Blog

  • हर घर तिरंगा उपक्रम उत्सव म्हणुन साजरा करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34

    चंद्रपूर – अन्न, वस्त्र आणि निवारा यासह स्वांतत्र ही सुध्द मानवाची मूलभूत गरज आहे. शुरवीर क्रांतीकारकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र अबादीत ठेवत देशाला बलशाली बनविण्याचे काम स्वातंत्र देशातील नागरिक म्हणून आपल्या कडून झाले पाहिजे. हर घर तिरंगा उपक्रम देशात राबविल्या जात आहे.

    हा उपक्रम चंद्रपुरात उत्सव म्हणून प्रत्येक घरी साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
    स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट उंचीचा तर घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचिचा तिरंगा झेंडा उभारला आहे. आज याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, एडीशनल पोलिस अधिक्षक विना जनबंधू, तहसिलदार विजय पवार, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वन विभागाचे जितेंद्र रामगावकर, मंगेश खवले, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, एस. टी महामंडळच्या जिल्हा नियंत्रक स्मिता सुतावणे, घुग्घूसचे पोलिस निरीक्षक आसिफ शेख, मधूकर मालेकर, काॅंग्रेस घुग्घूस शहर अध्यक्ष राजू रेड्डू, यंग चांदा ब्रिगेडचे इमरान शेख, उषा अगदारी, स्वप्नील वाढई, मुन्ना लोढे, नविन मोरे आदींची उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तिरंगा हा देशाची शान आहे. ऊर्जेचा स्त्रोत आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंगा प्रती आदर आहे. त्यामुळे केद्र सरकारने हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपूरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमा अंतर्गत महानगर पालिकेच्या वतीने तिरंगा वितरीत केल्या जाणार आहे. नागरिकांनी तो आपल्या घरी लावाला असे आवाहण यावेळी त्यांनी केले.

    राज्यातील प्रत्येक तालुक्यात 75 ते 100 फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा अशी भुमिका राज्य सरकारची होती. आपणही यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घुस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी लहरत राहावा याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. याचे काम पुर्ण झाले आहे. आज याचे लोकार्पण पार पडले. आज पासुन येथे स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला तिरंगा उभा राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    जगातील सर्वात चांगली लोकशाही व्यवस्था आपल्याला मिळाली आहे. याचे जतन आणि पालन करणे आपल्या सर्वांचे कत्यव्य आहे. आज येथे 100 फुट उंचिचा तिरंगा ध्वजाचे लोकापर्ण झाले आहे. आता हे पवित्र स्थान झाले आहे. याचे पावित्र कायम राहिले पाहिजे. येथे असलेल्या भिंतीपण बोलक्या करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.

  • चंद्रपूर शहरात निघाली भव्य तिरंगा रॅली

    News34

    चंद्रपूर –  माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक आझाद बगीचा दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

    सर्व शालेय मुलांनी हातात राष्ट्रध्वज उंचावुन मनपा कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण केले. याप्रसंगी विविध घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी परिसर दणाणुन सोडला. गांधी चौक ते आझाद बगीचापर्यंत रॅलीचा मार्ग होता,आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला व पंचप्रण शपथ घेण्यात आली.

    या रॅलीत शहरातील छोटुभाई पटेल शाळा,एफईएस गर्ल्स ,सिटी कन्या,हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय,लोकमान्य शाळा,न्यू इंग्लीश,किदवई तसेच नूतन माध्यमिक अश्या १० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मनपा अधिकारी – कर्मचारी व शाळांतील हजार विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता.

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात 100 फूट तर घुग्गुस येथे 75 फुटाच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण

    News34

    चंद्रपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या चंद्रपूर येथील 100 फुट उंचीचा आणि घूग्घूस येथील 75 फुट उंचिचा तिरंगा झेंड्याचे उ्दया रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

    चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट आणि घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचीचा तिरंगा झेंड्यासाठी स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून सदर काम पूर्ण झाले आहे. उदया सकाळी आठ वाजता याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते केल्या जाणार आहे.

    तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34

     

    चंद्रपूर, : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच तरुणांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २०४७ साली १५ ऑगस्टचा तिरंगा भारताच्या आकाशात उंच फडकेल, तेव्हा संपूर्ण जग तिरंग्याला सलाम करेल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

    प्रियदर्शनी सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भर भारत विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे नेते रामपाल सिंग, भाजपा आत्मनिर्भर भारत आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई बुटले, भाजपा चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपाचे नेते नामदेव डाहुले, स्पर्धेचे परीक्षक भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, बिपीन गुप्ता, प्रशांत ठाकरे, एसएनडीटीचे संचालक डॉ. इंगोले, आत्मनिर्भर भारतचे महामंत्री राकेश बोमनवार, रणजित डवरे, उपाध्यक्ष हिना खान, सदस्य रंजना जेगटे, लीलावती रविदास, प्रभाताई गुडदे, विठ्ठलराव डुकरे, चांदभाई, सचिन कोतपल्लीवार, राकेश गौरकार, आयोजनात विशेष परिश्रम घेणारे सोहम बुटले आदींची उपस्थिती होती.

    विद्यार्थ्यांची कल्पकता व त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘परिसंवादांच्या माध्यमातून विचार मांडण्याची ‌व विचार व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास दृढ होण्यास निश्चितच मदत होईल.

    फिल्मसिटीसारखे व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आले आहे हे कौतुकास्पद आहे.’ पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘स्पर्धेमध्ये समान नागरी कायद्यावर विचार मांडण्यात आले आणि चर्चाही करण्यात आली.देशामध्ये धर्म, जात, रंग, वंश, वय व शिक्षण यामध्ये विविधता आहे. मात्र, नागरिकांच्या हृदयामध्ये संविधानाचा भाव आणि भावना असणे आवश्यक आहे. त्यासोबतच भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा भाग व्हावा असा निर्धार देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही समाजामध्ये सहजता, सरलता व सुलभता निर्माण करेल. त्यामुळे ‘हम साथ साथ है’ या भावनेने समाज निश्चितच पुढे जाईल.’ या स्पर्धेत विदर्भाच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

    ज्ञानातून साधावे समाजहित
    ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ याप्रमाणे महाराष्ट्राच्या विदर्भातील नागरीकांचे योगदान सोनेरी अक्षरात लिहिले जाईल. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विचार मांडले. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व वैचारिक क्षमतेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता इतरांसाठी व समाजासाठी करावा. या ज्ञानातून समाज हितासाठी योगदान देण्याची भावना ठेवावी, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील या भागात विजेची बिकट समस्या

    News34

    पोंभुर्णा / पाणी पाऊस असो वा नसो, तालुक्यात विजेची समस्या नित्याचीच झाली आहे. रोजच्या रोज दिवसभरात कितीवेळा पुरवठा खंडीत होतो, हे सांगणेसुध्दा कठीण होऊन बसले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विद्युत पुरवठा विभागाविषयी समस्या जाणून घेऊन शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) पोंभुर्णा शिवसेनेनेच्या वतीने येथील विद्युत वितरण कंपनी ला निवेदन देण्यात आले.

     

    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बल्लारशाह विभागाअंतर्गत उपविभाग पोंभुर्णा येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील आष्टा,घोसरी, देवाडा खुर्द, उमरी पोतदार,या क्षेत्रासाठी विद्युत तंत्रज्ञ (लाईनमेन) नसून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.त्यामुळे ते कर्मचारी त्यांचा विभाग सांभाळून अतिरिक्त दिलेल्या विभाकडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी व अनेक गावातील नागरिकांना होत आहे.नेमका कोणत्या वायरमनकडे भार सोपविण्यात आला आहे, हेच माहित नसल्याने संपर्क कोणाशी करायचा हाच मोठा प्रश्न आहे.

