Category: ब्रेकिंग न्यूज मराठी

ब्रेकिंग न्यूज मराठी (Breaking News Marathi) विभागात वाचा news34.in वर सर्वात जलद आणि विश्वसनीय ताज्या बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि प्रशासकीय घडामोडींचे त्वरित कव्हरेज आम्ही देतो. कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटू नये यासाठी हा विभाग खास तयार केला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा आणि आपल्या परिसरातील माहिती त्वरित जाणून घ्या.

  • महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

    Municipal corporation election : मुंबई १५ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील शहरी राजकारण तापणार असून, आजपासून (१५ डिसेंबर २०२५) तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण २९ महापालिकांमधील २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात IAS शिस्तीचा पॅटर्न)

    राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या तारखांची घोषणा करत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्पष्ट केला आहे.


    📅 निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम:

    निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

    टप्पा (Phase)तारीख (Date)
    नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
    अर्जांची छाननी३१ डिसेंबर
    माघारीची अंतिम मुदत०२ जानेवारी (२०२६)
    चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी०३ जानेवारी
    मतदान१५ जानेवारी
    मतमोजणी१६ जानेवारी

    🔔 आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना

    निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत काही महत्त्वाचे नियम आणि सूचना स्पष्ट केल्या आहेत:

    • ऑफलाईन अर्ज: उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
    • जात प्रमाणपत्र: उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र (Caste Certificate) सादर करणे बंधनकारक असेल.
    • मतदार यादी: या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
    • ‘मताधिकार’ ॲप: आयोगाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मताधिकार’ नावाचे एक ॲप तयार केले आहे.
    • दुबार मतदान: ज्या मतदारांचे नाव दुबार असेल, त्यांच्या नावापुढे ‘डबल स्टार’ (Double Star) करण्यात आले आहे. अशा मतदारांना केवळ एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल.
    • दुरुस्तीचा अधिकार नाही: मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

    🗳️ आचारसंहिता लागू; राजकीय घडामोडींना वेग

    निवडणुकीची घोषणा होताच राज्यात तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन निर्णय प्रक्रियेवर आता मर्यादा येणार आहेत.

    आचारसंहिता लागू झाल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनीती यावर त्वरित चर्चा सुरू केली आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील शहरी राजकारण चांगलेच तापणार असून, सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  • शनिवारी चंद्रपूर हादरला; शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने केली शिकार

    breaking Tiger Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून शनिवारी १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने शिकार केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४४ नागरिक ठार झाले असून यामध्ये वाघाच्या हल्ल्यात ४०, बिबटच्या हल्ल्यात २ आणि अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. (हे हि वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)

    शेतात काम करताना झाला हल्ला

    सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात राहणाऱ्या ४९ वर्षीय अरुणा उर्फ छाया अरुण राऊत हि महिला शेतात कामाला गेली होती, सायंकाळ झाल्यावर अरुणा घरी परतली नाही, महिलेचे पती अरुण घरी आले असता त्यांनी पत्नीची गावात इतरत्र चौकशी केली मात्र त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर गावातील नागरिकांना एकत्र करीत शेतात गेले असता त्याठिकाणी सुद्धा अरुणा मिळाली नाही. लगतच्या जंगल परिसरात गावकर्यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावरील नाल्याजवळ अरुणा चा मृतदेह आढळून आला.

    मृतक अरुणाच्या गळ्याला व दोन्ही पायांना आणि पाठीला गंभीर जखमा होत्या. तसेच त्यांचे दोन्ही हात पूर्णतः तुटलेले होते. यावरून वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. breaking Tiger Attack

    दुसऱ्या घटनेत १३ डिसेंबर ला मूल तालुक्यातील वन संरक्षित क्षेत्रात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राख्याचे नाव पीतांबर गुलाबराव सोयाम,वय 36,रा.बेलघाटा असे आहे. पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमंेट नंबर 1765 मध्ये गुर चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.मात्र, सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगलालगतच्या शेतात पीतांबरचा मृतदेह आढळून आला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात कामावर जायचं कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

  • चंद्रपुरात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला

    Chandrapur Wild boar Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आतापर्यंत ४२ नागरिकांचा या संघर्षात बळी गेला आहे. १४ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ आंबेडकर नगर भागात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रान डुकराने हल्ला करीत जखमी केले. (हे हि वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर पोलिसांच्या रडारवर)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधील दुर्गा नगर मध्ये सकाळी ६ वाजता भारती विश्वनाथ शेंडे हि महिला अंगणात काम करीत होती, त्यावेळी रान डुक्कराने भारती शेंडे वर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भारती शेंडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी नागरिक जमा झाले व रानडुकरांना तिथून हुसकावून लावले.

