Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

    Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ८ जून २०१६ चा ‘काम नाही, वेतन नाही’ शासन निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे केली.  No work no pay policy

     

    आदिवासी विकास विभागाद्वारा संचालित खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदभनि आश्रमशाळा मान्यता रद्द झाल्यास किंवा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंतच्या कालावधीत ८ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू करण्यात आले आहे. Teaching staff

    ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू करणे म्हणजे एक प्रकारे कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे होय. या शासन निर्णयामुळे राज्यातील आदिवासी विभागामार्फत संचालित शाळांतील कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. Non-teaching staff

     

    या धोरणामुळे शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास अश्या कर्मचाऱ्यांवर समायोजन होईपर्यंत वेतन न मिळाल्याने आर्थिक संकट ओढावत आहे. यामुळे आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही दुटप्पी भूमिका शासनाने मागे घ्यावी, यासाठी आमदार सुधाकर अडबाले हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. Tribal development department

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत आदिवासी विकास विभागातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा जाचक असा ८ जून २०१६ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे आदिवासी विभागाकडे केली. Mla sudhakar adbale

  • Vande Mataram Chanda : ‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

    Vande Mataram Chanda : ‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण प्रणालीच्या कॉल सेंटरला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला. Vande mataram chanda

     

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, तांत्रिक सहाय्यक अनुराग गयनेवार आदी उपस्थित होते. Government-citizen interaction

     

    जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कॉल सेंटरला आतापर्यंत प्राप्त तक्रारीची यादी अद्ययावत ठेवावी. तक्रारीचा विषय व सदर तक्रार कोणत्या विभागाशी संबंधित आहे, याबाबत माहिती उपलब्ध ठेवावी तसेच दैनंदिन तक्रारीची नोंद ठेवावी. ज्या तक्रारकर्त्याचे प्रश्न प्रलंबित असतात व लवकर सुटत नाही, अशा तक्रारीबाबत  प्रशासनाला कळवावे, अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी श्री.गौडा यांनी आतापर्यंत प्राप्त  तक्रारी, निराकरण करण्यात आलेल्या तक्रारी, प्रलंबित तक्रारी तसेच कॉल सेंटरमधील कार्यरत चमु, दैनंदिन येणारे कॉल, याबाबत माहिती जाणून घेतली. Government machinery

     

    आतापर्यंत 710 तक्रारींचे निराकरण : ‘वंदे मातरम् चांदा’ या तक्रार निवारण प्रणालीवर आजपर्यंत 1038 तक्रारी प्राप्त झाल्या असून 710 तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी प्रक्रियेमध्ये आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी स्वतः कॉल सेंटरच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून तपासणी केली. तसेच आतापर्यंत आलेल्या विविध तक्रारी जाणून घेतल्या. Public services

     

    अशी नोंदवा तक्रार : तक्रार नोंदवण्यासाठी 1800-233-8691 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सदर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. टोल फ्री क्रमांकावरील प्राप्त तक्रारी vandemataramchanda.in या संकेतस्थळावर नोंदविली जाईल व संबंधित विभागास पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येईल. Grievance redressal

  • Transportation : फास्टॅग केवायसी अपडेट

    Transportation : फास्टॅग केवायसी अपडेट

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – तुमचा फास्टॅग केवायसी अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास उद्यापासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल. याचा अर्थ असा की तुमचा फास्टॅग यापुढे कार्य करणार नाही, ज्यामुळे तुमच्या रोजच्या प्रवासादरम्यान गैरसोय होईल. विनाव्यत्यय वापर सुनिश्चित करण्यासाठी, तुमचे फास्टॅग केवायसी त्वरित अपडेट करणे महत्वाचे आहे. Fastag kyc

     

     

    फास्टॅग केवायसी ऑफलाइन अपडेट

    तुम्ही तुमच्या फास्टॅग केवायसी ऑफलाइन अपडेट करण्यास प्राधान्य देत असल्यास, तुम्ही जवळच्या फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेला किंवा पॉइंट ऑफ सेल (POS) स्थानाला भेट देऊ शकता. तुमचा मूळ आयडी पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासह आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. बँक प्रतिनिधी किंवा POS ऑपरेटर तुम्हाला KYC अपडेट प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करतील आणि तुमचे तपशील सत्यापित करतील. Kyc update

     

