Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

    चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

    News34 chandrapur

    चंद्रपूर: 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडू धोतरे यांना प्रसार भारती तर्फे निमंत्रण देण्यात आले आहे.

     

     

    देशातील मन की बात कार्यक्रमात गौरवप्राप्त शेकडो व्यक्ती – संस्था प्रतिनिधीना यंदा दिल्ली येथे प्रसार भारतीकडून निमंत्रण देत बोलविण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचा उल्लेख 27 ऑक्टोबर 2017 रोजीच्या आकाशवाणी वरील मन की बात कार्यक्रम मध्ये इको-प्रो संस्थेच्या वतीने गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास सुरू असलेल्या ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ चा उल्लेख करीत संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला स्वच्छता कार्याचा गौरव करण्यात आलेला होता. पंतप्रधान यांनी उल्लेख केला तेव्हा जवळपास या अभियानास अविरत श्रमदानाचे 200 दिवस पूर्ण झालेले होते, मनकीबात कार्यक्रम नंतरही एकूण 1020 दिवस कोविड लोकडाऊन पर्यंत हे अभियान सुरू होते.

     

    बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सुरू झालेला ‘हेरिटेज वॉक’

    सदर अभियान स्वच्छता पुरते मर्यादित न राहता पुढे याच किल्ला परकोटवरून संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत ‘हेरिटेज वॉक’ हा स्थानिक पर्यटनास चालना देणारा उपक्रम सुरू केला. अनेक चंद्रपूरकर नागरिक, विद्यार्थी ताडोबा येणारे पर्यटक सहभागी होऊ लागले. यासोबतच “आपला वारसा, आपणच जपुया” ही मोहीम घेऊन बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात 25 संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोटरसायकल ने नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा स्थळी भेट देत “महाराष्ट्र परिक्रमा” पूर्ण केली होती.

     

    बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

    यापूर्वी बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित झाले असून इको-प्रो संस्थेस सुद्धा हा गौरव प्राप्त झालेला आहे. भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारा देश व युवा कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवकांना “राष्ट्रीय युवा पुरस्कार” दिला जातो. पर्यावरण, वन-वन्यजीव, आपात्कालीन व्यवस्थापन, आरोग्य, रक्तदान, पुरातत्व, शालेय विद्यार्थी तसेच युवा कार्यात महत्वपूर्ण योगदान आहे.

     

    गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याचे आमंत्रण मिळाले हे माझे भाग्य आहे. हे आमच्या इको-प्रो संस्थेच्या कार्याचे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक आहे. हे अभियान सुरू करण्यासाठी आम्ही अनेक आव्हानांना तोंड दिले. पण, आमच्या एका जिद्दीने आम्ही हे अभियान यशस्वी केले.

     

    या अभियानाच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरच्या गोंडकालीन ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, आता कुठे हा प्रवास सुरु झाला असून अजून बरेच काही करणे बाकी आहे. आशा आहे की, आमच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही आपल्या समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी पुढे येतील.
    – बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो

  • कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

     

    महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या वतीने 17 जानेवारी पासून विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आठ दिवस होऊन देखील शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्र व्यवहार करुन सदर आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

     

    या आधी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या घेऊन विधानसभेत आवाज उठवला तसेच शासन दरबारी बैठकांचे आयोजन देखील केले. परंतू सरकार यावर गंभीर नसल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्त ऊर्जा विभागातील कुशल प्रशिक्षणार्थ्यांचा देखील या आंदोलनाला पाठींबा असून यासर्व मागण्या संदर्भात तातडीने पावले उचलावी अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आमदार प्रतिभाताई धानेारकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

    ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.

     

    ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई केली, त्यांनतर ते गेट जवळील कवठाच्या झाडाजवळ गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पर्यटकांसमोर फरफटत नेत हनवते यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    5 ते 6 महिन्यांपूर्वी हनवते हे कंत्राटी कर्मचारी म्हणून निमढेला गेटवर रुजू झाले होते, हनवते यांचा मुलगा रणजित हनवते ताडोबा अभयारण्यात गाईड चे काम करतो.