    विशेष म्हणजे या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते, याची माहिती वनविभागाला सुद्धा दिली मात्र वनविभागाने यावर काही पाऊल न उचलल्याने आज हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दुर्गा नगर भागात धाव घेतली. Chandrapur Wild boar Attack

    वनविभागाला या हल्ल्याची माहिती देत, जखमी भारती शेंडे या महिलेला तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. राजू कुडे यांनी यावेळी वनविभागावर ताशेरे ओढत, या घटनेला जबाबदार वनविभाग असून त्यांनी तात्काळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ जंगल परिसरात तारांची सुरक्षा जाळी लावावी. यावेळी राजू कुडे सह वाहतूक अध्यक्ष जय देवगडे उपस्थित होते.

  • राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांत चंद्रपूर जिल्ह्याने दाखवला गुणवत्तेचा ठसा

    Chandrapur Health Ranking : चंद्रपूर, दि. 13 डिसेंबर २०२५ (News३४) : राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर विभागाच्या परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत चंद्रपूरने आरोग्य सेवेतील गुणवत्तेची छाप पाडली आहे. (हे वाचा – खासदार धानोरकरांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा)

    राज्यात राबविण्यात येणाऱ्या माता–बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, लसीकरण, आरसीएच ऑनलाईन नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत मोफत तपासण्या आदी नियमित व राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले. Chandrapur Health Ranking 

    चंद्रपूर 59.15 गुणांसह तिसऱ्या

    मानांकनातील गुणांनुसार धाराशिव जिल्हा 63.30 गुणांसह पहिल्या, अकोला 62.27 गुणांसह दुसऱ्या, चंद्रपूर 59.15 गुणांसह तिसऱ्या, गोंदिया 56.91 गुणांसह चौथ्या तर बुलढाणा 56.25 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विविध आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीत मिळालेले हे स्थान आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचे फलित असल्याचे डॉ. कटारे यांनी नमूद केले. Chandrapur Health Department

    सांघिक कामगिरीला यश हे मानांकन जिल्ह्यातील सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी, तसेच गावपातळीवर कार्यरत आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक–सेविका, आशा सेविका व आशा गटप्रवर्तक यांनी गुणवत्तापूर्ण सेवा दिली.            

    यासोबतच डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका व जिल्हास्तरीय कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रम समन्वयक व पर्यवेक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम प्राथमिक उपचारांसह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून पुढेही कायम राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • १४ वर्षीय मुलीवर पोलिसांनी केला अत्याचार; ५० वर्षांनंतरही न्यायाची लढाई

    Mathura Rape Case 1972 Chandrapur : चंद्रपूर, दि. 11 डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे 1972 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. हलाखीच्या आणि अर्धांगवायूग्रस्त अवस्थेत राहत असलेल्या मथुरा ताईंसाठी डॉ. गोऱ्हे यांनी आवश्यक तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी संतोष थिटे अतिरिक्त जिल्हाधिकारी, किशोर घाडगे एसडीओ, विजया झाडे तहसीलदार, आत्मज मोरे गट विकास अधिकारी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या. (हे वाचा – चंद्रपूर शहरात घरफोडीच्या मालिका सुरु)

    डॉ. गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मथुरा ताईंना वैद्यकीय उपचार, पेन्शन, अन्नधान्य, घरकुल, आर्थिक ठेव तसेच सर्व संबंधित कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने तत्परता दाखवत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या असून आजच्या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी त्याचा सविस्तर आढावा घेतला. पुढील सहाय्य, पुनर्वसन आराखडा आणि देखरेख यंत्रणा याबाबत अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सखोल चर्चा केली.

    याप्रसंगी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मथुरा ताईंच्या प्रकरणाचा उल्लेख माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही केला होता. त्या काळी पीडित महिलेला न्याय नाकारला गेला आणि त्यानंतर ‘कस्टोडियल जस्टिस टू विमेन’ कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विद्यार्थी व स्त्री मुक्ती आंदोलनात दीर्घ संघर्ष केला. जवळजवळ वीस वर्षांच्या लढ्यानंतर हा महत्त्वाचा कायदा देशाला मिळाला. त्या स्त्रीच्या वेदनेतून कायदा बदलला, पण आज त्या स्वतःच गंभीर विपन्नावस्थेत आहेत—ही बाब निश्‍चितच वेदनादायी आहे.”

    मथुरा ताईंच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या मुलांना स्थिर रोजगार, घरकुल आणि आवश्यक शासकीय लाभ तातडीने देण्याचे निर्देश दिले. “कुटुंबासमोर वारंवार कागदपत्रांची मागणी करून अडथळे निर्माण करू नयेत. ग्रामसेवकाला नोडल अधिकारी नेमून प्रत्येक शासकीय भेटीची नोंद व फोटो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे बंधनकारक करावे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. Mathura Rape Case 1972 Chandrapur

    प्रकरण काय?

