Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Imtiaz Jalil : मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार पण माझी एक अट आहे – खासदार इम्तियाज जलील

    Imtiaz Jalil : मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार पण माझी एक अट आहे – खासदार इम्तियाज जलील

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या या घोषणेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रतिसाद देत दम असेल तर खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावती मधून लोकसभा निवडणूक लढून दाखवावी. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Loksabha election

     

     

    चंद्रपूर येथे शनिवारी AIMIM च्या कार्यक्रमापूर्वी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सदर मुद्द्यावर भाष्य केले आणि नवनीत राणा यांच्या आव्हानाला उत्तर दिले. चंद्रपुरात एमआयएमने आयोजित केलेल्या जाहीर सभा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांनी दिलेले आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली. Fake cast certificate

     

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मला बनावट जात प्रमाणपत्र काढण्यास मदत केल्यास मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा ज्या जागेसाठी लढत आहेत त्याबाबतचा एक महत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. त्यांनी ही जागा राखीव असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि इम्तियाज जलील कायदेशीररित्या त्या विशिष्ट मतदारसंघासाठी लढू शकतील का असा सवाल केला. विनोदाच्या स्पर्शाने त्यांनी टिप्पणी केली की ही परिस्थिती नवनीत राणाची बुद्धिमत्ता दर्शवते. इम्तियाज जलीलचा हा प्रतिसाद त्याच्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची त्याची जिद्द आणि तयारी दर्शवतो. या समस्येकडे लक्ष देऊन, तो पारदर्शकता आणि निष्पक्ष स्पर्धेसाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित करतो. भारतीय राजकारणात बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. Imtiaz jalil

     

     

    निवडणुकीतील फायद्यासाठी अशा प्रमाणपत्रांचा वापर समता आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे कमी करते. इम्तियाज जलील यांच्या विधानाने या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे आणि निवडणूक प्रक्रियेत अखंडतेची गरज आहे. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतशी इम्तियाज जलील यांच्यासारखे राजकीय नेते देशाच्या लोकशाही परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांची कृती आणि विधाने सार्वजनिक सेवेतील त्यांचे समर्पण आणि त्यांच्या घटकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवतात. Navneet Rana

     

    नवनीत राणा यांच्या आव्हानाला इम्तियाज जलील यांनी दिलेला प्रतिसाद केवळ त्यांच्या दृढनिश्चयावर प्रकाश टाकत नाही तर राजकारणातील नैतिक आचरणाच्या महत्त्वाची आठवण करून देतो. बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दा उघडपणे मांडून त्यांनी पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे उदाहरण घालून दिले. शेवटी, इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या घोषणेला नवनीत राणा यांच्याकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. Fair Competition

  • Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा ‘व्होट फॉर ओपीएस’ नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. Old pension scheme

     

    आतापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्‍या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे. तो अहवाल अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मध्ये सभागृहात सादर करून राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, असेही निवदेनात म्‍हटले आहे. Retirement plan

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्‍यान १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने राज्‍यातील कर्मचारी सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्‍यान सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्‍मक असल्‍याचे सभागृहात म्‍हटले होते. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई काढण्यात येत असलेल्‍या संकल्प पदयात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक-कर्मचारी सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. financial security

    कर्मचाऱ्यांत वाढता असंतोष बघता सरकारने राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्‍काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.  Government employee

  • Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाच्या जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे तसेच तडाली (ता. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचा-यांच्या नवीन वसाहतीचे लोकार्पण रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. national health mission

     

    दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पाच एम्सचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. healthcare infrastructure

     

    यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अभियानांतर्गत विविध कामांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण व भुमिपूजन करण्यात येणार आहे. medical services

     

    या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा औषध भांडार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारत जवळ, चंद्रपूर तसेच तडाली येथील अधिकारी कर्मचारी नवीन वसाहतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. inauguration ceremony

  • Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे राजेश्वर तुकाराम या बैल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी राजेश्वर आपल्या दुचाकीवरून नागपूरला जाणार असून संध्याकाळी परतणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून सकाळी घरून निघून गेला. Tragic event

     

