Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात 28 व 29 ऑक्टोबर रोजी फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रतिभावान आणि फुटबॉल खेळाडूचा शोध घेऊन त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या टीमची निवड करून जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे व टीमला प्रशिक्षित करून दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या फुटबॉल लीग सामन्यांच्या निवड चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

     

    क्रीडा चाचण्यांचे आयोजन व नियोजनाकरीता सदर संस्थेमार्फत प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया दि. 28 व 29 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे.

     

    याकरीता दिल्ली येथील, संपूर्ण देशात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्याकरीता अग्रेसर असलेली इंडिया खेलो फुटबॉल या संस्थेमार्फत जिल्ह्याची मागील वर्षीपासून निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 15 व 17 वर्ष वयोगटातील मुले फुटबॉल खेळाडूंची निवड करण्यात येणार असून निवड चाचण्यांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलातील अद्ययावत फुटबॉल मैदानावर करण्यात येणार आहे. चाचण्यांच्या आयोजनाकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पुढाकार घेऊन सदर संस्थेच्या माध्यमातून चाचण्या होण्याकरीता नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास 5 लक्ष रुपये निधीची तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

     

    फुटबॉल खेळाडूंकरीता ही सुवर्णसंधी असल्याने याचा लाभ जिल्ह्यातील सर्व 15 व 17 वर्षातील फुटबॉलपटूंनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. चाचण्यांचे योग्य नियोजन व खेळाडूंची निवड प्रक्रिया उत्तम व्हावी याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  • चंद्रपुर शहरात दारू पिऊन दुचाकीवर युवकांचा धिंगाणा, दोघांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील 4 दिवसात घडलेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.

     

    मृतांमध्ये 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे, पहिला अपघात 20 ऑक्टोबर ला बाबूपेठ येथे घडला, यामध्ये ट्रिपल सिट वाहनांवर मस्ती करीत असलेल्या मुलांनी दुचाकी वाहनाला जबर धडक दिली, या धडकेत 8 वर्षीय विहान बोरकर या मुलाचा मृत्यू झाला.

    22 ऑक्टोबर ला शहरातील रामसेतू पुलाजवळ झालेल्या अपघातात लहुजी नगर निवासी 2 युवकांचा समोरासमोर झालेल्या धडकेत मृत्यू झाला, मृतक युवक आपले वाहन वेगात चालवीत होते, वाहनवरून नियंत्रण सुटल्याने समोरून येत असलेल्या दुचाकीला त्यांनी जबर धडक दिली.

     

    23 ऑक्टोबर ला लखमापूर येथील 3 युवक दारूच्या नशेत दुचाकी वाहनांवर ट्रिपल सिट जात असता त्यांचे वाहनवरून नियंत्रण सुटले.

    दुपारी 2 वाजता लखमापूर येथील जितू सिन्हा, 23 वर्षीय चेतन दुर्वे व 28 वर्षीय संतोष साहू हे आपल्या दुचाकी वाहनाने लखमापूर येथे जात होते.

     

    दारूच्या नशेत असलेले युवक अतिवेगात वाहन चालवीत होते, विद्या निकेतन शाळेसमोर पोहचताच काही वेळात त्यांचे वाहनावरून नियंत्रण सुटले, आणि दुचाकी डिव्हायडर ला घासत निघाली, काही क्षणात तिघेजण दुचाकीवरून फेकल्या गेले, मात्र त्यानंतर दुचाकी वाहन तब्बल 100 मीटर चालत गेले.

     

    प्रत्यक्षदर्शी यांच्या नुसार युवकांच्या वाहनाचा वेग हा 100 किलोमीटर पेक्षा जास्त होता, या अपघातात चेतन दुर्वे व संतोष साहू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर जितू सिन्हा किरकोळ जखमी झाला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

    चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून युवक धूम स्टाईल वाहने चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, यावर आता आळा घालणे गरजेचे झाले आहे, आता तर रस्त्यावर पायदळ चालणारे नागरिकही बाईक रेसर वाहन चालकापासून सुरक्षित नाही.

    सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहे.

  • शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे – विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोशाणे शेती नष्ट झाली आहे. तरी नुकसान भरपाईचा पत्ता नाही. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.

