Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चलती ट्रेन से गिरा युवक

    News34 chandrapur

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉 स्थानीय भगत सिंग वार्ड बल्लारपुर के निवासी दसरथ शिवशंकर निषाद (20) की मुंबई से आनेवाली लोकमान्य तिलक एक्सप्रेस क्रमांक 01127 से चलती ट्रेन से गिरने से मौत होने कि घटना सामने आई है सूत्रों से मिली जानकारी के अनुसार 3 अक्टूबर को मुंबई से बल्लारपुर आते समय 4 अक्टूबर की सुबह साढ़े पांच बजे के दरम्यान मलकापुर स्टेशन पार करने के बाद नंदुरा गांव के समीप गिरने कि जानकारी सामने आई है।

     

    वहां से अकोला इलाज के लिए लेकर जाने के पश्चात नागपुर के लिए रेफर किया गया जहां लेकर जाने के दौरान दशरथ को नागपुर के डॉक्टरों ने मृत घोषित कर पोस्टमार्टम किया है, 5 अक्टूबर को बल्लारपुर में घर में लाश लाने पर परिसर में मातम सा माहौल छाया रहा।

     

    👉 घर पर माता पिता व परिजनों का रो रोकर बुरा हाल रहा दोपहर को परिजनों व वार्ड वासियों की उपस्थिति में अंतिम संस्कार किया गया है माता पिता सब्जी भाजी बेचकर परिवार का भरण पोषण करते है मुंबई के किसी बर्फ फैक्टरी में काम कर लौटने के दौरान यह हादसा हुआ है ।

  • चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.
    यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. Realme चा 5G मोबाईल फक्त 11 हजार 999 रुपयात, आजच खरेदी करा amazon वर

     

    तिरडी वर औषधांचा हार चढवत प्रशासनाच लक्ष वेधण्यात आले, तसेच यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शासनाकडे अनूपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, गेली दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, सोनुग्राफी करीता महिने महिन्याची तारीख रुग्णांना न देता, त्यावर त्वरित उपययोजना करावी, कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून अधिष्ठाता यांचे कार्यालयात रखडलेले उपचाराचे बिल त्वरित अदा करण्यात यावे, खाटांची संख्या वाढविण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या, विविध फलक दाखवीत निद्रावस्थेत असलेल्या शासनाच्या व सरकारच्या ढिम्म कारभाराचा यावेळी निषेध केला.

     

    यावेळी उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत खाली असलेल्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. यावेळी शासनाकडून खरेदीत, भरीत प्रक्रियेत, व औषधी पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई यामुळे अनेक अडचणींना स्थानिक अधिकाऱ्यांना व डॉक्टर यांना समोर जावे लागत आहे हे स्पष्ट झाले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवगत करून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिले.

     

    सदर आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जनहित सेना जिल्हाध्यक्ष सुनील गुडे,तालुअक अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, अक्षय चौधरी, राज वर्मा,वर्षा भोमले, युगल ठेंगे, नितेश जुमडे, करण नायर, मयुर मदनकर, कार्तिक खंगार,सुयोग धनवलकर, राकेश पराडकर, तुषार येरमे,पियुष धुपे,असलम शेख, अभी उमरे, विनोद रेब्बावार,ऋषि बालमवार, कार्तिक खंगार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

    News34 chandrapur

    घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे.

     

    6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले.

     

    सदर ट्रॅक्टर जप्त करीत नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले, यावेळी मंडळ अधिकारी गनफाडे, तलाठी दूवावार, झिटे, चुरे कोतवाल व शिपाई उपस्थित होते.

    तहसीलदार पवार यांच्या कारवाईने वाळू तस्करांचे काही कालावधीसाठी धाबे दणाणले आहे.

  • 15 तासांनी प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन मागे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याने रात्री आठच्या सुमारास विरूगिरी आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून सहा तरूणांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता.

    आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे यांचा समावेश आहे. भूसंपादन कराराचे उल्लंघन करणाऱ्या अंबुजा कंपनीचे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमीनी परत द्याव्या नाहीतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये स्थायी नोकरी द्यावी आदी मागण्यां आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या.

     

    कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीच्या मराठा सिमेंट कंपनीने शासनासोबत केलेल्या भूसंपादन करारातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य न देता प्रकल्पग्रस्त आदिवासी व गैर-आदिवासी शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवले. त्याऐवजी स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दाखले तयार करून बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना डावलल्याने स्थानिक तरूण व प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

     

    कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वंचीत ठेवल्याने संतापलेले सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी पिंपळगाव येथील आकाश लोडे, अविनाश विधाते, उपरवाहीचे तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर व लखमापूर येथील सचिन पिंपळशेंडे यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता कंपनी परिसरातील मोबाईलच्या उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

     

    पहाटे पाच ते सायंकाळी 8 वाजतापर्यंत सहा युवक विरूगिरी स्टाईलने टॉवरवर आंदोलन करीत होते. उपविभागीय अधिकारी यांन या आंदेालनाची दखल घेत घटनास्थळी दाखल झाले. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांना प्राधान्याने घेऊन नागपूरात या विषयी आठवडाभरात बैठक लावून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

  • शिक्षक सेनेची मध्यस्ती आणि डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबाबत शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो मृत्यू आणि महाराष्ट्रभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यामुळे सरकार तोंडघशी पडली आहे, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे शंभर प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. चंद्रपुरात गेल्या ४ महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे ते संपावर गेले आहेत.

     

    चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व इतर अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना केवळ आश्वासने देत होते आणि त्यांच्या देयकाचा निधी इतरत्र वापरत होते. त्यामुळे या डॉक्टरांना संपावर जावे लागले मात्र गेल्या 10 दिवसांपासून तेच आश्वासन दिले जात होते. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य पाहून शिक्षक सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप करत अवघ्या एका दिवसात प्रकरण पूर्णपणे मिटवले.

     

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित शिक्षक सेनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व गडचिरोली संपर्क प्रमुख राजेश नायडू हे 6 ऑक्टोम्बर ला सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी या डॉक्टरांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टर व आरोग्य विभाग यांच्यात मध्यस्थी करून ही समस्या तात्काळ जागेवरच सोडवण्यात आली.

     

    राजेश नायडू यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांच्या गटाशी तात्काळ चर्चा करून कोषागाराशी बोलून उद्यापर्यंत पगार देण्यास सांगितले आणि डॉक्टरांना तातडीने कामाला येण्याचा सल्ला दिला.

    संपावर असलेल्या डॉक्टरांनी आपसात चर्चा करून व राजेश नायडू यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देत संप तातडीने संपवून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्यापर्यंत आमची देणी न दिल्यास किंवा संपाबाबत आमच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्हाला आमच्या हक्कासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल, असेही ते म्हणाले.

    यानंतर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनीही जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आभार मानले मात्र दिलेले आश्वासन पाळले नाही तर आता या डॉक्टरांसह शिक्षक सेनेच्या वतीने पूर्ण ताकदीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. हा प्रश्न सोडवल्याबद्दल डॉक्टरांनी शिक्षक सेनेचेही आभार व्यक्त केले.

  • चंद्रपूर महानगरपालिकेने या मशीनवर घातली बंदी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

     

    शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर मशीनचाही वापर केला जातो ज्याला सीओटू पेपर ब्लोवर मशीन म्हणतात. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात कागदांचे अथवा प्लास्टीक कागदांचे तुकडे एका वेळेस हवेत उधळल्या जातात. हे दृश्य पाहण्यास मोहक वाटत असले तरी त्या एका ब्लास्टने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर जमा होतो, मग रॅली अथवा कार्यक्रमात उपस्थीत लोकांच्या चालण्याने ते कागद रस्त्यावर असे घट्ट चिपकतात कि, ते काढतांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना फार त्रास होतो.

