Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • चंद्रपुरात येणार शास्त्रज्ञांचे पथक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, रोगासंदर्भात कृषी तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेण्यात येईल व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि येत्या मंगळवारी, दि. २६ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे.

     

    विद्यापीठाच्या अॅग्रोनॉमिस्ट व विभाग प्रमुख डॉ. वर्षा टापरे, ब्रीडर डॉ. नीचळ, एन्टोमोलॉजीस्ट डॉ. मुंजे, प्लांट एन्टोमोलॉजीस्ट गाव्हाडे, अॅग्रोनॉमिस्ट डांगे यांचे पथक चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत संशोधन व अभ्यास करणार आहे. चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले.

     

    यासंदर्भात माहिती मिळताच पालकमंत्री ना. श्री. सुधार मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचाही प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग दिसल्याने यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. क्षणाचाही विलंब न करता ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानुसार सोयाबीनवरील रोगांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी खास पथक पाठविण्यात येत आहे.

     

    जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील या संकटकाळात ना. श्री. मुनगंटीवार त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले असून यापूर्वीच त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. एकुणच हवामान, नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी संकटाच्या चक्रव्युहात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो, अशी ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिली आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 4 अग्रगण्य डिजिटल News ची महायुती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या अनेक डिजिटल न्युज कार्यरत आहे मात्र जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच 4 अग्रगण्य डिजिटल न्युज ने एकत्र येत एक नवा उपक्रम हाती घेतला आहे.

    सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात News क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या News34, Dig News, Mh24x7 व Parthshar Samachar यांनी एकत्र येत श्री गणेश विसर्जन शोभयात्रेचे थेट प्रक्षेपण करण्याचे ठरविले.

     

    विशेष बाब म्हणजे आपल्याला एकावेळी 4 Youtube चॅनेल वर ही शोभायात्रा बघता येणार आहे, यासाठी चारही news channel संचालकांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

     

    थेट प्रक्षेपण मध्ये कसलाही केबल लावण्यात येणार नाही, या थेट प्रक्षेपणात सर्व काही आपल्या मोबाईल वर दिसणार आहे, श्री गणेश विसर्जन शोभयात्रेची संपूर्ण माहिती, प्रशासनाची मुलाखत आपल्याला एका क्लिक वर दिसणार आहे.

     

    या उपक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी या तंत्रज्ञानाच्या नव्या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहे.

    4 डिजिटल news च्या या तंत्रज्ञानाने चंद्रपुरातील गणपती जगभरातील दर्शकांना थेट दिसणार आहे.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्या वन निसर्गाने वेढलेला जिल्हा आहे, अनेक वन्यप्राणी या निसर्गात वास्तव्यास आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी हे प्राणी शेतात जात पिकांची नासाडी करतात.

    या वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे वर्ष 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 13 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, सदर 12 प्रकरणात शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, विशेष म्हणजे काही प्रकरणात स्वतः शेतमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    याकरिता शेत मालकांनी शेतात जिवंत विजेचा प्रवाह सोडु नये जर असे केल्यास या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मालकांनी असा प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

  • अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली

    News34 obc vs maratha

    चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

     

    जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

     

    त्यानंतर 17 सप्टेंबर ला ओबीसी संघटनांचा महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र टोंगे यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधी दखलही घेतली नसल्याने आता आंदोलनाचे काय होणार? हा मोठा प्रश्न ओबीसी संघटनांना पडला आहे.

     

    टोंगे यांच्या आंदोलनाला विविध संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे,  21 सप्टेंबरला भारत राष्ट्र समितीने टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले.

     

    भारत राष्ट्र समितीने दिला टोंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    मागील 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    Bharat rashtra samiti chandrapur
    टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समितीने दिला पाठिंबा

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या सर्व रास्त व प्रमुख मागण्यासाठी मागील 11 दिवसापासून रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.

     

    भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत चर्चा केली याप्रसंगी सचिन भाऊ राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपस्थित होते. ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे.

     

    भूषण फुसे असेही म्हणाले की शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.

     

    याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचे आगमन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणराया विराजमान झाले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांनी गणेश मुर्तीची विधीवतरित्या स्थापना केले. यंदा हे त्यांचे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी हि परंपरा चालवत आहे.

     

    गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चर्तुथी निमित्त त्यांच्या घरी गणराया विराजमान झाले. त्यांच्या या उत्सवाला ९३ वर्षांची पंरपरा असुन स्वातंत्रपुर्व काळापासुन ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी बाबतीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचं आगमन सर्वात वर्ष 1930 पासून होत आहे.

  • तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

     

    चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

     

    राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. शिक्षकांना स्थिरता मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल.

     

    प्रशासकीय खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी शक्य तिथे बाह्ययंत्रणेद्वारे काम करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला.

     

    आमदार अडबाले यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय तात्‍काळ रद्द करावा. शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. शिक्षकांची बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. शिक्षकांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आमदार अडबाले यांनी सरकारला या शासन निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.

  • ओबीसी समाजाच्या या मागण्या पूर्ण होणार काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात शामिल करावे अशी मागणी केलेली आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे.

     

    या संबंधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संपन्न झालेल्या सभेत सदर मागणीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटनाच्या कडून चंद्रपूर येथे गांधी चौकातून महामोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, यात चंद्रपूर सहीत लगतच्या यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून मोठया प्रमाणात ओबीसी बांधवानी आपला आक्रोश व्यक्त केला.

