Category: ब्रेकिंग न्यूज मराठी

ब्रेकिंग न्यूज मराठी (Breaking News Marathi) विभागात वाचा news34.in वर सर्वात जलद आणि विश्वसनीय ताज्या बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि प्रशासकीय घडामोडींचे त्वरित कव्हरेज आम्ही देतो. कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटू नये यासाठी हा विभाग खास तयार केला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा आणि आपल्या परिसरातील माहिती त्वरित जाणून घ्या.

  • चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा हल्ला; मानव वन्यजीव संघर्षातील ४० वा बळी

    Chandrapur tiger human conflict updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर वनपरिक्षेत्रात २३ नोव्हेम्बरला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४० वा बळी गेला, दुर्गापुरातील पायली-भटाळी बीटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी ५४ वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी होता. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३६, बिबट २, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read Also : नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत देहव्यापाराचा धंदा उघकीस

    चिंचोली गावात राहणारे ५४ वर्षीय बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून कामी करीत होते, सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी १० वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला.

    गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते, सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले, मात्र वडील घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरु केली, मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नसल्याने गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. याबाबत दुर्गापूर पोलिसांना व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली. Chandrapur tiger human conflict updates

    Read Also : ताडोब्यातील १० चितळांचे स्थानांतर

    काही वेळात वनविभाग व पोलिसांची चमू त्याठिकाणी दाखल झाली, गेडाम यांचा शोध घेण्यासाठी सर्वानी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुऱ्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले, तब्बल रात्री ११ वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हाथ त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला.

    गेडाम यांचा मृतदेह मिळाल्यावर नागरिकांचा वनविभागवर रोष उफाळून आला, रात्रीपासून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली.

  • Chimur forest human conflict latest | जंगलराज; वाघाच्या दहशतीने चंद्रपूरचा शेतकरी वर्ग हादरला, पुन्हा शेतकरी ठार

    Chimur forest human conflict latest

    Chimur forest human conflict latest : चिमूर 6 नोव्हेंबर (NEWS34) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात सतत वाढ होत आहे, वर्ष 2025 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 38 नागरिकांचा बळी गेला आहे. 5 ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

    Also Read : चंद्रपुरातील अल्पवयीन गुन्हेगारी


    चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील आंबोली रोडवर असलेल्या शेतात ईश्वर भरडे कापूस वेचायला गेले होते. सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्या परिसरात दबा धरून बसलेल्या शेतकरी भरडे यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले.

    45 वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे हे शिवरा गावात राहत होते, या घटनेमुळे परिसरात जनतेचा रोष बघायला मिळाला, वाघाचे हल्ले सतत होत राहिल्यास शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

    आतापर्यंत 38 मृत्यू

    या घटनेनंतर नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी करीत काही काळ चक्काजाम आंदोलन सुद्धा केले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 34 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, 1 अस्वल व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. एकूण 38 मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहे.

  • Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

    Wardha river missing children

    Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५, रा. जिजामाता वॉर्ड, वरोरा) यांचा समावेश आहे. नदीपात्रातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी, वाहून गेलेल्या मुलांचा रात्री उशीरपर्यंत शोध लागला नाही.

    नेमकी घटना काय?

    शहरातील चार मित्र – रुपेश कुळसंघे, प्रणय भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम, आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे रविवारी दुपारच्या सुमारास सायकलने तुराना घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीच्या पात्रात उतरले. त्याच वेळी घाटाच्या दिशेने कोणीतरी महिला येत असल्याचे दिसल्याने, चौघांनीही नदीच्या पात्रात लपण्याचा प्रयत्न केला. लपण्याच्या प्रयत्नात ते नदीतील खोलगट भागात गेले आणि चौघेही बुडू लागले.

    गुराख्याने वाचवले दोघांना

    मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू करताच, जवळच जनावरे राखत असलेल्या एका गुराख्याने तातडीने धाव घेतली. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोन मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढले.

    Also Read : कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

    मात्र, दुर्दैवाने, रूपेश आणि प्रणय हे दोन मित्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने खोल पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात गुराख्याला यश आले नाही.

