Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपुरात थोर स्त्रियांचा जागर करणारा दांडिया उत्सव

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरच्या नानाजी नगर महिला मंडळातर्फे आयोजीत वुमेन्स पाॅवर दांडियाचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते रविवारी 15 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख,माजी नगरसेविका अनुराधा हजारे, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे व मनीषा बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    विशेष म्हणजे या दांडिया मध्ये नऊ दिवस राजमाता जिजाऊ, महाराणी हिराई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,आद्य शिक्षिका फातिमा शेख, प्रथम वैद्यकीय चिकित्सक रख्माबाई राऊत, माता रमाई भिमराव आंबेडकर व मदर टेरेसा या 9 थोर स्त्रियांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच विधानसभेत जनसामान्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार धानोरकर यांचा साडी-चोळी देऊन नानाजी नगर महिला मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला.

     

    उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांनी सक्षम होऊन स्वबळावर उभे राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.तसेच नवरात्र उत्सवातून थोर महिलांच्या कार्याचे स्मरण करण्याची संकल्पना समाजातील नवीन पिढीला दिशा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या दांडिया उत्सवामध्ये नऊ दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य मुली व महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी माजी नगरसेवक देशमुख यांनी व्यक्त केली.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गावंडे या मुलीने केले. यावेळी तिने जिजाऊची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राजमाता जिजाऊ च्या कार्याचे वाचन माधुरी शास्त्रकार तर आभार प्रदर्शन नंदू पाहुणे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या शुभांगी गावंडे,संगीता पाहुणे,मनिषा गावंडे, संगीता वानखडे,अलका लांडे ,जयश्री लांडे,प्रविण बरडे, वैशाली हिवरकर,साधना शेंडे, सपना राणा,कविता भांदककर यांनी अथक प्रयत्न केले.

  • चंद्रपुरात गर्भवती महिलेला मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल शहरात 14 ऑक्टोबर ला रात्रीच्या सुमारास शेजाऱ्यांनी गर्भवती महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे, या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राज्यात एकीकडे सरकार महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना काढत आहे मात्र दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढत आहे, असाच एक संतापजनक प्रकार मूल शहरात उघडकीस आला.

     

    शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राहणारे 27 वर्षीय आकाश बोर्डावार राहतात, मोल मजुरी करीत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, 6 महिन्यांपूर्वी आकाश चे लग्न दामिनी सोबत झाले, सध्या दामिनी ही 3 महिन्याची गर्भवती आहे.

     

    आकाश यांच्या घराशेजारी राहणारे राहुल प्रेमलवार राहत असून त्यांच्यासोबत नेहमी होणारे वाद बघता आकाश बोर्डावार यांचे बोलणे बंद आहे. 14 ऑक्टोबर ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे हे बोर्डावार यांच्या घरापुढे येऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळी करू लागले.

     

    त्यांचा आवाज ऐकून आकाश व त्यांची आई शोभा बोर्डावार यांनी शिवीगाळी का करता म्हणून हटकले, हटकले म्हणून चौघांचा पारा चढला व त्यांनी आकाश सोबत मारहाण केली, आकाश ला मारहाण होत असताना त्यांच्या गर्भवती पत्नीने पतीला वाचविण्यासाठी मध्ये गेली मात्र चौघांनी दामिनी ला सुद्धा मारहाण करीत तिला अश्लील शिवीगाळी केली.

     

    या मारहाणीत दामिनी जखमी झाली, पती आकाश ने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

     

    आकाश ने याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, पोलिसांनी राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे यांच्यावर कलम 324, 294,  506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

  • चंद्रपुर जिल्ह्यात ओबीसींच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान राबविणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.

     

    यासभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दिनांक 29 सप्टेंबर ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नसल्यानें सरकारचा निषेधाचा ठराव करण्यात आला.

     

    ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे , ओबीसीत मोडणारे खासदार ,आमदार यांनी अजून पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये असे निवेदन सरकारला दिले नाही आहे , त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे आणि 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली ता चंद्रपूर गावापासून “ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान “सुरू करून जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात अभियान राबविण्यात येणार असून सामारोप चिमूर तालुक्यात करण्यात येइल.

