Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • भाजप खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा भीषण अपघात

    News34 chandrapur

    गडचिरोली – गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला, सुदैवाने नेते या अपघातात बचावले.

     

    सकाळी 10 वाजताच्या सुमारास गडचिरोली मतदार संघाचे भाजप खासदार अशोक नेते हे नागपूर वरून गडचिरोली कडे जाण्यासाठी वाहन क्रमांक MH33AA9990 ने निघाले होते, पाचगाव जवळ पोहचल्यावर अचानक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले, आणि वाहन डिव्हायडरला जोरात धडकले.

     

    या धडकेत वाहनांचे एअर बॅग्स खुलल्याने खासदार नेते बचावले, वाहनात त्यांच्यासोबत असलेले इतर 4 जण सुखरूप असल्याची माहिती आहे.

     

  • मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका क्षमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तारेवरची कसरत सुरू असतानाच त्यांच्या मदतीला धावून आले ते देवेंद्र फडणवीस. मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी तीन मंत्र्यांसोबत दोन माजी न्यायमूर्ती देखील पोहोचले होते. या न्यायमूर्तींनी योग्य शिष्टाई करून उपोषण थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. माजी न्यायमूर्ती मारोती गायकवाड आणि दुसरे माजी न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांना उपोषणस्थळी जावे ही इच्छा फडणवीस यांनीच व्यक्त केली होती. फलस्वरूप उपोषण मागे घेण्यात त्यांना यश आलं.

     

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे – पाटील यांनी ९ दिवस अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत खालवली होती. परिणामी राज्यात मराठा आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचंही दिसून आलं. तसेच, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही या काळात घडल्या. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही नाजूक परिस्थिती हाताळणं काहीसं कठीण जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यातच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूच्या आजारामुळे बाजूला पडले होते. त्यांचं आजारपण राजकीय असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे.

     

    मात्र, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून आले ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनीच मराठा आरक्षणातील कायदेशीर गुंता आणि तो सोडवण्यासाठी लागणारा वेळ ही महत्त्वाची माहिती जरांगे – पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे-पाटील यांच्या काही मागण्यांना उत्तर देणे सरकारला शक्य नव्हते.

     

    अशावेळी कायदेशीर बाबींचा गुंता सोडविण्याचे काम कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींनीच केले तर ते सयुक्तिक ठरेल, असा विचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला. न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते. तर दुसरे माजी न्या. सुनिल शुक्रे हे अलीकडेच उच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. या दोघांचीही नावं जरांगे – पाटील यांच्याकडे जाण्यासाठी पुढे आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही कल्पना लागलीच उचलून धरली. या दोन्ही न्यायमूर्तींनी अतिशय योग्यप्रकारे विषयांची मांडणी जरांगे – पाटील यांच्यासमोर केली. सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ तयार करण्यात आले होते, त्यातल्या मंत्र्यांनीही जरांगेंकडे या माजी न्यायमूर्तींंचं म्हणणं ऐकण्याची विनंती केली. अखेर त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

     

    ‘टार्गेट’ असूनही फडणवीसांची महत्त्वाची भूमिका
    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतः जरांगे – पाटील यांनी फडणवीसांवर आरोप करत यथेच्छ टीका केली होती. तसेच, त्यांच्याविरोधात अरे-तुरेची एकेरी भाषा देखील वापरली होती. आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे सरकारमध्ये फडणवीसच थेट टार्गेट झाले होते. मात्र, याचा कोणताही विशाद मनात न ठेवता आणि राज्यात कायदा – सुव्यवस्था राखत त्यांनी आंदोलन हाताळलं. याहीवेळी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने धीर देण्यात फडणवीस यशस्वी झाले.

     

    ‘संकटमोचक’ ही जुनी ओळख

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते. त्यावेळीही ते आंदोलन त्यांनी शिताफीने हाताळले होते. मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांनी आरक्षण देण्याचा निर्णयच तेव्हा जाहीर केला. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात टिकले होता. मात्र, फडणवीसांनंतरच्या सरकारने सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू नीट न मांडल्याने हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण त्यावेळी आंदोलन योग्यरितीने हातळत फडणवीसांनी ‘संकटमोचका’ची भूमिका बजावली होती. त्यावेळची कौशल्य त्यांनी यावेळी देखील वापरल्याने राज्यात आंदोलनाचा उडालेला भडका क्षमवण्यात सरकारला यश आलं.

  • महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर/नागपूर – 28 ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे ची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, माजी आमदार चरण वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन उमाटे, विभागीय पदाधिकारी नंदकिशोर दंडारे, वैभव गोल्लर, विनायकराव तुपकर, महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, वंदना वनकर, प्रज्ञा बडवाईक, रमेश पिसे, किष्णाजी बेले, छबू वैरागडे, राजेंद्र झाडे, नयना झाडे, पुष्कर डांगरे व सर्व नागपूर विभागातील, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तथा जिल्यातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

     

    संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या बैठकी प्रसंगी नुकतेच भारताचे प्रतिनिधित्व करून तीन सुवर्ण पदक प्राप्त करणारे ओजस देवतळे यांच्या परिवाराला सन्मानित करण्यात आले, नागपूर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला, नागपूर विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग उल्हास नरळ साहेब यांचाही सत्कार करण्यात आला व बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. यावर विचारमंथन करण्यात आले, सोबतच भविष्यात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाचे किमान ४ खासदार व 15 आमदारांना सर्वपक्षीय प्रतिनिधित्व मिळावे याकरिता सर्व तेली बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले तेली माहाराष्ट्र तेल घाना महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

     

    समाज हा विदर्भात फार मोठ्या संख्येने आहे येणाऱ्या काळात ओबीसीं आरक्षणासह प्रतिनिधित्वाला जर धक्का लागला तर तेली समाज एक ओबीसीच्या घटक म्हणून राज्यभर रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करतील इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर मंथन करण्यात आले याप्रसंगी नागपूर विभागातील 200 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त करण्यात आल्या या बैठकीला नागपूर विभागातील ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते.

    चंद्रपुरात तेली समाज बांधवांची संख्या मोठया प्रमाणावर असून समाजात संघटनेविषयी जनजागृती व पदाधिकारी विस्तार व्हावा यासाठी चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांच्याकडे देण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी केले तर संचालक नागपूर जिल्हा अध्यक्ष पुष्कर डांगरे व माधुरी तलमले यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले.

     

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागपूर कार्याध्यक्ष राजेश बारुतकर, रुपेश कुबडे, राजेश काळबांडे, विजय पाटील, अरुण तडस, राम जुमळे, गणेश वासुरकर, संकुल शहारे, आकाश लेंडे, दत्तु जीभकाटे, शालिनी तेलरांदे, मंगला महाजन, मंगला मस्के, निशा हटवार, जयश्री गभने, किरण बारई इत्यादी नागपूर विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे घुग्घुस येथील 160 कुटुंबाचे होणार पुनर्वसन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वेकोलिच्या खाणींमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या घुग्गुस येथील १६० कुटुंबाचे नवीन जागेवर पुनर्वसन होणार आहे. या कुटुंबीयांना निवाऱ्यासह सर्व मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन जागेवर या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार हे सुरुवातीपासूनच आग्रही होते. याबाबत त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी गजानन मडावी यांचे घर भूस्खलनामुळे ६० ते ७० फूट जमिनीत गेले. या घटनेची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. वेकोलिच्या खाणींमुळे परिसरातील इतर १६० घरांनासुध्दा भूस्खलनाचा धोका असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासूनच या सर्व कुटुंबांचे इतर जागेवर पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

     

    त्यानुसार मौजा घुग्गुस येथील शासकीय जमीन स.न. २९/१, आराजी ५९.४७ हे. आर. जागेपैकी २.४० हे. आर. (६ एकर) जागा या १६० कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांचे योग्य पुनर्वसनाकरीता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३०, ३१ व ४० आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ४२ (१) (अ) व नियम ४५ अन्वये घुग्गुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

     

    दहा दिवसांच्या आत पीडितांच्या हातात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे चेक

    घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेऊन घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ १० हजार रुपये देण्यात येईल, असा शब्द पीडित कुटुंबाना दिला होता. भूस्खलनाच्या दुर्घटनेप्रकरणी बाधित झालेल्या १६० कुटुंबांसाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी केवळ दहा दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. सदर रक्कम जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आली व मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला १० हजार रुपये याप्रमाणे १६ लक्ष रुपये तातडीने वाटप करण्यात आले होते.

