Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपुरात लवकरचं Eye Hospital On Wheels चा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिवसेंदिवस मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मानवी जीवनात वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभराचे कितीतरी तास वापर करीत विद्यार्थी धडे घेत आहेत. जसे फायदे तसे नुकसान देखील असल्याने डोळ्यांचे आजार देखील वाढले आहे. यावर उपचार करता यावा म्हणून पुढील काही महिन्यात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ‘आय हॉस्पिटल ऑन व्हील’ ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

     

    ज्यामुळे डोळ्यांच्या आजारावार मात करता येईल.
    आणि चंद्रपूर जिल्ह्यात उत्तमोत्तम आरोग्यसेवा देता येईल अशी घोषणा वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की डोळ्यांच्या आजार लवकर बरे व्हावे यासाठी हा फिरता दवाखाना जिल्ह्यातील विविध भागात जात नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करीत त्यावर निदान करण्याचे काम करणार आहे, डिसेंबर महिन्यात या फिरत्या दवाखान्याचे उदघाटन करणार असल्याची माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

  • चंद्रपुरातील युवकांनी केली कमाल तयार केली हायड्रोजन कार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मुंबई – चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी कार तयार केली केली. या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री माता महाकाली महोत्सवात त्यांची कार ठेवण्यात आली होती. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांची मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली आहे. ना. फडणवीस यांनीही यावेळी युवकांचे कौतुक करत शासन त्यांना मदत करेल असा विश्वास दिला आहे.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सह कारची निर्मिती करणारे हर्षन नक्षीने , साईल काकडे, प्रज्वल जमदाडे, जय विधाते, दिपक मालेकर, वैभव मांडवकर यांची उपस्थिती होती.

     

    चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील वणी येथील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी अत्याधूनीक कार तयार केली आहे. या कारमध्ये सुरक्षा संसाधनापासून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहे. दोन वर्षाच्या परिश्रमा नंतर स्वखर्चातून या युवकांनी ही कार तयार केली आहे. टायर आणि काच वगळता कारसाठी वापरण्यात आलेले सर्व उपकरणे त्यांनी तयार केली असल्याची माहिती या युवकांनी दिली आहे. सदर कार एक किलो हायड्रोजनवर 250 किमी चालत असल्याचा दावा या युवकांनी केला आहे. तसेच ही कार अद्यावत AI तंत्रज्ञानावर आधारित चालक विरहीत कार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.

     

    दरम्यान आता त्यांना सदर कार रस्त्यावर उतरविण्यासाठी शासनाची मदत हवी आहे. त्यामुळे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवातही सदर कार ठेवण्याची संधी आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांना उपलब्ध करुन दिली होती. यावेळी त्यांनी या युवकांचे कौतुक करत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तर आता त्यांनी या युवकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून दिली आहे.

     

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारची पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली. भारताकरिता सर्वाधिक आवश्यकता आहे अशा प्रकारचे तंत्रज्ञान या कारमध्ये वापरण्यात आले आहे. या कारमुळे प्रदुषण कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून या कारला रस्त्यावरती आणण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केल्या जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

  • मराठा आरक्षण हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – गृहमंत्री फडणवीस यांचा आदेश

    News34 chandrapur

    मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

     

    अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, 2 हेक्टर च्या निकष काढत आता 3 हेक्टर करण्यात आला आहे.

     

    मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे, मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षणबाबत योग्य पाऊल उचलत आहे, मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे, ते अत्यंत चुकीचे असून सरकार हिंसाचार सहन करणार नाही.

    कुटुंब घरी असताना घराची जाळपोळ करणे म्हणजे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आहे, याबाबत आता अशी हिंसा करणाऱ्या विरुद्ध कलम 307 अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    या हिंसाचाराचा काही राजकीय पुढारी वयक्तिक लाभ घेत आल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे, त्याबाबत पोलीस विभाग आपलं काम करीत आहे, आता हिंसा करणाऱ्या विरोधात पोलीस विभाग कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य रसत्यावर विविध ठिकाणी वाहन कायमचे उभे ठेवून वाहतूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार, कायदा भंग करणाऱ्या व्यक्ति विरूद्ध मोटर वाहन अधिनियमांच्या तरतूदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 283 अंतर्गत सुद्धा कारवाई होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरात प्रशासना कडून वाहतूक नियंत्रण व सुव्यवस्था कायम ठेवन्याकरिता बरेच प्रयत्न करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रशासन द्वारे मुख्य मार्गाच्या दोनही बाजूला फुटपाथचे निर्माण, मार्गाच्या दोनही बाजूला पांढऱ्या रेशाने पार्किंगची जागा निश्चित करून वाहनांची रहदारी करिता रोड मोकळे करून देण्यात आले होते.

