Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत.

     

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील विद्यार्थ्यांना वरती हा अन्याय होईल म्हणून या रास्त मागणीला घेऊन ते उपोषण करत असून त्यांच्या या उपोषणाला आज कुणबी युवा चंद्रपूर संघटनेकडून जाहीर समर्थन तथा पाठिंबा देण्यात आले. तसेच ओबीसी समाजाला शासनाने कमजोर समजू नये.

     

    जर ओबीसी समाजाविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्यात आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात गंभीर उमटतील याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असा इशारा कुणबी युवा चंद्रपूर तर्फे देण्यात आला या वेळेला युवा जिल्हा समन्वयक श्री. राजू कुडे, संदेश खडसे, ॲड. प्रफुल मुरकुटे, सुप्रीत कुडे, विश्वनाथ पाल, सुधीर पिंगे, दिनेश देरकर, मोहन दरेकर तसेच अनेक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसीच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतील काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले, मात्र उपोषण मागे घेतले आंदोलन नाही असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

     

    राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं अशी मागणी झाली, त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    चंद्रपुरात 11 सप्टेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे आमरण उपोषणाला बसले आहे, मात्र 4 दिवस लोटल्यावर सुद्धा त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्यात आली नाही.

     

    मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गातून नको अशी ठाम भूमिका घेत टोंगे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

     

    जरांगे यांच्या उपोषणाला अर्ध्या मंत्रिमंडळाने भेट दिली, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या मग ओबीसी समाज बांधवांचे काय? त्यांच्या आंदोलनाची दखल कोण घेणार?

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश घेतला, त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले होते.

     

    त्या कार्यक्रमात भाजपचा DNA हा ओबीसी आहे, ओबीसी समाजाला फक्त भाजप न्याय देऊ शकते अशी ग्वाही त्यांनी दिली होती, 15 ऑगस्ट पासून राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात येणार अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी केली होती, मात्र आजपर्यंत एक वसतिगृह सुद्धा सुरू झाले नाही.

     

    जातनिहाय जनगणना, स्वाधार योजना, वस्तीगृह व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी मागणी रवींद्र टोंगे यांनी केली आहे.

     

    टोंगे यांच्या मागण्यांना भाजप न्याय देणार काय? की न्यायाची भाषा ही भाषणापुरती मर्यादित होती? भाजपवासी झालेले अशोक जीवतोडे यांनी तरी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपली कठोर भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायला हवी.

     

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली.

     

    तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील बांधवांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भेट द्यावी अशी मागणी केली, मराठ्यांना एक न्याय तर ओबीसी समाजावर अन्याय करू नका अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

     

    आरक्षणाच्या ठिणगीने राज्यात 2 समाजात भांडण लावण्याची कामे केली जात आहे, मात्र आरक्षणावर ठोस निर्णय सरकारच्या अंगावर येतो की काय अशी वेळ सध्या आली आहे, कमीतकमी भाजपच्या OBC DNA ने तरी ओबीसींच्या रास्त मागण्याची दखल घ्यावी अन्यथा आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही.

  • मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे.

    मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो वस्तीमधील मित्रांसोबत सोबत कच्चेपार गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावात मासे पकडण्यास गेला होता. मासे पकडण्याकरिता मृतक प्रफुल मेश्राम व त्याचे सोबती तलावात मच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले.

     

    प्रफुल मेश्राम हा मासे पकडण्याकरिता तलावाच्या खोल पाण्यात गेला परंतु तो डाव्या हाताने व डाव्या पायाने अपंग असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला.

    मृतकाच्या भावाने तोंडी रिपोर्ट वरुन सिंदेवाही पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे, मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले आहे पुढील तपास सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

  • तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं सत्य

    News34

    मुंबई/ नुकत्याच ott वर प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली गौरी सावंत यांनी वृत्त वाहिनीवर दिलेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.

     

    तृतीयपंथी यांच्या जीवन शैलीवर त्यांनी प्रकाश टाकत अनेक गुपित उघड केली आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे तृतीयपंथी दाढी कशी करतात? यामागील त्यांनी सत्य सांगितले आहे.

     

    दाढी करणे हे अनेकांसाठी नित्याचे काम आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रान्सजेंडर महिलांसारखे तृतीयपंथी ही प्रक्रिया कशी नेव्हिगेट करतात? गौरी सावंत, एक प्रमुख कार्यकर्त्या आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्या, या विषयावर प्रकाश टाकतात.

     

    गुरू किंवा गुरू शोधणे ही त्यांच्याकडे असलेली चैनी नाही यावर सावंत भर देतात. त्याऐवजी, ते उपलब्ध असलेल्यांकडून शिकतात. बहुतेक लोकांना त्यांच्या पालकांच्या घरी साडी कशी घालायची किंवा व्यवस्थित बसायचे हे शिकवले जात असताना, सावंत यांच्या गुरूंनी तिला या पारंपारिक पद्धतींची गुंतागुंत शिकवली. मात्र, जसजशी दाढी वाढू लागते, तसतसे नवे आव्हान निर्माण होते.

     

    चेहऱ्यावरील केस काढणे सोपे काम नाही, विशेषतः महिलांसाठी. एका वेळी एक केस उपटण्यासाठी चिमटा वापरण्याचा अनुभव सावंत सांगतात. ती स्पष्ट करते की ही प्रक्रिया वेळखाऊ पण आवश्यक आहे. शरीरात पुरुष संप्रेरकांची उपस्थिती चेहर्यावरील केस काढणे अधिक आव्हानात्मक बनवते. सावंतचे गुरू धीराने या तंत्राचे प्रात्यक्षिक करतात, तिच्या मांडीवर झाकण ठेवून काळजीपूर्वक प्रत्येक केस मुळापासून काढून टाकतात.

     

    दोन रुपयांच्या ब्लेडने मुंडण करणे आणि केस मुळापासून उपटणे यातील फरक सावंत अधोरेखित करतात. शेव्हिंगला दररोज पुनरावृत्तीची आवश्यकता असताना, मुळापासून केस उपटणे दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते, अंदाजे 15 दिवसांनी पुन्हा वाढ होते.

     

    हे मौल्यवान धडे ट्रान्सजेंडर समुदायातील गुरूंनी दिले आहेत. ते ट्रान्सजेंडर महिलांसमोरील अनन्य आव्हाने समजून घेतात आणि त्यांना आत्मविश्वासाने जगामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवतात.

  • वीज बिल तर भरतायं, मग दंड का देता?

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मुंबई – राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. How to pay electric bill online?

     

    उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

     

    लोकेश चंद्र म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे.

     

    महावितरणच्या वीज बिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक दिनांकापासून २१ दिवसात बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय दिनांक नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांक (ड्यू डेट) पर्यंतच बिल भरावे.

     

    महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

     

    सध्या महावितरणचे साठ टक्के ग्राहक ऑनलाईन बिल भरतात. विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलात सवलत मिळते.

  • चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे.

     

    चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला दिसत नाही काय?

     

    अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट दरम्यान हजारो वाहने दररोज ये-जा करतात, सकाळी 11 व सायंकाळी 5 वाजेदरम्यान मुख्य मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, वाहनांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्या जाते.

     

    वाढत्या अनियंत्रित वाहतुकीवर सध्या शासन प्रशासनातील अधिकारी गंभीर दिसत नाही, मुख्य मार्ग तर सोडा शहरातील ज्युबिली शाळा चौक ते जयंत टॉकीज या मार्गावर 4 चाकी वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असतात, हा मार्ग आपत्कालीन सेवेसाठी वापरला जातो, विशेषतः शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला हा एकमेव सोपा मार्ग आहे मात्र यावर सुद्धा वाहन धारक अतिक्रमण करून ठेवतात.

     

    या वाहन अतिक्रमनावर वाहतूक विभागाने कारवाई करीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, चंद्रपुरातील रस्ते कुणाचे हा News34 चा पहिला भाग आहे, शहरातील अनेक समस्या आता आम्ही आपल्यासमोर घेऊन पुन्हा नक्की येऊ….तोपर्यंत नियमित वाचत रहा News34…

  • चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2023 रोजी पोळा, 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, तसेच दि. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यासोबतच अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे महत्वाचे धार्मिक सण/ उत्सव 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच एकाच दिवशी येत असल्याने त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 13 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत तसेच दि. 19 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

     

    या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार:

    मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

     

    सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी.

     

    सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 13 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 17 सप्टेंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत तर दि. 19 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील. असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

  • ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत – डॉ. अशोक जीवतोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व सर्व पक्षीयांचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी जाहीर आभार मानले आहे.

     

    काल (दि.११) ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांतर्फे असे ठरले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्या जाणार नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण दिले जावे असे मान्य केले. यासाठी त्यांचे जाहीर आभार डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले.

     

    मात्र या निमित्ताने बिहारच्या धरतीवर जात निहाय जनगणना करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या व इतर मागण्या देखील सरकारने मान्य कराव्या असे मत देखील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

     

    सोबतच काल (दि.११) ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मराठ्यांना ओबीसी समाजात समाविष्ट करू नये, याबाबत चर्चा केली. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेवून मार्गदर्शन केले.

     

    त्यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्र देखील देण्यात आले आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.