     

    सकाळच्या सुमारास जंगल सफारीची सुरुवात असताना पर्यटकांसमोर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

  • थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.

     

    23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात केली, याबाबत मृतकाच्या भावाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, बल्लारपूर पोलिसांनी कलम 302, 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

     

    सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी गुन्ह्याची गंभीरता बघता तात्काळ हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले, बल्लारपूर पोलीस व चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास करीत 2 पथक तयार केले. सचिन ची हत्या करणारा त्याचा शेजारी 37 वर्षीय विठ्ठल उर्फ डेंनी डबरे निघाला. पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत अटक केली.

     

    प्रकरण नेमकं काय होत?

     

    सचिन व विठ्ठल यामध्ये जुना वाद होता, जेव्हा जेव्हा मृतक सचिन ला विठ्ठल दिसायचा त्यावेळी थांब तुझा गेम करतो अशी धमकी सचिन हा विठ्ठल ला द्यायचा, असं अनेकदा घडले, घटनेच्या दिवशी सुद्धा सचिन याने विठ्ठल ला धमकी देत तू इथेच थांब आज तुझा गेम करतो अशी धमकी देत घरून चाकू आणला, दोघांचा वाद झाला त्यानंतर विठ्ठल ने त्या चाकूने उलट सचिन वर वार केला, यामध्ये सचिन याचा जागीच मृत्यू झाला.

     

    असा मिळाला आरोपी

    सचिन ची हत्या केल्यावर आरोपी विठ्ठल ने पळ काढला नाही तो निवांत घरी होता, गावात अनेकांना माहीत होतं की विठ्ठल आणि सचिन या दोघांचा वाद सुरू होता, मात्र त्यावर कुणी बोलायला तयार नव्हते, विशेष म्हणजे पोलिसांनी विठठल ला संदेहाच्या आधारे चौकशीसाठी बोलावले होते, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहिती काढत या खुनाचा उलगडा केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि रमेश तळी, सपोनि विकास गायकवाड, सपोनि प्राची राजूरकर, पोउपनी वर्षा नैताम, रणविजय ठाकूर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दांडेवार, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, जमिर पठाण, नितेश महात्मे, श्रीनिवास वाभीटकर, प्रसनजीत डोरलीकर, प्रकाश मडावी व प्रसाद धुलगंडे यांनी केली.

     

  • वाळू चोरीचा नवा फंडा

    वाळू चोरीचा नवा फंडा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.

     

    रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव रेती पुरवून लुटमार सुरु असल्याचे चित्र दिसून येते. बैलबंडया वापरल्याने महसूल अधिकाऱ्यांची कटकट नाही. हा फंडा वापरुन मूल तालुक्यात दररोज शेकडो ब्रास रेती रेतीचोर काही ठिकाणी घरपोच तर काही ठिकाणी साठवणूक करीत असल्याची बोंब सुरू आहे.

     

    मूल तालुक्यात प्रस्थावित असलेल्या ९ रेती घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. लिलावाअभावी परवाना
    अभावी ट्रॅक्टर द्धारे रेतीघाट वाहतुक बंद आहे. मात्रं खाजगी बांधकामांसाठी रेती ची मोठी मागणी सुरू आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही रेती तस्करांनी बैलबंडया भाडयाने घेऊन बेभाव रेतीतस्करी सुरू केली आहे. मुल तालुक्यात प्रति बंडी ९०० रुपयावर रेती पुरविणे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज मोठ्या संख्येने बैलबंडीधारक तालुक्यातील अनेक घाटांवर उपसा करताना खूलेआम दिसतात. तालुक्यातील अनेक गावांमधून पहाटे व रात्रो रेती भरलेल्या बैलबंडयाचा लोंढा बघून रेतीचोर किती शातीर होऊन आपला फंडा चालवीत आहेत हे लक्षात येत आहे.

