Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • कांग्रेसचा दणका आणि कंपनी संचालक उपोषण मंडपात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये कामगार,ड्रायव्हर,आपरेटर यांचेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांना पाठिंबा म्हणून काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका कांग्रेसच्या वतीने तहसीलदार डॉ .रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले.

     

    यामधे जय भवानी कामगार संघटना यांचेही सहकार्य लाभले. निवेदन देताच तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी तात्काळ कंपनी प्रशासनाला पत्र देऊन कामगारांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा असे आदेश दिल्याने सायंकाळी ५-३० वाजता कंपनीचे डायरेक्टर श्री.मनोज अग्रवाल व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णराव इंगळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार ,कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, युवक तालुका अध्यक्ष पवन नीलमवार माजी सभापती,संचालक घनश्याम येनुरकर यांचे उपस्थितीत मागण्या मान्य केल्याचे लेखी लिहून दिले व उपोषण मंडपात येऊन उपोषण करतांना उपविभागीय अधिकारी व कंपनी डायरेक्टर मनोज अग्रवाल यांनी पाणी पाजून उपोषण सोडविले.

     

    मान्य केलेल्या मागण्या. १) १ एप्रिल २०२४ पासून १० ते १८ टक्के पगार वाढ देण्यात येईल. २) पेमेंट स्लीप ४ तारखेपर्यंत दिले जाईल. ३) नियमानुसार देण्यात येईल. ४) वैद्यकीय सुविधेचा कार्ड कागद पत्र कंपनीला दील्याबरोबर देण्यात येईल. ५) फक्त ८ तासाचीच ड्युटी देण्यात येईल. ६) स्थानिकानाच प्राधान्य देण्यात येईल. ७) कामावरून कमी केलेल्यांना आवशकता भासल्यास रोटेशन पद्धतीने काम देण्यात येईल. ८) एका महिन्यात २६ दिवसाच्या वर काम केल्यास त्याचा पगार देण्यात येईल. ९) कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनी प्रशासनाला शिवीगाळ, दमदाटी करणार नाही. अशा स्वरूपात मागण्या मान्य करण्यात असल्याचे लेखी दिले आहे.

  • चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचाऱ्यांची 190 पदे रिक्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र या संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटदारामार्फत भरावयाची 190 सफाई कामगारांची पदे रिक्त असून मागील अडीच वर्षांपासून ही रिक्त पदे भरलेली नसल्याने रुग्णालयात स्वच्छतेच्या बाबतीत आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रुग्णांच्या आरोग्यावर याचा गंभीर दुष्परिणाम होत आहे.

     

    जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी याबाबत न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये जुलै 2021 मध्ये एक रीट याचिका दाखल केली होती. या रीट याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधिश पृथ्वीराज के. चव्हाण व उर्मिला जोशी-फाळके यांनी 5 ऑक्टोंबर 2023 रोजी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संचालक तसेच चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले. 3 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावली आहे. देशमुख यांच्यातर्फे अॅड. स्वप्नजीत संन्याल उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

     

    सविस्तर असे की महाराष्ट्रातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता शासन निर्णयानुसार सफाई कामगार, कक्षसेवक,सुरक्षा रक्षक,ऑपरेटर,वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक, स्वयंपाकी लिपिक इत्यादी काल्पनिक पदांवर दरवर्षी 11 महिन्यांकरिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते.राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मे 2020 मध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अशी 562 कंत्राटी पदे भरण्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत 190 सफाई कामगार व 45 सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.

     

    या मध्ये निवड झालेल्या कंत्राटदारांना 11 महिन्याचा विलंब करून एप्रिल 2021 मध्ये काम सुरू करण्याचे लेखी आदेश देण्यात आले. लेखी आदेश देताना 190 सफाई कामगार व 45 सुरक्षा रक्षकांच्या पदांची मंजुरी रद्द करण्यात आली. त्यासाठी अर्थ विभागाच्या एका जुन्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आला. एक महिन्यानंतर आपल्याच आदेशाला अंशतः केराची टोपली दाखवून सुरक्षा रक्षकांच्या 45 पदांना पुन्हा मंजूर देऊन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कोणतेही कारण लागू नसताना 190 सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचे टाळण्यात आले.

    कामगारांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची मनमानी ?

    कोविड आपत्तीमध्ये अत्यावश्यक बाब म्हणून प्रसंगी नियम बाजूला ठेवून निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने आरोग्य विभागाला दिले होते. मात्र कोविड सारख्या आपत्तीमध्ये एका शासन निर्णयाचा आपल्या सोयीने अर्थ लावून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 190 सफाई कामगारांची पदे रिक्त ठेवली. आज सुद्धा ही पदे रिक्त आहेत.

     

    वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. सात महिन्यांच्या थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या कामगारांनी संप पुकारल्याने त्यांच्या वचपा काढण्यासाठी सफाई कामगारांची 190 पदे रिक्त ठेवण्यात आली का ? याची चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिली.

  • चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयास औषधांसाठी निधी द्या – ब्रिजभूषण पाझारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

     

    ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

     

    गोरगरिबांचा आधार असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे अवघड शस्त्रक्रिया, तसेच चांगले उपचार दिले जातात, अशी या वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. रुग्णालय अधिक उत्तम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु औषधासाठीचा निधी शासनाने वाढवून दिला नसल्याचे चित्र आहे.

     

    परिणामी रुग्णासाठी लागणारे औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहेत. तरी याकडे तत्काळ लक्ष वेधून वैद्यकीय महाविद्यालयास औषधांकरिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चंद्रपूर महानगरातील शिष्ट मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारे, श्री रमेश जी राजुरकर विधानसभा प्रमुख वरोरा भाजयुमो अध्यक्ष श्री. विशाल निंबाळकर, महानगराचे मन की बात प्रमुख श्री. डॉ. दिपक भट्टाचार्य, श्री. पोद्दार, श्री. सतीश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  • SNDT महिला विद्यापीठात AI तंत्रज्ञानावर व्याख्यान

    News34 chandrapur

    बल्लारपूर – “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” हे भविष्यातील प्रत्येकाचे स्किल्स राहणार आहे आणि हे स्किल्स भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. एआय हे तंत्रज्ञान जग काबीज करेल सोबतच तरुणांना आकर्षित करेल असे मत डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी व्यक्त केले. ते एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आयोजित “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.

    एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर येथे फ्युचर स्किल्स – आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानाला मुख्य वक्ता म्हणून डॉ. गजेंद्र आसुटकर, उपप्राचार्य, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानसंकुलचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख उपस्थिती सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त  यांनी केले सोबतच आधुनिक काळात मानव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त कामगिरीने भारत जगात आपले नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून लाभलेले डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी एआय बद्दल सर्व विद्यार्थिनींना अवगत केले सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे आहे असे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

     

    आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात असे मत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले. भविष्यात असे नव-नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

     

    कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अश्विनी वाणी, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. श्रुतिका राऊत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून आता आंदोलक ओबीसी नेत्यांवर हल्ले करीत आहे, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली त्यांच्या घराची जाळपोळ आंदोलकांनी सुरू केली आहे, मात्र ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलक शांत आहे, सध्या मराठा आंदोलन चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम करीत आहे मात्र हे ओबीसी समाज सहन करणार नाही अशी परिस्थिती राहिली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल बैस यांना केली आहे.

     

    मराठा आरक्षणाबाबत राज्यातील अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या, तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर व प्रांतिक तैलिक महासभेचे युवा आघाडी अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार प्रकाश बंब यांच्या बंगला व वाहनाची जाळपोळ आंदोलकांनी केली हे अत्यंत चुकीचे आहे.

     

    ज्या जनप्रतिनिधींने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली त्यांच्या बंगला व वाहनांची जाळपोळ करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने तातडीने हा जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

     

    ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे याबाबत कसलाही विरोध केला नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका सुद्धा यावेळी तेली समाजाने मांडली आहे.

     

    सध्या आंदोलकांनी राज्यात हैदोस घातला असून मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचे काम यांच्यातर्फे सुरू आहे, हे आता थांबवायला हवे, अन्यथा शासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी. आंदोलकांची दडपशाही अशीच सुरू राहिली तर संपूर्ण मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, राज्यपाल रमेश बैस यांनी प्रभावीपणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महासभेचे प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे.

     

    निवेदन देताना महासभेचे प्रकाश देवतळे, अजय वैरागडे, निलेश बेलखेडे, राहुल क्षीरसागर, छबु वैरागडे, कल्पना बगुलकर उपस्थित होते.

  • आप पक्षाच्या बॅनरमुळे चंद्रपुरात 4 वर्षांनी गाजला 200 युनिटचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.

     

    मागील २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, ४ वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात २०० युनिट बाबत बॅनर लावले.

     

    त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली. शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना विजेचा जोरदार झटका बसला. करंट लागल्यागत अवस्था झालेल्या आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला. या बॅनरला महानगरपालिकेने काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला. मनपात जाऊन ठीय्या आंदोलन केले. व काढलेले बॅनर लावायची मागणी लाऊन धरली.

     

    आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. आमदारांनी केवळ भूलथापा दिल्या आहेत. नागरिकांमध्ये या घोषणेमुळे मोठी नाराजी पसरली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आमदाराच्या दबावात परवानगी घेतली असतानाही महानगरपालिकेने आमचे बॅनर काढून टाकले. आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. पोलीसाना पाचारण करण्यात आले.

    महानगरपालिकेचे अधिकारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत होते. या चर्चेअंती महानगरपालिकेने परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच दिलेली परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याची नामुष्की मनपावर आली आहे.

