Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • 200 युनिट ची थाप, आणि चर्चेत आली आप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. आता निवडून येऊन चार वर्षे पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जिल्हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

     

    हे फलक रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आले होते. तरीही महानगर पालिकेने बॅनर काढण्याची कारवाई केली. आमदाराचा दबावाखाली मनपा ने बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

     

    चंद्रपूर शहरांमध्ये दोनशे बॅनर लावण्यात आले असून सर्वत्र आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून 200 युनिटच्या आश्वासन फोल ठरल्यामुळे लक्ष वेधण्यात आले आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा जनतेला माफीनामा आणि पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात येईल.
    या बॅनरमुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.

  • चंद्रपुरात लवकरचं Eye Hospital On Wheels चा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिवसेंदिवस मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मानवी जीवनात वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभराचे कितीतरी तास वापर करीत विद्यार्थी धडे घेत आहेत. जसे फायदे तसे नुकसान देखील असल्याने डोळ्यांचे आजार देखील वाढले आहे. यावर उपचार करता यावा म्हणून पुढील काही महिन्यात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ‘आय हॉस्पिटल ऑन व्हील’ ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

     

    ज्यामुळे डोळ्यांच्या आजारावार मात करता येईल.
    आणि चंद्रपूर जिल्ह्यात उत्तमोत्तम आरोग्यसेवा देता येईल अशी घोषणा वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की डोळ्यांच्या आजार लवकर बरे व्हावे यासाठी हा फिरता दवाखाना जिल्ह्यातील विविध भागात जात नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करीत त्यावर निदान करण्याचे काम करणार आहे, डिसेंबर महिन्यात या फिरत्या दवाखान्याचे उदघाटन करणार असल्याची माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

  • चंद्रपुरातील युवकांनी केली कमाल तयार केली हायड्रोजन कार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मुंबई – चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी कार तयार केली केली. या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री माता महाकाली महोत्सवात त्यांची कार ठेवण्यात आली होती. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांची मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली आहे. ना. फडणवीस यांनीही यावेळी युवकांचे कौतुक करत शासन त्यांना मदत करेल असा विश्वास दिला आहे.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सह कारची निर्मिती करणारे हर्षन नक्षीने , साईल काकडे, प्रज्वल जमदाडे, जय विधाते, दिपक मालेकर, वैभव मांडवकर यांची उपस्थिती होती.

     

    चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील वणी येथील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी अत्याधूनीक कार तयार केली आहे. या कारमध्ये सुरक्षा संसाधनापासून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहे. दोन वर्षाच्या परिश्रमा नंतर स्वखर्चातून या युवकांनी ही कार तयार केली आहे. टायर आणि काच वगळता कारसाठी वापरण्यात आलेले सर्व उपकरणे त्यांनी तयार केली असल्याची माहिती या युवकांनी दिली आहे. सदर कार एक किलो हायड्रोजनवर 250 किमी चालत असल्याचा दावा या युवकांनी केला आहे. तसेच ही कार अद्यावत AI तंत्रज्ञानावर आधारित चालक विरहीत कार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.

     

    दरम्यान आता त्यांना सदर कार रस्त्यावर उतरविण्यासाठी शासनाची मदत हवी आहे. त्यामुळे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवातही सदर कार ठेवण्याची संधी आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांना उपलब्ध करुन दिली होती. यावेळी त्यांनी या युवकांचे कौतुक करत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तर आता त्यांनी या युवकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून दिली आहे.

     

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारची पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली. भारताकरिता सर्वाधिक आवश्यकता आहे अशा प्रकारचे तंत्रज्ञान या कारमध्ये वापरण्यात आले आहे. या कारमुळे प्रदुषण कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून या कारला रस्त्यावरती आणण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केल्या जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

  • मराठा आरक्षण हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – गृहमंत्री फडणवीस यांचा आदेश

    News34 chandrapur

    मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

     

    अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, 2 हेक्टर च्या निकष काढत आता 3 हेक्टर करण्यात आला आहे.

     

    मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे, मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षणबाबत योग्य पाऊल उचलत आहे, मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे, ते अत्यंत चुकीचे असून सरकार हिंसाचार सहन करणार नाही.