     

    गतवषीं सुदधा असाच प्रकार सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी बैलबंडीधारकाना वेठीस धरले होते मात्र काही राजकिय व्यक्ती यात हस्तेक्षेप करीत असल्याची चर्चा होती. बैलबंडीधारकांना काही ठरावीक
    रक्कम एका फेरीमागे देऊन तेवढीच रक्कम या रेती चोरांच्या घशात जात असल्याचे बोलल्या जाते.

     

    मूल तालुक्यात दिवसाकाठी शेकडो ब़ास रेतीचे अवैध उपसा सुरू असून यात शेकडो बैलबंडीधारकांना फुस लावून गुंतविण्यात आल्याचे कळते. सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान मुल शहरात सुद्धा रेती वाहतुक करणाऱ्या बंडीच्या टोळया हमखास आढळून येतात असे बोलले जाते.

  • 2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त मंगेश खवले, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आदी उपस्थित होते.

     

    राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

     

    दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

  • अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    News34 chandrapur

    वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला.

     

    वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात साई सोनिपत हरीयाणा या संघाने ठाणे महानगरपालिका, ठाणे या संघावर विजय मिळवला. तर मुर्तीजापूर संघाला पुरुष गटात तृतीय पारितोषिक मिळाले.

     

     

    महिला गटात मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाने एमएच स्पोर्टिंग क्लब, पुणे या संघाचा पराभव करुन अव्वल स्थान प्राप्त केले. तर विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. पुरुष गटात विजेत्या ठरलेल्या साई सोनिपत हरियाणा संघाला एक लाख एक्कावन हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या ठरलेल्या ठाणे महानगरपालिका, ठाणे संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच तृतीय पारितोषिक मिळालेल्या मुर्तीजापूर संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

     

    तसेच महिला गटात विजेता ठरलेल्या मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच उपविजेत्या ठरलेल्या एमएच स्पोर्टींग क्लब, पुणे संघाला एक्काहत्तर हजार रुपये रोख व चषक तसेच तृतीय विजेत्या ठरलेल्या विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चेतन साहू हरियाणा याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुलेट गाडी देण्यात आली.

     

     

    तर उत्कृष्ट चढाई बिल्ला(मुर्तीजापूर), उत्कृष्ट जंपर म्हणून आवेद पठाण (ठाणे), उत्कृष्ट पकड म्हणून ढोलू (हरियाणा) यांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली. महिला गटात संजना भोई हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून इलेक्ट्रीक स्कुटर देऊन सन्मानीत करण्यात आले. तर पुजा पाटील हिला उत्कृष्ट चढाई, वैष्णवी मेश्राम हिला उत्कृष्ट जंपर तर राखी घानोडे हिला उत्कृष्ट पकड म्हणून सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

     

    यावेळी मंचावर आमदार चषकाच्या आयोजिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या सोबत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, चित्राताई डांगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, विलास टिपले, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, सुरज गावंडे, प्रशांत भारती, शाकीर मलक, रमजान अली, मदिन कुरेशी, राजू चिकटे, प्रमोद मगरे, बसंत सिंह, मनोज चिंचोलकर यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रविण काकडे, सचिव कासीफ खान व त्यांच्या चमून अथक परिश्रम घेतले.

  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     

    27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला, यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील (वणी-आर्णी सोडून) एकूण 17 लक्ष 82 हजार 316 मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार 9 लक्ष 12 हजार 483 तर महिला मतदार 8 लाख 69 हजार 788 व तृतीयपंथी मतदार 45 असे आहे.

     

    सदर पुनर्निरीक्षण कार्यक्रम मोहिमेत 18 ते 19 वयोगटातील 15 हजार 27 नव्या मतदारांची भर पडली आहे, तसेच 20 ते 29 वयोगटातील 13 हजार 687 मतदारांची वाढ झाली, 22 हजार 200 मृत मतदारांचे नवे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.