     

    यावेळी सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खणके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी , प्रेमानंद जोगी, डॉ दिलीप कांबळे, शाम लेडे ,राजेश बेले, श्रीधर मालेकर,कृनाल चहारे, अरूण देऊलकर, एम वि पोटे, प्रा सुरेश विधाते, प्रा बबन राजूरकर, देवराव दिवसे, प्रदीप पावडे, दिनेश कष्टी, विनोद शेंडे, गणपती मोरें, अक्षय येरगुडे, देवा पाचभाई, शखील शेख, पांडूरंग गावतुरे बंडू लेनगुरे, नाझीर गुलाब कुरेशी, महेश खगार, विलास माथनकर सुधाकर काकडे सुनिल मचणवार,देवराव सोनपित्तरे, अवधुत कोटेवार, रणजित डवरे, भाऊराव झाडे, बाबूराव पारखी,गणेश आवारी, हितेश लोडे,मनिषा बोबडे, कुसुमताई उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र  प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले.

     

    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवसीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास” या विषयावर आधारित मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

     

    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधिक्षक रीना जनबंधू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार, आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, राहूल घोटेकर उपस्थित होते.

     

    यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले की, केंद्रीय संचार ब्यूरोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीची प्रदर्शनाच्या रुपात उत्तम मांडणी केली आहे. प्रत्येक छायाचित्राच्या खाली प्रत्येक घटनेचे वर्णन लिखीत स्वरूपात मांडण्यात आले आहे. जेणेकरून प्रदर्शन पाहणाऱ्यांना माहिती जाणून घेणे सोपे होईल. नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवनप्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     

    अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या की, केंद्रीय संचार ब्यूरोने माहितीपूर्ण असे प्रदर्शन लावले आहे. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संस्थेने कायमस्वरुपी अशाप्रकारचे प्रदर्शन दीक्षाभूमी येथे स्थापन करण्याबाबत विचार करावा, जेणेकरून चंद्रपूरच्या नवीन पिढीला डॉ. बाबासाहेबांची माहिती पोहचविणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी केली.

     

    अरुण घोटेकर म्हणाले, केंद्रीय संचार ब्यूरोने या प्रदर्शनाच्या माध्यमातून चंद्रपूराला उत्कृष्ठ अशी भेट दिली आहे. या प्रदर्शनातील माहिती अवलोकन करण्यासारखी आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरील हे प्रदर्शन दुर्मिळ आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी तर संचालन उमेश महतो यांनी मानले.

    17 आक्टोबरपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

    हे प्रदर्शन 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरीकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध दुर्मिळ छायाचित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन हंसराज राऊत यांनी केले आहे.

  • चंद्रपुरातील 3 डॉक्टर्स विरोधात पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर ग्रामीण रुग्णायात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेवर स्थानिक डॉक्टरांनी निष्काळजीपणे उपचार केले असून, सिझर केलेल्या ठिकाणचे टाके खुलल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे पीडित महिलेवर चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकीत्सक आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात निष्काळजी केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई संबंधित डॉक्टरांवर करण्यात आली नाही.

     

    २५ ऑक्टोबरपर्यंत या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा पीडित महिलेची बहीण प्रज्ञा कडूकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

     

    दीपा संपत पेरकर या महिलेला प्रसूतीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सिझर करून प्रसूती करण्यात आली. यानंतर पाच दिवसाने तिची रुग्णालयातून सुटी करण्यात आली. परंतु, या कालावधीत तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही. घरी गेल्यानंतर सिझरचे टाके खुलून तिची प्रकृती गंभीर झाली. यानंतर तिला परत रुग्णालयात नेले असता तिन्ही डॉक्टरांनी हात वर केले.

     

    या प्रकरणात डॉ. मृणाल, डॉ. डोंगरे, डॉ. रामटेके यांनी निष्काळजीपणी केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. डॉ. मृणाल या बल्लारपुरातील काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

     

    दरम्यान, या तिन्ही डॉक्टरांवर जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच चौकशी करून त्यांची वैद्यकीय सेवा निलंबित करण्यात यावी, अन्यथा २५ ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला राजेश बेले, प्रज्ञा कडूकर, पीडित महिलेचा भाऊ उमेश नगराळे उपस्थित होते.

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

    News34 chandrapur

    बुलढाणा – सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांचा शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील वर्ष 2023 मधील दुसरा भीषण अपघात आहे.

    कशी घडली घटना?