    कुटुंब घरी असताना घराची जाळपोळ करणे म्हणजे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आहे, याबाबत आता अशी हिंसा करणाऱ्या विरुद्ध कलम 307 अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    या हिंसाचाराचा काही राजकीय पुढारी वयक्तिक लाभ घेत आल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे, त्याबाबत पोलीस विभाग आपलं काम करीत आहे, आता हिंसा करणाऱ्या विरोधात पोलीस विभाग कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य रसत्यावर विविध ठिकाणी वाहन कायमचे उभे ठेवून वाहतूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार, कायदा भंग करणाऱ्या व्यक्ति विरूद्ध मोटर वाहन अधिनियमांच्या तरतूदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 283 अंतर्गत सुद्धा कारवाई होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरात प्रशासना कडून वाहतूक नियंत्रण व सुव्यवस्था कायम ठेवन्याकरिता बरेच प्रयत्न करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रशासन द्वारे मुख्य मार्गाच्या दोनही बाजूला फुटपाथचे निर्माण, मार्गाच्या दोनही बाजूला पांढऱ्या रेशाने पार्किंगची जागा निश्चित करून वाहनांची रहदारी करिता रोड मोकळे करून देण्यात आले होते.

     

    परंतु मागिल काही महिन्यापासून असे दिसून येत आहे की बरेच ठिकाणी फुटपाथ आणि पार्किंगच्या जागेवर कायमचे वाहन उभे ठेवून काही बेजबाबदार व कायदा भंग करणारे समृद्ध लोक / व्यवसायिक लोकांनी अतिक्रमण करून घेतले आहे आणि त्यामुळे मुख्य मार्ग असो किंवा गल्ली असो सर्व ठिकाणी वाहतूकीत इतक्या मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होउ लागला आहे की ज्यावरून शहरातील व चंद्रपूर शहराच्या बाहेर जाणान्या मुख्य मार्गांवर सुद्धा दिवसभर ट्रैफिक जाम ची दशा कायम दिसत राहते.

     

    नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मुख्यमार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड आणि महात्मा गांधी रोड हया मेन रोड वर दोनही बाजूला प्राईवेट बस मालकांनी, टॅक्सी धारकांनी, वाहन शोरूम मालकांनी, वाहन रिसेल कारणारे व्यवसायिकांनी मोठे व्यवसायिक कॉम्पलेक्स मधे व्यवसाय करणारे गाळे धारकांनी, मेन रोड वर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका द्वारा चंद्रपूर शहरात रोड वर मार्किंग करून दिलेल्या पांढऱ्या रेशांच्या बाहेर आपली वाहने उभे ठेवून वाहतूकित अडथळा निर्माण केला आहे.

     

    ज्यामुळे दिवसात सर्वसामान्य जनतेला रोड वर आपली वाहन चालविणे अवघड झाले आहे. इतकेच नव्हेतर जाम ची कायम स्थिति उदभवत असल्याने पायदळ जाणारे लोक सुद्धा त्रास भोगत आहे. अनेक ठिकाणी अव्यवस्थित पार्किंग असल्याने दररोज दूर्घटना होत आहे त्यात जीवहानि होण्याचे सुद्धा अनेक प्रसंग निर्माण झाले आहे.

     

    हा गंभीर विषय आहे. सर्व सामान्य जनता आपले वाहन घेउन आता मुख्य मार्ग असो किंवा चंद्रपूर शहरच्या बाहेर जाणारे महामार्ग असो त्यावर आपले दुचाकी व चारचाकी वाहन चालवितांना घाबरतात कारण त्यांच्या वाहनांच्या येण्या-जाण्याचे मार्गच उरले आहे. सर्व ठिकाणी काही खास लोक आपले वाहन दिवसरात्र अव्यस्थितपणे लावून रोडचे त्यांनी कायमचे अतिक्रमण करून घेतले आहे. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे की नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड, मेन रोड हया मार्गावर बरेच लोक आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवतात आणि त्यांचा विरोध केल्यावर ते शिवीगाळ करून वाहतूक व्यवस्थेत आम्ही अडथळा निर्माण केल्यावरही आमच्या विरूद्ध प्रशासन काहीच करू शकत नाही अशी धमकी देण्याचे स्तरावर गेले आहे.

     

    सर्व सामान्य जनता त्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जाब देण्याऐवजी आपला त्रास स्वतः भोगून शांत निघून जाते परंतू कधी कधी आपसात मारामारीची परिस्थिति निर्माण होते ज्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.

    या परिस्थितीतून कायमची मुक्तता मिळण्याकरिता आपल्या मार्फत अधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले असेल परंतू स्थिति मधे काहीही सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या कडे शासनाने कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी दिली आहे आणि कायद्यात मोटर वाहन अधिनियम अंतर्गत दंड व सक्तीचे प्रयोजन, रोड वर अतिक्रमण केल्यास दंड व सक्तीचे प्रयोजन सह वाहन जप्ती करण्याचे सुद्धा अधिकार दिले आहे तर त्याचे योग्यपणे वापर होणे गरजेचे आहे.