    देवाडा क्षेत्रात देवाडा खुर्द,जामतुकुम, जामखुर्द, जाम रयतवारी,रामपूर दीक्षित,चेक पोंभुर्णा असे सहा गावांचा तर आष्टा क्षेत्रात आष्टा, वेळवा माल, सेल्लुर नागरेड्डी,चेक आष्टा, सोनापूर,चेक नवेगाव,असा सहा गावांचा तर उमरी क्षेत्रात उमरी पोतदार,घनोटी नं.१,घनोटी नं.२, विहिरगाव, आंबेधानोरा,सातारा तुकुम,सातारा भोसले,सातारा कोमटी, आंबईतुकूम असा नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

    मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.धान व मिरचीची रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना रोपे जगवण्यासाठी मजुराकरवी डोक्यावर घागर घेऊन दिवसभर पाणी घालावे लागत आहे. शेतातील मोटारपंप कुचकामी ठरत आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, डीओ जाणे,फेज जाणे,अश्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचे शेतकरी व सामान्य नागरिक मेताकुटीस आला आहे.

    म्हणून या सर्व समस्यांचे निराकरण करता यावे म्हणून शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) रोजी पोंभूर्णा शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,युवासेनेचे रजत ढोंगे, सुमित मानकर,राहुल गगपल्लीवार,सुनील कावटवार, समीर बुरांडे, वासुदेव गोरंतवार,विनोद जाधव, वेदांत आगरकर,विश्वास मडावी,सचिन मडावी,एकनाथ कुळमेथे, अरविंद कोडापे,इत्यादी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील महिला सरपंचाचा पंतप्रधान मोदी करणार सत्कार

    News34

    15 August 2023

    चंद्रपूर :  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्हयातील “हर घर जल” योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमती मेश्राम यांचा सत्कार होणार आहे.

     

    चंद्रपुर जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पोहचले आहे. जिल्हयातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी चांगले काम केले आहे.

    लाखापुर येथील 140 कुटुंबापैकी 101 नागरिकांच्या घरी जल जीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन मिळाले आहे, विशेष म्हणजे यासाठी सरपंच मेश्राम यांनी गावातील पाण्याचा स्त्रोत म्हणून विहिरीच्या आत बोअर मारली आहे, कारण गावात जवळपास नदी नसल्याने त्यांनी विहिरीतून पाण्याचा उपसा करण्याचे काम करीत सदर योजना पूर्णत्वास आणली.

    महाराष्ट्र राज्यात फक्त कोल्हापूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे ही योजना पूर्णत्वास आली आहे.

    केंद्र शासनाने चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे.

    या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.
    चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    चंद्रपुर जिल्हयातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपुर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
    विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात भाजप युवा मोर्चाचे शिवम सिंग यांनी बांधले शिवबंधन

    News34

    चंद्रपूर – राज्य व जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या राजकारणाचे बदलते स्वरूप सध्या नागरिक बघत आहे, मात्र शिवसेना ठाकरे गट या बदलत्या व सूडाच्या राजकारणाला बगल देत आपली चांगली प्रतिमा नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरत असून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकजण शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहे.

    चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ महामंत्री, जिल्हा सचिव उत्तर भारतीय मोर्चा तसेच युवा वॉरियर्स चे अध्यक्ष शिवम रामप्रवेश सिंग यांनी आज शिवसेना कार्यालय, चंद्रपूर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे यांच्या मार्गर्शनात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला.

    यावेळी वसीम भाई शेख,सिकंदर खान,सोनू ठाकूर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रिजवान पठाण, शहरप्रमुख शाहबाज शेख, मनीष दास, बादल डे उपस्थित होते.

  • चंद्रपूर महावितरणची तत्पर सेवा अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी

    News34

    चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बाबूपेठ शाखा कार्यालय भागातील रहिवासी कनकतारा मलय्या सौदारी यांनी महावितरण कडे नविन वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी देण्यात आली.