    26 मार्च 1972 रोजी (तत्कालीन चंद्रपूर जिल्हा) देसाईगंज पोलीस ठाण्यात (सध्या गडचिरोली जिल्हा) गणपत व तुकाराम या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी 14 वर्षीय मथुरा वर अत्याचार केला होता, अपहरणाची तक्रार मथुरा ने दिली होती, सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी मथुरा ला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते, याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी मथुरेवर अत्याचार केला होता. अत्याचार प्रकरणात पुरावे नसल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय उलटवित आरोपींना दोषी ठरविले, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करीत आरोपी पोलिसांची सुटका केली होती, या निर्णयानंतर 1979 च्या काळात देशभरात संताप उसळला होता, देशव्यापी आंदोलन झाले, जनतेच्या दबावाने वर्ष 1983 मध्ये अत्याचार कायद्यात मोठे बदल करण्यात आले, या घटनेचा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाषणात उल्लेख केला होता.

    त्या पुढे म्हणाल्या, “अनेक लोक कागदपत्रे घेऊन जातात; पण त्याचा उद्देश मथुरा ताईंना कळत नाही. आता येणाऱ्याने ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असावे. विधिमंडळ हे माणसांसाठी आहे; म्हणूनच अधिवेशन सुरू असतानाही मी इथे आले. ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, त्या स्त्रीला समाजाने न्याय दिलाच पाहिजे. मथुरा ताईंच्या नावाने मदतीचा गैरवापर होऊ नये, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.”

    माध्यमांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक करत त्या पुढे म्हणाल्या, “न्याय नेहमी न्यायालयातूनच मिळतो असे नाही; काहीवेळा कायदे बदलूनही न्याय द्यावा लागतो. महिलांच्या चळवळीच्या इतिहासातील हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.”

    डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सक्रीय पुढाकारामुळे मथुरा ताईंच्या स्वास्थ्य, सुरक्षेसाठी सातत्याने देखरेख ठेवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • यूडीआयडी न सादर केल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेतील १२ दिव्यांग कर्मचारी निलंबित

    UDID card verification : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ : दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे राबवली आहे. या तपासणी मोहिमेअंतर्गत, आवश्यक असलेले यूडीआयडी (UDID – Unique Disability ID) अर्थात वैश्विक ओळखपत्र सादर न करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

    सोमवारी (दि. ८) झालेल्या या कारवाईमध्ये पंचायत समितीतील काही कर्मचारी तसेच कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली होती, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. (हे हि वाचा – मूल तालुक्यातील सोमनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा)

    ♿ प्रमाणपत्रांच्या तपासणीची गरज काय?

    दिव्यांग विभागाने ही विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यामागे अनेक महत्त्वाचे कारणे आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजनांचा आणि आरक्षणाचा लाभ केवळ खऱ्या व पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर करून नोकऱ्या मिळवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची सत्यता संशयास्पद असल्याने, संपूर्ण राज्यात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी यूडीआयडी क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. यूडीआयडी हे केंद्र सरकारद्वारे जारी केलेले ओळखपत्र असल्याने, ते प्रमाणपत्राची सत्यता आणि अचूकता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे मानक ठरते. UDID card verification

    जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ही कारवाई करून शासकीय नियमांचे पालन आणि पारदर्शकता राखण्यासंदर्भात कठोर संदेश दिला आहे. यूडीआयडी सादर करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे त्यांच्या प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, ज्यामुळे प्रशासनाला निलंबनाचा निर्णय घेणे भाग पडले. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत हे कर्मचारी निलंबित राहतील.

  • सुगंधित तंबाखू माफियांवर थेट मकोका! फडणवीसांची अधिवेशनात घोषणा

    MCOCA on gutkha trade : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी व सत्ता पक्षातील आमदारांनी अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखूवरून सरकारला चांगलंच घेरलं, इतर राज्यातून येणारे हे अंमली पदार्थाची वाहतूक थांबवायची असेल तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरचं कायद्यात बदल करून अश्या माफियांवर मकोका लावण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे असे सांगितले. (हे हि वाचा – ताडोब्याची वाघीण चालली सह्याद्रीला)

    विधानसभेत गुटखा माफियांचा मुद्दा: विरोधकांचा हल्ला

    वर्ष २०१२ पासून राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध असला तरी आज खुलेआम सर्रासपणे विक्री होत आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासन या विक्रीवर डोळेझाक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशी वस्तूची उलाढाल आठवड्याला कोट्यवधी रुपयांची असते.

    तंबाखू व्यापाऱ्यांवर मकोका

    हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ सह मुंबई भागात होत असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा व जे याचा व्यवसाय करतात त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. MCOCA on gutkha trade

    राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या आत सुद्धा गुटखा व खर्रा विक्रीची दुकाने मनपा, नगरपालिका द्वारे कारवाई करीत अतिक्रमण काढण्याच्या सूचना सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती मंत्री पंकज भोयर यांनी दिली.

    राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री होत आहे मात्र ऍन औषध प्रशासन झोपेचं सोंग घेऊन काम करीत आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्यामुळे तरुण पिढी कॅन्सर च्या विळख्यात सापडली आहे. कधीकाळी प्रशासनाने सुगंधित तंबाखूचा माल पकडला तर आरोपीना जामीन मिळतो व ते पुन्हा त्याच कामात गुंततात.

    कायदा कमकुवत असल्यामुळे आरोपी हा व्यवसाय वारंवार करतात त्यामुळे अश्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी. इतर राज्यातून होणारी वाहतूक थांबविता संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले तरचं हा अवैध धंदा बंद होऊ शकतो.

    मकोका लागणार

    आमदारांच्या या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि आम्ही यापूर्वी या गुन्ह्यात मकोका अंतर्गत कारवाई करू शकतो काय याबाबत सविस्तर चर्चाही झाली मात्र त्या कायद्यात सदर गुन्हा बसत नाही, त्यामुळे आम्ही कायद्यात बदल करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या गुन्ह्यात आता मकोका कायद्यांतर्गत कारवाई होणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले.

    चंद्रपुरातील सुगंधित तंबाखूचे केंद्र

    चंद्रपूर शहरात तुकूम, जटपुरा गेट, बिनबा गेट व बल्लारपूर आणि रयतवारी हे सुगंधित तंबाखू विकिरिचे मोठे केंद्र आहे, विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोलीस व अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध आहे, मात्र कारवाई करण्यात संबंधित विभाग डोळेझाक करतो.

  • evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

    evm machine vandalized in gadchandur polling : कोरपना/गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान दिवसभर विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. कुठे तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले, तर कुठे मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले. या सगळ्या गोंधळात गडचांदूर येथे एक अत्यंत गंभीर घटना घडली, जिथे एका संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन फोडून टाकली.

    पोलीस आदेश : चंद्रपूर जिल्ह्यात कलम ३६ लागू

    ही घटना गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे घडली. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) नावाच्या मतदाराने मतदान करताना ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबले असता, अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या कथित प्रकारामुळे संतापाच्या भरात दुर्गे यांनी ईव्हीएम मशीनवर हल्ला करत ती फोडून टाकली.

    घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने मतदारांनी गर्दी केली आणि संतप्त नागरिकांनी **“भाजप मुर्दाबाद”**च्या जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेला ब्रेक बसला आणि वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. evm machine vandalized in gadchandur polling

    परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ ईव्हीएम मशीनचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

    या घटनेमुळे गडचांदूरमधील राजकीय तापमान अधिक वाढले असून, मतदान केंद्राबाहेर अजूनही तणाव असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

    युवकाला अटक

    गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 9 येथील मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्रासोबत छेडछाड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत सुरू केले. विशेष म्हणजे यावेळी कंट्रोल युनीट पुर्णपणे सुरक्षित होते.

    विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी असून आज गडचंदुर येथील मतदान केंद्र क्रमांक 9/2 येथे मतदान करताना त्याने बॅलेट युनिट ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर उपस्थित पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने सदर मतदान केंद्रावर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले आहे.

  • why municipal elections postponed in chandrapur । चंद्रपुरात नगरपरिषद निवडणुका रद्द नाही, पण! आयोगाचा ताजा आदेश जाहीर

    घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती

    why municipal elections postponed in chandrapur : चंद्रपूर, दि. 30 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती,  वरोरा, ब्रम्हपुरी,  मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

    मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

    उमेदवारांचा हिरमोड

    प्रशासन व न्यायालयाच्या या आदेशाने भावी नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे, मागील आठवडाभरापासून प्रचारात शक्ती लावत सामान्य मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र २ दिवसांनी होणार मतदान पुढे ढकलल्याने उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे.

    या काळात राष्ट्रीय पक्ष कांग्रेस, भाजप, शिवसेना दोन्ही व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दोन्ही यांचे स्टारप्रचारकांनी सभा घेतल्या होत्या, सभेसाठी लागलेला खर्च व पुढे होणारा खर्च यामुळे उमेदवार यांचं बजेट बिघडले आहे, सदर निवडणूक हि डिसेम्बर महिन्याच्या २० तारखेला होण्याची शक्यता आहे. why municipal elections postponed in chandrapur

    त्या अनुषंगाने घुग्गुस  नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. 10 –  ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला), 

    मूल न.प.ची जागा क्र. 10 –  ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

  • Chandrapur breaking news today tiger attack । चंद्रपूर हादरले! गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार

    Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    प्रशासनाचा आदेश : जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी

    सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack

    विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.