     

    नियमित कर्ज भरनाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नाही. परंतु उद्योगपतींचे 7 हजार कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसे नाही. म्हणून आता संतोष रावत यांचे पाठीमागे राहून कांग्रेसला निवडून दिले पाहिजे असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारो शेतकऱ्यांसमोर केले. याप्रसंगी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ‌ रावत यांनाही शेतकऱ्यांच्या समस्या, नजुल व वनहक्क धारकांना जमिनीचे पट्टे दिल्या गेले नाही.

     

    हे मार्गी लावण्याचे विजुभाऊ मार्गी लावतील परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जाण्याची तयारी आपण ठेवावे असे मार्गदर्शन केले. उपस्थित युवा नेत्या शिवानी ताई वडेट्टीवार यांनी पालक मंत्र्याच्या क्षेत्रात शेतकऱ्यांची अवदशा होणे ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले. मोर्चात तालुक्यातील २५०० च्या वर दुष्काळ ग्रस्त शेतकरी व महिला उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन उपविभागीय अधिकारी मेश्राम,तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना विजय वडेट्टीवार व संतोशसिंह रावत यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी ,वन परिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले. मंचावर सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, शिवा राव, माजी जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा डांगे, माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,ओबीसी सचिव गुरुदास चौधरी,दीपक वाढई यांचेसह महिला अध्यक्षा,युवक अध्यक्ष,व तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाच्या आयोजनासाठी बजार समितीचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व सरपंच, कांग्रेस पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

     

  • ओबीसी व मराठा आरक्षण बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान

    News34 chandrapur

     

     

    नागपूर – ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

     

    नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. ही भूमिका आधीच मी स्पष्ट केली आहे. फक्त पद्धती काय असावी, हे ठरवावे लागेल. बिहारमध्ये या जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल. त्यामुळे योग्य निर्णय याबाबत सरकार करेल. मागासवर्ग आयोगातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुद्धा पूर्ण केली जाईल.

     

    मराठा आरक्षण प्रश्नाचा विचार केला तर मागच्या काळात आमच्याच सरकारने मराठा आरक्षण दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकले. तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकलेले हे एकमेव आरक्षण होते. आमच्या काळात सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यावर स्थगिती आली नाही. नंतरच्या काळात काय झाले, त्या राजकारणावर बोलण्याची ही वेळ नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली आहे आणि आम्ही सारे त्यांच्या भूमिकेसोबत आहोत. आरक्षण टिकले नाही तर सरकारवर टीका होते. त्यामुळे घाईत कोणता निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • चंद्रपूर शहरात अपघाताची मालिका सुरुचं, 1 युवक ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात धूम स्टाईल दुचाकी वाहन चालविणाऱ्या चालकाचा धुमाकूळ सतत वाढत आहे, याचा परिणाम 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 8 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला, सदर घटनेला 2 दिवस पूर्ण होत नाही तर पुन्हा दुचाकी अपघातात एका युवकांला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    22 ऑक्टोबर ला शहरातील दाताला कडे जाणाऱ्या रामसेतू पुलाजवळ दुचाकीस्वार 2 युवक भरधाव वेगात वाहन चालवीत होते, रामसेतू पुलाच्या खाली उतरल्यावर एका वृद्धाला दुचाकीस्वारांनी जोरदार धडक दिली, तो वृद्ध इसम गंभीर जखमी झाला मात्र त्या युवकांमधील एकाला आपला जीव गमवावा लागला.

     

    जिजाऊ लॉन च्या आधी असलेल्या डिव्हायडर ला त्या 2 युवकाची दुचाकी जोरदारपणे आदळली, यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

    दोन्ही युवक हे चंद्रपुरातील लहुजी नगर निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

     

    चंद्रपूर शहरात दुचाकी स्वरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, मात्र यावर नियंत्रण करणारी वाहतूक शाखा जणू अनियंत्रित झाली की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    19 ऑक्टोबर ला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाच्या आढावा वाढते अपघात कसे कमी करता येणार याकडे लक्ष देण्याची निर्देश दिले होते.

     

    मात्र त्यांनतर सुद्धा शहरात अपघाताची जणू मालिका सुरू झाली असे चित्र निर्माण झाले आहे.