  • चंद्रपूर मनपाची हद्दवाढ, ही गावे होणार समाविष्ट

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर भूमिपुत्र युवा संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात चंद्रपूर शहराभोवतीच्या 13 किलोमीटर अंतरातील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही या प्रस्तावावर आक्षेप घेतो, असे संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना 2011 मध्ये झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या आणि वस्ती समाविष्ट करण्यात आली होती. आता स्थापनेच्या 12 वर्षांनी महापालिकेची हद्द वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा आणि मोठ्या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावावर आक्षेप घेण्यात येत आहे.

    पूर्वीपासून समाविष्ट असलेल्या प्रभागाचा सर्व परीने विकास करावा. आताच मनपा क्षेत्रात पाण्याची समस्या जटील आहे. रस्ते बरोबर नाही. मग हद्द वाढवून काय होईल. सध्या पूर्वीपासून समाविष्ट भागातच विकास होऊ द्या. नागरिकांना सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळू द्या, असे चोखारे यांनी म्हटले आहे.

    चंद्रपूर शहराचा विकास हा सर्वांगीण असावा, यासाठी मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा समावेश करण्यात यावा. यामुळे शहराचा विकास होईल आणि शहरातील रहिवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतील. जवळच्या इतर गावांचा समावेश न करता मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करून ही हद्द वाढ करणे म्हणजे जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यासारखे आहे. त्यामुळे मनपापासून जवळपास असलेली सर्व गावे यात समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा समावेश करू नये, अशी विनंती चोखारे यांनी केली आहे.

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

    News34 chandrapur

    मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.

     

    यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, राष्ट्रीय गोकुळ मिशनचे सहआयुक्त डॉ. भूषण त्यागी, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     

    यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन दुग्धविकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

     

    उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेण्यात येईल.तसेच यातून 3,30,000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राज्य सरकार यासाठी निधी देणार आहे.

     

    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतील.

    तसेच यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

  • लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीचा मुद्दा पोहचला उद्योगमंत्र्यांच्या दालनात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, उसगाव आणि वडा या गावांमध्ये असलेल्या लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीने CSR फंडातून खर्च केलेल्या सन 2013 पासून आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची चौकशी होणार आहे. याबाबत चंद्रपूरचे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी निवेदन दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कंपनीने वर्षातून चार वेळा कंपनीच्या माध्यमातून प्रदूषणग्रस्त लोकाकरीता आरोग्य शिबिर लावायला पाहिजे होते. परंतु तशी कुठलीही प्रक्रिया किंवा योजना कंपनीमार्फत राबविली जात नाही. तसेच कंपनीद्वारे अनेक प्रकारचे नियम धाब्यावर बसून कामगारांचे शोषण केले जात आहे.

     

    याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील दिनेश चोखारे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

     

    मंत्री सामंत यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीमध्ये प्रदूषण, कामगार शोषण यासह इतरही बाबींचा समावेश असेल.

    या चौकशीनंतर कंपनीवर कोणती कारवाई होते हे पाहावे लागेल.

  • ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे. बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही.या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अश्यात जिल्हात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.तेलंगनाला लागून असलेला या भागात ” अब की बार, किसान सरकार ” नारा गुंजू लागला.

     

    विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे.रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार ? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिला आहे.सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे,माधुरी आंबेकर,विजय हजारे,कपिल धेटे,रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    काय लिहिलं शपथ पत्रात..

    उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली.गावात पाण्याची समस्या आहे.ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

  • आमदार धानोरकर यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार 3 नोव्हेम्बरला सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यलयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून ठिय्या आंदोलन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात हुकूमशाही सरकारच्या निषेध केला.

    जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

     

    महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

    ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.

    धानोरकर यांच्या या मागणीला कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आमदार धानोरकर यांनी बेधडक आंदोलन करीत वरोरा वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

  • हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने 18 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे

    News34 chandrapur

    कोरपना – आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून करण्यात येणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मध्यस्थी नंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मागे घेतले.

    कंपनी संदर्भात बारा मागण्या उपस्थित करून सदर उपोषण सुरू होते.यातच काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता तुर्तास मायनिग बंद करून लवकरच समोपचाराने कंपनी व प्रकल्पग्रस्त यांची समन्वय बैठक लावून न्याय मागण्या सोडवण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.

     

    याप्रसंगी माजी आमदार अड संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन निमकर , तहसीलदार पी एस व्हटकर , पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, खुशाल बोंडे , किशोर बावणे , भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शिवाजी सेलोकर , राजू घरोटे , अमोल आसेकर,दिनेश खडसे आदी उपस्थित होते.