Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • व्हिडीओ टाकून कुणी असं येत का ? देवेंद्र फडणवीस

    News34 chandrapur

    मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला कार्यकाळ पूर्ण करतील, आगामी निवडणूका त्यांच्या नेतृत्वाखाली होणार, मी पुन्हा येईन, एखादा व्हिडीओ असा टाकला तर कुणी व्हिडीओ टाकून असं येत का अशी स्पष्ट प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

     

    राज्याच्या विकासाकरिता आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहो, ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली.

     

    ट्वीटर आलेल्या त्या व्हिडीओ बाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की एखाद्याला यायचं असेल तर ते व्हिडीओ टाकून येतात काय? एखाद्या व्हिडिओचा असा वेगळा अर्थ लावणे हा वेडेपणा आहे.

  • चंद्रपुरात वाढते अपघात, प्रशासन “टक्केवारीत” खुश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना वाढल्या आहे, विशेषतः चंद्रपूर शहरात सातत्याने अपघात होत आहे, यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात आहे. मात्र प्रशासन कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही, उलट मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाताची टक्केवारी घटल्याचे सांगून आरटीओसह संबधीत प्रशासन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी शहरातील अतिक्रमण काढण्यास अन्य उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, औद्योगिकीकरण असल्याने जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण ही जास्तच आहे, मागील काही दिवसांपासून महामार्गावर नव्हे तर शहरात अपघाताची मालिका सुरू झाली आहे, मागील आठवड्यात आठ वर्षीय बालकासह अपघातात 7 जणांना आपला जीव गमावला लागला, त्यापूर्वी एका शिक्षीकेसह अन्य नागरिकांना बळी गेला आहे. ही चिंताजनक बाब आहे, मात्र यावर आजही प्रशासनाने नियंत्रण आणलेले नाही. विशेष म्हणजे 27 ऑक्टोबर ला शहरातील रहमतनगर येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला, त्या मुलाचा अपघात पोलिसांच्या वाहनामुळेच झाला.

     

    अपघाताबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली, त्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट वर्ष 2023 या कालावधीत 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांनी अपघातात आपला जीव गमावन्याचे शासन दरबार नोंद आहे.

    या अपघातात दुचाकी अपघातांची संख्या 275 असून यामध्ये 129 जणांचा मृत्यू झाला, बैठकीत नियमाबद्दल चर्चा करण्यात आली होती मात्र ते नियम प्रत्यक्षात लागू झालेच नाही.
    महामार्गावर अनेक अपघात होत असतात मात्र आता चंद्रपूर शहरात अपघातात वाढ झाली आहे.

     

    4 सप्टेंबर 2023 ला चंद्रपुरातील बापट नगरमध्ये झालेल्या अपघातात शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला. त्याचदिवशी सायंकाळी 2 अपघातात दोघांनी आपला जीव गमावला. त्यांनतर ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ झालेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला, सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे. त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे.

     

    अतिक्रमनात झपाट्याने वाढ

    चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी रस्त्यावर आपला कब्जा केला आहे, एरवी रस्त्याच्या कडेला सामान्य नागरिकांनि दुचाकी वाहन लावले तर तात्काळ वाहतूक विभाग वाहन उचलून नेतात. मात्र चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील असलेल्या दुचाकी वाहनांच्या शोरूमसह अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. एवढेच काय तर अर्धा अधिक रस्त्यावर नवीन दुचाकी, चारचाकी वाहने विक्रिसाठी ठेवल्या आहे. मात्र वाहतूक पोलिसांसह अन्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामागे आर्थिक कारण दडले असल्याचे बोलल्या जात आहे.
    अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली मात्र कोणताही उपयोग झाला नाही.