    नाशिक जिल्ह्यातील काही भाविक बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शन झाल्यावर नाशिक कडे परत जात असताना वैजापूर जांबरगाव शिवारातील टोल नाक्याजवळ उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

     

    स्थानिक नागरिक धावले मदतीला

     

    अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य चालविले, अपघातात भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे पूर्णतः चक्काचूर झाले, वैजापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली असता तात्काळ घटनास्थळी 5 ते 6 अंबुलन्स दाखल झाले, 20 प्रवासी जखमी झाले असून काहींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    या अपघातात जखमी व मृत प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावातील निवासी आहे.

    वैजापूर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोलनाक्यावर उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, मृतांमध्ये 4 महिन्याचा बालकाचा सुद्धा समावेश आहे.

     

    अपघातांचे कारण समोर

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की शनिवारी रात्री RTO ने समृद्धी महामार्गावर ट्रक अडविला, ट्रक बाजूला घेत असताना हा अपघात झाला, धडक इतकी भीषण होती की अपघाताचा आवाज परिसरातील गावात दणाणला.

  • मराठा नंतर आता ओबीसी समाज आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल आंदोलनाची 30सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर (दिनांक 29 सप्टेंबर )ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले.

     

    उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नाही म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याच्या तसेच ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम ठरविण्यातच्या दृष्टीकोनातून रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला दुपारी 1 वाजता मातोश्री सभागृह , तुकुम येथे बैठकीचे आयोजन केले आहे उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रिय ओबीसी महासंघ यांनी केले आहे.

  • भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होत.

     

    तेलंगणा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेला तुफान गर्दी एकवटली होती. राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या होत्या.मोठ्या संख्येने बीआरएस कडे जनता वढली असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जीवती शहरात ” अब की बार, किसान सरकार ” हा नारा गुंजला.

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत.पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते.इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार झालेले नाही.

     

    अश्या विविध प्रश्नांना घेऊन भारत राष्ट्र समितीने जनआक्रोश मोर्चा काढला.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे,शेत जमीनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प,युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, अश्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या होत्या.

     

    या मोर्च्यात सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, राकेश चीलकुलवार, बालाजी कारले, अजय साकीनाला, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, सुभाष राठोड, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम, गणेश शेंबडे, संघर्ष पडवेकर, नामदेव कोडापे यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील खडकी रायपूर, लांबोरी ,महाराज गुडा ,पाटण, शेणगाव ,आंबेजरी, कुंबेजरी ,लेंडीगुडा, भारी ,धाबा, भूरीरऐसपूर, पल्लेजरी, टेकामांडवा, अर्जुना धोंडी सह अनेक गावातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

  • मूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मुल येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी सभापती राकेश रत्नावार यांनी केली होती.
    या मागणीची गंभीर दखल राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचे कडून दिनांक १३/१०/२०२३ रोजी पत्र क्रमांक ६५५/२०२३-२४ नुसार मंजुरी प्रदान केली आहे.

     

    आजमीतीस शासकीय हमीभाव केंद्रावर विक्रीची नोंदणी सुरू होणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी शासकीय हमीभाव दराने खरेदी होणार असून धान विक्रीची नोंदणी सुरू केली जाणार आहे. जेव्हा धान काढणीची वेळ येईल तेव्हा नोंदणी करावी की, शेतीचे कामे करावे. तसेच, नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांला स्वत: उपस्थिती राहावे लागनार आहे.

     

    मूल तालूका हा धान उत्पादक तालूका म्हणून प्रसिध्द असून धानाचे मोठया प्रमाणात उत्पादन होत असते. त्यामूळे, शेतकऱ्यांकडील शासकीय हमीभाव दराने खरेदी करण्याकरिता नोंदणीची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या हिताची मागणी ना.विजयभाऊ वड्डेट्टीवार,विरोधी पक्ष नेता,विधानसभा तथा माजी मंत्री, यांनी तात्काळ मंजुरी मिळून दिल्याबद्दल बाजार समिती पदाधिकारी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.विजय वडेट्टीवार यांचे जाहीर आभार मानले आहे.

     

    मंजुरी पत्र देताना विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवर,राहुल मुरकुटे, सरपंच चांगदेव केमेकार ,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवर्,खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, संचालक हसन वाढई,विनोद कामडी आदी कांग्रेस पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

  • ढोल ताशांच्या गजरात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

    News34 chandrapur

    नागपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

     

    विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकार, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटे, सुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.

     

    लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

     

    भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

    आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.