Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • मराठा आरक्षणाचा वाद पेटला, जरांगे विरोधात टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन

    News34  maratha reservation

    चंद्रपूर – राज्यातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करीत सरकारला मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे, सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र सरकार व पाटलांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला असून चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

     

    ओबीसी समाजाने आजपर्यंत सरकारला जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली मात्र अजूनही त्या मागणीची पूर्तता झाली अनही, अश्यातच मराठा समाजाने आरक्षण मागत जालन्यात आंदोलन सुरू केले.

     

    मराठा समाजाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने ते आंदोलन प्रकाश झोतात आले, आता मराठा समाजातील मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली, त्यावर सरकारने अध्यादेश काढण्याची तयारी पण सुरी केली आहे, मात्र सरकार व पाटील यांच्या भूमिकेवर ओबीसी समाजाने तीव्र निषेध नोंदवीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्टपासून प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वस्तीगृह सुरू करणार अशी घोषणा केली होती मात्र ती घोषणा हवेत राहली, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाती मूला-मुलींसाठी वस्तीगृह सुरू करावे, स्वाधार योजना सुरू करावी, जातनिहाय जनगणना करावी अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आले की सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास सरकारला आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊ, सरकारने आरक्षणाबाबत योग्य भूमिका घ्यावी.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला जिल्ह्यातील 25 संघटनांनी पाठिंबा दिला आहे, 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

    उपोषण मंडपात यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर व सदस्यांची उपस्थिती होती.

  • चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागासवर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    मंत्रालयात ना.  मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,  जिल्हाधिकारी विनय गौडा,  हरीश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, दूरदृष्य प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, एमएआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक  स्वाती पांडे उपस्थित होत्या.

     

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात फ्लाईंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे  या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपती कडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

     

    चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते, ते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

  • मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करू नका – अशोक जीवतोडे

    News34 maratha reservation

    चंद्रपूर : मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, असे ठाम मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे. Bolt ear Buds वर 73 टक्क्यांची सूट आजच खरेदी करा…. amazon

    सध्या राज्यात विशेषतः मराठवाड्यात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

     

    मात्र निजामशाहीतील रेकॉर्ड तपासून कुणबी निकष पूर्ण करणाऱ्या कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्यांना याअगोदर पण ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळतच होते, त्याला आमचा विरोध नाहीच, मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे.

     

    प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले त्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. यात कुणीही राजकारण आणू नये असे देखील डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, व हीच भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे.

  • सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभागाकडून सदर स्पर्धा पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

    पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, सामाजिक सलोखा व देखावे, स्वातंत्र चळवळ किंवा शिवराज्यभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त सजावट व देखावा, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, वैद्यकीय कार्य, सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम अन्य क्रीडास्पर्धा आदी कार्याचा गौरव व्हावा, तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे.

     

    या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

     

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

     

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

     

    19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

     

    राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

  • महाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

    News34

    चंद्रपूर –  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चंद्रपूरच्या अभिजित बाळकृष्ण धांडे याने दोन्ही पदाची परीक्षा पास होत सहाय्यक अभियंता पदाचे यादीत 180 पैकी 151 गुण घेऊन २ रा तर कनिष्ठ अभियंता पदाचे निवड यादीत 180 पैकी 149 गुण घेऊन ९ वा क्रमांक मिळविला आहे. या दुकानात मिळेल महागड्या वस्तू अगदी स्वस्त दरात

     

    यानिमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे, किसान काँग्रेसचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव, साई सेवा संकल्प समितीचे विनोद गोवारदिपे यांनी त्याचे जुनोना रोड स्थित घरी जाऊन अभिनंदन केले.

    अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आधी बजाज पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मध्ये पदविका व त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी चे शिक्षण घेणारा अभिजित बालपणापासून अभ्यासात हुशार आहे. पदविका परीक्षा देखील त्याने मेरिट मध्ये उत्तीर्ण केली होती. अभिजित चे आई, वडीलांनी खाजगी नोकरी करून मुलांना शिकविले.

  • चंद्रपुर जिल्ह्यातील या महिला म्हणतात मोदी जी आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी

    News34

     

    चंद्रपूर :- मागील 40 वर्षांपासून वीज, पाणी, रस्ता, नाली अश्या मूलभूत गरज्यांच्या अभावात राहणाऱ्या गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्प येथील बहिणींनी रक्षाबंधन च्या पर्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘मोदीजी हमे बिजली, पाणी, रास्ता दो’ अश्या आशयातून आमच्या समस्या सोडवा असे पत्र लिहून पाठवले.

