Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • इको प्रो चा वाघ-अधिवास सत्याग्रह

    इको प्रो चा वाघ-अधिवास सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इको-प्रो ने वरोरा-चिमूर मार्गावरील वहानगाव शेतशिवारात जाऊन “वाघ अधिवास सत्याग्रह” आंदोलन केले. ही सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा मधील प्रसिद्ध वाघ असलेले बंजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय, या झुंजीत बंजरंग वाघ मृत झालेला होता. ही झुंज कोर, बफर च्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेतशिवारात झालेली होती. हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून, वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे. वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्रचा विचार न करता “वाघ अधिवास जिथे, वनविभागाच्या योजना तिथे” अशी मागणी करीत ‘वाघ अधिवास सत्याग्रह’ करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे, यात मागील पाच वर्षात शेकडो मनुष्यहानी वाघसह अन्य वन्यप्राणीच्या हल्ल्यात झालेली आहे. मनुष्यहानी म्हणजेच संघर्ष नसून शेतकरीचे शेतपिक नुकसान, पाळीव जनावरे मारली जाणे, वाघाच्या भीतीच्या वातावरणात राहणे आदी अनेक समस्या संघर्षास कारणीभूत आहेत. वाढती वाघाची संख्यामुळे एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे मानव वन्यप्राणी संघर्ष अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.

     

    वाढते वन्यप्राणी सर्वत्र वाघ वावर यामुळे स्थानिक गावकरी-शेतकरी कायम संकटात राहणे, आणि त्रासाला सामोरे जाणे अशी परिस्थिती असताना मात्र विविध योजनेचा लाभ मात्र बफर आणि कॉरिडॉर मधील क्षेत्रातील गावाचा विचार करणे कितपत योग्य आहे? आज वाघाला कुठलीही सीमा नाही, तो जंगलाच्या बाहेर शेतशिवारात असतो, गावालगत असतो, शहरात सुद्धा असतो, विविध उद्योगाच्या क्षेत्रात असतो तेव्हा त्याचा वावर जिथे असतो तिथे संघर्ष आणि समस्या निर्माण होतात. मात्र ठराविक भागातील गावात वनविभागाच्या योजनेचा लाभ दिला जातो, यात धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहे.

     

    चंद्रपूर शहरालगत असलेली गावात चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र मधील वाघ लगतच्या सात-आठ गावात महिना-दोन महिने वावर असल्याने तिथे बफर, कॉरिडॉर नसताना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा लाभ देत त्या गावाचा समावेश करण्यात आला. मात्र जिल्ह्यात तीनही वनविभाग अंतर्गत शेकडो गावे आहेत जे वाघाच्या दहशतीखाली आहेत, या भागात वाघ-मानव संघर्ष निर्माण झाल्यास लोकडाऊन सारखी परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गावांना “वाघ तिथे योजना” संकल्पना राबवून सर्वाना समान लाभ देण्याची मागणी करण्यात आली.

     

    वाघ-अधिवास सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या

    सोबतच या सत्याग्रह आंदोलनातून शेतपिक नुकसान भरपाई देण्याची वनविभाग, कृषी विभाग व महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जवाबदारी सोपवावी. प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफर च्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे, परिसरातील सिंचन व्यवस्था व शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी, वाघ-मानव संघर्ष बाबत राज्यशासनाने गठीत केलेली समितीचा अहवाल नुसार कार्यवाही त्वरित करावी, वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पिआरटी गठण आणि त्यांचे मानधन नियमित देणे, या सर्व गावातील शेतकरी करिता सौरऊर्जा कुंपण त्वरित देणे, कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालालगतच्या शेतीला कायम स्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहणगाव येथे करण्यात आलेल्या “वाघ-अधिवास सत्याग्रह” आंदोलनातून शाशनाकडे करण्यात आलेली असून या मागण्याकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे.