    शोधमोहीम थांबली, उद्या पुन्हा सुरू होणार

    गुराख्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना माहिती दिली, ज्यामुळे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. Warora search operation river

    परंतु, रात्री उशीर झाल्यामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ता. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

    या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

    आईचे छत्र हरवलेल्या प्रणयवर काळाचा घाला

    वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या प्रणय विनोद भोयर याचा शोध अद्याप लागलेला नाही. प्रणय केवळ अकरा महिन्यांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याचे वडील विनोद भोयर यांनी त्याचे एकट्याने पालनपोषण केले होते. आधी पत्नी आणि आता एकुलत्या एका मुलगा नदीत बुडल्याने वडील विनोद भोयर यांच्यावर मोठा आघात झाला असून ते एकाकी पडले आहेत.

  • Farmer killed by tiger Chimur Forest Range | चिमूर वनपरिक्षेत्रातील वाघाचा कहर; शेतकरी ठार, गावात प्रचंड संताप!

    Farmer killed by tiger Chimur Forest Range

    Farmer killed by tiger Chimur Forest Range : चिमूर (चंद्रपूर): चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा (Shivra) गावात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. रविवार (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, ६० वर्षीय नीलकंठ भुरे हे शेतकरी आणि शिवरा गावचे माजी सरपंच वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात अवघ्या एका महिन्यात वाघाच्या हल्ल्यातील ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Tiger attack Shivra village Chandrapur

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे थैमान, गोंडपीपरी तालुक्यात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    रात्री उशिरा मृतदेह आढळला

    नीलकंठ भुरे हे शंकरपूर-चिमूर रस्त्यावरील त्यांच्या शेतामध्ये पिकाची पाहणी करण्यासाठी सायंकाळी चार ते पाच वाजता गेले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला. शेतात त्यांची सायकल दिसल्यामुळे कुटुंबीयांना शंका आली.

    गावातील ३० ते ४० लोकांना सोबत घेऊन पुन्हा शोधमोहीम (Search Operation) राबवल्यानंतर, रात्री ११ वाजता त्यांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत नाला किनारी आढळून आला. वाघाने हल्ला करून त्यांचे शरीर ओढत नेले होते आणि त्यांचे दोन्ही पाय खाल्ले होते.

    लोकप्रतिनिधींची धाव, रात्री दीड वाजता आश्वासन

    घटनेची माहिती मिळताच चिमूर वन विभाग आणि भिसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक आणि सरपंच अतुल नन्नावरे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.

    जोपर्यंत वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी येऊन वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आणि कुटुंबाला योग्य आर्थिक मदत (Financial Aid) देण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

    अखेर, सोमवारी पहाटे दीड वाजता चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे आणि ₹ १० लाख मदत देण्याचे आश्वासन दिले. यानंतर ₹ ३० हजार रोख आणि ₹ ९ लाख ७० हजार चा धनादेश (Cheque) कुटुंबीयांना तत्काळ सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

    या घटनेमुळे चिमूर (Chimur News) परिसरात वाघाची दहशत (Tiger Terror) शिगेला पोहोचली असून, वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • Tiger terror in chandrapur district | गोंडपिपरीत वाघाचे थैमान! ८ दिवसांत दुसरा बळी; ४५ वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

    Tiger terror in chandrapur district

    Tiger terror in chandrapur district : गोंडपिपरी (चंद्रपूर 26 ऑक्टोबर News34): गोंडपिपरी (Gondpipri Taluka) तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी (Ganeshpipri) गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज, सोमवार (दि. २७ ऑक्टोबर), सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत (Terror) आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. Woman killed by tiger Gondpipri cotton field

    Also Read : नागभीड मधील त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू

    अल्का महादेव पेंदोर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मजूर मिळत नसल्याने त्या एकट्याच आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी (Cotton Picking) गेल्या होत्या. त्यांचे पती बैल घेऊन घरी परतले, मात्र उशिरापर्यंत अल्का घरी न परतल्याने कुटुंबियांना भीती वाटली. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतशिवारात अल्का यांचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

    वनविभागाच्या उपाययोजनांना अपयश

    गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी आणि चेकपिपरी या भागात वाघाची दहशत वाढली होती. या वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती.

