Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक: आरक्षण प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    Municipal reservation controversy : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करून दिनांक 17 नोव्हेंबर ते दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. याबाबत महानगरपालिकेने एक नोटिफिकेशन काढले होते. त्याची वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्यानुसार अनेक नागरिक, राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवार यांनी आक्षेप नोंदवले. मात्र, त्या आक्षेपांवर कोणतीही सुनावणी न घेता आणि अंतिम आरक्षण जाहीर न करता थेट राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (चंद्रपूर मनपात शिस्तीचा IAS पॅटर्न)

    हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे का?

    आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता निवडणूक जाहीर करणे नियमबाह्य नाही का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाबाबत प्रक्रिया पूर्ण करणे, आक्षेपांवर सुनावणी घेणे व अंतिम निर्णय जाहीर करणे अनिवार्य आहे. आक्षेप मागवून त्यावर सुनावणी न घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे.
    आरक्षण प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणूक जाहीर करणे हे लोकशाही आणि कायद्याच्या दृष्टीने चिंताजनक असून राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी जनविकास सेनेची मागणी आहे. Municipal reservation controversy

    अंतिम आरक्षण 50% च्या मर्यादेत आणणे सहज शक्य होते

    मुळात आरक्षणाच्या आक्षेपांवर सुनावणी झाली नव्हती. सुनावणी घेऊन अंतिम आरक्षण जाहीर करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाला आरक्षणात बदल करण्याची मुभा होती. या संधीचा वापर करून आरक्षण 50 टक्के च्या मर्यादेत आणणे सहज शक्य असताना निवडणूक विभागाने असे का केले नाही ? हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक जिंकलेल्या काही ओबीसी उमेदवारांना भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो. त्याची नुकसान भरपाई कशी करणार ? याचे उत्तरही निवडणूक विभागाने द्यायला हवे.

  • महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

    Municipal corporation election : मुंबई १५ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील शहरी राजकारण तापणार असून, आजपासून (१५ डिसेंबर २०२५) तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण २९ महापालिकांमधील २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात IAS शिस्तीचा पॅटर्न)

    राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या तारखांची घोषणा करत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्पष्ट केला आहे.


    📅 निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम:

    निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

    टप्पा (Phase)तारीख (Date)
    नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
    अर्जांची छाननी३१ डिसेंबर
    माघारीची अंतिम मुदत०२ जानेवारी (२०२६)
    चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी०३ जानेवारी
    मतदान१५ जानेवारी
    मतमोजणी१६ जानेवारी

    🔔 आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना

    निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत काही महत्त्वाचे नियम आणि सूचना स्पष्ट केल्या आहेत:

    • ऑफलाईन अर्ज: उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
    • जात प्रमाणपत्र: उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र (Caste Certificate) सादर करणे बंधनकारक असेल.
    • मतदार यादी: या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
    • ‘मताधिकार’ ॲप: आयोगाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मताधिकार’ नावाचे एक ॲप तयार केले आहे.
    • दुबार मतदान: ज्या मतदारांचे नाव दुबार असेल, त्यांच्या नावापुढे ‘डबल स्टार’ (Double Star) करण्यात आले आहे. अशा मतदारांना केवळ एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल.
    • दुरुस्तीचा अधिकार नाही: मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

    🗳️ आचारसंहिता लागू; राजकीय घडामोडींना वेग

    निवडणुकीची घोषणा होताच राज्यात तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन निर्णय प्रक्रियेवर आता मर्यादा येणार आहेत.

    आचारसंहिता लागू झाल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनीती यावर त्वरित चर्चा सुरू केली आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील शहरी राजकारण चांगलेच तापणार असून, सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  • चंद्रपूर मनपात शिस्तीचा ‘IAS पॅटर्न’; उशिरा येणाऱ्यांना घडवली अद्दल

    Municipal office late staff : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – वर्ष २०१२ रोजी चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर प्रथमच १३ वर्षांनी मनपाला IAS दर्जाचा अधिकारी लाभला, मनपा आयुक्त नरेश अकनूरी यांनी पदभार संभाळल्यावर कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार)

    १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त अकनूरी कार्यालयात दाखल झाले, मात्र यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आले नव्हते, कर्मचाऱ्यांसह अधिकारी कार्यालयीन वेळेत मनपात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट मनपाचे प्रवेशद्वार बंद केले.