    महामार्गावर होणारे अपघात अनियंत्रित आहे मात्र आता शहरात होणारे अपघात गंभीर समस्या बनली आहे.

     

    विशेष म्हणजे चंद्रपूर वाहतूक शाखेत 2 पोलीस निरीक्षक आहे, त्यानंतरही सुद्धा शहरात दुचाकी स्वारांचा धुमाकूळ सुरूचं आहे, आता तरी वाहतूक शाखेने यावर तात्काळ तोडगा काढत अश्या अनियंत्रित दुचाकीस्वारांवर नियंत्रण घालावे अन्यथा भविष्यात शहरातील अपघात पोलिसांसमोर आव्हान उभं करतील हे निश्चितचं.

  • सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना लागू करणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे.

     

    आगामी काळात राज्यात आमची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

     

    यावेळी मंचावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनीष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या ९ कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडला. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा आमचाच असून सत्तेत येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. असे वचनही या प्रसंगी त्यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्निग्धा कांबळे यांनी केले. तर सुत्रसंचलन डांगे यांनी केले.

     

    महिला कर्मचाऱ्यांनी बांधल्या राख्या…

    मेळाव्यात राज्य जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना राख्या बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती केली.

    मी तुमच्या संघर्षात पुढे राहील…

    जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्या संघर्षात मी खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहिल. असे अभिवचन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले.

  • चंद्रपुरात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले मिशन टिन्स चे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा शांतता आणि सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. मात्र काही असामाजिक तत्वांकडून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

     

    नियोजन सभागृह येथे पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच उप-प्रादेशिक परिवहन विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी संजय पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

     

    पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, पोलिस विभागाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गस्तीवर असणारे वाहन, पोलिस, कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलिस नक्की कुठे आहे, यावरसुध्दा लक्ष ठेवावे. खब-यांचे जाळे वाढविण्यासाठी पोलिस मित्र/मैत्रीण नियुक्त करता येतात,  याबाबत विचार करावा.
    जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सोशल मिडीयावरील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढणे तसेच रस्ते कसे विकसीत करता येईल, याबाबत नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    सादरीकरणात जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले, जिल्ह्यात ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रतिबंध, सिटबेल्ट व हेल्मेट बाबत राबविण्यात आलेल्या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अपघातांची संख्या तसेच अपघातातील मृत्युंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. सन 2022 मध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्हचे 767 प्रकरणांची नोंद होती. यावर्षी सप्टेंबरअखेर पर्यंत 7721 प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. यात 900 टक्के वाढ आहे. सन 2022 मध्ये सिटबेल्टची 7149 प्रकरणे तर 2023 मध्ये 18281 प्रकरणे (156 टक्के वाढ), 2022 मध्ये सिटबेल्टची 12079 प्रकरणे तर 2023 मध्ये 27303 प्रकरणे (126 टक्के वाढ) नोंदविण्यात आली आहेत. या तीनही बाबींमध्ये गत वर्षीच्या एकूण 19995 प्रकरणांच्या तुलनेत 2023 मध्ये एकूण 53305 प्रकरणांची नोंद आहे.

     

    तसेच अवैध दारुला आळा घालणे, या प्रकणांत 45 टक्क्यांनी वाढ असून 2632 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सन 2022 मध्ये जनावरांची अवैध वाहतुकीची 39 प्रकरणे होती. यावर्षी 69 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 2200 जनावरे पकडण्यात आली आहेत. सन 2017 ते 2023 या कालावधीत जिल्ह्यातील अल्पवयीन 300 मुले आणि अल्पवयीन 1271 मुली असे एकूण 1571 जण बेपत्ता असल्याची नोंद झाली. यापैकी 292 मुले तर 1236 मुलींना परत आणण्यात यश प्राप्त झाल्याचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

     

    रस्ते अपघातांची संख्या कमी करा

     

    जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्याच्या उपाययोजनेसाठी निधीबाबतचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा समितीमध्ये तात्काळ पाठवावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजवावे. अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसीत करा. वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर प्रभावीपणे दिसण्यासाठी वाहनांच्या तपासणीची मोहीम राबवावी. तसेच टोल नाक्यावर वाहनांच्या रिफ्लेक्टरची तपासणी करावी.