     

    परंतु मागिल काही महिन्यापासून असे दिसून येत आहे की बरेच ठिकाणी फुटपाथ आणि पार्किंगच्या जागेवर कायमचे वाहन उभे ठेवून काही बेजबाबदार व कायदा भंग करणारे समृद्ध लोक / व्यवसायिक लोकांनी अतिक्रमण करून घेतले आहे आणि त्यामुळे मुख्य मार्ग असो किंवा गल्ली असो सर्व ठिकाणी वाहतूकीत इतक्या मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होउ लागला आहे की ज्यावरून शहरातील व चंद्रपूर शहराच्या बाहेर जाणान्या मुख्य मार्गांवर सुद्धा दिवसभर ट्रैफिक जाम ची दशा कायम दिसत राहते.

     

    नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मुख्यमार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड आणि महात्मा गांधी रोड हया मेन रोड वर दोनही बाजूला प्राईवेट बस मालकांनी, टॅक्सी धारकांनी, वाहन शोरूम मालकांनी, वाहन रिसेल कारणारे व्यवसायिकांनी मोठे व्यवसायिक कॉम्पलेक्स मधे व्यवसाय करणारे गाळे धारकांनी, मेन रोड वर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका द्वारा चंद्रपूर शहरात रोड वर मार्किंग करून दिलेल्या पांढऱ्या रेशांच्या बाहेर आपली वाहने उभे ठेवून वाहतूकित अडथळा निर्माण केला आहे.

     

    ज्यामुळे दिवसात सर्वसामान्य जनतेला रोड वर आपली वाहन चालविणे अवघड झाले आहे. इतकेच नव्हेतर जाम ची कायम स्थिति उदभवत असल्याने पायदळ जाणारे लोक सुद्धा त्रास भोगत आहे. अनेक ठिकाणी अव्यवस्थित पार्किंग असल्याने दररोज दूर्घटना होत आहे त्यात जीवहानि होण्याचे सुद्धा अनेक प्रसंग निर्माण झाले आहे.

     

    हा गंभीर विषय आहे. सर्व सामान्य जनता आपले वाहन घेउन आता मुख्य मार्ग असो किंवा चंद्रपूर शहरच्या बाहेर जाणारे महामार्ग असो त्यावर आपले दुचाकी व चारचाकी वाहन चालवितांना घाबरतात कारण त्यांच्या वाहनांच्या येण्या-जाण्याचे मार्गच उरले आहे. सर्व ठिकाणी काही खास लोक आपले वाहन दिवसरात्र अव्यस्थितपणे लावून रोडचे त्यांनी कायमचे अतिक्रमण करून घेतले आहे. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे की नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड, मेन रोड हया मार्गावर बरेच लोक आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवतात आणि त्यांचा विरोध केल्यावर ते शिवीगाळ करून वाहतूक व्यवस्थेत आम्ही अडथळा निर्माण केल्यावरही आमच्या विरूद्ध प्रशासन काहीच करू शकत नाही अशी धमकी देण्याचे स्तरावर गेले आहे.

     

    सर्व सामान्य जनता त्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जाब देण्याऐवजी आपला त्रास स्वतः भोगून शांत निघून जाते परंतू कधी कधी आपसात मारामारीची परिस्थिति निर्माण होते ज्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.

    या परिस्थितीतून कायमची मुक्तता मिळण्याकरिता आपल्या मार्फत अधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले असेल परंतू स्थिति मधे काहीही सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या कडे शासनाने कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी दिली आहे आणि कायद्यात मोटर वाहन अधिनियम अंतर्गत दंड व सक्तीचे प्रयोजन, रोड वर अतिक्रमण केल्यास दंड व सक्तीचे प्रयोजन सह वाहन जप्ती करण्याचे सुद्धा अधिकार दिले आहे तर त्याचे योग्यपणे वापर होणे गरजेचे आहे.

