Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    News34 chandrapur

    भद्रावती : माणुसकीला धर्म जात नसते आणि सेवेला भिंती नसतात, आलेल्या प्रत्येक रंजल्या गांजलेल्या मदत करणे हाच खरा धर्म समजून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविंद्र शिंदे वरोरा विधानसभा क्षेत्रात काम करीत आहेत. रविंद्र शिंदे यांच्या राजकारणाची दिशा व मार्ग हा प्रचलित नसून वेगळा आहे. त्यांचे राजकारण हे सेवाधर्म व मदतकार्य यास प्राथमिकता देवून सुरू आहे. एक चांगला आदर्श ते त्यांच्या कार्यातून समाजाला देत आहे.

     

    अशीच एक घटना नुकतीच पाहायला मिळाली. स्थानिक डोलारा येथील चंडिका वार्ड मधे राहणारी गृहिणी अमरीन इकबाल शेख यांचा तीन महिन्याचा मुलगा मोहत्र हसनैन इकबाल शेख याच्या ह्रुदयात छिद्र आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. उपचाराकरीता पैशांची गरज आहे. मात्र तेव्हढी आर्थिक तयारी कुटुंबाची नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेकडे अमरीन शेख यांनी पत्र देवून सहकार्याची अपेक्षा केली. परिस्थिती जाणून घेवून तात्काळ रविंद्र शिंदे यांनी बाळाला रुग्णालयात नियमित ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. नागपूर येथे बाळावर उपचार सुरू आहे. त्यानुसार आता दररोज त्या बाळाला रुग्णालयात ने-आण करण्याची जवाबदारी शिवसेनेने घेतली आहे.

     

    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुषमा शिंदे तसेच शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल याप्रसंगी उपस्थित होते.

     

    चिमुकल्या हसनैन यांचे उपचार होतपावेतो दर महिण्याला निशुल्क रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याचे वचन विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी रूग्णाचा पालकांना यावेळी दिले.

  • एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर व्याख्यान संपन्न

    एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर व्याख्यान संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी बीसीए च्या विद्यार्थिनी  करिता “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. बोलतांना त्यांनी संगणक कौशल्यावर आजच्या विद्यार्थ्यांनी फोकस करावा सोबतच संगणक कौशल्य ही काळाची गरज असल्याचे विषद केले.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून स्व. डॉ. सचिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य संतोष शिंदे उपस्थित होते. यावेळी समन्वयक वेदानंद अलमस्त आणि संगणक विभागाच्या प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले,  सोबतच विद्यार्थिनिना संगणक कौशल्य याबाबत महत्व पटवून दिले. प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले प्राध्यापक संतोष शिंदे यांनी संगणक कौशल्यासोबतच सी –प्रोग्रामिंग याबाबत विद्यार्थिनिना मार्गदर्शन केले. यात त्यांनी सी –प्रोग्रामिंगची गरज आणि आधुनिक काळात होणारे बदल यावर यावर आपले मत व्यक्त केले.

     

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले तसेच  भविष्यात संगणक कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कसे करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले आणि  भविष्यात असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शितल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी केले.

  • चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रोज ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने आंदोलन करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे.

     

    इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी सांगितले की, रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून तो शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छीनाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्नीया, भुजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतच्या जलस्त्रोत प्रदूषित होणे, तलावाच्या घाण पाण्याची दुर्गधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. रामाळा तलावाच्या इको-प्रोच्या सत्याग्रह-आंदोलन नंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासन नंतर फक्त खोलीकरण झाले, मात्र सांडपाणी मुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव मात्र प्रलंबित आहे.

     

    इको-प्रोने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाने या समस्यांवर खोलकरण वगळता कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इको-प्रो प्रशासनाकडे रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पावले उचलायला सांगणार आहे.

     

    आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘एसटीपी चे बांधकाम, रिटेंनीग वॉल चे बांधकाम त्वरीत पुर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासीक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.

     

    इको-प्रोने या आंदोलनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविन्यात येणार आहे. या निवेदनात त्यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे. या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही इको-प्रोने दिला आहे.

     

    या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     

    हिवाळी अधिवेशन निमित्त विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांचेकडे इको-प्रोची राज्यव्यापी मागणी केली आहे.

