Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    News34 chandrapur

    रमेश निषाद

    बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली.
    आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याबाबत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    या बाबत माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले.
    घटनास्थळी पाहणी केली असता वाघाचे हल्यात शामराव रामचंद्र तिडसुरबार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्यावेळी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात आले.

     

    सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.

  • नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

     

    नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

    दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

     

    या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

  • भोपाळचां नीरज सोलंकी ठरला चिमूर क्रांती मॅरेथॉनचां विजेता

    भोपाळचां नीरज सोलंकी ठरला चिमूर क्रांती मॅरेथॉनचां विजेता

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    नवीन वर्षाचे औचित्य साधून श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने चिमूर क्रांती मॅरेथॉन दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

     

    श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखऊन श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथील पटानगनातून दौड स्पर्धेला सुरुवात केली. बालाजी मंदिर ते पिंपळनेरी वॉर्ड पाच किलोमीटर व पिंपळनेर वॉर्ड ते बालाजी मंदिर पाच किलोमीटर अशी दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेत राज्यासहित विविध राज्यातून १९० सप्रधक सहभागी झाले होते. चिमूर मॅरेथॉन स्पर्धेतील खुल्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक भोपाळ येथील नीरज सोलंकी यांनी प्राप्त केला. आणि रेल्वे क्लबचे नागराज बुरसूने यांनी दुसरा. भोपाळ येथील उपेंद्र पाल यांनी तिसरा. नागपूर येथील राजन यादव यांनी चौथा. तर नाशिक येथील अंकित कुमार यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.

     

    सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार कीर्तीकुमार भांगडिया. पोलिस निरीक्षक मनोज गभने. नगर परिषद मुख्याध्यापिका डॉ सुप्रिया राठोड यांचे हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चाच्या पदाधीकऱ्यानी अथक परिश्रम घेतले

  • 43 इंच उंचीची पंगनूर गाय आपण बघितली काय?

    43 इंच उंचीची पंगनूर गाय आपण बघितली काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरात सध्या जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. यात विविध प्रकारचे पशुधन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून यात पंगनूर या गाईची प्रजाती अकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही गाय अवघी साडेतीन ते चार फूट इतकी असून दुधाळ गाय म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षातुन तीन हजार लिटर दुध देण्याची क्षमता आहे.

     

    3 जानेवारी पासून सुरू झालेल्या कृषी महोसत्वाचा आज शेवटचा दिवस, मागील 4 दिवसापासून कृषी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, बचत गटाचे स्टॉलवर अनेक शेतकरी व नागरिक भेट देत आहे, आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून सध्या 43 इंचीची पंगणुर गाय नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चला तर मग या विशिष्ट प्रजातीविषयी आपण जाणून घेऊया.

     

     

    ही आहेत गायीचे वैशिष्ट्य

    गायीच्या प्रजाती तेथील भौगोलिक वातावरणानुसार जडणघडण होत असते. पंगनूर ह्या गाईच्या प्रजाती आंध्र प्रदेश येथील आहे. विशेषतः तिरुपती क्षेत्रातील पहाडी भागात ही प्रजाती आढळून येते. कृषी विषयक कामे तसेच दूध उत्पादनासाठी देखील उपयोग होतो.

    तिरुपती बालाजी मंदिरात मिळतो प्रसाद

    तिरुपती बालाजी मंदिर हे जगप्रसिद्ध असून दररोज येथे लाखो भाविक येत असतात. या भाविकांना जो प्रसाद वाटला जातो तो ह्या पंगनूर गाईच्या तुपापासून बनलेला असतो. त्यामुळे ह्या गाईला अध्यात्मिक महत्त्व देखील प्राप्त झाले आहे.

     

    धोक्यात आलेली प्रजाती

    ह्या प्रजातीचे संवर्धन अपेक्षितरित्या झाले नसल्याने ह्याची संख्या आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे ही प्रजाती आता धोक्यात आली असून केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे.

     

  • चंद्रपुरात कोयता गँग, बंदूक व कोयत्याचा धाक दाखवीत पेट्रोलपंप लुटले

    चंद्रपुरात कोयता गँग, बंदूक व कोयत्याचा धाक दाखवीत पेट्रोलपंप लुटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा येथील आसिफाबाद मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावर 6 जानेवारी ला पहाटे 3 वाजता सशस्त्र दरोडा पडला, या मध्ये दरोडेखोरांनी तब्बल 1 लाख 90 हजार रुपये लुटले. मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज तपासात दरोडेखोरांना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली.