     

    तसेच वारंवार सूचना देउन सुद्धा जसे मुख्यमार्ग आणि महामार्ग वर अव्यवस्थितपणे वाहन लावून अडथळा निमार्ण करणाऱ्या किंवा मुख्यमार्ग व महामार्ग वर मनपाकडून पांढया रंगाने चिन्हित करून दिलेल्या पार्किंग झोनच्या बाहेर दिवसरात्र आपले वाहन कायमचं
    उभे ठेवणाऱ्या लोकांविरूद्ध सक्तीची कारवाई करण्याकरिता भारतीय दंड संहितेच्या कलम 283 मधे सुद्धा आपणास असे अधिकार देण्यात आले आहे की ज्यावरून आपण सार्वजनिक मुख्य मार्ग, महामार्ग वर अतिक्रमण करणाऱ्या लोकांविरुद्ध जप्तीची कारवाई करू शकतात.

    तरी सर्व सामान्य जनतेचा हा प्रश्न आम्ही आपल्या समक्ष ठेवून आपणास विनंती करू इच्छितो की आपण चंद्रपूर शहर च्या सर्व मुख्य रस्त्यांवर आपली वाहने अव्यस्थितपणे किंवा दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणारे लोका विरूद्ध 7 दिवसात कडक मोहीम राबवून त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 283 अंतर्गत कारवाई करत त्यांचे वाहन जप्तीची कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून प्रशासनाने सामान्य लोकांच्या येण्या-जाण्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या सार्वजनिक रोड वर आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणाऱ्या लोकांमधे नियमांची व कायद्याची धाक बसेल आणि आपल्या शहरात वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत थोडी फार सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

     

    ह्या विषयाचे स्मरणपत्र दिनांक 27 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ह्यांना देण्यात आले, ह्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि ह्या विषयावर एक अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाल्याचे चर्चे दरम्यान सांगण्यात आले व येत्या काही दिवसात ह्या वाहूतुक अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने कडक कायदा करण्याचा अध्यादेश काढण्यात येईल व मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना देण्यात आले.

     

    निवेदन सादर करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, संभाजी खेवले, राहुल वाघ तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • मराठा समाज आरक्षणावर आमदार बोर्डीकर यांची सुप्रिया सुळेवर जोरदार टीका

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून सध्या काही आमदार व खासदार राजीनामे देण्याच्या तयारीत आहे, मात्र या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 40 दिवसापासून सरकारने मराठा आरक्षण बाबत काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार समाचार घेत, अनेक वर्षे शरद पवार साहेब सत्तेत होते जर त्या काळात आपल्या वडिलांनी मराठा समाजबाबत काही चांगले निर्णय घेतले असते तर आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.

     

    सरकार आरक्षण प्रश्नावर गंभीर आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समजाला न्याय देतील, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होत मात्र मविआ सरकार आलं आणि आरक्षण गेलं, त्यावेळी आपण गप्प होता सुप्रियाताई, उगाच उलटसुलट प्रतिक्रिया देत आमच्या मराठा बांधवांच्या भावना भडकवू नका ही आपल्याला विनंती आहे.

  • चंद्रपूर वेकोली क्षेत्रात बदल्यांचा सपाटा आणि अधिकाऱ्यांची नाराजी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महिन्याभरापूर्वी वेकोली चंद्रपुर क्षेत्रात नव्या मुख्य महाप्रबंधक रुजू होताच त्यांनी बदलीचा सपाटा लावला आहे , मात्र दोन दिवसा अगोदार झालेल्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाला काही अधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.

     

    चंद्रपुर क्षेत्रातील शिवा प्रसाद, सचिन फुलझेले, निलाभ कुमार, पी.जी अश्विनी व व्हिक्टर कालाबंडी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे, नव्या मुख्य महाप्रबंधकांनी सध्या तरी अनेक अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली नाही, मात्र अचानक त्यांनी बदल्यांचा निर्णय घेतल्याने अधिकाऱ्यात नाराजीचा सूर उमटला आहे.