    काही वेळानी कर्मचारी व अधिकारी मनपात दाखल झाले असता, प्रवेशद्वार बाहेरून बंद असल्याचे समजले, मनपात २ वर्षांपासून प्रशासक बसल्यावर अधिकारी व कर्मचारी पूर्णतः बेभान झाले होते, कार्यालयीन वेळेवर न पोहोचता अधिकारी आपल्या सोयीनुसार कार्यालयात येत होते. मात्र आजच्या प्रकारामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली असल्याचे चित्र दिसले. Municipal office late staff

    नेहमी नागरिकांना बाहेर ताटकळत उभे ठेवणारे अधिकारी आज स्वतः बाहेर ताटकळत उभे होते. मनपा आयुक्त अकनूरी यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असे वागणे व त्यांना शिस्त लावण्याचा हा प्रकार दिवसभर जनमानसात चर्चेत होता.

  • चंद्रपूर शहर विकासावर लक्ष; आमदार जोरगेवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    Municipal Corporation Meeting : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज रविवारी महानगरपालिकेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. (हे वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)

    या बैठकीला नव्याने रुजू झालेले मनपा आयुक्त नरेश अकनुरी यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, रवी गुरुनुले, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, बलराम डोडाणी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, कल्पना बबुलकर, ॲड. राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार आदींची उपस्थिती होती.

    या बैठकीदरम्यान शहराच्या विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा विषय, महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे देण्याचा प्रश्न तसेच भिवापूर हनुमान खिडकी परिसरातील झरपट नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    आगामी काळात चंद्रपूर शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामे अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांशी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

  • चंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासनासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करा

    Chandrapur municipal commissioner : चंद्रपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सध्या कार्यरत आयुक्त हे केवळ चार्जवर असून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच शहरातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेत तात्काळ पूर्णवेळ आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    व्यापक क्षेत्रफळ, वाढते प्रशासनिक दायित्व आणि निवडणुका न झाल्यामुळे निर्माण झालेल्या स्थगित परिस्थितीमुळे अनेक नागरिकाभिमुख सुविधा व विकासकामांना गती मिळत नाही. शहराची लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता अनुभवी आयएएस अधिकारी असणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर स्वनियंत्रण राहील, निर्णयप्रक्रियेला वेग येईल आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळेल.

    सध्या निवडणुका न झाल्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प, मूलभूत सुविधा व विकास आराखडे अर्धवट स्थितीत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी निदर्शनास आणले.

    चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पूर्णवेळ आयुक्त नेमणे आवश्यक असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केली.

  • चंद्रपूर मनपा निवडणुकीत आपचा झंझावात; मोफत पाणी, आरोग्य आणि शिक्षणाची घोषणा

    AAP development model : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर नगरपरिषद नंतर वर्ष २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र या काळात चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी कांग्रेस व भाजपची सत्ता भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली बघितली मात्र आता नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आपचे जिल्हाअध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारी परिषदेद्वारे केले आहे. (हे हि वाचा – दारू दुकानाला परवाना देताना लोकसंमती बंधनकारक करा – आमदार जोरगेवार)

    नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या निवडणुका होणार आहे, यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे, मात्र यंदा आम आदमी पक्षाने प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्याची तयारी केली असून त्यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूर मनपा मध्ये आप ची सत्ता आल्यावर नागरिकांनी कधी न बघितलेला चंद्रपूर निर्माण करण्याचा संकल्प म्हणजेच विकासाची गॅरंटी जाहीर केली आहे. AAP development model

    चंद्रपूर मनपाचे बजट ४५० कोटी रुपये आहेत मात्र त्यामानाने शहराचा विकास झालाच नाही, कांग्रेस भाजपच्या काळात शासकीय शाळांची संख्या कमी झाली, खासगी शाळांचे जाळे वाढले. आरोग्यासाठी खासगी रुग्णालयावर नागरिक अवलंबून आहे, रस्ते व नाले निकृष्ट दर्जाचे, आजही पाणी पुरवठा नियमित होत नाही. मात्र आप ने सत्ता आल्यावर शहरात मूलभूत गरज लक्षात घेत विकास करणार असल्याची ग्वाही दिली.

