Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

     

    विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

     

    गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.

     

    दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.

  • नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

     

    19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर हल्ला करीत ठार केले.

     

    त्या घटनेनंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम होती, रामाळा-वैरागड या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांचा ती वाघीण पाठलाग करीत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे तो मार्गच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वनविभाग त्या वाघिणीवर लक्ष ठेवून होता.

     

    T13 या वाघिणीमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना सोबत भविष्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढू नये यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानगीने वनविभागाने आरमोरी वनपरिक्षेत्र मुल्लूर चक गावातील झुडपी जंगलात 23 ऑक्टोबर ला डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर, TATR चे शूटर अजय मराठे व RRT सदस्य यांनी वाघिणीला डार्ट करीत बेशुद्ध करून वाघिणीला जेरबंद केले.

     

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यावर तिला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

     

    सदरची यशस्वी कारवाई वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, संदीप भारती, पवनकुमार जोंगा यांच्या उपस्थितीत RRT गडचिरोलीचे दीपक टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाडगुरे, निकेश शेंद्र, मनन शेख यांनी केली.

     

     

  • ओबीसी व मराठा आरक्षण बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान

    News34 chandrapur

     

     

    नागपूर – ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

     

    नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. ही भूमिका आधीच मी स्पष्ट केली आहे. फक्त पद्धती काय असावी, हे ठरवावे लागेल. बिहारमध्ये या जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल. त्यामुळे योग्य निर्णय याबाबत सरकार करेल. मागासवर्ग आयोगातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुद्धा पूर्ण केली जाईल.

     

    मराठा आरक्षण प्रश्नाचा विचार केला तर मागच्या काळात आमच्याच सरकारने मराठा आरक्षण दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकले. तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकलेले हे एकमेव आरक्षण होते. आमच्या काळात सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यावर स्थगिती आली नाही. नंतरच्या काळात काय झाले, त्या राजकारणावर बोलण्याची ही वेळ नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली आहे आणि आम्ही सारे त्यांच्या भूमिकेसोबत आहोत. आरक्षण टिकले नाही तर सरकारवर टीका होते. त्यामुळे घाईत कोणता निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना लागू करणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे.

     

    आगामी काळात राज्यात आमची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

     

    यावेळी मंचावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनीष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या ९ कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडला. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा आमचाच असून सत्तेत येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. असे वचनही या प्रसंगी त्यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्निग्धा कांबळे यांनी केले. तर सुत्रसंचलन डांगे यांनी केले.

     

    महिला कर्मचाऱ्यांनी बांधल्या राख्या…

    मेळाव्यात राज्य जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना राख्या बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती केली.

    मी तुमच्या संघर्षात पुढे राहील…

    जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्या संघर्षात मी खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहिल. असे अभिवचन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले.

  • चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: स्वच्छता हीच सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करून देशाची मोठी सेवा करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा यांनी दिले.

     

    नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, वनअकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    डॉ. पी.पी.वावा म्हणाले, सर्वप्रथम येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करावे. स्थायी अथवा  कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे. त्यांचा ब्लड ग्रुप, इन्शुरन्स सुविधा, पीएफसह मासिक वेतन प्रमाणपत्र द्यावे. या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच आरोग्य तपासणीचे कॅम्प आयोजित करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, कोर्ट व प्रलंबित प्रकरणांमध्ये त्वरित कार्यवाही करावी. येथील सफाई कर्मचाऱ्यांना वास्तव्यास राहण्यासाठी अजूनही पक्के घर नाही. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून द्यावी.

     

    ते पुढे म्हणाले, येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा त्यांचा परंपरागत व्यवसाय असल्याने त्यांना जात प्रमाणपत्र  देण्याचे नियोजन करावे. रोजगार व स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण तसेच शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच  शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही ते म्हणाले.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना लागणारी कागदपत्रे, त्याच्या घरांचा प्रश्न देखील सोडविण्यात येईल, असे डाॅ. वावा यांना आश्वासित केले. यावेळी सफाई कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सदस्यांसमोर मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • चंद्रपुरातील CGHS वेलनेस सेंटरला 1 वर्ष पूर्ण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांकरीता वेलनेस सेंटरला मंजुरी मिळाली यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालीन तसेच विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री स्तरावरुन सहकार्य लाभले मात्र या दरम्यान अनेक अडचणी उद्भवल्यानंतरही अखेरीस हे CGHS वेलनेस सेंटर रुग्णसेवेत रुजू होवून आज वर्षपूर्ती वर्धापन सोहळा साजरा होत आहे ही आनंदाची बाब असून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना प्रभावी सेवा मिळण्याकरीता अडचणी दूर करुन विविध सेवा उपलब्ध करण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

     

    चंद्रपूरातील रेल्वेस्थानक परिसरात गतवर्षी ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रारंभ झालेल्या या वेलनेस सेंटर च्या प्रथम वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. 21 ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन हंसराज अहीर मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमास CGHS च्या अतिरिक्त संचालक डॉ. विजया मोटघरे, चंद्रपूरच्या CGHS इनचार्ज डॉ. ममता आदेवार, जॉइंट सेक्रेटरी सुरेश डोरले, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र गुरनूले, पेन्शनर असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