     

    आज करण्यात आलेल्या आंदोलनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा माजी मानद वन्यजीव रक्षक, माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे माजी सदस्य बंडू धोतरे यांचे नेतृत्वात कुणाल देवगिरकर, धमेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुधीर देव, सचिन धोतरे, राहुल कुचनकर, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, प्रकाश निर्वाण, अमोल दौलतकर, प्रितेश जीवने, चित्राक्ष धोतरे सहभागी होते, यावेळी वहाणगाव येथे स्थानिक गावकरी यांना या सत्याग्रह विषयी, “वाघ तिथे वनविभागाच्या योजना” या विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती देत येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलन विषयी माहिती दिली, यावेळी स्थानिक गावकरी मध्ये सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिभाऊ दडमल, शंकर नन्नावरे, गजानन गायकवाड, शेतकरी सुधाकर दडमल, तानाजी सावसाकडे, सुभाष दोडके, राजू कुळमेथे, पांडू दोडके यावेळी उपस्थित होते.

  • चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.

     

    दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

     

    यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.

  • चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    News34 chandrapur

    चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.

     

    जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची चाहूल लागली नव्हती.

     

    वर्षाच्या शेवटच्या महिन्यात थंडी ने कहर करायला सुरुवात केली असून ग्रामीण असो की शहरी भाग नागरिकांना आता थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी हा महत्वपूर्ण आधार मिळाला आहे.

  • खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकवीताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर – काम्पा मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

     

    चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही.

     

    या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत. आज दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंक्ररपुर येथे उपचार सुरू आहे.

     

    या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी डॉ सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला. बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले

  • इको-प्रो चे घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य मधील कर्मचारी नियुक्ती करिता “मानवी साखळी सत्याग्रह”

    इको-प्रो चे घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य मधील कर्मचारी नियुक्ती करिता “मानवी साखळी सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर: इको-प्रो तर्फे हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी, नववे सत्याग्रह करीत घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य घोषित होऊन अनुक्रमे पवणे सहा तर पावणे तीन वर्ष होऊन सुद्धा पदस्थापना न झाल्याने अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी तसेच दोन्ही अभयारण्य मधील पर्यटनाचे मॉडल गावाच्या संपूर्ण विकासाभिमुख बनविण्याची मागणीकरिता आज “मानवी साखळी सत्याग्रह आंदोलन केले.

     

    जिल्हात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुर्व-उत्तर दिशेकडील अत्यंत महत्वाच्या वन्यप्राणी भ्रमणमार्गात ५ वर्षाआधी (२३ मार्च २०१८) घोषीत झालेले ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनक्षेत्रातील ‘घोडाझरी अभयारण्य’ व ताडोबाच्या दक्षिणेकडील वन्यप्राणी भ्रमणमार्गात मध्य चांदा वनविभाग अंतर्गत असलेल्या वनक्षेत्रातील ‘कन्हारगांव अभयारण्य’ २ वर्षाआधी (२१ मार्च २०२१) घोषीत होउन सुध्दा अदयाप वन्यप्राण्याच्या दृष्टीने व्यापक वन्यजीव व्यवस्थापनाच्या कामास सुरूवात झालेली नाही. सोबतच सभोवतालच्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने, येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुध्दा कार्यास सुरूवात झालेली नाही. कारण यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ म्हणजे अधिकारी-कर्मचारीचे पद वर्ग करण्यात आलेली असली तरी त्यावर कर्मचारी यांची नियुक्ती अदयापही करण्यात आलेली नाही. यामुळे वन्यप्राणी व्यवस्थापन, अभयारण्या सोबतच या परिसरातील गांवाचा सुध्दा विकास खुंटला आहे.