    महानगरात अशी असणार शिक्षण क्रांती

    शहरातील प्रत्येक झोनमध्ये जागतिक दर्जाच्या शाळेची उभारणी, शिक्षण पूर्णतः मोफत आणि जागतिक दर्जाचे, AI तंत्रज्ञान युक्त अत्याधुनिक शाळा, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना परदेशी प्रशिक्षण दौरे.

    आरोग्याची संजीवनी

    चंद्रपूर मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन रुग्णालयाची निर्मिती. मनपाच्या वतीने मोफत तपासणी, उपचार आणि औषधे. गरज भासल्यास खासगी रुग्णालयात मनपाच्या खर्चाने उपचार. मनपा क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी पैसे लागणार नाहीत.

    चंद्रपूर महानगरात जलसमृद्धी

    पाणी पूर्णतः मोफत मिळणार, जुन्या थकीत पाणी बिलांची संपूर्ण माफी, प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा.

    शहरात येणार विकास क्रांती

    रस्ते नाल्याना २० वर्षाची लेखी हमी, एकदा रस्ता पूर्ण झाला तर पुढील २० वर्षे त्या रस्त्यावर खोदकाम होणार नाही. खड्डेमुक्त, टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची हमी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत समावेश करणार.

    भाजप व कांग्रेसने चंद्रपूर मनपामध्ये सत्तेत आल्यावर फक्त भ्रष्टाचार करण्याला प्रथम प्राधान्य दिले मात्र नागरिकांच्या हिताचे काम केले नाही, याकरिता जनतेने आम्हाला संधी द्यावी असे आवाहन मयूर राईकवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सध्या आम आदमी पक्षाचे २२ उमेदवार मनपा निवडणुकीसाठी सज्ज आहे. महानगरातील आमच्या विकास व्हिजन वर जे पक्ष सहमत असतील आम्ही त्यांच्यासोबत युती करू अशी माहिती राईकवार यांनी दिली.

    आयोकीत पत्रकार परिषदेत आपचे राज्य पदाधिकारी सुनील मुसळे, राजू कुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • कालबाह्य औषधे खुलेआम जाळली!, गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    expired medicines burning case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – वेस्टर्न कोलफिल्ड लि. चंद्रपूर येथील क्षेत्रीय रूग्णालयाच्या आवारात कालबाह्य झालेली औषधी आणि काही वैद्यकीय साहित्य दि. 26/11/2025 रोजी उघडपणे जाळले असल्यामुळे हवेमध्ये रासायनिक वायू प्रदूषण निर्माण झाले आहे.

    गुन्हा दाखल करा

    त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच पाळीव प्राणी, जल पाणी व पक्षी यांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झालेला असल्यामुळे क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ येथील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी व त्याचे सहयोगी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष व सदस्य सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त, वेकोली मुख्य प्रबंधक यांच्याकडे राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केलेली आहे.

    योजना – चंद्रपुरात सुरु झाली किलकारी योजना

    waste burning


    महाराष्ट्र शासनाने बॉयोमेडिकल वेस्ट विल्हेवाट लावण्याकरीता चंद्रपूर, एम. आय. डी.सी. परिसरामध्ये बॉयोमेडिकल वेस्ट प्रकल्प विल्हेवाट लावण्याकरीता उभारले असतेवेळी वेस्टर्न कोल्डफिल्ड लि. चंद्रपुर क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ, क्षेत्रीय वैद्यकीय आधिकारी व त्यांचे सहयोगी कर्मचारी पदाची गरीमाची पायमल्ली करून नागरिकाच्या जीवाला व आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्यावर लिपापोती करण्यात चंद्रपूर शहर महानगरपालिका, स्वच्छता विभाग सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. illegal biomedical waste burning