    दुसरा बळी: आठ दिवसांपूर्वी याच वाघाने चेकपिपरी येथील ७० वर्षीय शेतकरी भाउजी पाल यांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वाघाला जेरबंद (Cage/Capture) करण्याचे आदेश मिळवले होते, मात्र वनविभागाला या आदेशांचे पालन करण्यात अपयश आले.

    लोकक्षोभ: ८ दिवसांत दोन शेतकऱ्यांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट (Anger Wave) पसरली आहे.

    सन्मानजनक मदतीसाठी ग्रामस्थांचा पवित्रा

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू तात्काळ गणेशपिपरी (Gondpipri News) येथे दाखल झाली. मात्र, संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत या नरभक्षक वाघाला जेरबंद केले जात नाही आणि मृत कुटुंबाला सन्मानजनक आर्थिक मदत (Financial Aid) दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. उशिरापर्यंत गावकऱ्यांचा हा विरोध सुरू होता.

    सध्या कापूस वेचणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना, वाघाच्या भीतीमुळे शेतीत काम करणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

    आतापर्यंत 36 बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे, यावर्षी 36 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये 32 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, एक हत्ती व एकाचा अस्वलीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

  • Tehsildar and Naib Tehsildar suspended । भद्रावती शेतकरी विषप्राशन प्रकरण: तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    Tehsildar and Naib Tehsildar suspended

    Tehsildar and Naib Tehsildar suspended : भद्रावती (३ ऑक्टोबर २०२५) – शेती संबंधित प्रकरणात न्याय न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विषप्राशन केल्याच्या गंभीर घटनेनंतर, महाराष्ट्र शासनाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

    शेतकऱ्याला न्याय नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

    मोरवा येथील परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५) या शेतकऱ्याने तालुक्यातील कुरोडा येथील गट क्रमांक ८६, ८७, ९५ आणि ९८ मधील जमिनीच्या अभिलेखात वारसांची नावे नोंदवण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. यासाठी त्यांच्याकडे २०१५ चा न्यायालयीन आदेश देखील होता. मात्र, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता, “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे कारण देत अर्ज फेटाळून लावला.

    Also Read ; चंद्रपुरात ड्राय डे च्या दिवशी दारूविक्री, पोलिसांनी केली कारवाई

    अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती तहसील कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Bhadravati land dispute government officer suspension

    महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

    या अत्यंत दुर्दैवी घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली. महसूल अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम १९६९ चे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाच्या जनसामान्य विरोधी कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    वादग्रस्त कार्यकाळामुळे राजेश भांडारकर चर्चेत

    निलंबित झालेले तहसीलदार राजेश भांडारकर यांचा कार्यकाळ आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता. त्यांच्यावर अवैध रेती उत्खनन, मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याचे अनेक आरोप होते. नागरिकशास्त्र संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी त्यांच्या विरोधात वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रशासनाला अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली, असे चित्र आहे.

  • Chandrapur Warora Earthquake Update । भूकंप की ॲपची चूक? चंद्रपूरकरांसाठी प्रशासनाचं महत्वाचं अपडेट

    Chandrapur Warora Earthquake Update

    Chandrapur Warora Earthquake Update : चंद्रपूर: २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती ‘सेसमिक स्टडी ऑफ इंडिया’ या भूकंप ॲपवर दिसली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे.

    चंद्रपूरच्या रस्त्यावर युवकाची दहशत, हातात तलवार घेत नागरिकांना धमकविण्याचा प्रयत्न

    प्रशासनाने केली सत्यता पडताळणी

    आपत्ती व्यवस्थापन, चंद्रपूरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप ॲपवर नोंद झाल्यानंतर लगेचच वरोरा परिसरातील ग्रामस्थ, पोलिस पाटील, तलाठी आणि वेकोली खदान व्यवस्थापनाशी संपर्क साधून खात्री करण्यात आली. या सर्व तपासणीत कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे समोर आले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.

    भूकंपाची नोंद खरी, पण धक्के नाहीत?