     

    आज आपल्या शहरात कुठलीही रॅली निघाली तरी ती रॅली संपताच रस्ते स्वच्छ आढळुन येतात कारण मनपा स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेप्रती जागरूक असतात. नागरीक म्हणुन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आपलेही कर्तव्य आहे तेव्हा मनपातर्फे आवाहन करण्यात येत आहे कि,सार्वजनिक कार्यक्रम अथवा रॅलीमध्ये पेपर ब्लोवर मशीनचा वापर करून कागद अथवा प्लास्टीक तुकडे हवेत उडवु नये अन्यथा सदर मशीन,सदर वाहन जप्त करण्यात येऊन संबंधितांवर घनकचरा अधिनियमानुसार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

  • सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात चंद्रपुरातील हजारो तरुण रस्त्यावर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे / निदर्शने आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण तथा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत होती. हजारो विद्यार्थी दुपारी एक वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत होते.

     

    या निर्देशनाच्या दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांनी तथा विद्यार्थ्यांनी कंत्राटीकरणाच्या विरोधातील त्यांचा राग रोष तीव्र शब्दात व्यक्त केला. सरकारने कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय हा किती अन्यायकारक आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

     

    सोबतच या धरणे आंदोलनामध्ये एक नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीवर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, विद्यार्थी हितासाठी वीस पटाखालील शाळा बंद होऊ नये यासाठी समोर शाळा संकल्पना रद्द करावी, राज्यातील विविध कार्यालयात रिक्त असलेली तथा शिक्षक व प्राध्यापकांची पदे तात्काळ करण्यात यावी, शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची सुरू केलेली वसुली तात्काळ थांबून स्पर्धा परीक्षेचे शुल्क 100 रुपये करण्यात यावं तलाठी पदभरती तसेच विविध पदभरती होणाऱ्या पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी कडक असा कायदा करण्यात यावा, इत्यादी मागण्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून वाचा फोडली.

     

    यावेळी विविध महाविद्यालयातील चंद्रपूर शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध संघटनेचे पदाधिकारी, जुनी पेन्शन कर्मचारी संघटना, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर विविध शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कर्मचारी या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

     

    या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास येणाऱ्या पंधरा दिवसानंतर एक मोठा आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय या धरणे आंदोलनाच्या दरम्यान घेण्यात आला. या धरणे आंदोलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व समन्वयक सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

     

    सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

  • नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल

    News 34chandrapur

    चंद्रपूर : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सदर विमानाने टेकऑफ, लँडींग व हवाई मार्गात येणा-या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक बाबींचे निरीक्षण केले.

     

    एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे. याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे पूर्तता करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. याच अनुषंगाने आज (दि.6) मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली.

     

    सदर विमानाचे वैमानिक कॅप्टन इझिलारसन व त्यांचे दोन सहकारी अभियंते सादत बेग आणि हरीष कश्यप हे विमानानेच नागपूरवरून मोरवा विमानतळावर दाखल झाले. काही वेळ उड्डाण करून निरीक्षण केल्यानंतर सदर विमान नागपूरकडे रवाना झाले.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा नोडल अधिकारी अजय चंद्रपट्टण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विष्णू ओडपल्लीवार, अमित पावडे आदी उपस्थित होते.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात अंबुजा सिमेंट प्रकल्पग्रस्तांचं विरुगिरी आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठे उद्योग अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र हे सर्व उद्योग कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे, गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांनी 6 ऑक्टोबर ला सकाळपासून विरुगुरी आंदोलन सुरू केले आहे.

    3 कामगार गगनचुंबी टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे, अंबुजा सिमेंट कंपनी अडाणी समूहाकडे गेल्याने त्यांनी भूसंपादन कायद्याचे उल्लंघन केले, ही सर्व बाब 4 वर्षांपूर्वी चौकशीत सिद्ध झाली मात्र त्यावर काही कारवाई केल्या गेली नाही.