    फास्टॅग केवायसी ऑनलाइन अपडेट

    तुमचा फास्टॅग केवायसी ऑनलाइन अपडेट करणे हा एक सोयीस्कर पर्याय आहे. तुमच्या फास्टॅग प्रदात्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि KYC अपडेट विभागात नेव्हिगेट करा. तुमचा फास्टॅग नंबर, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी आवश्यक माहिती भरा. तुमच्या आयडी प्रूफ, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि निर्दिष्ट नमुन्यानुसार फोटोच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. तपशील सत्यापित करा आणि फॉर्म सबमिट करा. तुमचे केवायसी यशस्वीरित्या अपडेट झाल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. Transportation

     

    फास्टॅग केवायसी स्थिती

    तुमचा Fastag KYC अपडेट केल्यानंतर, तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी स्थिती तपासायची असेल. असे करण्यासाठी, तुमच्या फास्टॅग प्रदात्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा. केवायसी स्टेटस विभाग शोधा आणि तुमचा फास्टॅग नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. सिस्टम तुमच्या फास्टॅग केवायसी अपडेटची सद्यस्थिती दाखवेल. Daily commute

     

    उशीर करू नका! तुमच्या रोजच्या प्रवासात कोणतीही गैरसोय किंवा व्यत्यय टाळण्यासाठी आजच तुमचे फास्टॅग केवायसी अपडेट करा.

  • Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation

     

    कोण आहे चैतराम पवार? जाणून घ्या chaitram pawar

     

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनवासी चैत्राम पवार यांनी 1992 पूर्वीच्या उजाड आणि ओसाड असलेल्या मालरण प्रदेशात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अढळ आशावाद आणि गावातील आदिवासी बांधवांच्या पाठिंब्याने पवारांनी समृद्ध गाव निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. बारीपाडाच्या यशाने जगभरातील तज्ञांचे लक्ष वेधून घेतले, 78 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ते दुसरे स्थान मिळवले. शिवाय, बारीपाडा प्रकल्पाला IFAD या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मान्यता मिळाली. Maharashtra vanbhushan award

     

    चैत्राम पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये आपला प्रयत्न वाढवला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागात वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत. Baripada

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या वनविभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल चैत्राम पवार यांचे कौतुक केले. राखीव वनक्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, पर्यावरण विषयक उपक्रमात पवारांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 3 मार्च रोजी चंद्रपूर येथील ताडोबा महोत्सवात हा पुरस्कार सोहळा होणार असून त्यात चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Chandrapur tadoba festival

     

    ही मान्यता पवारांच्या समर्पणाचा आणि बारीपाड्याला समृद्ध समाजात रूपांतरित करण्यासाठी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा दाखला आहे. चैत्राम पवार यांचा प्रवास ही एक प्रेरणादायी यशोगाथा आहे जी श्रमशक्ती आणि लोकांच्या अदम्य भावनेचे दर्शन घडवते. पर्यावरण आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करताना महाराष्ट्राला अभिमान वाटतो. Tribal community

  • Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा अभयारण्यातील वाघ तर आपण बघितले असणारचं आता या वाघाची विविधता बघण्यासाठी वनविभागाने 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. Tadoba festivals

     

    1 मार्च ते 3 मार्च दरम्यान शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आयोजित महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सव दरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. Tadoba sanctuary

     

    आयोजित महोत्सव कार्यक्रम दरम्यान चांदा क्लब मैदान परिसरात नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. Chandrapur district

     

    1 ते 3 मार्च दरम्यान दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरोरा नाका चौक ते मित्रनगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सव करीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांसाठी बंद राहील. वरील दोन्ही मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. Wildlife enthusiast

     

    नागरिकांनी पोलीस प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. नागपूर कडून शहराकडे जाणारे वाहन वरोरा नाका उड्डाण पूल ते सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान ते मित्र नगर चौक, संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश केल्या जातील. शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपूरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते बस स्टॅण्ड ते सिद्धार्थ हॉटेल मार्गे उड्डाण पूल वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक मित्र नगर चौक ते जिल्हा स्टेडियम मार्गे जिल्हाधिकारी निवासस्थान हुन बाहेर जातील.  Chandrapur vehicle parking

     

    ताडोबा महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने वाहनतळ नियोजित केले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब मैदान समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चर्च मैदान, कृषी भवन जवळील ट्रॅव्हल स्टॅण्ड जवळ नागरिकांनी आपले वाहन पार्क करावे. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Traffic police

     

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच फुटपाथवरही अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Chandrapur municipal corporation

     

    त्याचप्रमाणे काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबी द्वारे काढण्यात आले असुन काही गाळेधारकांना गाळे सील करण्याबाबत अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत. रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Road encroachment

     