    प्रशासनाने स्वतः थोपटली आपली पाठ

    मागच्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या कमी असून मृतकाचा आकडा सुद्धा कमी आहे, उलट 30 टक्के नागरिक यंदा वाचले, मृतकाच्या आकड्यात 30 टक्क्यांची कमी आली असे अधिकारी ताठ मानेने सांगत आहे, ही टक्केवारी कमी असली तरी निष्पाप नागरिकांचा बळी तर जात आहे ना?  मृतकाची संख्या 30 टक्क्यांनी कमी असली तर तो आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी कुणाची आहे? याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवायला हवं. प्रशासन सध्या मागील वर्षीच्या तुलनेत “टक्केवारी” कमी झाल्याचे सांगून खुश असल्याचे दिसत आहे.

     

    अधिकाऱ्यांचा संवेदनशीलपणा संपला

    यंदा मृतक कमी आहे असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबांच्या घरी एकदा डोकावून बघावं.ज्यांच्या घरचा कमावता पुरुष दुचाकी अपघातात ठार झाला, एक आठ वर्षाचा मुलगा अपघातात गेला, 3 दिवसांनी त्याच्या वडिलांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला, यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायलाच हवं.

    कारवाई कुणावर?

    शहरात अक्षरशः स्टंट करणारे दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. शहरात झालेल्या अपघाताला जबाबदार हे स्टंट करणारे दुचाकीस्वारचं आहे, मात्र हे वाहतूक पोलिसांच्या हाती कधी लागत नाही, आजही शहरात ट्रिपल सिट ने अल्पवयीन बालक प्रवास करतात, त्यांच्यावर कारवाई नाही, इतकेच नव्हे तर शहरात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी आहे? ट्रिपल सिट व स्टंट करणारे दुचाकी स्वार त्या कॅमेऱ्यात कैद होत नाही काय? हा प्रश्न आहे.

     

    वाहतूक विभागात इतिहास

    चंद्रपूरच्या इतिहासात चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत पहिल्यांदाच 2 पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली असली तरी चंद्रपुरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहे.

     

    विशेष म्हणजे वाहतूक विभागाच्या बाजूलाचं अवैध ट्रॅव्हल्स स्टॅण्ड लागले आहे, तत्कालिन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी वाहतूक विभागाच्या बाजूला असलेले ट्रॅव्हल्स स्टॅण्ड बंद केले होते, त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी सुद्धा त्या आदेशाचा मान राखत स्टॅण्ड बंद केले, मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

     

    सध्याचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची पोलिस प्रशासनावर पकड ढिली होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. त्यामुळेच शहरात वाहतूक अनियंत्रित होत असल्याचेही बोलल्या जात आहे. लहान सहान कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या पोलीस अधीक्षकांना शहरातील अपघात कसे काय दिसत नाही, हा प्रश्नच आहे.

    शहरातील सिग्नल ची अवस्था काय?

    शहरातील अति वर्दळीचा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील सिग्नल व कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शोभेची वास्तू ठरत आहे, नागरिक 12 सेकंद पूर्वी सिग्नल तोडून जातात, यामध्ये कर्मचाऱ्याचा दोष नसला तरी चौकात लागलेले कॅमेरे त्या नियमभंग करणाऱ्या नागरिकांना टिपत नसतील का?

    चंद्रपूर नागपूर मार्गावर बापट नगर येथे सुरू करण्यात आलेला सिग्नल आधी सतत सुरू होता त्यांनतर काही दिवसांनी तो बंद झाला, विद्या निकेतन शाळेसमोर अपघात घडला, त्या अपघातात दोघांनी आपला जीव गमावल्यावर तो सिग्नल पुन्हा सुरू झाला.

     

    सामान्यांचा अंत बघू नका

    शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निष्पाप बळी जात आहे आणि प्रशासन मात्र उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी आता सामान्य नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • चंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (२९) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर शहरात आठवडाभरात 7 मृत्यू झाले आहे.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रणील हा दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीजे ७८२० या क्रमांकाच्या दुचाकीने बिनबा गेटकडून सिस्टरकॉलनीकडे येत होता. तर शहर पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच ३४/६०६६ हे सिस्टरकॉलनीकडून बिनबागेटमार्गे शहर पोलीस ठाण्याकडे जात होते.