     

    4 वर्षापूर्वी शासनाने कंपनीला कारवाईची नोटीस सुद्धा पाठवली मात्र कारवाई फक्त कागदोपत्री मर्यादित राहिली, सरकार सर्व नियम धाब्यावर बसवून अंबुजा सिमेंट कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, भूसंपादन करार रद्द करीत प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकरी च्या मागणीसाठी सकाळपासून प्रकल्पग्रस्तांनी टॉवर वर चढत विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे.

     

    अंबुजा गो बॅक, अडाणी गो बॅक ची नारेबाजी कामगार करीत असून आम्हांला न्याय द्या अन्यथा आम्ही जीवाचे बरेवाईट करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की

    News34 chandrapur

    राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत.

     

    ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात यलगार पुकारला. काल पांढरपौनी गावातून भव्य मोर्चा काढत, अवैध दारू बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत राजुरा शहर गाठून पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेराव घातला. येथील अधिकाऱ्यांना गावातील अवैध दारू बंद करण्याचे निवेदन देत पूर्णपणे अवैध दारू बंद करण्यात यावी अन्यथा या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम होऊन पांढरपौनी गावांमध्ये सुरू असलेले जवळपास सर्वच अवैध दारू विक्री केंद्रे तातडीने बंद झालित मात्र ही अवैध दारू बंदी केवळ फार्स ठरते की काय असे वाटायला लागले आहे. कारण गावापासून थोड्याच अंतरावर असलेले बसस्थानक आणि पांढरपौनी साईडिंग येथे मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा वळवला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरूच आहे.

     

    आश्चर्याची बाब म्हणजे आज गावात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतः महिलांनीच पुढाकार घेऊन गस्त वाढवली. या दरम्यान सकाळी १० : ३० च्या सुमारास गावातील एका अवैध दारू विक्रेत्याच्या घरून दारूच्या बाटला पोत्यात भरून बुलेट गाडीवर घेऊन जाणाऱ्या काही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न स्थानिक महिलांनी केला. मात्र या तरुणांनी महिलांच धक्काबुक्की करून पळ काढला. यात एक महिला जखमी झाली आहे. या घटने नंतर गावकर्‍यांनी राजुरा पोलीस ठाण्यात सुचना केली असता संबंधितांनी आपण फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करू शकतो असे सांगितले मात्र पोलिसांकडून तातडीने मदत होत नसल्याने स्थानिक जनतेत कमालीचा असंतोष पहायला मिळत आहे.

     

    यानंतर कुठे माशी शिंकली की काय तासाभरात पोलिसांची जिप्सी गावात आली. दरम्यान पोलीस यायच्या आधी महिलांना एका अवैध दारू विकणाऱ्या महिलेला ग्रामपंचायत मध्ये पकडून ठेवले होते आणि पोलिस आल्यावर अवैध दारू विक्रेत्या महिलेच्या घरात देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटलांचा ढिगच आढळून आला तर काही दारूच्या बाटल्या सापडल्याचेही महिलांनी सांगितले.

     

    पोलीस विभाग आता त्या महिलेसह इतर चार ते पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि पोलीस कारवाई होण्याच्या शक्यतेने सर्व अवैध दारू विक्रेत्यांनी जवळील स्टाक अन्यत्र हलविला तसेच घराशेजारी असलेल्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावली असल्याने पोलिसांच्या हाती फारसे काही सापडले नाही. त्या महिलेच्या घरून बुलेटवर दारू घेऊन जाणारे ते तरूण गडचांदूर येथील असून त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीशी संबध आहे का याचाही शोध घेऊन कठोर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. त्या बुलेटचा नंबरही गावकर्‍यांनी पोलीसांना सांगितल्याचे कळते.

     

    एकंदरीत अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी गावातील महिलांनी चंग बांधला असून महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास त्यांचे मनोबल वाढून येणाऱ्या काळात विरोध करणाऱ्यांपैकी काही निवडक नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची असेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.