     

    कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क. 4. बंगाली कॅम्प येथील जवळपास 400 रहिवासी मागील 40 वर्षापासून विज, पाणी, नाली, रस्ते अशा मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, त्यांच्या वस्तीत विजेचे कनेक्शन नाही, नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही, नाली, रस्ते नाहीत करिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज भाऊ बहिणींच्या रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पर्वावर नरेंद्र मोदी यांना आपले भाऊ या नात्याने आम्हा बहिणी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या करिता ‘प्रिय मोदीजी, हमे बिजली, पाणी, रस्ता दो’ अश्या मागणीचे पत्र बंगाली कॅम्प वासीय महिलांनी व बालकांनी लिहून पाठवले आहे, सदर कार्यक्रम भारत राष्ट्र समिती च्या वतीने भूषण फुसे यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

    यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे, जेष्ठ नेते रामदास चौधरी, महेंद्र ठाकूर, अश्विन वाघमारे तसेच मिथुन घुले, मंगला कुंभारे, लक्ष्मीबाई उंदीरवाडे, काजल मंडल, गोकुल विश्वास, सावित्री देवी पोद्दार, लिलाबाई बारापात्रे, हिराबाई मेकाले आदी स्थानिक बंगाली कॅम्प वासीय, शेकडो महिला भगिनी, बालक व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    रक्षाबंधन या भाऊ – बहिनींच्या पवित्र सणाच्या पर्वावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड पाठवून मागणीच्या या अनोख्या स्वरूपाच्या विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

  • Exploring the Hidden Charms of Chandrapur District: A Perfect Tourist Getaway

    Uncovering the Natural Beauty

    Chandrapur district, located in the heart of Maharashtra, is a treasure trove of natural wonders waiting to be explored. From lush green forests to majestic waterfalls, this district offers a unique and enchanting experience for every nature lover.

    One of the most captivating attractions of Chandrapur is the Tadoba Andhari Tiger Reserve, which is one of India’s premier tiger reserves. Spread over a sprawling area, it is home to a diverse range of flora and fauna. Embark on an exciting safari to catch a glimpse of the majestic tigers, leopards, deer, and a variety of bird species. The reserve also offers picturesque landscapes and serene lakes, making it a paradise for photographers and wildlife enthusiasts.

    Discovering Historical Marvels

    Chandrapur district is also steeped in history, with several ancient forts and temples that are worth a visit. One such marvel is the Ballalpur Fort, which stands tall as a testament to the rich heritage of the region. Explore its imposing stone walls, intricate carvings, and hidden passages as you transport yourself back in time. The fort offers breathtaking views of the surrounding countryside, allowing you to soak in the beauty while immersing yourself in history.

    Another must-visit attraction is the Mahakali Temple, known for its architectural grandeur and spiritual significance. Dedicated to the Goddess Mahakali, the temple attracts thousands of devotees every year. Marvel at its intricate sculptures, vibrant murals, and unique blend of ancient and modern architectural styles. The serene ambiance and positive energy of the temple make it a perfect place for introspection and spiritual rejuvenation.

    Jain Mandir – It is a Jain Shwetambar Tirtha and Sri Keshariya Parshwanath is enshrined in the temple. It is two kilometers away from Bhandak railway station. The idol is said to be ancient. The construction of the temple is very beautiful and the architecture inside is attractive. People of all religions visit it as a place of sightseeing and worship. The structure and its surroundings have been protected by the Archaeological Department of Government of India with the status of a pilgrimage site.

    Vijasana Gumpha or abode is about three kilometers west of Bhadravati. Famous archaeologist Cunningham first mentioned the caves. It is mentioned that the famous Chinese pilgrim Hiuen Tsang visited there in the seventh century AD. Those caves have three tunnels in three directions and the east facing tunnel should be sixty five feet long. There are moderate niches on both sides. Buddhist monks must have sat in it and meditated.

    Manikgarh Fort was built at a height of 507 meters above sea level. It is situated on thirty hectares. The fort is included in Rajura, Korpana and now Jivati ​​talukas. It is mentioned that the Manikgad fort was built in the new century by the Naga dynasty king Mahindu Yon. His rule lasted from 9th to 12th century. Later this region came under the rule of Gondrajya. Manikya Devi is the progenitor of this human-born serpent king. This fort must have been named Manikgarh after her name. Later Manikyagad was corrupted and became Manikgad. The gates of the fort, sculptures of snakes and lions, cannons, ramparts, towers, Tahalki towers, idols on the towers, cellars, Patal Vehir, Rani Mahal, Rani Lake etc. can be seen in this fort. Along with this, there is a rich forest rich in biodiversity. The fort, which was in a dilapidated state, was repaired through the Department of Aesthetics and Archaeology. It was beautified. The fortifications were rebuilt. Walking towers, new towers to accommodate tourists, interior and exterior colors, iron fences were built at various places for the safety of tourists. Therefore Manikgad fort has got the status of a tourist spot. Its beauty has also undergone a radical change. Surrounded by hills, the office of Manikgadwan Division was opened at this place. This office is under the supervision of Forest Protection Committee. To see Manikgad fort, one has to take a ticket and visit the fort. The fort is just 65 km from Chandrapur. Gadchandur via Chandrapur, Ballarpur, Rajura then Manikgad Fort is just twelve km away on the Gadchandur-Jivati ​​route. While going through this route, there is forest on both sides of the road. Surrounded by hills, the Amlanala dam is visible. One can reach the base of Manikgad fort by crossing winding roads. On the left side of this base is the Hemadpanti Vishnu temple. This is also a temple worth visiting

    Indulging in Local Delights

    No trip to Chandrapur district is complete without savoring its local cuisine. The district is known for its delicious Varhadi food, which is a gastronomic delight for food lovers. Try the mouthwatering Saoji chicken or mutton, known for its fiery spices and rich flavors. The authentic flavors and aromatic spices will leave you craving for more.