     

    घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य दोन्ही ताडोवा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर व्यवस्थापनाकडे हस्तांतरण करून, याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. कन्हारगांव अभयारण्य घोषीत होउन दोन वर्ष अधिक काळ लोटुन सुध्दा पदे वर्ग करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांची पदस्थापना अदयाप करण्यात आलेली नाही. कन्हारगांव अभयारण्याकरीता एकुण ४६ पदाची गरज असतांना गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील ११ पदे वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ४ पदाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. तर उर्वरीत ३५ पदाबाबत काहीच निर्णय नाही. घोडाझरी अभयारण्याकरीता एकुण २१ पदांवर अधिकारी-कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता असताना पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी सर्व पदे रिक्तच आहे. दोन्ही अभयारण्ये ताडोबा बफर कडे व्यवस्थापनासाठी असले तरी मुख्यालयापासुन अंतर बरेच लांब असल्याने या अभयारण्याचे कार्यालय अभयारण्यलगतच्या तालुकाच्या ठिकाणी करणे आवश्यक असुन घोडाझरी करीता ‘नागभीड’ तर ‘कन्हारगांव’ करीता गोंडपिपरी संयुक्तीक ठरेल.

     

    दोन्ही अभयारण्य पर्यटनाचे स्वरूप सहजीवन निर्माण करणारे असावे

    चंद्रपूर जिल्हयात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असुन त्याची किर्ती सर्वदुर आहे. पर्यटन सुध्दा मोठया प्रमाणात सुरू असुन हमखास वाघांचे हमखास दर्शन करीता ओळखले जाते. घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य मध्ये पर्यटनाचे वेगळे मॉडल निर्माण करण्याची संधी असुन जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संर्घर्षाच्या पार्श्वभुमीवर जे वन्यप्राणी व गावकरी यांचेतील सहजीवन अधिक योग्य प्रकारे विकसीत होउ शकेल. आज जिल्हयात मानव-वन्यप्राणी शिगेला पोहचला आहे. वाघ, वन्यप्राणी व वनविभाग पर्यायाने शासन यांचेविषयी नकारात्मक भावना वाढीस लागत आहे. या अभयारण्याच्या परिसरातील गावांचा सर्वागीण विकासात या पर्यटनाचा हातभार पुर्णतः असावा या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.

     

    आज ताडोबात येणारे पर्यटकांचा सर्वाधिक पैसा हा रिसोर्ट व निवास व्यवस्थेवर खर्च होतो, ताडोबाला सफारी बुकीगचे मिळणारे फि ही एकच स्त्रोत असतो. एखादया पर्यटकाच्या एकुण खर्चाच्या तुलनेत कमी असतो, सर्वाधिक खर्च हो रिसोर्ट व जिप्सी यावर खर्च होतो. खरेतर रिसोर्ट, जिप्सी यामधुन येणारा पैसा सभोवतालच्या सर्व इको डेव्हलपमेंट समीती चे एक मॉडल तयार करून त्याचे कमुनीटी होम स्टे व रिसोर्ट व कमुनिटी जिप्सी असल्यास या पर्यटनातुन येणारा सर्व प्रकाराचा पैसा या संपूर्ण गावातील युवकांना रोजगार तसेच गांव विकासासाठी वापर करणे संयुक्तीक ठरणार आहे. या पर्यटनातून फक्त नी फक्त “गांव आणी गावकरी” यांचा विचार होणार असल्याने येत्या काळात या ‘हिरवे उदयोग/प्रकल्प असणारे अभयारण्यकडे पाहण्याचा दृष्टीकोनात बदल येणार व सहजिवन प्रस्थापित करण्यास नक्कीच यश मिळेल.

     

    आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या नवव्या दिवशी, इको-प्रो तर्फे नववे सत्याग्र/ आंदोलन करीत घोडाझरी व कन्हारगांव हे घोषीत झालेले अभयारण्यांना नवसंजीवणी देण्यास, या भागातील गांवाचा विकास करण्यास तात्काळ पद नियुक्ती करण्यासाठी, आणी या अभयारण्याच्या पर्यटन विकासातुन गांवाचा विकास साधणारा लोकाभिमुख पर्यटन मॉडल बनविण्याचे मागणीकरीता ‘मानवी साखळी सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. यात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रकाश निर्वाण, राजू हाडगे, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, बंडू दुधे, प्रितेश जीवने, जितेंद्र वाळके, भूषण ढवळे, सचिन धोतरे, सुनील मिलाल, निलेश दौडकर, लोकेश भलमे, भारती शिंदे, योजना धोतरे, शारदा काहिलकर, विशाखा लिपटे आदी सहभागी होते.

  • मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे.

     

    जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

     

    जरांगे हे मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरुवातीपासून या मागणीला विरोध केला. चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. याची दखल घेत सरकारने २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, मुख्य सचिव व ओबीसी संघटनांची बैठक घेतली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार नाही, असे सांगितले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविले होते.

     

    मागण्यापूर्तीच्या अनुषंगाने लेखी पत्रही दिले होते. हे सारे घडत असतानाही जरांगे पाटील आता नवी मागणी करू लागले आहेत. त्यांच्या मागण्यांचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी खुशाल करावी. तसे आरक्षणही लढा देऊन मिळवावे. आमचा विरोध ओबीसींमधून आरक्षणाला आहे. तो अजूनही कायम आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागून आहे. समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातील तथ्यही लवकरच बाहेर येईल. ओबीसी समाज या अहवालातील बाबींकडे लक्ष ठेवून आहे, असेही सचिन राजुरकर यांनी मटले आहे.

  • चंद्रपुरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

    चंद्रपुरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    सदर महोत्सवात भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येत असुन शहरातील जिल्हा स्टेडियम,चांदा पब्लीक स्कूल परिसर, सेंट मायकल स्कूल,प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका इत्यादी परिसराचे सौंदर्यीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे. लवकरच विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भिंतीचित्र महोत्सवातील स्पर्धकांना देशभरातील लोकांना आपल्या कलेचा परिचय देण्याची संधी प्राप्त होत आहे.

     

    स्पर्धेत मुंबई,नागपूर,सांगली,सोलापूर,अहमदनगर,पांढरकवडा,हिंगोली,वर्धा, आरमोरी, जळगाव,यवतमाळ,गोंदीया,चिमुर, गोंडपिंपरी, चिचपल्ली, बल्लारशाह, वरोरा, हिंगणघाट, चंद्रपूर इत्यादी शहरातील एकुण २७४ स्पर्धक सहभागी झाले असुन वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकार सुद्धा सहभागी झाले आहेत. उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना धनादेशाद्वारे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. मनपातर्फे सर्व स्पर्धकांच्या निवास व जेवणाची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली असुन सौंदर्यीकरण स्थळी नेण्यास वाहने,पेंट,ब्रश,बसण्यास बेंचेस इत्यादी तसेच वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

     

    उदघाटन प्रसंगी स्पर्धकांना स्पर्धा साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपअभियंता विजय बोरीकर,डॉ.अमोल शेळके, सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे,संतोष गर्गेलवार,चैतन्य चोरे,विकास दानव, साक्षी कार्लेकर, मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने स्पर्धक व नागरिक उपस्थीत होते.

    मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रांद्वारे संवाद साधणाऱ्या भिंती आपण तयार करून दाखविल्या आहेत. शहरात थंडीचा कडाका वाढत आहे अश्या वेळेस राज्यातल्या एका टोकावरच्या शहरात येऊन आपण स्पर्धेत भाग घेत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. संपुर्ण राज्यातील कलावंतांच्या कलांनी चंद्रपूर शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितच वाढ होईल अशी आशा करतो – आयुक्त विपीन पालीवाल

  • माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन वरिष्ठ सभागृहातील सदस्य माजी मंत्री अनुभवी ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृती जपण्याचा मुद्दा हाताशी धरून विधानपरिष सभागृहात मांडला.

     

    महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांनी अत्यंत गरिबीतून समाज सेवा करीत चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील जनतेचे नेतृत्व करीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना राबऊन सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आष्टी येथील वैनगंगा नदीवर मोठा पूल बांधून आदिवासी व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला वाहतुकीने जोडण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. म्हणून ही त्यांची कर्मभूमी म्हणू ओळखली जाते.

     

    परंतु अशा महान आणि दुसरे मुख्यमंत्री राहिलेल्या महान व्यक्तिमत्वाचा पाहिजे तसा गौरव अजून पर्यंत महाराष्ट्र शासनाने केल्याचे दिसत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे. याची जाणीव ठेऊन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्र शासनाने स्व. मा सा.कन्नमवार यांची शासकीय जयंती साजरी करावी. गौरव ग्रंथ चलचित्र तयार करण्यात यावे एखाद्या शासकीय उपक्रमाला कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार खडसे यांनी केली. यांच्या मागणीला सरकार तर्फेही सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री,गृहमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे यथोचित सन्मान राखला जाईल सांस्कृतिक विभागामार्फत त्यांचे स्मारक उभारण्यात येईल असा शब्द दिला आहे.

     

    खान्देश या भागातील नेते मध्ये असतानाही विदर्भाच्या मुद्दाद्वारे सुपुत्राचा विदर्भात अधिवेशन मा. सा. होत असतांनाही सन्मान शासकीय होत नाही म्हणत विधानपरिषद मध्ये आवाज उठविल्याबाबत मुलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती राजेंद्र उर्फ बालू कन्नमवार यांनी आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेत त्याचे जाहीर आभार मानले आहे.

  • विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

     

    बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

  • गांधी चौकात दिलेला शब्द आज तेथेच पुर्ण करता आल्याचा आनंद – आमदार किशोर जोरगेवार

    गांधी चौकात दिलेला शब्द आज तेथेच पुर्ण करता आल्याचा आनंद – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – निवडून आल्यानंतर गांधी चौकात विजय सेभेला संबोधित करत असतांना गोर गरिब, गरजु विद्यार्थी, दिव्यांग यांची सेवा करण्याचा संकल्प केला होता. तेव्हा पासून आपण विविध उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी, गोर गरिब नागरिक, दिव्यांग बांधव सामाजात काम करणा-या संघटनांना शक्य ती मदत पोहचवण्याचे काम करत आहोत. आज गांधी चौकात आपण गरजु मुलींना सायकल, दिव्यांग बांधवांना सायकल देत आहोत. त्यामुळे या गांधी चौकातून या वर्गाची सेवा करण्याचा दिलेला शब्द याच चौकात पुर्ण करता आल्याचा अधिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने महानगरपालिका पटांगणात सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, तहसीलदार विजय पवार, अजय जयस्वाल, सुर्यकांत खनके, मिलींद गंपावार, श्याम धोपटे, गोपाल मुंधडा, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे आदींची मंचावर उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आमदार म्हणून मोठा निधी आपण मतदार संघाच्या विकास कामावर खर्च केला आहे. मात्र रस्ते, नाली, सभागृह म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. माझ्या मतदारसंघातील गरिब – गरजु, दिव्यांग बांधव यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे हे सुध्दा लोकप्रतिनी म्हणून आमचे काम आहे. काही मित्र मंडळींनी वाढदिवसा निमित्त मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी आपण त्यांना मदत करायची ईच्छा असेल तर या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली होती. व त्यांनी हा भव्य कार्यक्रम आयोजित केला.

     

    आज आपण विविध शाळेतील 100 गरजु विद्याथीनींना सायकल वितिरित केली आहे. तर जवळपास 30 दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकल आपण देत आहोत. ही मदत शेवटची बिलकुल नाही. पूढे ही समाजातील या घटकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज विद्याथीनींना सायकल मिळाली त्यांच्या चेह-यावरचा आनंद हेच आमचे समाधान आहे. आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखीय काम करत देशाचे नावलौकीक करावे, आपल्याला शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

     

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवासा निमित्त दिवसभरच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाकाली मंदिर येथे श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणपती मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने लाडू तुला कार्यक्रम घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.