     

    रहेमतनगर येथील मस्जिदजवळ समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून प्रणील पुढे जाण्यासाठी निघाला. एवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने प्रणीलने ब्रेक मारले. त्यामुळे गाडी घसरून प्रणील हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर पोलिसांच्या वाहनाच्या मागील चाकात आला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

     

    दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठीगर्दी केली. त्यामुळे या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक फाल्गून घोडमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मृतक प्रणील हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • रमाई घरकुल, इंदिरा आवास व शबरी घरकुल योजनेच्या निधी पाच लाख रुपये करण्यात यावे – कांग्रेसची मागणी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल:- महाराष्ट्र शासनाने कित्येक वर्षापासून रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजनांचे शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्याच पद्धतीने दिले जात असून वाढती महागाई,मजुरीचे दर लक्षात न घेता केवळ १५००००/- (दीड लाख रुपये) दिल्या जात आहे.

     

    परंतु हा निधी घरकुलाच्या पाया बनवण्यातच खर्च होत असल्याने घर बांधकाम करण्यासाठी घरकुल लाभार्थ्याला कर्ज काढून घर बांधावे लागत. परंतु गरिबीमुळे त्याला कर्ज फेडता येत नाही अशी अवस्था घरकुल लाभार्थ्याची झाली आहे. घरकुलाच्या निधीत पाच लाख रुपये ५०००००/-(पाच लाख रुपये) करण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेसद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे मुल तहसीलदार यांचे मार्फत करण्यात आली.रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना या सर्व योजनांचे अनुदान निधी महाराष्ट्र राज्य शासनाकडून मागील कित्येक वर्षापासून १५००००/-(एक लाख पन्नास हजार रुपये) मिळत आहे.

     

    रेती, सिमेंट, विटा, लोहा व मजुरी याचे भाव कमी असताना या तुटपुंज्या अनुदानात लाभार्थी कसेबसे घर बांधत होते. परंतु आता महागाईचा भडका कितीतरी पटीने वाढलेला असून गरीब लाभार्थ्यांना निव्वळ दीड लाख रुपये अनुदानात घर बांधणे कठीण झालेले आहे. आजच्या काळात रेती, सिमेंट, विटा, लोहा व मजुरीचे दर लाभार्थ्यांना परवडेनासे झाले आहे. अशातच घरकुल मंजूर करणे, बिले काढणे, बिलांसाठी तालुका कचेरीवर चकरा मारणे यामध्येही गरीब लाभार्थ्याला पैसे द्यावे लागते.

     

    काही संबंधित अधिकारी व पदाधिकारी आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय बिले काढत नाही. याचाही फटका गरीब लाभार्थ्यांना बसतो. त्यामुळे आजच्या महागाईच्या दृष्टिकोनातून विचार करता शासनाने घरकुलाच्या लाभार्थ्यांना ५०००००/- (पाच लाख रुपये) अनुदान द्यावे जेणेकरून एक छोटसं घर गरीब लाभार्थ्यांना बांधता येईल. या मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले. सदर मागणीची तात्काळ शासकीय व प्रशासकीय स्तरावरून दखल घेऊन पाठपुरावा करावा व ५०००००/- (पाच लाख रुपये)निधी मंजूर करावा. जर सदर मागणी मान्य झाली नाही तर शासनाला व प्रशासनाला यासंबंधी जाग येण्यासाठी काँग्रेस कडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला.