     

    तसेच वारंवार सूचना देउन सुद्धा जसे मुख्यमार्ग आणि महामार्ग वर अव्यवस्थितपणे वाहन लावून अडथळा निमार्ण करणाऱ्या किंवा मुख्यमार्ग व महामार्ग वर मनपाकडून पांढया रंगाने चिन्हित करून दिलेल्या पार्किंग झोनच्या बाहेर दिवसरात्र आपले वाहन कायमचं
    उभे ठेवणाऱ्या लोकांविरूद्ध सक्तीची कारवाई करण्याकरिता भारतीय दंड संहितेच्या कलम 283 मधे सुद्धा आपणास असे अधिकार देण्यात आले आहे की ज्यावरून आपण सार्वजनिक मुख्य मार्ग, महामार्ग वर अतिक्रमण करणाऱ्या लोकांविरुद्ध जप्तीची कारवाई करू शकतात.

    तरी सर्व सामान्य जनतेचा हा प्रश्न आम्ही आपल्या समक्ष ठेवून आपणास विनंती करू इच्छितो की आपण चंद्रपूर शहर च्या सर्व मुख्य रस्त्यांवर आपली वाहने अव्यस्थितपणे किंवा दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणारे लोका विरूद्ध 7 दिवसात कडक मोहीम राबवून त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 283 अंतर्गत कारवाई करत त्यांचे वाहन जप्तीची कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून प्रशासनाने सामान्य लोकांच्या येण्या-जाण्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या सार्वजनिक रोड वर आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणाऱ्या लोकांमधे नियमांची व कायद्याची धाक बसेल आणि आपल्या शहरात वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत थोडी फार सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

     

    ह्या विषयाचे स्मरणपत्र दिनांक 27 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ह्यांना देण्यात आले, ह्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि ह्या विषयावर एक अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाल्याचे चर्चे दरम्यान सांगण्यात आले व येत्या काही दिवसात ह्या वाहूतुक अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने कडक कायदा करण्याचा अध्यादेश काढण्यात येईल व मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना देण्यात आले.

     

    निवेदन सादर करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, संभाजी खेवले, राहुल वाघ तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपूर RTO कार्यालयातील उभ्या वाहनाला आग

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील शासकीय दूध डेअरी जवळ असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उभ्या ट्रक ला 30 ऑक्टोबर ला रात्री भीषण आग लागली.

     

    सोमवारी रात्री 8.30 ते 9 वाजता दरम्यान परिवहन विभागाने जप्त केलेल्या उभ्या ट्रक ला अचानक आग लागली, परिवहन विभागाला आग लागली अशी अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली, मात्र ती आग कार्यालयाला लागली नसून जप्त केलेल्या ट्रक ला लागली होती.

     

    परिवहन विभागाच्या परिसरात नागरिकांची गर्दी जमली, तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत सूचित करण्यात आले सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

    आग कुणी लावली? की शॉर्ट सर्किट मुळे आग लागली याबाबत सध्या काही स्पष्ट झाले नाही. मात्र या आगीत परिसरातील अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ते सुद्धा या आगीत स्वाहा झाल्याची माहिती आहे.

  • मराठा समाज आरक्षणावर आमदार बोर्डीकर यांची सुप्रिया सुळेवर जोरदार टीका

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून सध्या काही आमदार व खासदार राजीनामे देण्याच्या तयारीत आहे, मात्र या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 40 दिवसापासून सरकारने मराठा आरक्षण बाबत काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार समाचार घेत, अनेक वर्षे शरद पवार साहेब सत्तेत होते जर त्या काळात आपल्या वडिलांनी मराठा समाजबाबत काही चांगले निर्णय घेतले असते तर आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.

     

    सरकार आरक्षण प्रश्नावर गंभीर आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समजाला न्याय देतील, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होत मात्र मविआ सरकार आलं आणि आरक्षण गेलं, त्यावेळी आपण गप्प होता सुप्रियाताई, उगाच उलटसुलट प्रतिक्रिया देत आमच्या मराठा बांधवांच्या भावना भडकवू नका ही आपल्याला विनंती आहे.

  • लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या वसाहतीचे अवैद्य बांधकाम तात्काळ थाबवा – दिनेश चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – म्हातारदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरात लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे वसाहतीचे अवैद्य बांधकाम थांबवणे सदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     

    या परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची आम्हाला माहिती झाली आहे. हे बांधकाम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. या बांधकाममुळे येथील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कामाची परवानगी सुद्धा ग्रामपंचायत कडून घेण्यात आली नाही आहे.