    “चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरातील तलावांची सुध्दा हीच अवस्था असल्याने ही सर्व तलावे प्रदुषणमुक्त, सांडपाणीमुक्त करीत त्याचे पर्यावरणीयदृष्टया महत्व जाणुन संवर्धन करणेकरीता ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदुषणमुक्त योजना’ राबविणे काळाची गरज आहे. राज्यातील शहरा-शहरातील हा तलावाच्या स्वरूपातील नैसर्गीक व ऐतीहासीक वारसा नष्ट होण्यापासुन वाचविण्यासाठी शासनाचा मोठा उपक्रम ठरू शकेल. या संदर्भात राज्य शाशनाने अभियान राबवित दर्लक्षित व नष्ट होऊ पाहणारे तलावांना नवसंजीवणी देण्यात यावे” बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो चंद्रपूर

  • आग लागली तर अग्निरोधक कसे वापरणार?

    आग लागली तर अग्निरोधक कसे वापरणार?

    News34 chandrapur

    गडचांदूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कंपनी तर्फे सामाजिक दायित्वांच्या कार्याद्वारे विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून 6 डिसेम्बर रोजी घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महात्मा गांधी जुनिअर कॉलेज गडचांदूर येथे राबविण्यात आला.

     

    या कार्यक्रमात आग कशी लागू शकते, लागल्यास त्या पासून काय हानी होऊ शकते व त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे प्रात्यक्षिका द्वारे माणिकगड सिमेंट वर्क्सच्या विभागाने शाळेतील एकूण 700 विध्यार्थी आणि शिक्षकांना समजवून सांगितले.

     

    प्रात्यक्षिकात आग लागल्यावर अग्निरोधक कसे वापरावे हे विध्यार्थी व शिक्षक वर्ग याना समजवून सांगितले,  कार्यक्रमा दरम्यान मुलांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले आणि विध्यार्थ्यांना पुरस्कृत सुद्धा करण्यात आले.

     

    यावेळी प्राचार्य चिताडे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून या पासून आम्हाला व विध्यार्थ्यांना घरगुती आग व सुरक्षे बद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व शिक्षक वर्गानी या कार्यक्रमांची मनसोक्त प्रशंसा केली व असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे अशी विनंती सुद्धा केली.

     

    या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य ,स्मिता चिताडे मॅडम, उप प्राचार्य माहुरे सर तसेच माणिकगढ संघ आणि शाळेतील शिक्षक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.

  • चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक,भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण जवळपास सव्वादोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिनांक 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच निविदा प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले व पात्र असलेल्या इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप माजी नगरसेवक देशमुख यांनी केलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त बिपिन पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनने केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जनविकास सेनेने दिलेला आहे.

     

    असा झाला घोटाळा…

     

    नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीला फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक ‘जॉईंट व्हेंचर’ ची तरतूद करण्यात आली.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीने दिल्ली येथील ‘एक्वारियस टेक्नॉलॉजी’ या एजन्सी सोबत जॉईन वेंचर चे पत्र सादर केले.

    मात्र याच निविदा प्रक्रियेत ‘एक्वारस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीने एम एस भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही.

     

    निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या 80% चे एक काम किंवा 50% चे दोन काम किंवा 40% ची तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशांत मद्दीवार या एजन्सीने काम पूर्ण केल्याचे पत्र सादर केले नाही. केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला.

     

    या निविदा प्रक्रियेतील चार कामे प्रशांत मद्दीवार या एजन्सीला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ 0. 91 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आले. प्रियदर्शनी चौक ,कामगार चौक व एसटी वर्कशॉप येथिल कामांची काही देयके सुद्धा अदा केली आहे. आयुक्त बिपिन पालीवाल यांनी अशा प्रकारे कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

     

    कामाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा अंदाजपत्रकात लाखो रुपयांची वाढ

     

    निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना शेड्युल बी या प्रपत्रा मध्ये कामाचे सविस्तर दर दर्शवून त्याची बेरीज केली जाते. ही बेरीज म्हणजेच या कामाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत असते.
    अंदाजपत्रकीय किंमत ‘बिल ऑफ कोटेशन’ म्हणजेच बीओक्यू या प्रपत्रा मध्ये दर्शविण्यात येते. कंत्राटदार मध्ये दर टाकून निविदा प्रक्रियेत भाग घेतात.
    शेड्युल बी मध्ये कामाची एकूण किंमत व बीयुकीमध्ये टाकलेली किंमत एकच असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत शेड्युल बी पेक्षा लाखो रुपयांनी अधिक किंमत बीओक्यू मध्ये टाकण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारे लाखो रुपये वाढवून कंत्राटदाराला लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     

    पात्र ठरणाऱ्या चांगल्या कंपन्यांना अपात्र केले

     

    या निविदा प्रक्रियेत भाग घेणारी अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना अनामत रक्कम मधून सूट सुद्धा देण्यात येते. या दोन्ही एजन्सीज कडे करोडो रुपयांची कामे करण्याचा अनुभव आहे. तसेच या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले.शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. आपल्या मर्जीतील प्रशांत मद्दीवार व स्वयंभू या एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी सर्व नियम पायदळी तुडवले.

  • सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    News34 chandrapur

    नागपूर  :-राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे.  शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत.  हा कार्यक्रम टाळला असता तर शासन  शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
    आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात  मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील  वाढता  रोष,  कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.
    छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे. महायुती  सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात  गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. NCRB आकडेवारी नुसार २०२२ वर्षात राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये २ हजार ५०३ चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे.
    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसा महाराष्ट्र खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात चौथ्या क्रमांकावर, सायबर गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक दुष्काळ. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट-मीठच सरकारने चोळले. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी  विचाराचा वारसा जपणारे  राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे.
    जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत  विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन  तेरा वाजले आहेत.  एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.

     

    धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.

     

    पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.

     

    शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

     

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.

    येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    News34 chandrapur

    मुल – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार सकाळी १०-०० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  याप्रसंगी उपस्थित सर्व कांग्रेस पदाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या फोटोला पुष्प माला व पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नवार, माजी सभापती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक किशोर घडसे, सरपंच तथा संचालक अखिल गांगरेडिवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, व्यंकटेश पुल्लकवार, माजी नगरसेविका ललिता फुलझेले, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, महिला सरचिटणीस शामलता बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्य समता बनसोड, फर्जना शेख, यांचेसह ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडूभाऊ गुरनुले, अन्वर शेख, विष्णू सादमवार, प्रशांत उराडे,राजू कानमपल्लीवार, ग्रामीण,शहरी,युवक व महिला तसेच ओबीसी सेल किसानसेल, व सर्व सेलच्या पदाधीकारी उपस्थित होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

     

    या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील सर्व घटकांना माणूस म्हणुन जगण्याचा हक्क अधिकार मिळवून देण्याचे त्यांनी काम केले. कामगारांपासून स्त्रिया पर्यंत सर्व अधिकार संविधानामध्ये त्याची तरतूद करून जगाला हेवा वाटावा असा सुंदर संविधान त्यांनी या देशाला दिले. असे महामानवाचे उपकार मानावे तेवढे कमी आहे म्हणून केवळ देशात नाही तर जगामध्ये या महामानवाला मागणारे अनुयायी पाहायला मिळतात. तसेच जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आम आदमी पक्ष हा बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती काम करत असून येणारा काळ हा सुशिक्षित युवांचा तथा आम आदमी पक्षाचा असेल असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

     

    यावेळी वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपुर मध्ये ओबीसींच्या मागण्या करिता रवींद्र टोंगे, विजय बलकी, आणि प्रेमानंद जोगी यांनी ११ सप्टेंबर २०२३ पासून सुरू केले होते, २९ ऑक्टोबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारची ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चां नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२३ ला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते परंतू ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर २०२३ पासून अक्षय लांजेवार, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुकाध्यक्ष व अजित सुकारे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे.

     

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकारी मार्फ़त याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसींच्या मागण्या मध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा जात-निहाय सर्वे करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने थांबविलेली मेगा नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, वसतिगृहात प्रवेशीत नसणार्‍या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, ओबीसी, विजाए भज,व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, म्हाडा व सिडको मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी, विजा, भज, व विशेष मागास प्रवर्ग संवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात यावे, विजा, भज, इ.मा.व वि. मा. प्र. या प्रवर्गातील विध्यार्थासाठी ६०५ अभ्यासक्रमात सामाविष्ट नसलेल्या अभ्यासक्रमास स्कॉलरशिप तथा फ्रीशिप लागू करण्यात यावे, ८ लाख रूपये उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली येथे नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांना घेवून चिमूर क्रांतीभूमीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ अन्नत्याग आंदोलन करणार आहे.