     

    निवेदनाच्या प्रती राज्याचे विरोधी पक्षनेते नाम.विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे पालक मंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना देण्यात आले. निवेदन देताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास गुरगुले, प्रशांत उराडे युवक काँग्रेस,ओबीसी सेल काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक पाटील वाढई, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन नीलमवार, धनराज रामटेके,गुरुदास चौधरी,किशोर पेंदाम, विक्रम गुरनूले,शाम पुठ्ठावार कथा काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • वाघाच्या मृत्यूसंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली महत्वाची बैठक

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर – विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले.

     

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सांगितले.

     

    यावेळी वनमंत्री यांनी वन विकास महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेऊन ही कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    या बैठकीस प्रधान सचिव (वने) श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली श्री. रमेश कुमार इ. अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

  • चंद्रपुरात एका आठवड्यात काढले 60 हजार 494 नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा हा 1209 उपचार/शस्त्रक्रिया करता देण्यात येतो. या योजनेंतर्गत देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून मागील सात दिवसांत तब्बल 60494 नागरिकांचे आयुष्मान कार्ड तर आतापर्यंत एकूण 4 लक्ष 6 हजार 239 जणांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे.

     

    आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक यांच्या विशेष सहभागाने आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. आरोग्य विभागामार्फतसुध्दा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, तालुका समुह संघटक, डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर कर्मचा-यांचा तसेच उमेद अंतर्गत बचत गटाचे सहकार्य आयुष्मान कार्ड काढण्याकरीता घेण्यात येत आहे. पात्र लाभार्थी हे मोबाईल ॲपच्या सहाय्याने स्वत:चे आयुष्मान कार्ड काढू शकतात. त्यामुळे त्यांनी सुध्दा या मोहिमेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

     

    आयुष्मान कार्ड स्वतः काढण्याची पद्धत :
    Weblink- https://beneficiary.nha.gov.in आणि मोबाईल मध्ये ‘Ayushman App’च्या सहाय्यतेने पात्र लाभार्थी स्वत:चे किंवा इतर पात्र लाभार्थी व्यक्तीचे ‘आयुष्मान कार्ड’ काढू शकतो. या करीता, लाभार्थी जवळ Android 9.0 version किंवा त्यापेक्षा अधिक version मोबाईल असणे आवशक आहे. सुरवातीला मोबाईल मध्ये Google Play Store मधून ‘Ayushman App’ download व Install करणे गरजेचे आहे. त्यानंतर Adhar Face Rd App Install करावे. ‘Ayushman App’ मध्ये “Beneficiary” लॉगीन पर्यायाची निवड करावी. Mobile OTP च्या सहाय्याने लॉगीन करावे. तदनंतर, Search पर्यायामध्ये नाव, आधार कार्ड क्रमांक आणि राशन कार्ड online ID(RCID) द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. यानंतर पात्र लाभार्थी यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकवर OTP किंवा फेस ऑथ (लाभार्थी यांचा मोबाईल द्वारे फोटो) च्या माध्यमातून पूर्ण करता येते. याबाबत अधिक माहिती करीता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांचाशी संपर्क साधावा.

     

    आयुष्मान कार्ड कोण काढू शकते : आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका, योजनेच्या अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वत: लाभार्थी.

     

    आयुष्मान कार्डचे लाभ : प्रति वर्ष प्रति कुटुंब 5 लक्ष रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा मोफत, 1209 उपचार / शस्त्रक्रियांचा समावेश, देशातील अंगिकृत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांचा समावेश

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील अंगिकृत रुग्णालये :

     

    चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मूल, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, मूल रोड चंद्रपूर आणि मुसळे रुग्णालय, बसस्थानक मागे चंद्रपूर.

  • चंद्रपुरात ठोक व्यापाऱ्यांची चिल्लर विक्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दाताळा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला यार्डमधील ठोक व्यापाऱ्यांकडून आवारात किरकोळ विक्री केली जात असल्याने शहरातील अनेक ग्राहक स्वस्त भाजीपाल्यासाठी कृउबासच्या भाजीपाला यार्डमध्ये येतात. याचा परिणाम शहरातील गंजवार्ड आणि गोलबाजारातील भाजीविक्रेत्यांवर होत असून, या दोन्ही बाजारात ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने विक्रेत्यांची उपासमार होत आहे.