     

    ओबीसी च्या मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात. यात प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीजातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येवू नये. बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातनिहाय सर्वे करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकार कडे करावी.

     

    कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये. ५२% ओबीसी समाजाला ५२% आरक्षण देण्यात यावे. मा. सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे करावी. महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी मंजूर केलेली ७२ वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरु करावी.ओबीसी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्याकरीता स्वाधार योजना त्वरित लागू करावी.ओबीसी विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमात त्वरित शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजना त्वरित लागू कराव्या. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP) योजनेत इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा (OBC) समावेश करण्याबाबत. नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र व (२) 8 लाख रू. उत्पन्नाची अट अशा दोन अटीपैकी 8 लाख रू. उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

     

    म्हाडा व सिडको योजने अंतर्गत ओबीसी समाजास आरक्षण लागू करण्यात यावे याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, पालकमंत्री ,चंद्रपूर,मुख्य सचिव, प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अध्यक्ष मागासवर्गीय आयोग, पुणे यांना या महामोर्च्याच्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, ऍड. विजय मोगरे, राजेश बेले दिनेश चोखारे, सूर्यकांत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कामडे, विलास माथाणकर श्याम लेडे, कुसुम उदार, अनिल डहाके,कुणाल चहारे,गणेश आवारी, मनीषा बोबडे, गोमती पाचभाई,अनिल शिंदे, देवा पाचभाई,प्रेमा जोगी अक्षय येरगुडे हितेश लोडे यांच्या मार्फत चंद्रपूर उपविभागीय अधिकारी मृगूनाथन यांनी स्वीकारले.

     

    उपरोक्त मागण्या पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी विद्यर्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत.या आंदोलनास ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तयावाडे यांनी समारोपिय भाषणात निवेदनात दिलेल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असा इशारा दिला.

     

    विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार माजी, माजी मंत्री परिणय फुके आमदार अभिजित वंजारी, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर,अशोकभाऊ जिवतोडे, माजी आमदार देवराव भांडेकर,माजी आमदार आशिष देशमुख,माजी आ. सुदर्शन निमकर,नंदू नागरकर, पप्पू देशमुख, महेंद्र ब्राम्हणवाडे, देवराव भोंगडे,सतीश वारजूरकर, संध्याताई गुरनुले,रवींद्र शिंदे,राजेंद्र वैद्य, सलील देशमुख,रमेश राजूरकर,अनिल धानोरकर, किशोर टोंगे, संदीप गिऱ्हे, नितीन भटारकर, प्रशांत वाघरे, अविनाश पाल, गंगाधर वैद्य, गोविंदा पोडे,संदीप आवारी, बळीराज धोटे, विश्वास झाडे, राजू झोडे,अभिलाष गावतुरे, डॉ गावतुरे, प्रवीण खोब्रागडे, सुनील मुसळे राजेंद्र खोब्रागडे,प्रतीक डोर्लिकर,निलेश बेलखेडे, नंदू पढाल, दत्ता हजारें, वासुदेव खेळकर,डॉ. महाकुळकर, गोवील मेहेरकुरे,विजय नळे विजय पिदूरकर, रंजित डवरे डॉ. पियुष मेश्राम, ऋषभ राऊत, निलेश खोडे, आदिवासी समाजाचे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम ,पराग वानखेडे आदी विविध पक्षाचे तथा विविध जातनिहाय संघटना कुणबी, तेली, माळी, सुतार, नाभिक, बारई, सोनार, कलार,धनगर, बेलदार, भावसार, शिंपी, परीट, लोहार, वाढई समाज संघटना सोबतच आरपिआय संघटनेचे समर्थक उपस्थित होते.

  • चंद्रपुरात निघाला ओबीसींचा महामोर्चा

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये,बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे, ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही. सोमवार पासून 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

     

    अन्नत्याग आंदोलनाला शासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही, मात्र मराठ्यांच्या आंदोलनात राज्याच्या अर्ध्या मंत्री मंडळाने भेट दिली, पण ओबीसी आंदोलनाला अजूनही एकाही मंत्र्याने भेट दिली नाही.

     

    सोमवारी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महामोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग दर्शविला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपला सहभाग दर्शविला.

     

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलन मंडपात मोर्चा समाप्त करण्यात आला, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नाही, सरकारने ओबीसी वस्तीगृहाबाबत घोषणा केली मात्र त्याची पूर्तता केली नाही, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    आयोजित महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील हजारो ओबीसी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

     

    या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

     

    वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.

     

    त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

  • चंद्रपुरात रविवारी ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे , ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही.

     

    सोमवार पासून11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे व 17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेच्या वतीने चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

     

    या दरम्यान दिनांक 16 सप्टेंबर ला शहरात बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, मोर्चात सहभागी व्हावें असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासघाचे महासचिव सचिन राजूरकर, समनवयक डॉ अशोक जीवतोडे, धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे डॉ संजय घाटे ,चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर , ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, राजेश बेले,सतीश मालेकर, शाम राजुरकर, शैलेश जुमडे, शाम लेडे, अक्षय येरगुडे , ऍड देवा ,पाचभाई, मनीषा बोबडे, यांनी केले आहे.