    घाण कचरा संकलन गाडीमध्ये संपूर्ण कालबाहय झालेली औषधी आणि काही वैद्यकीय जाळलेली स पूर्ण सामुग्री वेस्टर्न कोल्डफिल्ड लि. चंद्रपूर क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ, क्षेत्रीय वैद्यकीय आधिकारी यांनी पदाचा दुरूपयोग करून कॉलनी परिसरात कचरा संकलन करण्याकरीता आलेल्या गाडीमध्ये टाकण्याकरीता कचरा संकलन करणा-या कर्मचारा-यावर दबाव यंत्रणेचा वापर करून कालवाहय झालेल्या औषणी आणि वैद्यकीय सामुग्री जाळलेल्या पाणकच-याची विल्हेवाट लावण्यास भाग पाडले. अशा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी व त्या चे सहयोगी कर्मचारी या व्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करून निल बनाची कार्यवाही करण्यात अशी मागणी संस्थापक अध्यक्ष राजेश वारलूजी बेले संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी केली आहे

  • चंद्रपूरमध्ये मातृत्व व बालआरोग्यासाठी किलकारी मोफत सेवा सुरु

    गर्भवती महिला आणि बालआरोग्यासाठी भारत सरकारची मोफत ऑडिओ कॉल सेवा – किलकारी

    Kilkari audio messages for new mothers : चंद्रपूर 27 नोव्हेंबर (News३४) – मातृत्व व बालआरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत किलकारी ही मोबाईल-आधारित मोफत स्वास्थ्य सेवा देशभर प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमधून गरोदर महिला व एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मोबाईलवर स्थानिक भाषेत (मराठीसहित) आठवड्यातून 1 वेळा आरोग्यविषयक मार्गदर्शन ऑडिओ कॉलद्वारे दिले जाते.

    क्राईम – गोवंशीय जनावरांची वाहतूक, २ आरोपीना अटक

    कोण लाभ घेऊ शकतो?

    किमान 4 महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला
    तसेच 1 वर्षाखालील बाळ असलेली कुटुंबे
    कॉल कोणत्या क्रमांकावरून येईल?
    या सेवेचे सर्व अधिकृत कॉल 1600403660 या फोन क्रमांकावरून येतात. नागरिकांनी हा क्रमांक आजच आपल्या मोबाईलमध्ये जतन (Save) करून ठेवावा, जेणेकरून कॉल सहज ओळखता येईल आणि महत्त्वाचा संदेश ऐकणे चुकू नये. येणारा कॉल हा ३ ते ५ मिनिटांचा असुन पुर्ण कॉल ऐकणे आवश्यक आहे.  


    गरोदर महिलेला कॉल कधीपासून येतात?
    गर्भधारणेच्या 13 व्या आठवड्यापासून (किंवा अंदाजे 4 थ्या महिन्यापासून) गरोदर महिलेला किलकारीचा फोन आठवड्यातून 1 वेळा येण्यास प्रारंभ होतो.
    तसेच बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत हे कॉल नियमितपणे प्राप्त होत राहतात.
    कॉल चुकला तर काय?
    एखादा कॉल नागरिकांकडून चुकल्यास, किंवा पुन्हा ऐकायचा असल्यास, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 14423 हा नंबर डायल करून त्याच आठवड्याचा किलकारी संदेश अगदी मोफत पुन्हा ऐकता येतो.


    किलकारी संदेशात काय असते?
    गरोदर महिलेच्या गर्भावस्थेच्या महिन्यानुसार आवश्यक आरोग्य सूचना
    उदा. जर एखादी महिला 5 व्या महिन्यात असेल, तर तिला 5 व्या महिन्यात अपेक्षित मार्गदर्शनच दिले जाते.
    त्याचप्रमाणे, बाळाच्या वयानुसार दर आठवड्याला बाळाच्या आरोग्य व देखभालीबाबत मार्गदर्शन दिले जाते.
    संदेशामध्ये आहार, औषधोपचार, नियमित तपासणी, लसीकरण, आजार प्रतिबंध, आरोग्यसवयी, आणि काळजी घेण्याच्या आवश्यक टिप्सचा समावेश असतो.


    सेवा सुरू करण्यासाठी नोंदणी कशी करावी?
    आपल्या भागातील आशा सेविका, ए.एन.एम. आरोग्य कर्मचारी किंवा जवळील शासकीय आरोग्य केंद्रात जा.
    गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्माची अधिकृत नोंदणी करून घ्या.
    नोंदणी करताना तोच मोबाईल क्रमांक द्या ज्यावर तुम्हाला किलकारीचे कॉल प्राप्त करायचे आहेत.
    ही माहिती ऑनलाइन आर.सी.एच. प्रणाली मध्ये नोंदवली जाईल आणि त्यानंतर कॉल्स आपोआप सुरू होतील.


    सेवेचा मुख्य उद्देश –
    किलकारी सेवेमुळे गरोदर महिला, नवमाता, बाळ, आणि त्यांचे कुटुंब आरोग्यदृष्ट्या जागरूक होऊन निरोगी व आनंदी जीवन जगण्यास सक्षम बनतात. ही सेवा संपूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    अधिक माहितीसाठी –
    नागरिकांनी जवळील शासकीय आरोग्य केंद्र किंवा आशा व एएनएम आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • महानगरपालिका निवडणूक 2025: मतदार यादीसाठी महत्त्वाच्या तारखा बदलल्या!

    voter list reform timeline Maharashtra : चंद्रपूर २७ नोव्हेंबर (News३४) – राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतदार यादी सुधारणा व प्रसिद्धी प्रक्रियेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना मतदार यादीतील हरकती व दुरुस्ती नोंदविण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमातील दिनांकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

    राजुरा बातमी : कांग्रेसच्या आक्रमक भूमिकेने महावितरणची माघार

    निवडणूक कार्यक्रमातील सुधारित टप्पे पुढीलप्रमाणे :

    प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्याचा अंतिम दिनांक –
    आधी निश्चित दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
    सुधारित जाहीर दिनांक : ३ डिसेंबर २०२५

    प्राप्त हरकती/सूचनांवर निर्णय, अंतिम मतदार यादीचे अधिप्रमाणीकरण व प्रसिद्धी –
    आधी निश्चित दिनांक : ५ डिसेंबर २०२५
    सुधारित जाहीर दिनांक : १० डिसेंबर २०२५

    मतदान केंद्र ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे –
     आधी निश्चित दिनांक : ८ डिसेंबर २०२५
     सुधारित जाहीर दिनांक : १५ डिसेंबर २०२५

    मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे –
     आधी निश्चित दिनांक : १२ डिसेंबर २०२५
     सुधारित जाहीर दिनांक : २२ डिसेंबर २०२५

       सदर कार्यक्रमानुसार, सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलातील दुरुस्ती, तसेच हरकती/सूचना आवश्यक पुराव्यासह मुख्य महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत, लेखी स्वरूपात विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. voter list reform timeline Maharashtra


        लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी सुधारणा प्रक्रियेस सहकार्य करावे, असे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहे. हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग यांच्या निर्देशानुसार अमलात आणण्यात येत आहे.

  • चंद्रपूर मनपाची कारवाई! 90 किलो बेकायदा प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यास दंड

    Chandrapur municipal plastic enforcement : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 90 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या या व्यक्तीकडून 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    सोमवार 24 नोव्हेंबर रोजी पठाणपुरा गेट रोडवरून येत असलेल्या एका दुचाकी वाहनावर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वाहून नेण्यात येत असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास आढळून आले. त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की सदर पिशव्या या शंकर आत्राम यांच्या मालकीच्या आहेत. तेव्हा तात्काळ छापा टाकून एकूण 3 पोते (अंदाजे 90 किलो) सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला असून नियमांनुसार 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

    Read Also : चंद्रपूर मनपाची मोहीम बेघरांना दिला निवारा

    चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. Chandrapur municipal plastic enforcement

     एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे,जगदीश शेंद्रे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.