    राजुरा तालुक्यात मागील वर्षी पेट्रोल पंपावर दरोड्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते, मात्र नव्या वर्षात 6 जानेवारीला 5 जणांनी चेहऱ्यावर कपडा गुंडाळत राजुरा-आसिफाबाद मार्गावरील साई कृपा पेट्रोल पंपावर धडक दिली, त्याठिकाणी असलेल्या मॅनेजर ला बंदूक व कोयता दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याजवळून पेट्रोल पंपाचे 1 लाख 90 हजार रुपये लुटत तिथून पोबारा काढला.

     

    घटनेनंतर विरुर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार देण्यात आली, जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी तात्काळ हे प्रकरण चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी घटनेचे गांभीर्य बघत पथक तयार करीत तपास सुरू केला.

     

    पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या जलद तपासाने 5 दरोडेखोरांना अटक करण्यात आली, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आले.

    नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज तपासाचे पोलीस अधीक्षकांनी सुद्धा कौतुक केले आहे.

  • वाघनखे कधी येणार? वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती

    वाघनखे कधी येणार? वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वाघनखे कधी येणार याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकी ची आचार संहिता संपल्यावर ते वाघनखे राज्यात आणणार अशी माहिती आज दिली.

    सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखे लंडन येथे आहे, याबाबत वनमंत्री मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला होता, आता लवकरात लवकर ती वाघनखे राज्यात येणार अश्या हालचाली सुरू झाल्या आहे.

     

    13 जानेवारी पासून राज्यात जाणता राजा चे प्रयोग होणार आहे, त्यांनतर जून महिन्यात शिवराज्याभिषेक ची तारीख आहे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली की आपण वाघनखे आणणार, कारण आचारसंहितेच्या मध्ये आयोजित कार्यक्रमावर बंदी येणार त्यामुळे आचारसंहिता संपल्यावरचं आपण कार्यक्रम घेऊ शकणार अशी माहिती राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 6 जानेवारीला दिली.

  • व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

    व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    स्व. बाळशास्त्री जाभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार व्यक्त केले.

     

    शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रम मधील मंचावर ठाणेदार मनोज गभणे,व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार योगेश सहारे, पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित होते.
    संचालन बालू सातपुते, प्रास्ताविक विलास कोराम तर आभार योगेश सहारे यांनी व्यक्त केले.

     

    यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया चे जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, भरत बंडे राजु रामटेके, रामदास ठुसे,उमेश शंभरकर, जावेद पठाण, फिरोज पठाण,संजय नागदेवते, पंकज मिश्रा,राजेंद्र जाधव, शुभम बारसागडे नितीन पाटील,गुणवत चटपकर, जितेंद्र गाडगे,सुनील कोसे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

  • खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

    प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.

     

    कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन‌ स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.

     

    ढिसाळ नियोजनाची खिचडी?

    खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

  • भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

    भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – बीआरएसने एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु केला आहे. राजुरा विधानसभातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवीला जाणार आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अल्पोहाराचे देण्यात येणार आहे.आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली.

     

    उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक येत असतात.रुग्ण बरे होईस्तोवर त्यांना थांबावे लागते. अश्यात त्यांची खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत असते.अश्यात बीआरएसने हाती घेतलेला उपक्रम आपुलकीचा ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रात बीआरएस तर्फे एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

     

    आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात या उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी नेते भूषण फुसे,ज्योतीताई नळे, अनुसूर्याताई नूती, राकेश चीलकुलवार, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, सुभाष हजारे उपस्थित होते.

  • रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

    रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर, नांदगाव व माना या गावालगत सध्या रस्त्याच्या दुरुस्ती करण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर काम तात्काळ थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    या मार्गावरून शेतकरी, शेतमंजूर रात्रदिवस ये जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्त्याचे विसापूर, नांदगाव पोडे ते माना गावापर्यत खडिकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण असलेल्या रोड ला पुन्हा नव्याने 3 कोटी 50 लाख मंजूर करून त्या रोड वरती नवीन खडिकरण, मजबुतीकरण न करता सरळ त्या वरती गिट्टी टाकून फक्त डांबर टाकत रोड चे काम करत आहेत व अश्या पद्धतीने काही राजकारणी लोक, इंजिनिअर आणि ठेकेदार एकसंघमत करून शासनाचा 3 करोड 50 लाख निधी लंपास करत आहे हे काम लवकरात लवकर बंद करावे, सदर काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले चांगलेच संतापले होते.

     

    या सर्व कामाची पालक मंत्री साहेबांनी चौकशी करावी असे पत्र सुद्धा आम्ही देणार आहोत व जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्या वरती कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    यावेळी मनसे चे तालुका प्रमुख राज वर्मा मनसे चंद्रपूर, शहर उपप्रमुख कैलास जी वालकोडे, संतोष जी येमूरले मनसे शाखा अध्यक्ष प्रमोद जी निखाडे, प्रशांत पिंपळशेडे, शंकर उईके आदि गावकरी हजर होते.