजार ब्रास च्या ऐवजी हे तस्कर 10 हजार ब्रास वाळू उत्खनन करतात, प्रशासन द्वारा वाळू घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमरे व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टम बसविल्या जातो, मात्र वाळू तस्कर ज्या वाहनांवर जीपीएस सिस्टम लावला असतो ते वाहन शट डाऊन दाखविण्यात येते आणि दुसऱ्या वाहनाने वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यात येते.

     

    प्रशासनाची अर्थपूर्ण भूमिका…

    खनिज संपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात वाळू तस्कर तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खणीकर्म अधिकारी व स्थानिक यांच्याशी ओळखी करीत सलोख्याचे संबंध स्थापित करतात आणि मग सर्वांशी अर्थपूर्ण व्यवहार सुरू करीत हा गोरखधंदा सुरू करण्यात येतो.

    दरवर्षी शासनाला यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुना लागतो विशेष बाब म्हणजे प्रशासनातील अधिकारी महसूल विभागाला चुना लावण्याचे काम करीत असतो, त्यामुळे वाळू तस्कर कुणाच्याही नियंत्रणात नसतात, त्यामुळे मुजोरी व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधामुळे हे काहीही करायला तयार असतात हे विशेष.

    या वाळू तस्करीला जबाबदार तस्कर नसून तर त्यांच्याशी हातमिळवणी करणारे प्रशासनातील अधिकारी आहे, ज्यादिवशी या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रारंभ होणार त्यादिवशी हे अवैध धंदे पूर्णतः बंद होणार.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  • चंद्रपूर शहरात मध्यरात्री घडला भीषण आगीचा थरार

    चंद्रपूर शहरात मध्यरात्री घडला भीषण आगीचा थरार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकुम येथे 30 डिसेंम्बरच्या रात्री मुक्ताई इलेक्ट्रिकल च्या दुकानाला भीषण आग लागली, आग इतकी भयावह होती की बाजूच्या 2 दुकानात आगीने शिरकाव करीत लाखोंचे नुकसान केले.

     

    नवं वर्षाच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरातील नागरिक सज्ज झाले आहे, नव्या वर्षात नवे संकल्प घेत नागरिक पुढच्या वर्षाच्या योजना आखत आहे मात्र या आनंदाच्या क्षणी तुकुम भागात दुकानाला आग लागल्याने दुकान चालकांच्या नव्या वर्षाच्या संकल्पावर विरजण पडले.

     

    30 डिसेंम्बर च्या मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्र जवळील मुक्ताई इलेक्ट्रिकल च्या दुकानात अचानक शॉर्ट सर्किट झाला हळुवार पणे घडलेला हा प्रसंगाने काही वेळात रौद्र रूप धारण केले होते.

     

     

    सदर दुकानात टीव्ही, पंखा असे विविध दुरुस्तीचे कामे केल्या जातात, बाजूला रिवाईंडिंग व चष्म्याची दुकान आहे, या आगीत तिन्ही दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले, नागरिकांनी वेळेवर अग्निशमन दलाला पाचारण केल्याने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, यावेळी रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, नागरिकांनी सुद्धा याठिकाणी गर्दी केली होती.
    आगीवर नियंत्रण मिळविताना एमएसईबी ने काही वेळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला होता.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..