Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    News34 chandrapur

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नागपूर येथील विधिमंडळ परिसरात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, गोंदियाचे आमदार करोटे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवराव किरसान, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भ्राह्मणवाडे, पवन अगदारी आदींची उपस्थिती होती.

     

    दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, दिनदर्शिका ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला दिवस, महिने, वर्ष यांची माहिती देते. दिनदर्शिकेमुळे आपले वेळेचे नियोजन चांगले होते. दिनदर्शिका प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी दिनेश चोखारे यांचे अभिनंदन केले.

     

    दिनेश चोखारे म्हणाले की, ही दिनदर्शिका २०२४ पर्यंतची आहे. यात प्रत्येक महिन्याची माहिती तसेच महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. दिनदर्शिका ही एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण साधन आहे. या दिनदर्शिकेमुळे लोकांना वेळेचे नियोजन करण्यात मदत होईल.

     

    यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांनीही दिनदर्शिकेचे कौतुक केले.

     

    दिनदर्शिकेमध्ये दरवर्षीचा शुभेच्छा संदेश, ज्योतिष टिप्स, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका, कृषी संबंधित माहिती, शालेय अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटना, कला, साहित्य, संगीत, क्रीडा या विषयांवरील माहिती यांचा समावेश आहे.

     

    यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला साद देत अनेक महिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार प्रतिभाताई धानोरकर तसेच महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
    याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संदीप कुमार जी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, शहर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा तालुका अध्यक्ष रवी मरपल्लीवार, जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्ष वैशाली पुल्लावार, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष हेमंत आरेकर, युवा नेते आशिष अहिरकर, अंशुल मोरे यांची उपस्थिती होती.
    यावेळी  शोभा नंदू कुमरे, वैशाली पुल्लावार यांची जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष  पदावर तर छबूताई वामन पावडे, वंदना शत्रुघ्न उईके, किशोरी विकास मशाखेत्री, सुशिला प्रभाकर कुळमेथे, मंगलाताई दादाजी आत्राम, शोभा प्रकाश महाजनवार, प्रेमिला गोविंदा रोहणकर, रिना रंजीत मारबोनवार यांची जिल्हा महिला काँग्रेस महासचिव म्हणून तर संगीता विनायक बुरांडे, रोशना लोंढे, शिल्पा विनोद ठाकरे, प्रिती नरेश भांडेकर, कविता किशोर नंदीग्रामवार, विनता नितेश रायपुरे, नलिनी थेरकर यांची जिल्हा महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
  • राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.

     

    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी पत्रकार गणेश यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    जोगी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शिष्टमंडळासहित पोलीस अधिक्षकांची भेट घेतली, यावेळी घडलेला सर्व प्रकार लोंढे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला, कारवाई होणार असे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी दिले.

     

    जर जोगी यांच्यावर कारवाई झाली नाही तर सत्तेचा माज असलेल्या नेत्याविरोधात ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक होत एकजुटतेने याविरोधात आंदोलन करणार असा इशारा सोलापन यांनी यावेळी दिला.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी

    चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यात शुक्रवार दिवस हा अपघात दिवस ठरला असून आज चक्क 13 व्यक्ती विविध अपघातात जख्मी झाले असून एकाचा मृत्यू तर 12 व्यक्तीवर चिमूर उपजील्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. नानाजी शिवराम जीवतोड वय 65 वर्ष यांचा मृत्यू झाला.

     

    चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या लोखंडया पुलाजवळ मिनझरी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन दुचांकीस्वर गंभीर जख्मी झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 31 FC 3690 मिंनझरी वरून चिमूर कडे विद्यार्थी व प्रवासी घेऊन राष्ट्रीय महामार्गाने येत असताना लोखंडी पुलाजवळ दुचाकी क्रमांक एम एच 34 व्हि 4146 ला धडकली त्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वर शरद शंकर आदे वय 25. सोमेश्वर लक्ष्मण पंचवटे वय 49 दोघेही राहणार हिरापूर् गंभीर जखमी झाले आहेत.

     

    त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. तर शेगाव येथून मयतिच्या कार्यक्रमाकरिता जात असताना चिमूर नेरी मार्गावर पोल्ट्रीफार्म जवळ टाटासुमो MH -26 L 1667 या गाडीचा राळ तुटल्याने टाटा सुमो गाडी पलटी झाल्याने ड्रायव्हर सोबत अकरा व्यक्ती जख्मी झाले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना कळताच घटनास्थळावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घटनस्थलवर पोहचून पंचनामा केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले.

     

    उपस्थित वैधकिय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून हिरापूर येथील दोन रुग्णांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले. व अकरा रुग्ण चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील कार्यवाही पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे करीत आहेत.

  • चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तर, लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. यासर्व बाबी संविधानात नमूद आहेत. मात्र, अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल १४२ खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे. यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी ३.३०  वाजता गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कामगार नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची उपस्थिती होती.

     

    भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली. या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नींची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने १४२ खासदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केले.

     

    केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू केले आहे. खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.