    For those seeking a unique shopping experience, head to the Chandrapur Market, where you can find a variety of handicrafts, textiles, and traditional artifacts. Pick up souvenirs to commemorate your trip and support the local artisans.

  • गणेश मंडळांना मिळणार 5 लाखांचं पारितोषिक

    News34

    मुंबई / चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या गणेश उत्सवाला खरेदी करा, मोबाईल, लॅपटॉप व अनेक महागड्या वस्तू ते सुद्धा माफक दरात फक्त amazon वर

    या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक :

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील.

    व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

    राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

     

  • चंद्रपुर जिल्ह्यात शासनाच्या गव्हाची खुल्या बाजारात विक्री

    News34

    चंद्रपूर/कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून शासनाच्या तांदळाची दुसऱ्या राज्यात विक्री करणार मोठं नेटवर्क पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ही रेशन दुकानदार दुकानातील शासनाच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करीत आहे, असाच एक प्रकार कोरपना तालुक्यातील धामणगाव येथे नागरिकांनी उघडकीस आणला.

    स्वस्त धान्य विक्रेता नामे राजेश दतात्रय ढग्गे यांनी मागील जानेवारी महिन्यापासून गावातील नागरिकांची दिशाभूल करीत लोकांना 9 महिन्यापासून गहू दिले नव्हते. गावातील नागरिक दर महिन्याला गहुची मागणी करीत असता राजेश दतात्रय ढग्गे कडून शासनाकडून गहू आले नाही असे उत्तर मिळत होते. व नागरिक त्यांचा भूलथापांना बळी पडले व याचा फायदा घेऊन राजेश दतात्रय ढग्गेनीं दर महिन्याला येणारे सरकारी गहू विकण्यास सुरू केले.

    असाच प्रकार खूप महिन्यापासून सुरू होता पण 27 ऑगस्ट रविवार ला दुपारी 1.00 वाजता गहू विकण्याचा प्रकार सुरू होता, स्वस्त धान्य दुकान बेकायदेशीर विक्री करीत गहुचे कट्टे वाहन क्रमांक MH 34 AB 3064 या चारचाकी वाहनमध्ये गहू भरतांना गावातील नागरिकांच्या लक्षात आले.

    ही बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनीं पोलिसांकडे तक्रार केली. स्वस्त धान्य दुकानदार मागील 9 महिन्यापासून नागरिकांचे हक्काचे गहू विकत आहे. गहू मिळत नसल्याने अनेक जण खाजगी दुकानातून गहू जास्त किमतीत विकत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. गावामध्ये अनेक नागरिक हे मजूर वर्ग आहेत.

    दिवसभर मजुरी करून पैसे कमावतात त्यात शासनाकडून मिळणाऱ्या योजना हे असले चोरटे स्वस्त धान्य दुकानदार शासनाला व नागरिकांना भूलथापा देऊन स्वतःचे खिसे भरत असतात. अश्या दुकानदारांना कठोर शिक्षा व स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित करण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.

  • Exciting Updates on Online Bookings for Safaris in Tadoba Tiger Reserve

    Welcome to our Blog!

    We have some exciting news to share about the online booking of tourism safaris in Tadoba Tiger Reserve. While the online booking system is currently closed due to unfortunate circumstances, we are optimistic about the future and can’t wait to welcome you back soon!

    A Temporary Setback

    Recently, a company with the contract for online bookies in Tadoba Tiger Reserve was involved in fraudulent activities, resulting in a loss of 12 crores in online bookings. As a precautionary measure, the online booking system has been temporarily suspended.

    However, we want to assure you that the offline mode of booking in the buffer zone is still available. You can book your safari at the entrance itself, ensuring you don’t miss out on the incredible wildlife experience that Tadoba Tiger Reserve offers.

    Preparing for the Future

    We understand the convenience and ease of online booking, which is why we are eagerly waiting for the order of the District and Sessions Court to resume our online booking system. Our NIC system is ready, and we are hopeful that the court’s decision will be in our favor within the next two to three days.

    Once the online booking system is up and running again, you will be able to secure your spot for the safari of your choice from the comfort of your own home. Stay tuned for updates on our website and social media channels!

    An Unforgettable Experience Awaits

    Despite the temporary setback, we want to assure you that visiting Tadoba Tiger Reserve is still an incredible adventure waiting to happen. Our team is dedicated to providing you with a safe and memorable wildlife experience.

    Witness the majesty of the tigers, explore the lush forests, and encounter a diverse range of flora and fauna. Our expert guides will accompany you on the safari, sharing their knowledge and ensuring you have a once-in-a-lifetime experience.

    So, mark your calendars! September 30th is just around the corner, and we can’t wait to welcome you back to Tadoba Tiger Reserve for an unforgettable safari experience.

    Stay Connected

    Don’t miss out on any updates about the online booking system and the reopening of safaris in Tadoba Tiger Reserve. Stay connected with us by following our blog, subscribing to our newsletter, and following us on social media.