     

    जिल्ह्यात एकूण 6 हजार 778 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था करण्यात आली आहे, मतदारांना मतदार यादीत आपले नाव तपासायचे असल्यास त्यांनी HTTPS://electoralsearch.eci.gov.in यावर ऑनलाइन तपासावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी केले.

    तसेच मतदार सेवा पोर्टल व व्होटर हेल्पलाईन ऐप यावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

     

    चंद्रपुरात एकूण 2 हजार 32 मतदान केंद्रे असून त्यामध्ये शहरी भागात 691 ग्रामीण भागात 1341 मतदान केंद्रे आहे.

  • ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    News34 chandrapur

    नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, कोलाऱ्याच्या श्रीमती शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, ट्रॅक्स संस्थेच्या श्रीमती पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     

    ताडोबा-अंधारी या प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे 82 गावे असून त्यापैकी 62 गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात.

     

    ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसीत केलेल्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक,स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रीया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

     

     

    रिसॉर्टमधील ध्वनीप्रदुषण प्रतिबंधासाठी समिती
    ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.

     

    आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 50 टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी. या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

     

    इरई सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. परंतु या क्षेत्रात तारेचे कुंपण टाकून शेती करण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाजनकोच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण काढुन तेथे वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी आवश्यक नियम तयार करुन त्यानुसार पर्यटनाचा मार्ग निश्चित करावा असेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

     

    प्रारंभी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी श्रीमती पूनम धनवटे, बंडू धोतरे, धनंजय बापट, योगेश दुधपजारे तसचे सरपंच श्रीमती शोभाताई कोचाडे व सुनिता कातकर यांनी विविध सूचना मांडल्या. त्याअनुषंगाने अहवाल सादर करावा असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सांगितले.

  • विद्यार्थी व पालकांना घेऊन चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे आंदोलन

    विद्यार्थी व पालकांना घेऊन चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर: आम आदमी पार्टी महानगरपालिकेच्या शाळे संदर्भात नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आलेली आहे. मागील वर्षी पार्टीच्या आंतरिक सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर शाळा, इंदिरानगर येथील शाळा डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा या सर्व मनपाच्या शाळा खूप दयनीय अवस्थेत आढळल्या.

     

    या संदर्भात महानगर पालिका आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करून शाळेचे पुन:निर्माण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेली होती. परंतु त्यावरती अजून पर्यंत नीधी उपलब्ध करून कार्यवाही न झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी पालकामध्ये तीव्र नाराजी व रोष आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा भिंत, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह इत्यादी वस्तूंचा अभाव असल्याची तक्रार आम आदमी पार्टी कडे वारंवार करीत असतात.

     

    हा विषय वारंवार मांडून सुद्धा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे व जनतेच्या टॅक्स चा पैसा गेट बनविने सौंदर्यीकरन अशा निरूपयोगी कामावर खर्च केल्या जात आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचा मार्गदर्शनात तथा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांचा नेतृत्वात पालक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पैदल मार्च आंदोलन करण्यात आले.

     

    जर 15 दिवसांत शाळे संदर्भात महत्वाचे पाऊल उचलले गेले नाही तर आम आदमी पार्टी विदयार्थी तथा पालकांना सोबत घेऊन उपोषणाला बसेल अशी माहिती राजु कुडे यांनी दिली.

     

    यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरें,जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार अरोरा,शहर संगठन मंत्री संतोष बोपचे, सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत, सिकंदर सागोरे , सुनिल सदभया,जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर,सह सचिव श्रीकांत मुन, ऍड तबसुंम शेख, अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, सुजित चेटगुलवार,सुनिल भोयर, संगम सागोरे,क्रिश कपूर, स्वाती राऊत, प्रणाली रामटेके, प्रकाश शेंडे, आदित्य साव, विनीत तावाडे, प्रियांशु पोयाम, संजय कुंभारे, किरण राऊत, प्रतिज्ञा राजपाली, कोटांगले, उंदिरावाडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.