    ज्या वेळी भूकंप ॲपवर ही नोंद झाली, त्याच वेळी मार्डा आणि एकोना गावातील लोकांनी कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगितले. यामुळे, जरी ॲपवर भूकंपाची नोंद झाली असली, तरी जमिनीवर त्याचे कोणतेही प्रत्यक्ष परिणाम जाणवले नाहीत. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Tadoba Jeep Driver Killed । वडिलांसमोरच वाघाचा हल्ला; तरुण जीप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

    Tadoba Jeep Driver Killed

    Tadoba Jeep Driver Killed : मोहर्ली २४ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या भामडेली गावात आज (२४ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल बबन नन्नावरे (वय ३७, रा. भामडेली) असे मृताचे नाव असून, ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप चालक म्हणून काम करत होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 33 नागरिकांचा बळी गेला असून यामध्ये वाघ 30, बिबट 2 तर हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

    नेमकी घटना कशी घडली?

    सकाळी अमोल नन्नावरे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी लागणारा मोटर पंप आपल्या वडिलांना देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने अमोलला सुमारे ५० फूटपर्यंत फरफटत नेले. Tadoba Tiger Attack News

    गुराख्यावर वाघाचा हल्ला, गुराखी जखमी

    ही संपूर्ण घटना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर घडली. वडिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने अमोलचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. अमोलच्या मानेवर गंभीर जखमा आढळल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथे पाठवण्यात आला आहे.

    प्रशासनाची तत्परता

    घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे, क्षेत्र सहायक एस. जुमडे, बालपणे, वनरक्षक, पीआरटी टीम, वन मजूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

    ग्रामस्थांची मागणी

    अमोलच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी; मृतकाच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत

    चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिटात वाघाच्या हल्ल्यात अमोल बबन नन्नावरे (वय ३८, रा. भामडेळी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, नन्नावरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Tadoba Buffer Zone Death Case

    घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. ज्या वाघाने अमोल नन्नावरे यांचा जीव घेतला, त्या नरभक्षक वाघाला तातडीने पकडून जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले, “शेतकरी बांधव आपल्या शेतात सुरक्षित नसतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जोपर्यंत या वाघाला पकडून जेरबंद केले जात नाही, तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यात आहे. वन विभागाने तात्काळ विशेष मोहीम हाती घेऊन या वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश मी दिले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निर्देशानुसार, मृत अमोल नन्नावरे यांच्या पत्नी प्रेमिला अमोल नन्नावरे यांना घटनास्थळीच तात्काळ रोख ५०,०००/- रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, नन्नावरे कुटुंबियांना नियमानुसार पुढील शासकीय मदत लवकरात लवकर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी, यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

  • Breaking News Swift hits Scorpio । राजुरा-गोविंदपूर महामार्गावर भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दोन जखमी

    Breaking News Swift hits Scorpio

    Breaking News Swift hits Scorpio : राजुरा (२३ सप्टेंबर २०२५) – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडचांदूर लागत लालगुडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ चारचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर अपघातात सहा जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे महामार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    ट्र्क ची धडक, महिला गंभीर दुचाकी जळून खाक

    उभ्या वाहनाला धडक

    गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील लालगुडा परिसरात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. स्विफ्ट कार कोरपना वरून गडचांदूरच्या दिशेने येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या स्कॉर्पिओ चारचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    धडकेचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

    या महामार्गावर याआधीही मोठे अपघात घडले आहेत. नुकतेच झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सतत घडणाऱ्या दुर्घटनांमुळे रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे


  • alcazar car fire Chandrapur Nagpur route । चंद्रपूर-नागपूर मार्गावर अलक्झर कार जळून खाक, प्रवासी सुखरूप

    alcazar car fire Chandrapur Nagpur route

    alcazar car fire Chandrapur Nagpur route : चंद्रपूर / वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

    बिबट्याने मुलाला नेले उचलून, सिंदेवाही हादरलं

    नागपूर निवासी अमीन हारून अली हाजी हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक mh ३१ fu ६६७३ ने निघाले होते, वरोरा मधील रत्नमाला चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीत जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्निविरोधक यंत्र आणण्यास गेले मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता.

    अन्यथा मोठी घटना घडली असती

    परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठी घटना टळली. वाहन मालक अमीन हारून अली हाजी यांनी याबाबत माहिती दिली कि आम्ही सकाळच्या सुमारास चंद्रपुरवरून नागपूरसाठी निघालो असता वरोरा जवळ पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघायला लागला. वेळेपूर्वी आम्ही वाहनातून उतरलो अन्यथा मोठी घटना घडली असती. याबाबत वरोरा पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली आहे.