     

    यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी चंद्रपूरातील या CGHS वेलनेस सेंटर स्थापनेतील अडचणीबाबत माहिती देत बिल्डिंग व स्टाफ नियुक्ती पर्यंतच्या पाठपुराव्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. या वेलनेस सेंटरमधून उपचार करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्त बांधवांना प्रभावी उपचार मिळण्याकरीता ज्या काही अडचणी उद्भवल्या आहेत. त्या सोडविण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न करु असे आश्वस्त दिले. खाजगी डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधांची कमतरता भासणार नाही याबाबतही आपण लक्ष घालू असे अहीर यांनी उपस्थितांना सांगितले.

     

    यावेळी डॉ. विजया मोटघरे यांनी CGHS वेलनेस सेंटर व्दारा केलेल्या मागण्यांबाबत वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन आरोग्य सेवेत उद्भवणाऱ्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी डॉ. ममता आदेवार, सुरेश डोरले यांनीही वर्धापन प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर यांनी केले. या कार्यक्रमास CGHS चे अंशुमन जावडेकर, सिंह तसेच मनोहर साळवे शंकरराव गुडेल्लीवार, वासुदेवराव आसकर, रामानंद सिंह, सुनिल कोंकमवार, विजय खापने व अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही – सीईओ विवेक जॉन्सन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले.

     

    पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक विजय राठोड, राजेश मुळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

     

    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, कर्तव्यावर असताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद दिन पाळला जातो. लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात 21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान सीमेवर गस्त घालत असताना चिनी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या 10 पोलीस शहीद झाले. तेव्हापासून राज्यात आणि देशात वर्षभरात शहीद झालेल्या पोलिसांना 21 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयात असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडत शहिदांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शहीद परिवारातील कुटुंबीयांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

  • चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.

     

    चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर येथे जाऊन शेतशिवारातील झाडावरून १४ फुट लांब व २६ किलो वजनाच्या अजगर सापाला अलगद पकडले. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे. याआधी तेरा फुट लांबीचा अजगर याच परिसरात झिरे यांनी पकडला आहे. अजगराची वनविभागा मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी त्याला सोडण्यात आले.

     

    अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.

  • चंद्रपुरात भाऊच्या दांडियाची धूम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे.
    Chandrapur dandiya
    भाऊच्या दांडियात अधिकाऱ्यांची उपस्थिती
    या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक पाठक, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता गाडेगोणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौव्हाण, कार्यकारी अभियंता कुंभे, कृषी अधिकारी शंकरजी तोटावार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गोडसेल्वार, दिलीप माकोडे, संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल, उद्योजक चंदू वासाडे, प्रा. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. डोहे यांची विशेष उपस्थिती  होती. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते उमाकांत धांडे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, डॉ. सागर वझे, मोनू चिमुरकर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, अजय बल्की, सुरज बोबडे, रतन सिलावार, किशोर हेमके यांची उपस्थिती होती.
    या दांडियात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
    ———————————————————

    २१ ला प्रिन्स नरुला, २२ ला प्रथमेश परब

    चंद्रपूर शहरात भाऊचा दांडियात धूम आहे. यामध्ये तरुणाईचे आकर्षक झालेले प्रिन्स नरुला हे २१ ऑक्टोबर व प्रथमेश परब हे २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत.
    ————————————————————

    मान्यवरांतर्फे बक्षिसांचा पाऊस

    ग्रुप दांडियामध्ये स्वर्गीय राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन तर्फे १ लाख रुपये, कपल करिता स्वातंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलची पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुगलिया परिवारातर्फे ५० हजार रुपयाचे बक्षीस तसेच सोलो (मुलगा) गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार, सोलो (मुलगी) ५० हजार, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा मुलांना ११ हजार रुपये व लहान मुलींसाठी ११ हजार रुपये तसेच काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (पुरुष) ११ हजार रुपये, ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचा एल्गार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन 20 ऑक्टोबर ला चांगलेच चिघळले.

     

    प्रशासनाकडून आदिवासी संस्कृती व समाजाची थट्टा केल्याने आज वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे याना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली, त्यांनतर तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र पोलीस विभागाने यावर नमती भूमिका घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

     

    जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली होती, यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील अटल बिहारी वाजपेयी इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृती घडविणारे पुतळे व झेंडे लावण्यात आले होते, मात्र प्रशासनाकडून पुतळे व झेंडे हटविल्याने हा वाद सुरू झाला. आदिवासी बांधव वनविभागाच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाला बसले, मागण्या पूर्ण करा अश्या भूमिकेत आदिवासी समाज त्याठिकाणी ठाण मांडून बसला आज आंदोलन चिघळल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

     

    कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी चर्चा केली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.
    बिगडत चाललेली परिस्थिती पाहता ३०० हून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.