     

    दहा दिवसात कृउबासच्या भाजीपाला यार्डमधून किरकोळ भाजीपाला विक्री थांबविण्यात यावी, अन्यथा भाजीपाला यार्ड प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा किरकोळ भाजीपाला व्यावसायिकांसह हिमायू अली यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
    दाताळा मार्गावर कृउबासचे मोठे भाजीपाला मार्केट आहे. दूरवरून तसेच अन्य जिल्ह्यातून व राज्यातून येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला जातो. हा भाजीपाला किरकोळ विक्रेते खरेदी करून गोलबाजार, गंजवार्ड, बंगाली कॅम्प, तुकूम येथील भाजीबाजारात ग्राहकांना विकतात.

     

    भाजीपाला यार्डमधील मोठ्या व्यापाऱ्यांना किरकोळ विक्रीची परवानगी नसतानाही अनेक व्यापारी स्वत:च्या हमालांमार्फत येथे किरकोळ विक्री केली जात आहे. त्यामुळे शहरातील ग्राहक स्वस्त भाजीपाला मिळण्याच्या अपेक्षेने भाजीपाला यार्डमधून भाजीपाला खरेदी करीत आहे. त्यामुळे गंजवार्ड, गोलबाजार व अन्य बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीची घटली आहे. याचा परिणाम येथील किरकोळ व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर व्यावसायिकांच्या डोक्यावर वाढत आहे. याच कर्जबाजारीतून दोन व्यावसायिकांनी आपले जीवन संपविल्याचा आरोप यावेळी किरकोळ व्यावसायिकांनी केला आहे.

     

    यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला यार्डमध्ये भाजीपाला विक्रीस विरोध केला होता. यानंतर काही महिने किरकोळ भाजीविक्री बंद करण्यात आली. तसा फलकही प्रवेशद्वारावर लावण्यात आला. मात्र, यानंतर पूर्ववत भाजी यार्डमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री केली जात आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी कृउबासच्या पदाधिकाऱ्यांसह काही व्यापाऱ्यांना नोटीस पाठविली. परंतु, भाजीयार्डमध्ये किरकोळ विक्री होत नसल्याची दिशाभूल करणारे उत्तर या नोटीसला देण्यात आले.

     

    कृउबासच्या यार्डमधील किरकोळ विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा हिमायू अली यांच्यासह गंजवार्ड येथील भाजीपाला व्यावसायिकांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला गंजवार्ड येथील भाजीविक्रेता उपबाजार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम साखरकर, शिल्पा कांबळे, अर्चना खोब्रागडे, विरेंदर सिंग, शंकर दानव व अन्य भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.

  • देवेंद्र फडणवीस होते म्हणून आज हे शक्य झालं अन्यथा – राधाकृष्ण विखे पाटील

    News34 chandrapur

    अहमदनगर – मागील 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरणाच्या कार्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आज या प्रकल्पाचे उदघाटन होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राधाकृष्ण विखे पाटील फडणवीस यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या प्रकल्पाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.

     

    कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले.

    गेल्या ५३ वर्षापासून रखडलेला आणि ८ कोटीहून सुरू झालेला प्रकल्प आज ५ हजार कोटीवर गेला. पण तरीही या प्रकल्पाच्या सुधारीत खर्चाला मान्यता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आली होती.

     

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच निळवंडे धरणाच्या या महत्वपुर्ण प्रकल्पाला गती मिळाली. नाहीतर अजूनही १०-१५ वर्ष अजून हे काम झालेच नसते.

  • दिव्यांग मॉडेल विराली मोदी प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला

    News34 chandrapur

    मुंबई – 16 ऑक्टोबर ला विवाह नोंदणी कार्यालयात गेलेल्या दिव्यांग मॉडेल विराली दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पर्याय नसल्याने विवाहात विघ्न निर्माण झाले होते, मात्र विराली ने ट्विट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत तक्रार दिली, फडणवीसांच्या एका कॉल ने प्रशासन हादरले, व नम्रपणे विराली ची माफी मागत भविष्यात असा त्रास होऊ नये असे आश्वासन सुद्धा दिले. त्यानंतर फडणवीसांनी आपला शब्द पाळत त्या प्रकरणात एका अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

     

    16 ऑक्टोबर ला मुंबई येथील खार स्थित विवाह नोंदणी कार्यालयात मॉडेल विराली मोदी व्हिल चेअर वर पोहचल्या, मात्र नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने कार्यालयात जाण्यासाठी कसलाही पर्याय नव्हता, कार्यालयातील विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर यांना या समस्येबाबत अवगत केले, व सही घेण्यासाठी आपण खाली यावे अशी विनंती केली, मात्र निष्ठुर मनाच्या अधिकाऱ्यांनी खाली येणे टाळल्याने विराली च्या विवाहात अडचण निर्माण झाली.

     

    त्यावेळी विराली ने X वर ट्विट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विवाहात होत असलेल्या समस्येबाबत तक्रार केली, जनप्रतिनिधीं व्यस्त जीवनात कसा तत्पर असतो याचं उदाहरण फडणवीस यांनी देत तात्काळ विराली च्या ट्विट वर उत्तर देत त्यांची माफी मागितली व आपली समस्या दूर करू असे आश्वासन दिले.

     

    त्यांनतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॉल ने विवाह नोंदणी कार्यालय हादरले व तात्काळ विराली ची समस्या दूर करीत त्यांचा विवाह पार पाडला, विवाह झाल्यावर विराली ने लग्नाचे फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट द्वारे पाठवीत त्यांचे आभार मानले.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराली चे अभिनंदन करीत आपल्याला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागत भविष्यात कुणासोबत असा प्रसंग घडणार नाही असा शब्द देत मी स्वतः याप्रकरणी लक्ष घालेल असे आश्वाशीत केले.

    उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला शब्द पाळत विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर याला निलंबित केले. हळवा व नागरिकांच्या समस्येची जाणीव करणाऱ्या फडणवीस यांनी उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा असे उदाहरण समाजापुढे दिले आहे, फडणवीस यांच्या भावनिक व नागरिकांच्या समस्येची जाणीव असलेल्या या कार्याने समाजमाध्यमातून फडणवीस यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मरतोय, प्रशासन कुठंय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  आर सी सी पी एल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व विविध मागण्यासाठी कोरपना तालुक्यातील परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी दिनांक १६ ऑक्टोबर पासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

    या उपोषणाला दहा दिवस उलटून ही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या अद्याप ही पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तात असंतोषाचे वातावरण असून उपोषणकर्त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.

    RCCPL सिमेंट कंपनीकडून लिजं क्षेत्रातील संपूर्ण ७५६.१४ हेक्टर जमीन सरसकट भूसंपादित करावी, प्रकल्पग्रस्तांना प्रती एकर पन्नास लाख रुपये व एक सातबारा एक नोकरी द्यावी , परसोडा गावाच्या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, दलाला मार्फत करण्यात येणारी खरेदी त्वरित थांबवण्यात यावी,

     

    परसोडा व कोठोडा बु या दोन्ही ग्रामपंचायतीच्या नव्याने एनओसी घेण्यात याव्या, कंपनी परिसरातील स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, परसोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची कंपनी वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील पायमल्ली करणारे कंपनी अधिकारी व जबाबदार प्रशासन यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतच्या सूचित करण्यात आलेल्या विषयाच कंपनीने काटेकोरपणे पालन करावे या मागण्या कंपनी व प्रशासनाकडे प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहे. या उपोषणाला आतापर्यंत विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.