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुक सेवा देण्याची सुचना केली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी व अभियंता यांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तत्परतेने देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर परिमंडल अंतर्गत ग्राहकांना वीज जोडण्या तसेच ग्राहकांच्या विविध तक्रारींचे वेळेत निरासन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

    महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु करुन श्री. कनकतारा सोदारी यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून चंद्रपूर उपविभाग क्र. 1 येथे सद्दस्थितीत पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या संपुर्ण ग्राहकांच्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत व ही मोहीम चंद्रपूर परिमंडलांतर्गत सर्वत्र राबविण्यात येत आहे.

     

    त्या अनुषंगाने मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडल यांनी चंद्रपूर उपविभाग क्र. 1 चे उपकार्यकारी अभियंता श्री वसंत हेडाऊ व संपूर्ण चमुचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी श्री सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, श्रीमती संध्या चिवडे, अधिक्षक अभियंता, चंद्रपूर प्रविभाग, चंद्रशेखर दारव्हेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग, किर्ती चांभारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, वसंत हेडाऊ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चंद्रपूर उपविभाग क्र. 1 साहील टाके, सहाय्यक अभियंता बाबूपेठ शाखा कार्यालय व सर्व जनमित्र उपस्थित होते.

  • त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सुनीता पाटील

    News34

    चंद्रपूर – वरोरा शहरात पोलिसांनी अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहविक्री चा व्यापाराचे मोठे नेटवर्क उघडकीस आणत त्या प्रकरणात अनेकांना अटक केली. Viral videos

    मात्र वरोरा तालुक्यातील काही तथाकथित नेत्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलींची भेट घेत तिच्यासोबत आक्षेपार्ह विचारणा करीत व्हिडीओ बनविला ते तितक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, त्यामुळे पीडित मुलीची ओळख त्यांनीं पटवून दिली. Sex racket

    अत्याचार पीडित कोणत्याही प्रकरणात पीडितेची ओळख बाहेर आणणे हा मोठा गुन्हा आहे असे असताना सुद्धा मेश्राम व जीवतोडे यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना केली आहे.

    त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये मेश्राम हे तिला आक्षेपार्ह विचारणा करीत जणू त्या अल्पवयीन मुलीची खिल्ली उडवीत आहे असे दिसत होते, अश्या विकृत मानसिकतेच्या तथाकथित नेत्यांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कुणी असे कृत्य करणार नाही अशी मागणी चंद्रपूर महिला अध्यक्ष सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, महिला पदाधिकारी राणी जैन, लक्ष्मण पाटील व अजय आंबेकर यांनी केली आहे.

    वरोरा प्रमाणे चंद्रपूर शहरात सुद्धा असे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना दिली आहे.

     

  • चंद्रपूर शहरातील या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार यांचं नाव

    News34

     

    चंद्रपूर : शहरातून बल्लारपुरकडे जाणारा रस्ता बागला चौक ते अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले या रस्त्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.

     

    मोठा गाजावाजा केला गेला तसेच रस्त्याचे फलक शहरात लावण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदाराने तेथून पळ काढल्याने जनतेमध्ये प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आम आदमी पार्टी च्या टीमने अधिक माहिती घेतली असता अधिकच्या कमिशन खोरी मुळे कंत्राटदाराचा वाद झाला असे कळले.कमिशनखोरीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप आप ने केला आहे.

    या रोड वरती जिल्ह्यातील विद्युत विभागाचे मुख्य कार्यालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने तथा बल्लारपूर कडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज रहदारी असते. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात.

    आज आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात तथा राजु कुडे यांच्या नेतृत्वात या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार खड्डा रस्ता असे नावं देण्यात आले. सोबतच हा रस्ता चोरीला गेला असल्याने आमदार यांनी हा रस्ता तात्काळ शोधून आणून जनतेच्या सेवेत तत्पर करून द्यावा. अशी विनंती सुध्दा करण्यात आलेली आहे.
    तात्काळ काम झाले नाही तर जनतेला सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करू असा इशारा राजु कुडे यांनी दिला.

    यावेळी आप चे शहर सचिव राजू कुडे, झोन सह संयोजक जयदेव देवगडे, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, प्रशांत रामटेके, सागर बोबडे, भिमराज बागेसर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.