    सदर कारवाई उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात  सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,अतिक्रमण निर्मुलन अधिकारी राहुल पंचबुद्धे तसेच मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली. Vehicle seizure

  • Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगार पेक्षा वेतन मिळत नाही. वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही. Mahavitran

     

     

    त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या 30 संघटना एकत्र येत कृती संघटना स्थापन केली. प्रलंबित मागणीविरोधात टप्प्या टप्प्याने आंदोलने झाली आता 28 व 29 फेब्रुवारीला 48 तासाचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. Contract worker

     

    यावेळी चंद्रपूर महावितरण बाबुपेठ येथे 28 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु केले यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मिलींद गवई यांनी कामगारांच्या मागण्याबाबत माहिती दिली.

  • Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले. Tadoba andhari tiger project

     

    रामगावकर पुढे म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. Sustainable tourism

     

    हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. Wildlife conservation

     

    पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले. Tadoba tiger

     

    या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

     

    निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. रामगावकर यांनी दिली.
    आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.

  • Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    राज्याच्या शाश्वतपर्यावरणपूरकसर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

    चंद्रपूर – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी,  कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mla kishor jorgewar

     

       सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करित आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण  ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार  महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. State budget

     

    त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह महिला सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये, जिल्हा वार्षीय योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांची तरदुत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.18 लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलसीस सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एंकदरित विचार केल्यास समाजातील सर्व घटकाला स्पर्श करुन न्याय देणारा राज्यहिताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. Finance minister ajit pawar

     

    शाळांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा “बजेट”

    आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. शाळांचा विकास आणि शैक्षणिक सुविधांसाठीही या अर्थसंकल्पात अंतर्भाव दिसून येत नाही. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देण्यात आले नाही. शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेंशनबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. आय टी शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कुठलीही तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नाही.

    – सुधाकर अडबाले, आमदार
    महाराष्ट्र विधान परिषद

     

    सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

    राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
    – रितेश (रामू) तिवारी,
    जिल्हाध्यक्ष
    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर

     

    राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले. मात्र, चंद्रपूरसारख्या प्रदूषित जिल्ह्यासाठी शुद्ध हवा, पर्यावरण आणि इरई नदी खोलीकरण आणि पूरग्रस्त स्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस तरदूत करण्यात आली नाही. या शिवाय राज्यातील शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी कोणतीही निधीची तरतूद नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्याची पिळवणूक होईल.

    बहुजनांचे प्रतिनिधी
    श्री. राजेश वारलुजी बेले
    अध्यक्ष | संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था
    चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा निवडणूक 2024

  • Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – श्री. माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने मंदिराच्या आवारात जागृत माता श्री. माँ. दुर्गादेवी मंदीराचा आठवा वर्धापन दिन सोहळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. समिती संचालक रुपलसिंह रावत व सौ. मोना रावत यांनी यांचे हस्ते मंदिराचे पुजारी मुकेशजी मिश्रा यांच्या मंत्रोपचार पद्धतीने पुजा अर्चा करण्यात आली.

     

    नंतर सकाळी ९ वा. पासुन मातेचा दुग्धाभिषेक सोहळा मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व सौ. मामता रावत यांनी महाआरती असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. दुपारी १ वा. पासुन महीलांकरीता कुंकुम पुजा आणि संध्याकाळी ७ वा. आरती नंतर महाप्रसाद (महाभोजन) आयोजित करण्यात आला.

     

    या महाप्रसादाचा आस्वाद तालुक्यातील व मुल शहरातील चार हजारांच्या वर भाविकांनी आस्वाद घेतला. माँ.दुर्गा मातेचा द्वीदिवसीय सोहळा आयोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात समितीचे उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, सचिव संजय पडोळे, संचालक घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार , केदारनाथ कोटगले, गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, सुरेश देशमुख, छोटू रावत, सुनील मंगर, यांनी सहकार्य केले. महाप्रसाद भोजन व्यवस्थेसाठी राकेश रत्नावार, घनश्याम येनरकर, संजय पडोळे, राजेंद्र कन्नमवार, रुपल रावत, सुनील मंगर, गुरु गुरनुले, केदारनाथ कोटगले, लोमेश नागापुरे, व्यंकटेश पुल्लकवार, तेजस महाडोळे व युवशक्तीची पूर्नटीम, यांनी परिश्रम घेतले. महिलांच्या गर्दीसाठी शामलता बेलसरे, राधिका बुक्कावार,संमता बनसोड,सीमा भसारकर यांनी मेहनत घेतली.