    बाबुपेठ येथे पोलिस चौकी कार्यान्वित करणार :

    बाबुपेठ येथे असलेली पोलिस चौकी एक महिन्याच्या आत पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पोलिस विभागाने आवश्यक मनुष्यबळाची पुर्तता करावी. या चौकीच्या बांधकामासाठी निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती आवश्यक :

    सन 2023 मध्ये दुचाकी अपघातात 161 जणांचा मृत्यु झाला आहे. यात 154 जणांचा मृत्यु हा हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच हेल्मेटचा वापर केल्याने किती जणांचे जीव वाचले आणि न वापरल्याने किती जणांचा मृत्यु झाला, याचा सर्व्हे करावा. हेल्मेट शिवाय (विशिष्ट क्रमांकासह) नवीन वाहनांची नोंदणीच करू नये, याबाबत नियोजन करता येते का, ते तपासावे.

     

    दारू दुकानांची संख्या वाढवू नका

    दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. दारु दुकानांबद्दल नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्याकडे गांभियाने लक्ष द्यावे. यापुढे जिल्ह्यात दारुच्या दुकानांची संख्या वाढवू नये, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले.

     

    गोवंश ठेवण्यासाठी जागेची उपलब्धता :

     

    अवैध वाहतुकीदरम्यान पकडण्यात आलेली जनावरे ठेवण्यासाठी किती जागेची मागणी आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. जागेची उपलब्धता करून देऊन त्याच्या बाजुला वनविभागातर्फे कुरण विकसीत करण्याचे नियोजन करता येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

     

    मिशन ‘टीन्स’ चे उद्घाटन :

     

    पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुले / मुली यांना सायबर क्राईम, लैंगिक शोषण, बॅड टच – गुड टच, पोक्सो कायदा आदींबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी ‘टीन्स’ उपक्रम (ट्रेनिंग, एज्युकेटिंग, इंपॉवरिंग, नर्चरींग स्टुडंट) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणेकरून याबाबत शालेय विद्यार्थ्यांना अवगत करता येईल. तसेच याबाबत जे पिडीत आहेत, त्यांचे मनोर्धर्य उंचाविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडूनसुध्दा मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  • रविंद्र शिंदेचे कार्य समजले आणि आशेचा किरण गवसला

    News34 chandrapur

    भद्रावती : तालुक्यातील खापरी येथील वैष्णवी सुनील पाचभाई ह्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीला तिचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून केली. रविंद्र शिंदे यांनी प्रसंगावधान ठेवीत केलेल्या सहकार्यामुळे वैष्णवीच्या चेहऱ्यावर अप्रतीम हास्य फूलले.

     

    दि. २२ ऑक्टोंबर रोजी वैष्णवीच्या आईवडीलांनी रविंद्र शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे व युवा सामाजिक कार्यकर्ते उमेश काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
    लेकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रविंद्र शिंदे यांच्या रूपाने आमच्या मदतीला देवदुतच धावून आले. कदाचित त्यांनी वैष्णवीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली नसती ,तर आमच्या वैष्णवीचा प्रवेश या वर्षी झाला नसता. तिचे एक वर्ष वाया गेले असते. रविंद्र शिंदे यांनी दिलेले सहकार्य आम्ही विसरू शकत नाही. तसेच त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड सुध्दा आम्ही कदापिही करू शकणार नाही.

     

    आम्ही त्यांचे खुप खुप आभारी आहोत. अशी कृतज्ञता वैष्णवीची आई भारती आणि वडील सुनिल पाचभाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    खापरी येथील सुनिल पाचभाई हे हात ठेल्यावरुन भाजीपाला विकतात. त्यांच्या कुटुंबात स्वतः कुटुंब प्रमुख सुनिल पाचभाई , पत्नी भारती , मुलगी वैष्णवी आणि मुलगा वैभव असे एकूण चार सदस्य आहे. सुनिल यांच्या डाव्या हाताला यापूर्वी इजा पोहचली आहे. तरी सुध्दा आपली मुलगी व मुलगा शिकला पाहीजे. त्यांचे जिवन घडविण्यासाठी पाचभाई दाम्पत्य अहोरात्र कष्ट करीत आहे. परंतु वाढत्या महांगाईच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना अत्यंत अवघड जात आहे.
    मुलगी वैष्णवी हिला बी.एस्सी. प्रथम वर्ष नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नागपूर हिंगणा येथील आकार बहुउद्देशीय संस्थेत प्रवेश मिळाला.