     

    यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे,संगठन मंत्री भिवराज सोनी,जिला सचिव संतोष दोरखंडे, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री,संतोष बोपचे,युवा अध्यक्ष प्रशांत सिदुरकर, शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, ऍड तब्बसूम शेख, दिपक बेरशेट्टीवार, शंकर सरदार, पवनकुमार प्रसाद, महेश नन्नावरे, अश्रफ सय्यद,गणेश आडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

  • MIDC कृष्णा फेरो अलाय कंपनीच्या विरोधात कामगारांचे आमरण उपोषण

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये मागील दोन तीन वर्षापासून काम करणाऱ्या कामगार, ड्रायव्हर,आपरेटर कडून अधिकचे काम करुन घेणे त्याचा मोबदला मागला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, पगारात कपात करणे इत्यादी अन्य मागण्या कंपनी प्रशासनाकडून होत नसल्याने संबंधित कामगार यांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेऊन तीन कामगार उपोषनाला बसले असून उर्वरित १८ कामगारांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला असून तेही सोबत उपोषणस्थळी बसले आहेत.

     

    कामगारांच्या उपोषणाला मुल शहर युवक काँग्रेसने अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा दिला असून उपोषण मंडपाला कांग्रेस नेते ,सी डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत व संचालक श्री. बनसोड, सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, तालुका युवक अध्यक्ष पवन निलमवार, महिला अध्यक्षा नलिनी आडपवार ,औद्योगिक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय समर्थ, माजी नगर सेविका लीनाताई फुलझेले, महिला पदाधिकारी शामला बेलसरे,राधिका बुक्कावार, गणेश गेडाम यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याशी चर्चा केली. आणि पाठिंम्बा देऊन न्याय मिळून देउ असे आस्वासन दिले आहे.

     

    उपोषण कर्ते कामगार राकेश वाकुडकर ,नितेश घोडे, महेश नेवारे हे आमरण उपोषण करणार असून त्यांना १८ कामगारांनी सोबत पाठिंबा दिला आहे.यामधे संतोष मेश्राम,लवकुष बांग्रे ,अमोल नेवारे ,सुनील बांबोळे, सोमेश्वर सरपते ,मनोज चुदरी ,सागर बेदले, रवी चौखुंडे, बासू कटलावार,आश्विन मडावी,बंडू चंभारे ,सूरज बावनवाडे ,सुदर्शन चौधरी,दशरथ ढोले, मंगेश मोहरले, प्रदीप शेंडे,श्रावण पेंदोर ,सूरज उईके यांनी आपला सहभाग पाठिंबा दर्शविला आहे.

     

    जो पर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य कंपनी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा इशारा उपोषण करते कामगार यांनी दिला असून जय भवानी कामगार संघटणेचा पाठिंबा जाहीर केला आहे.

  • चंद्रपुरातील महिलांनी तयार केले दिवाळीचे फराळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे.

    सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी ३ ते ७ नोव्हेंबर पर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे.

    शहरातील नागरिकांनी महिला स्वयंसाह्य बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याकरिता हातभार लावावा तसेच बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • जरांगे पाटील उपोषण मागे घ्या

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून ओबीसी समाजाच्या काही नेत्यांवर, त्यांच्या घरांवर जाळपोळीसह हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं सह्याद्री अतिथीगृहावर आज (ता. १ नोव्हेंबर) आयोजन केलं होतं. या बैठकीत सर्वानुमते एक ठरावही मंजूर करण्यात आला.

     

    मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे राज्यभर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन हिंसाचारामुळे चिघळताना दिसतंय. राज्यातील या स्थितीवर तोडगा काढण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

     

    या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावात सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. अशा घटना अयोग्य असून यामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर राज्यात कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवत शांतता राखायला हवी आणि याला मनोज – जरांगे पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं अशीही विनंती करण्यात आली आहे.
    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

     

    ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण देता येईल. राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामुळे थोडा संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा. सगळ्यांनीच थोडासा संयम बाळगावा, थोडा वेळ सरकारला द्यावा. ज्या कायदेशीर त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे. असंही या ठरावात नमूद करण्यात आलंय.

     

    दरम्यान, या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
    नेमकं हे आरक्षण कोणत्या धर्तीवर मिळेल आणि कायद्याच्या चौकटीत ते कसं बसेल? मराठ्यांना त्याचा कसा फायदा होईल, हे महत्त्वाचं आहे. ही सर्व एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी सरकारला वेळ लागणार आहे. हा वेळ सरकारला हवा आहे. यासाठी मनोज जरांगे – पाटील वेळच देत नाहीये. त्यामुळे सरकारची कुठे ना कुठे अडचण होतेय, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

    तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका मांडली. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला, परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

  • 200 युनिट ची थाप, आणि चर्चेत आली आप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. आता निवडून येऊन चार वर्षे पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जिल्हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

     

    हे फलक रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आले होते. तरीही महानगर पालिकेने बॅनर काढण्याची कारवाई केली. आमदाराचा दबावाखाली मनपा ने बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

     

    चंद्रपूर शहरांमध्ये दोनशे बॅनर लावण्यात आले असून सर्वत्र आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून 200 युनिटच्या आश्वासन फोल ठरल्यामुळे लक्ष वेधण्यात आले आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा जनतेला माफीनामा आणि पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात येईल.
    या बॅनरमुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.