     

    कारण चंद्रपूर क्षेत्रात 3 उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र मुख्य महाप्रबंधक कार्यालय व दुर्गापूर उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली नाही, त्यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर मुख्य महाप्रबंधकांचे विशेष प्रेम आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

     

    मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील कार्मिक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून त्याठिकाणी कार्यरत आहे, अनेक महाप्रबंधक आजपर्यंत आले आणि गेले मात्र हे कार्मिक अधिकारी आजही कार्यालयातील खुर्चीला चिकटून बसले आहे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर त्या कार्मिक अधिकाऱ्यांची बदली होत आहे, एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की बदली च्या निर्णयात मोजक्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, या निर्णयामागे काहींनी महाप्रबंधक यांची दिशाभूल करीत आपल्या अधिकाऱ्यांना संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.

     

    अचानक झालेल्या या बदली सत्राने याचा सर्वात जास्त परिणाम कोळसा उत्पादनावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

  • भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यादरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – IPL नंतर क्रिकेट च्या महासंग्राम वर्ल्ड कप भारतात सुरू झाले असून आज 29 व्या मॅच मध्ये भारत विरुद्ध इंग्लड चा सामना लखनौ येथे खेळल्या गेला, भारताने 50 षटकात 229 धावा बनविल्या, मात्र या मॅच दरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

     

    वर्ल्ड कप 2023 च्या 29 व्या मॅच मध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड चा क्रिकेट सामना रंगला, या सामन्या दरम्यान चंद्रपुरातील नाहीसे झालेले सट्टेबाज पुन्हा परतले आहे, सामन्या दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला अशी माहिती मिळाली आहे.

     

    सध्या अंचलेश्वर गेट, महाकाली वॉर्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स, तुकुम, रामनगर, दादमहल, भिवापूर, जटपुरा गेट भागात सट्टे बाजानी आपले बस्तान मांडत सट्टे बाजीचा खेळ सुरू केला आहे, शहरातील विविध ठिकाणी 20 ते 50 मोबाईल ऍक्टिव्ह करीत सट्टेबाज आपलं नेटवर्क चालवीत आहे, या मध्ये अनेक राजकीय पदाधिकारी सुद्धा गुंतले आहे, सध्या सट्टा घेणारा व लावणारा हे आपसात व्हाट्सएपच्या माध्यमातून एकमेकांसोबत सम्पर्क साधत आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाईन वर तक्रारीचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर   – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या तक्रारी या पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन प्रशासनास प्राप्त व्हायच्या व त्याचे निराकरण व्हावयास ही वेळ लागायचा. मात्र प्रशासनाचे कामकाज गतिमान व्हावे या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेतुन २५ ऑक्टोबर रोजी चांदा सिटी हेल्पलाईन ॲपची सुरवात करण्यात आली होती.

     

    या कार्यप्रणालीनुसार इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड केल्यानंतर किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत संबंधित परिसर, विभाग, तक्रार पाठवणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावे लागते. याच तक्रारीत गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचे नाव व संपर्क क्रमांकांची प्रसिद्धी एसएमएस,फोन कॉल, ऑटो मायकिंग, सोशल मीडिया व इतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करून ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांपर्यंत हे क्रमांक पोचविण्यात आले आहे.
    या ॲपवर स्वच्छता,समाज कल्याण -दिव्यांग,महिला व बालकल्याण,रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, NULM, विद्युत व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोकाट जनावरे, बांधकाम,नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरीकांना तक्रार करता येते.तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

     

    अधिकारी स्तरावर तक्रार निश्चित दिवसात मार्गी लागली नाही तर हीच तक्रार पुढे टप्प्याटप्प्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रारींचे निराकरण कितपत झाले किंवा पेंडंसी आहे का ? याचा आढावा आयुक्तांद्वारे नियमित घेतला जात असल्याने संबंधित तक्रारी त्वरेने निकाली काढल्या जात आहेत.मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • नागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

    News34 chandrapur

    चंद्रपूर /जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

     

    ‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार महावितरणकडून ग्राहकसेवा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलामध्ये नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत या तत्पर सेवेचा जुने घर किंवा दुकानाच्या खरेदीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

     

    नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ मध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे व प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इन्व्हाईस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

     

    एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून ‘एसएमएस’ द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे. तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी लागेल.

     

    जागेच्या खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्या- जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     

    चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

     

    गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

     

    या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

    पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.