     

    प्रवेश मिळाल्याने पाचभाई कुटूंबात आनंदी लहरी बहरू लागल्या. परंतु प्रवेश घेण्यासाठी लागणारे प्रवेश शुल्क भरण्यासाठीची रक्कम कशी जमवायची ? या काळजीने पाचभाई कुटूंबाचा आनंद मावळण्यास सुरुवात झाली. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची माहिती कुणीतरी सुनिल पाचभाई यांच्या कानावर टाकली. आणि… अखेर आशेचा किरण पाचभाई कुटुंबाला गवसला.

     

    लेकीच्या शैक्षणिक प्रवेशाची चिंता वाढल्याने, सुनिल पाचभाई आणि त्यांच्या पत्नी भारती यांनी मुलगी वैष्णवीसह भल्या सकाळीच रविंद्र शिंदे यांचे निवासस्थान गाठले. रविंद्र शिंदे यांना पाचभाई दाम्पत्यांनी आपली आपबीती कथन केली. लेकीचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी कृपया काहीतरी व्यवस्था करा, अन्यथा वैष्णवीचा प्रवेश होणार नाही, तिचे एक वर्ष वाया जाईल अशी विनंती पाचभाई दाम्पत्यांनी या प्रसंगी केली.

     

    रविंद्र शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावला. पाचभाई कुटुंबाला धिर दिला. तसेच वैष्णवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली. तसेच यापुढे सुध्दा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पाचभाई दाम्पत्यांसह वैष्णवीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वैष्णवीचे बी.एस्सी. प्रथम वर्ष नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली. आता वैष्णवीचा प्रवेश सुध्दा निश्चित झाला. वैष्णवीचे वर्ग सुध्दा सुरू झाले. वैष्णवीचा मोठा भाऊ वैभव हा चंद्रपूरच्या शासकीय इंजीनीअरींग कॉलेजचा संगणक शाखेतील तीसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

     

    यापूढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे : रविंद्र शिंदे

     

    कुठल्याही कुटूंबातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकी विकासापासून दूर राहता कामा नये. त्यांचा सर्वंकष विकास झालाच पाहीजे.त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा लाभ समाजाला निश्चितच होईल. वैष्णवी सारख्या असंख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना विकासाची संधी मिळत नाही. काही समस्या व अडचणी असल्यास नि : संकोचपणे संपर्क साधावा. यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे . असे प्रतिपादन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.

  • चंद्रपुरातील माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तीरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कन्यांचे पूजन झाले. तर कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली.

    श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडत आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी रात्री आठ वाजता प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या गायन कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार यांच्यासह ईतर पदाधिका-यांनी वैशाली सावंत यांना मातेची मुर्ती देत सन्मानीत केले. माता महाकाली महोत्सव हा नारीशक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे. यात चंद्रपूरकरांचा लाभत असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. दरवर्षी आपण हे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळेतील विद्यार्थींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कन्यापूजनानंतर शक्तीरुपी कन्यांना महोत्सव समीतीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणा-या पालकांनाचेही समीतीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. काल महोत्सवाच्या तिस-या दिवशी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि मनसे राजु उभंरकर यांनी महोत्सवाला भेट देत शुभेच्छा दिल्यात यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने मातेची मुर्ती देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

    चंद्रपूरच्या युवकांनी बनवलेली हायड्रोजन कार ठरतेय आकर्षण

    चंद्रपूरातील कौशल समोर यावे या हेतुने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील युवकांनी बनविलेली हायड्रोजन कार श्री माता महाकाली महोत्सव मध्ये ठेवण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या कारची पाहणी करुन कार तयार करणा-या सर्व टिमचा सत्कार केला आहे.