     

    प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रेय, गोपाल अमृतकर, अरुण भेलके, नंदू नागरकर, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, रमिज शेख, कुणाल चहारे, प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, विना खनके, सकिना अन्सारी, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, हर्षित रामटेके, युसूफ भाई, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोडाम, गोस खान, प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नौशाद शेख, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.

     

    वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.

     

    वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.

  • घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

    घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस येथे कोळसा भरून येत असलेल्या ट्रक ला 21 डिसेंम्बरला रात्री 12 वाजे दरम्यान भीषण आग लागली, या आगीत हायवा ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.

     

    HRG ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक क्रमांक MH34 BZ0588 हा वेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुस कडे येत होता, मात्र बैरम बाबा मंदिर परिसराजवळ ट्रक पोहचताच शॉर्ट सर्किट झाला आणि ट्रक ला भीषण आग लागली.

     

    सुदैवाने वाहन चालक वेळीच बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली, घुग्घुस पोलिसांना याबाबत माहिती त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र आगीत ट्रक चे मोठे नुकसान झाले.

  • चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    गडचांदूर :- गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.
    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील काही पत्रकार बसून होते.

     

    पत्रकार गणेश, यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती. यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.शरद जोगीवर यापुर्वी सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे कळते? त्याच्या विरोधात कोणी जर बातमी टाकली तर तो,त्याने महिनेवारी पद्धतीने पोसलेल्या काही तथाकथित पत्रकारांना बोलावून आपल्या मनाप्रमाणे उलट बातम्या लावायला सांगतो,हे मात्र विशेष.!

     

    शरद जोगीवर गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, सत्तेच्या जोरावर पत्रकारांना मारहाण म्हणजे ही लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची एकप्रकारे केलेली हत्या आहे, आणि या वृत्तीला समर्थन करणारे सुद्धा दोषी आहे, गरज पडली तर आम्ही जोगी विरोधात आंदोलन करीत पत्रकारांची ताकद दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी दिली आहे.

  • सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याच्या सर्वंकष विकासामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आणि स्मशानभूमी यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात मॉडेल ठरावा, यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करता येईल, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (दि.21) दिले.

     

    जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना नियामक परिषदेची सभा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, रामदास आंबटकर, श्री. शिंदे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, डॉ. मनीषा कायंदे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

     

    जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण सुविधा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा  व पायाभुत सुविधा या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘नियमानुसार वार्षिक आराखडा तयार करून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि रोजगार या विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

     

    पिण्याच्या पाण्याच्या 1302 योजना कार्यान्वित केल्या आहेत. पण आता जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा उदा. वॉल कंपाऊंड, वर्गखोली, सोलर सुविधा, खेळासाठी मैदाने, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासाठी दोन वर्षाचा वार्षिक आराखडा तयार करावा. मनपा व 17 नगरपरिषदेच्या शाळा व अंगणवाड्या उत्तम कराव्यात. गावातील स्मशानभूमी पूर्णत्वास नेता येईल. प्रदूषण व वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये भेदभाव होता कामा नये. सूक्ष्म नियोजन करून दोन वर्षाचा  आराखडा तयार करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, रुग्णालय, रस्ते स्मशानभूमी आदी कामे करता येतील. तसेच “मिशन जय किसान” अंतर्गत शेतीशी निगडित कामे देखील करण्यात येणार आहेत.

     

    पालकमंत्री श्री .मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठी जिल्ह्यामध्ये 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येत असून देशात जिल्हा पाणंद रस्त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी योजना आखण्यात येत असून तेलंगणा राज्याने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येनुसार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अमृत वृक्ष योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा तपासाव्यात.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या विकासासाठी नियमाच्या चौकटीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने निधी वितरित केला जाईल. यासाठी विधानसभा सदस्यांना प्रत्येकी  15 कोटी तर विधानपरिषद सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 130 कोटी निधीचे वितरण करण्यात येईल. त्यासोबतच, 80 कोटी रुपये कॅन्सर हॉस्पिटल व  प्रादेशिक पाणीपुरवठयाच्या सोलरकरिता 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असेही ते म्हणाले.

  • आमदार जितेंद्र आव्हाड बाबत विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचं मोठं विधान

    आमदार जितेंद्र आव्हाड बाबत विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचं मोठं विधान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – निधी वाटपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्ष नेत्याला टोला लगावला होता त्याबाबत आज विश्रामगृहात माध्यमप्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला : आव्हाड भांबावले आहेत, पागल झाले आहेत….ही प्रतिक्रिया आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची.

     

    विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंड पुरी खाल्ली, असा आरोप विकास निधी वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर वडेट्टीवार उसळले. ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले, त्यांना थोडाफार निधी मिळाला. पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे यांनाही निधी मिळाला. मग स्वपक्षाच्या नेत्यांवर ते आरोप का करीत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

     

    युती धर्मातील या दोन नेत्यांनी एकमेकांविरुद्ध प्रतिक्रिया दिली आता या प्रतिक्रियेचे काय पडसाद पळणार हे लवकरच कळेल.