  • तर होमगार्ड बंदोबस्तात दिसणार नाही – होमगार्ड संघटनेचा शासनाला इशारा

    News34 chandrapur
    चंद्रपूर : राज्यात ४५ हजारांवर होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून विविध उत्सवात बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, होमगार्ड कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना कामावरून काढणे, वेतन उशिराने देणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे असे प्रकार सुरू असून, अनेक मागण्याही शासनाकडे प्रलंबित आहे.

     

    या सर्व समस्यांवर १५ सप्टेंबरपर्यंत तोडगा काढण्यात यावा, अन्यथा गृहविभागाच्या सर्वच बंदोबस्तांवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

    इंग्रज काळापासून राज्यात होमगार्ड ही संकल्पना असित्वात आहे. गृहविभागाच्या अंतर्गत हा विभाग असून, या विभागातील कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहेत. होमगार्ड यांना ३६५ दिवस नियमित काम देण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी, पोलीस विभागाप्रमाणे होमगार्डसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, होमगार्डला लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, होमगार्डच्या पाल्यांना प्रशासकीय सेवाभरतीमध्ये अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यात यावी, होमगार्डच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे आदी २० मागण्यांसाठी होमगार्ड महासंघाने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केले होते.

     

    यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी होमगार्डच्या मागण्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घालून मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, दहा दिवस लोटूनही अद्याप कोणतीही चर्चा होमगार्ड महासंघासोबत करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरातील होमगार्डमध्ये आक्रोश आहे. १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आगामी सण, उत्सवाच्या बंदोबस्तात होमगार्ड सहभागी होणार असा इशारा देण्यात आला आहे.

     

    होमगार्डच्या मुंबई कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी विजय पवार हे जिल्हा कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून होमगार्ड कर्मचाऱ्यांची पिळवूणक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आली.

     

    होमगार्ड वेल्फेअर फंडात ८ कोटींचा निधी असून, हा निधी होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी असताना त्या निधीचा कर्मचाऱ्यांसाठी वापर केला जात नाही, असा आरोपही यावेळी डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी केला आहे. पत्रकार परिषदेल चैतन्य मासूरकर, वीरेंद्र उके, राम बेलसरे, निखिल करवाडे, आर.एम. मोडक, विनोद गुनशेट्टीवार उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या अभियंत्यांची शासनाने घेतली दखल

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणुन होणार शासनाकडून सन्मान

    मूल : स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील उप विभागीय अभियंता प्रशांत चंद्रकांत वसुले यांना सन 2021-22 या कालावधीमध्यें अभियंता म्हणून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शासनाने वैयक्तिक पुरस्कार जाहीर केला असून येत्या अभियंता दिनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यांत येणार आहे. Pwd chandrapur

     

    सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्ते, पुल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करण्यांत येतात त्यांची संकल्पना तयार करून व इतर माध्यमांचा उपयोग करून संकल्पनाचित्रे बनवताना तसेच सार्वजनिक इमारतीच्या विद्युतीकरणाची काम करतांना तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अश्या अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायदयाची ठरते.

     

    अश्या अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन भारतरत्न सर विश्वेश्वरया यांच्या 15 सप्टेंबर या जन्मदिनी पाळण्यात येणा-या अभियंता दिवशी त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देवून सन्मान करण्यांत येते. याकरीता 8 जानेवारी 2018 पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे सेवारत असलेले उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांची शासनाने सन 2021-22 या वर्षाकरीता उत्कृष्ट अभियंता म्हणून निवड केली आहे.

     

    सेवेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी उपविभागातंर्गत विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक बांधकाम पुर्ण केली असून जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यात प्रशांत वसुले यांचे योगदान तेवढेच महत्वाचे आहे. नवीन प्रशासकिय इमारत, स्व. कर्मवीर कन्नमवार सांस्कृतिक सभागृह, पत्रकार भवन, तालुका क्रिडा संकुलाचा विकास, नगर परिषदेचे निर्माणाधिन असलेले भव्य व्यापारी संकुल, नगर परिषदेची दोन मजली शाळा इमारत याशिवाय अलीकडेच लोकार्पण झालेले विश्राम गृह अश्या अनेक वास्तुंच्या निर्मिती शिवाय तालुक्यात वाहणा-या नदयांवरील पुल, चिरोली-सुशी आणि मारोडा-भादुर्णी मार्गावर निर्माण करण्यांत आलेले पुल कम बंधारे अश्या बांधकामाच्या अनेक योजना उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी सहकारी अभियंत्याच्या सहकार्याने पुर्णत्वात नेल्या असून तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

     

    येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रशांत वसुले यांचा मुंबई येथे होणा-या शासकिय कार्यक्रमात सन्मान करण्यांत येणार असल्याने मूल तालुक्याच्या लौकीकात पुन्हा भर पडली आहे. हे विशेष