     

    या संदर्भात योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई होईपर्यंत सदर बांधकाम थांबवण्यात यावे अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.

    निवेदन सादर करतांना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनेश दादा पाटील चोखारे, सचिन राजूरकर, म्हातारदेवीचे सरपंच संध्याताई पाटील, माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील यांची उपस्थिती होती.

  • महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटना चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी राहुल क्षीरसागर यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – २८ ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, माजी आमदार चरण वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन उमाटे, विभागीय पदाधिकारी नंदकिशोर दंडारे, वैभव गोल्लर, विनायकराव तुपकर, महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, वंदना वनकर, प्रज्ञा बडवाईक, रमेश पिसे, किष्णाजी बेले, छबू वैरागडे, राजेंद्र झाडे, नयना झाडे, पुष्कर डांगरे व सर्व नागपूर विभागातील, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तथा जिल्यातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

     

    संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या बैठकी प्रसंगी नुकतेच भारताचे प्रतिनिधित्व करून तीन सुवर्ण पदक प्राप्त करणारे ओजस देवतळे यांच्या परिवाराला सन्मानित करण्यात आले, नागपूर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला, नागपूर विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग उल्हास नरळ साहेब यांचाही सत्कार करण्यात आला व बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.

     

    यावर विचारमंथन करण्यात आले, सोबतच भविष्यात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाचे किमान ४ खासदार व 15 आमदारांना सर्वपक्षीय प्रतिनिधित्व मिळावे याकरिता सर्व तेली बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले तेली महाराष्ट्र तेल घाना महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

     

    समाज हा विदर्भात फार मोठ्या संख्येने आहे येणाऱ्या काळात ओबीसीं आरक्षणासह प्रतिनिधित्वाला जर धक्का लागला तर तेली समाज एक ओबीसीच्या घटक म्हणून राज्यभर रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करतील इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर मंथन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर विभागातील 200 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त करण्यात आल्या या बैठकीला नागपूर विभागातील ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते. यावेळी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते चंद्रपुरातील युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल क्षीरसागर यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी केले तर संचालक नागपूर जिल्हा अध्यक्ष पुष्कर डांगरे व माधुरी तलमले यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले.

     

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागपूर कार्याध्यक्ष राजेश बारुतकर, रुपेश कुबडे, राजेश काळबांडे, विजय पाटील, अरुण तडस, राम जुमळे, गणेश वासुरकर, संकुल शहारे, आकाश लेंडे, दत्तु जीभकाटे, शालिनी तेलरांदे, मंगला महाजन, मंगला मस्के, निशा हटवार, जयश्री गभने, किरण बारई इत्यादी नागपूर विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  • चंद्रपूर वेकोली क्षेत्रात बदल्यांचा सपाटा आणि अधिकाऱ्यांची नाराजी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महिन्याभरापूर्वी वेकोली चंद्रपुर क्षेत्रात नव्या मुख्य महाप्रबंधक रुजू होताच त्यांनी बदलीचा सपाटा लावला आहे , मात्र दोन दिवसा अगोदार झालेल्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाला काही अधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.

     

    चंद्रपुर क्षेत्रातील शिवा प्रसाद, सचिन फुलझेले, निलाभ कुमार, पी.जी अश्विनी व व्हिक्टर कालाबंडी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे, नव्या मुख्य महाप्रबंधकांनी सध्या तरी अनेक अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली नाही, मात्र अचानक त्यांनी बदल्यांचा निर्णय घेतल्याने अधिकाऱ्यात नाराजीचा सूर उमटला आहे.

     

    कारण चंद्रपूर क्षेत्रात 3 उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र मुख्य महाप्रबंधक कार्यालय व दुर्गापूर उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली नाही, त्यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर मुख्य महाप्रबंधकांचे विशेष प्रेम आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

     

    मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील कार्मिक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून त्याठिकाणी कार्यरत आहे, अनेक महाप्रबंधक आजपर्यंत आले आणि गेले मात्र हे कार्मिक अधिकारी आजही कार्यालयातील खुर्चीला चिकटून बसले आहे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर त्या कार्मिक अधिकाऱ्यांची बदली होत आहे, एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की बदली च्या निर्णयात मोजक्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, या निर्णयामागे काहींनी महाप्रबंधक यांची दिशाभूल करीत आपल्या अधिकाऱ्यांना संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.

     

    अचानक झालेल्या या बदली सत्राने याचा सर्वात जास्त परिणाम कोळसा उत्पादनावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे