Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Maharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Maharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Maharashtra state budget चंद्रपूर – आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 

    अवश्य वाचा : डेंग्यू चा बाजार सुरू होण्यापूर्वी मनपाने केली कारवाई

    Maharashtra state budget आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पातील तरतुदी कमी व मोदींची स्तुती जास्त असा हा अर्थसंकल्प दिसून येत आहे. समोरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला फसविण्याचा महायुतीचा डाव यातून दिसून येत आहे. बेरोजगारी शेतकरी, महिला याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीवर महायुती सरकार सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणार असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहे, त्यापूर्वी घोषणांचा बाजार या अर्थसंकल्पातून समोर आलेला आहे. महायुती सरकारने कितीही घोषणा केल्या तरी जनता यांना लोकसभा निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, राज्यातील व देशातील जनता भाजप व महायुती सरकारला मोठा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, चांगल्या दिवसाचे स्वप्न नागरिकांना दाखवीत वाईट दिवसांची वाटचाल भाजपने नागरिकांना दाखवली,  त्याच उत्तर सामान्य जनता निवडणुकीच्या वेळी दाखवून देणार हे नक्की आहे.

    निवडणुकीपूर्वी कितीही घोषणा केल्या तरी त्या सर्व योजना जनता पायदळी नक्कीच तुडविणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अंतरिम अर्थसंकल्प बाबत दिली आहे.

  • Marathi Language : गौरव दिन मराठी भाषेचा

    Marathi Language : गौरव दिन मराठी भाषेचा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठी, महाराष्ट्राची चैतन्यशील आणि भावपूर्ण भाषा, तिच्या मूळ भाषिकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी, मराठी रसिक एकत्र येऊन गौरव दिन साजरा करतात, हा दिवस भाषेचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. गौरव दिनाची उत्पत्ती. Gaurav din

     

    प्रख्यात मराठी कवी आणि नाटककार व्ही.व्ही. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त 1987 मध्ये गौरव दिन, म्हणजे “Day Of Pride” पहिल्यांदा साजरा करण्यात आला. शिरवाडकर, कुसुमाग्रज म्हणून प्रसिद्ध. कुसुमाग्रज हे केवळ विपुल लेखकच नव्हते तर ते समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकही होते. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना प्रचंड आदर आणि प्रशंसा मिळाली. Marathi literature

     

    कुसुमाग्रजांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस गौरव दिन म्हणून घोषित केला. हा दिवस मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेबद्दल असलेल्या अपार अभिमानाची आणि प्रेमाची आठवण करून देतो. Linguistic diversity

     

    मराठी भाषेचा उत्सव साजरा करणे

    गौरव दिन हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम आणि मराठी भाषेचे सौंदर्य आणि वैविध्य दर्शविणारे संमेलन यांनी भरलेला दिवस आहे. मराठी भाषिक समुदायांनी एकत्र येऊन त्यांची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख साजरी करण्याचा हा एक प्रसंग आहे. Cultural heritage

     

    या दिवशी, शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्था स्पर्धा, वादविवाद आणि कविता वाचन आयोजित करतात, तरुण प्रतिभांना त्यांचे भाषिक कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतात. हे कार्यक्रम केवळ अभिमानाची भावनाच वाढवत नाहीत तर तरुण पिढीला त्यांचा भाषिक वारसा आत्मसात करण्यास आणि जतन करण्यास प्रोत्साहित करतात.

     

    शतकानुशतके जुना समृद्ध इतिहास असलेले मराठी साहित्य या उत्सवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी पुस्तक मेळावे, काव्यवाचन आणि साहित्यिक चर्चा आयोजित केल्या जातात. शब्दांच्या सामर्थ्यावर आणि समाजाला आकार देण्यावर त्यांचा काय प्रभाव पडतो यावर विचार करण्याची ही वेळ आहे.

     

    गौरव दिनाचे महत्व

    गौरव दिन आपल्या वाढत्या जागतिकीकरणाच्या जगात प्रादेशिक भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे भाषिक विविधतेची जोपासना आणि पालनपोषण करण्याची गरज अधोरेखित करते, कारण भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती, इतिहास आणि ओळख यांचे भांडार देखील आहेत.

     

    आपल्या अभिव्यक्त स्वभावासाठी आणि भावनांचे बारकावे टिपण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी भाषेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिदृश्याला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. गौरव दिन हा भाषिक समृद्धीचा उत्सव साजरा करतो आणि लोकांना त्यांच्या भाषेचा आणि वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित करतो.

     

    शिवाय, गौरव दिन हा मराठी भाषिक समुदायांच्या साहित्य, कला, संगीत, नाट्य आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील योगदानाची कबुली देण्याची संधी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या मराठी प्रतिकांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.

     

    वारसा जतन करणे

    गौरव दिन हा उत्सवाचा दिवस असला तरी तो मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देतो. जागतिक स्तरावर इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या युगात मराठीसारख्या प्रादेशिक भाषांचा विकास होत राहील याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

     

    शाळा, महाविद्यालये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही मराठी भाषा शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संसाधने विकसित करण्यासाठी, कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य आणि महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भाषाप्रेमी, संस्था आणि सरकार एकत्र काम करत आहेत.

     

    मराठीबद्दलचे प्रेम वाढवून आणि विविध क्षेत्रांमध्ये तिचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊन, भावी पिढ्या या भाषेचे कौतुक आणि कदर करत राहतील याची आम्ही खात्री करू शकतो. Marathi Bhasha Gaurav din

     

    निष्कर्ष

    गौरव दिन हा जगभरातील मराठी भाषिक समुदायांसाठी अभिमानाचा, उत्सवाचा आणि चिंतनाचा दिवस आहे. मराठी भाषेत अंतर्भूत असलेल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि भाषिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या गरजेचे हे स्मरण आहे. या खास दिवशी आपण एकत्र येऊ या, मराठी भाषेचे सौंदर्य साजरे करूया आणि तिचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकून राहू या.

  • Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    News34 Chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या पटांगणात दिनांक 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत बहुजन विकास मंच चंद्रपूर द्वारा बहुजन समाजातील नागरिकांकरिता विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे सादरीकरण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच शिवराय ते भिमराय असा प्रवास सांगणारा मी वादळवारा हा कार्यक्रम अनिरुद्ध वनकर यांच्यातर्फे सादर करण्यात आला. Upcoming election

     

    24 फेब्रुवारी रोजी निर्भय बनो या शीर्षकाखाली डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले की, 2014 पासून देश हुकूमशाही कडे चाललेला दिसून येत आहे, लोकशाही जर बळकट करायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मोदी व शहांचा पराभव होणे आवश्यक आहे. Bahujan vikas manch

     

    आज भारतीय जनता पार्टी घाबरली असून त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. देशातल्या अनेक स्वायत्त संस्था हाताशी घेऊन विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव केंद्रातील सरकार करीत आहे. समाजा समाजात द्वेष निर्माण करून हे सरकार सामाजिक असंतोष निर्माण करीत आहे. dr.Vishwambhar Chaudhary

     

    देशातील अनेक संस्था अदानी व अंबानीला विकून त्यांना आर्थिक बळकट करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात आर्थिक असमतोल निर्माण होत आहे. एकीकडे देश बळकट होत चालल्याचे सांगून दुसरीकडे ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य देत असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहे हा विरोधाभास असून आज याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. Constitution

     

    यावेळी प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, आज या देशात संविधान टिकवायचे असेल तर हे हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षातील विविध माजी नगरसेवक व मान्यवरांचा  सत्कार देखील करण्यात आला.यावेळी मंचावर आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोपाल अमृतकर अँड. प्रीतीशा साधना, तसेच बहुजन विकास मंचातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.
  • District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

    District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या (District Drug Store) नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य पुष्पा पोडे उपस्थित होत्या.

     

    यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, चंद्रपूर येथे नवीन औषध भांडाराचे तसेच तडाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. यात औषधींचा साठा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. या भांडाराच्या माध्यमातून एक चांगले औषध भांडार जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. stockpile of medicines

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा, विस्तारीकरण, स्मार्ट पी.एच.सी. निर्माण करण्यात येत आहे. शहरातील खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Medical services

     

    डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी पालकमंत्री सदैव प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.

     

    तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी / लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथे मान्यवरांच्या हस्ते फित कापून जिल्हा औषधी भांडारच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तर आभार राकेश नाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     

    नवीन औषधी भांडारमधील सुविधा : नवीन औषधी भांडार मध्ये औषधी साठवणुकीची जास्त क्षमता, मार्गदर्शक सुचनांप्रमाणे औषधाची व्यवस्था, औषधाप्रमाणे खोलीचे तापमान नियंत्रण, पी.एच.सी. व इतर ठिकाणी औषधी साठा वाहतुकीची सोय, फायर फायटींग डिटेक्शन सिस्टीम, पाण्याची सुविधा, शौचालयाची सोय, कोल्ड स्टोरेज रूम, किडे, वाळवी, साप आदींपासून औषधीचे संरक्षण आदी सुविधा येथे करण्यात आल्या आहेत.

     

    जिल्हा औषध भांडार मुळे ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना औषध पुरवठा करण्याकरीता लागणा-या औषधांचा साठा करण्यास व व्यवस्थित जतन करून वितरीत करण्यास मदत होणार आहे.

  • Pollution Crisis : चंद्रपुरात सनफ्लॅग कोळसा खाणी विरुद्ध आंदोलन

    Pollution Crisis : चंद्रपुरात सनफ्लॅग कोळसा खाणी विरुद्ध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सॅन फ्लॅग कोळसा खाणीमुळे जिल्ह्यातील बेळगाव येथील रहिवाशांना प्रदूषणाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा केवळ पर्यावरणावरच परिणाम होत नाही तर गावकऱ्यांच्या जीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. Sunflag coal mine

    गावातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई हा त्यांना भेडसावणारा एक प्रमुख प्रश्न आहे. त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा यावेळी प्रयत्न करीत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. Pollution crisis

     

    सन फ्लॅग कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रदूषण विभागाचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप समाजातील प्रमुख सदस्य राजेश बेले यांनी केला. प्रदूषणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करीत त्यांना निलंबित करावे अशी मागणी बेले यांनी केली असून कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे पुतळे जाळून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Environmental preservation

     

    गावकरी त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचा निर्धार करतात. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या चिंतेकडे लक्ष देणे आणि सॅन फ्लॅग कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्थांचे कल्याण आणि पर्यावरणाचे रक्षण याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे आणि पुढील हानी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या पाहिजेत. Water scarcity

  • Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील १३ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Chandrapur city

     

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. Tax collection

     

    कर वसूली मोहीमेदरम्यान दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार,सुंदराबाई खनके,पुंडलिक खनके यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासुन थकीत असल्याचे आढळुन आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत वारंवार सुचना दिल्याचेही आढळून आले,मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार यांचे प्रत्येकी १,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार यांचे ६,सुंदराबाई खनके यांचे २,पुंडलिक खनके यांचे ३ असे एकुण १३ नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. Tax payments

     

    काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Pathanpura ward

    करावा भरणा – www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. Municipal services

     

    त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

  • Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवून चंद्रपूर लोकसभा जागा जिंकण्याची संधी देण्याचा विचार करू शकते. त्यामुळे विधानसभेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. Assembly Election

     

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा नवा उमेदवार येणार, की सुधीर मुनगंटीवार उमेदवार होणार? सध्या या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभेच्या जागेवर शिवसेना दावा करू शकते, असा अंदाज आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन बल्लारपूर येथे झाले. त्याच दिवशी भाजपने मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा कार्यक्रम शहरात आयोजित केला होता. Chandrapur lok sabha

     

    नेहा पेंडसेच्या कार्यक्रमाला आणि शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील विरोधाभासी गर्दीने शिवसेनेची ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत, तसतसे पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही जागांसाठी कशी रणनीती आखतात आणि स्पर्धा करतात हे पाहणे मनोरंजक असेल. Bharatiy janata party

     

    राजकारणातील नवे पर्व, कोण आहेत संदीप गिर्हे?

    चंद्रपूर शहरातील रामनगर भागातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या संदीप गिऱ्हे यांचे जीवन संघर्ष आणि चिकाटीने भरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी लहान वयातच शाळेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश केला. Sandeep girhe

     

    शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या सध्याच्या पदापर्यंत, गिर्हे यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. राज्यात राजकीय बदल होऊनही संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले. आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ठाकरे गटाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात, तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लक्षणीय बळ मिळविले आहे. Shiv sena

     

    गिऱ्हे यांच्या संघटन कौशल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना थक्क करून सोडले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संभाव्य पाठिंब्याने संदीप गिऱ्हे यांना मोठा राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गिऱ्हे यांच्यासारखा तळागाळातील कार्यकर्ता दिग्गज नेत्यांना आव्हान देणारा पाहिल्यास नवल वाटणार नाही. शेवटी, बदल हा गोष्टींचा नैसर्गिक क्रम आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देता, चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला आमदार निवडून आणण्याची दाट शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. Minister sudhir mungantiwar

     

    संदीप गिऱ्हे यांचे समर्पण आणि संघटनात्मक बांधणीसाठी धोरणात्मक दृष्टीकोन याने निःसंशयपणे या जिल्ह्यात पक्षाच्या वाढत्या प्रभावाला हातभार लावला आहे. शेवटी, संदीप गिऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय शक्ती म्हणून झालेला उदय हा त्यांच्या अटूट बांधिलकीचा आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा पुरावा आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिवसेना पक्ष आगामी निवडणुकीत मोठा प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या मतदारांची साथ शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळत आहे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला आलेला जनसमुदाय शिवसेनेची वाढती ताकद दाखवीत आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात बेधडक वक्तव्य करीत आहे, त्यांनी सत्तेपुढे गुढघे टेकले नाही, आजही त्यांच्या सोबतीला निष्ठवंतांची फौज उभी आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरे पॅटर्न चालणार असा अंदाज राजकीय विचारवंतांनी वर्तविला आहे.

  • Book Festival : ज्याने फेसबुकला जन्म दिला तो पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फक्त – सुधीर मुनगंटीवार

    Book Festival : ज्याने फेसबुकला जन्म दिला तो पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फक्त – सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ज्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे, पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती मात्र लोप पावत आहे. ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील, अशी सूचना वजा अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) व्यक्त केली.

     

    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरदराव सालफळे होते. तर प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडे, रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार, नामदेव राऊत, प्रा. श्याम मोहरकर, सुदर्शन बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. मानसिक भूक भागविण्यासाठी वाचकांचा क्लब स्थापन करण्याचा विचार करावा. उद्या या सभागृहातील ग्रंथोत्सव चांदा क्लब ग्राऊंडवर होईल तेव्हा मला अधिक आनंद होईल.’ ज्याने फेसबुकला जन्म दिला तो मार्क झुकेरबर्ग छान झाडाखाली बसून पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फेसबुकवर व्यस्त आहेत, असे मी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सएपवर वाचले होते.

     

    ही खरे तर आपल्यासाठी विडंबनात्मक स्थिती आहे, असेही ते म्हणाले. ‘मी आमदार झालो तेव्हा वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली. आणखी नवीन वाचनालये सुरू करणार आहे. २०१५ मध्ये माझ्या विभागातर्फे जीआर काढून कार्यक्रमांमध्ये ‘बुके नव्हे बुक द्या’ असा नियम केला. आता जागा अपुरी पडत आहे, इतकी पुस्तके झाली आहेत. हजारो पुस्तके माझ्याकडे आहेत. मी निवृत्त होईल तेव्हा ही पुस्तकेच माझ्यासाठी धावून येतील,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    ग्रंथालयांमध्ये एकसूत्रता यावी

    ग्रंथालयांच्या अंतर्गत सर्व व्यवस्थांमध्ये एकसूत्रता आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये एका सॉफ्टवेअरने जोडली तर अधिक सोयीचे होईल. एखाद्या ग्रंथालयात एखादे पुस्तक नसेल तर महाराष्ट्रातील कोणत्या ग्रंथालयात ते उपलब्ध आहे, हे कळू शकले पाहिजे. त्यावर पुस्तकांना रेटिंग देण्याची सोय असावी. अमेझॉनच्या धरतीवर हे काम करणे शक्य आहे, अशा सूचना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हाभरात जनजागृतीसाठी स्पर्धा घेता येतील का, याचाही विचार करावा, असेही ते म्हणाले.

     

  • Eco Pro – इको-प्रो कडून चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन

    Eco Pro – इको-प्रो कडून चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करत पार्थना करीत असतात, या दिवसाचे निमित्त साधून ‘इको-प्रो’च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन आज एकाचवेळी सकाळी गड पूजन केले. Eco pro

     

    इको-प्रो संस्था जिल्ह्यातील किल्ले संरक्षण व संवर्धनकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुद्धा राबविले, यातून आता किल्ला पर्यटन ‘चंद्रपूर हेरिटेज वॉक’ सुद्धा सुरू झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील विविध गड-किल्ले संवर्धन करिता सुद्धा प्रयत्न सुरू आहे. Chandrapur district

     

    फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड-दुर्ग प्रेमी किल्ल्यावर एकत्रित येत पूजन करतात आणि पार्थना करतात की “हे किल्ला स्वरुपी देवतांनो, त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझे संरक्षण करण्याची, ते आम्ही केले पाहिजे. जेथे-जेथे संवर्धन कार्य चालू आहे, तेथे अशी कोणतेही दुर्घटना घडू देऊ नकोस, कि ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य, दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृध्दी दे व त्याच्या आरोग्याची काळजी घे. हिच तुझ्या चरणी माझी प्रार्थना. Heritage walk

     

    अशी पार्थना करीत आज चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यावर पूजन करण्यात आले. चंद्रपूर येथील परकोट किल्ल्यावर पठाणपुरा गेट वर बंडू धोतरे यांचे नेतृत्वात योजना धोतरे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, कपिल चौधरी तर बल्लारपूर येथील किल्ल्यावर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जैस्वाल आणि भद्रावती येथील किल्ल्यावर भद्रावती इको प्रो सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, दिपक कावटे, राहुल सपकाळ, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले व माणिकगड किल्ल्यावर सुनील लिपटे, सुधीर देव, राजू काहिलकर, संजय सब्बनवार आदी कार्यकर्ते यांनी पूजन केले.

  • Crime Prevention : चंद्रपुरात 20 वर्षीय युवकाला देशी कट्टा व 5 जिवंत काडतुससहित अटक

    Crime Prevention : चंद्रपुरात 20 वर्षीय युवकाला देशी कट्टा व 5 जिवंत काडतुससहित अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी जिल्ह्यात अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. Crime prevention

     

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सूचनांचे पालन करीत पथक तयार केले, व संपूर्ण जिल्हाभर अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरोधात मोहीम सुरू केली. Illegal weapon

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने नुकत्याच केलेल्या धडक कारवाईत तुकूम परिसरात एका २० वर्षीय तरुणाला पकडण्यात आले. संशयिताकडे देशी चाकू आणि 5 जिवंत काडतुसे आढळून आली, ज्यामुळे या जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली. Public safety

     

    आरोपी 20 वर्षीय जुबेर साहेब अली शेख असे नाव असून त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहे, आरोपी जुबेर वर अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला. Law enforcement

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, संतोष एलपूलवार यांनी केली.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी आणखी एका तरुणाला पकडल्यानंतर अवघ्या महिन्याभरात ही अटक झाली आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आपल्या समाजातील बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वाढीव दक्षता आणि सक्रिय उपायांची आवश्यकता अधोरेखित होते. Community vigilance

     

     

    या शस्त्रांच्या स्त्रोताचा तपास करण्यासाठी आणि अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमधील संभाव्य कनेक्शन ओळखण्यासाठी अधिकारी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. चंद्रपूरमधील रहिवाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत.

     

     

    संशयिताला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची झटपट कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची बांधिलकी दर्शवते. हे आमच्या समुदायांचे रक्षण करण्यासाठी मजबूत कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या महत्त्वाची आठवण करून देणारे आहे.

     

    रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना द्यावी. एकत्र काम करून, प्रत्येकासाठी अधिक सुरक्षित आणि सुरक्षित वातावरणात योगदान देऊ शकतो.

     

    कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे आणि त्यांच्या तपासात त्यांना सहकार्य करणे समुदाय सदस्यांसाठी आवश्यक आहे. एकत्रितपणे, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा प्रसार रोखण्यात आणि आपल्या समुदायांचे कल्याण सुनिश्चित करण्यात मदत करू शकतो.