    महोत्सवात आयोजित आरोग्य शिबिरात हजारो लोकांची तपासणी

    श्री माता महाकाली महोत्सव येथे डॉ. आसावरी देवतळे यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा हजाराहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात तपासणी नंतर औषधोपचारही केल्या जात आहे.

    उद्या निघणार मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखी यात्रा

    उद्या निघाणा-या नगर प्रदक्षिणा पालखी यात्रेने पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप होणार आहे. हळदी कुंकुवाचा सडा टाकून पालखीचा मार्ग स्वच्छ केला जाणार आहे. या पालखी यात्रेत मंदिर अब बनने लगा है या गाण्याची सुप्रसिध्द गायीका ईशरत जॅहा यांचा रोड शो असणार आहे. सोबतच यात केदारनाथ धाम येथील झांज व डमरु पथक, पवनसुत हनुमान व वानरसेना, कानपूर येथील शिवतांडव व अघोरी नृत्य, उत्तर प्रदेश राज्यातील काली माता दृष्य, आदिवासी नृत्य, गंगा आरती, पालखीत तुतारी व अब्दारीचा समावेश, पालखीत पोतराजे नृत्य यांचा समावेश,चंद्रपूर शहरातील ८० वादकांचा जगदंब व अन्य ढोल ताशा व ध्वज पथकांचा समावेश, शहरातील बँड पथकांचा समावेश, पालखीत गायत्री मंदिर परिवारातील ५०० कलशधारी महिलांचा समावेश, पालखीत ५०० महिला व पुरुषांचे लेझीम पथक, डी. जे. धुमालचे विविध संच, शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी- विद्याथ्र्याचे दृष्य समूह, डी. जे. चे विविध संच, महिला, पुरुषांचे दांडिया गरबा नृत्य समूह, १००९ महिला – पुरुषांचे योग नृत्य, १५१ मंडळांचे महिला – पुरुषांचे भजन समूह, नागपूर येथील विरांगण क्रीडा गृपच्या मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिक, शहरातील अनेक सामाजिक संघटनांचा पालखीत सहभाग, शहरातील व्यायाम शाळांचा पालखीत सहभाग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृष्य समूह, चंद्रपूर जिल्ह्यातील देवी – देवतांच्या मंदिरांचे दृष्य, श्री माता निर्मला परमेश्वरी भक्तांचा पालखीत समावेश,पारंपरिक खेळांचे पालखीत दृष्य, तेलगु समाजाचे बतुकम्मा दृष्य, पारंपारिक सण उत्सवांचे बोलके दृष्य, शहारातील तंट्या बिल व वाघोबांचा समावेश, मशाल पथक यांचा पालखीत समावेश, टांगता रोप मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, चंद्रपूर यांचा पालखीत समावेश, स्थिर मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर यांचे १०८ वारकरी टाळ, मृदुंग, गर्जना समुह,स्वच्छता समूह यांचा पालखीत समावेश,बंगाली समाजातील महिलांद्वारा शंखनाद व पुरुषांद्वारा डंकनाद आदींचा समावेश असणार आहे.

  • चंद्रपुरातील भाऊ च्या दांडियात बिग बॉस फेम प्रिन्स नरूला ची हजेरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस फेम अभिनेता प्रिन्स नरुला यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी युथ आयकॉन असलेल्या प्रिन्स नरुलाची एक झलक टिपण्यासाठी चंद्रपूरकर तरुण, तरुणींनी मैदानावर एकच गर्दी केली.

     

    येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षांपासून भरविण्यात येत असलेल्या भाऊचा दांडिया उत्सवाला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आह. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी नच बलिये तसेच रोडीज एक्स २, बिगबॉस ९ चा विजेचा प्रिन्स नरुला याने हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोदी गर्दी केली. त्याची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मैदानावरील युवतींमध्ये चुरस बघायला मिळाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रिन्स नरुला याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. २२ ऑक्टोबर रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत प्रथमेश परब यांची उपस्थिती राहणार आहे.

     

    २४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या दांडिया उत्सवात स्पर्धकांना अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी असून, लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहे

    याप्रांगी माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विश्वास झाडे, ऍड. विजय मोगरे, वारजूरकर, आदी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.