    मात्र, संध्याकाळ झाली तरी राजेश्वर घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. कुटुंबीयांनी राजेश्वरचा शोध सुरू केला, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण तो कोणताही मागमूस न घेता गायब झाल्याचे दिसत होते. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी राजेश्वरची दुचाकी तोरगाव ते मौशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडली. दुर्दैवाने राजेश्वरचा निर्जीव मृतदेह दुचकीजवळील सागवान नर्सरी येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. Bullock traders suicide

     

    राजेश्वरने स्वतःचा जीव घेण्याच्या निर्णयामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. ब्रह्मपुरी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुःखद घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तपास सुरू केला आहे. राजेश्वरच्या वैयक्तिक जीवनाभोवतीचा तपशील आणि त्याच्या मानसिक स्थितीत योगदान देणारे कोणतेही संभाव्य घटक चालू तपासाचा भाग म्हणून कसून तपासले जातील.  तपासावरील पुढील अद्यतने उपलब्ध होताच सामायिक केली जातील. Torgaon incident

  • Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या देशातली परिस्थिती अत्यंत भयावह असुन केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ED,CBI सारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन विरोधी पक्षांना कमकुवत करुन आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. Unity राज्यातील व केंद्रातील सरकार हे समाजा समाजात द्वेष निर्माण करुन लोकशाहीचा अपमान करीत आहे. त्यामुळे आज संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन विचार मंच द्वारा आयोजित लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. Constitution

     

    बहुजन विचार मंच चंद्रपूर द्वारा आयोजित लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पटांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले लिखित तृतीयरत्न या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिभा धानोरकर उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या कि, आजची राजकीय परिस्थिती भयावह असून देश हुकुमशाही कडे वळत आहे. Democracy

     

    आपल्याला आज संविधान रक्षणाची गरज असुन त्यासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होईल. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाने बहुजन समाजाचा वारसा जोपासला जाऊन कला व गीतांमधून प्रबोधन होणार आहे तसेच डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे मत देखील यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. Mla pratibha dhanorkar

     

    तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी चंद्रपूरातील विविध समाजातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला. Political climate

     

    उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सूर्यकांत खनके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिरुध्द वनकर यांच्यासह विनोद दत्तात्रय, रितेश तिवारी, नम्रता ठेमस्कर, चंदा वैरागडे, अनिल नरुले, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बापू अन्सारी, सकिना अन्सारी, विना खनके, रमजान अली, अनुताई दहेगांवकर, शालिनी भगत, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन श्री. गोपाल अमृतकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. प्रितिशा साधना, राहुल सुर्यवंशी, रामचंद्र कोंद्रा, स्वप्नील शेंडे, मोनु रामटेके, श्याम राजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.

  • Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीने आज महाराष्ट्र शासन व प्रशासनाचा निषेध करण्याकरिता तहसील कार्यालय जिवती येथे चप्पल व जोडे दाखवीत निषेध व्यक्त केला. bharat rashtra samiti

     

    12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. Jivati taluka

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली, मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. Farmer protests

     

    तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. Maharashtra government

     

    आंदोलनाच्या चौथ्या दिवस लोटूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्याने बीआरएस आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनाला चप्पल – जोडे दाखवीत निषेध नोंदवला. Agricultural sector

    शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि जिवती तालूका वासीयांना योग्य न्याय द्यावा असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.

  • IPS Status : राज्यातील 5 पोलीस उपायुक्तांना IPS दर्जा बहाल

    IPS Status : राज्यातील 5 पोलीस उपायुक्तांना IPS दर्जा बहाल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – भारत सरकारने अलीकडेच राज्यातील पाच पोलीस उपायुक्तांच्या अपवादात्मक समर्पण आणि सेवेची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा (IPS) दर्जा प्रदान केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही प्रशंसनीय कामगिरी जाहीर करण्यात आली. Indian police service

     

    पूर्णिमा गायकवाड, पराग मणेरे, एन.जी. पाटील, आर.ए.शिंदे आणि संजय जाधव या पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा बहाल करण्यात आला आहे. या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या कर्तव्याप्रती अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. Deputy commissioner of police

     

    पाच प्रतिष्ठित पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पराग मणेरे यांचे विशेष स्थान आहे कारण त्यांनी यापूर्वी चंद्रपूर पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये, मानेरे यांनी अपवादात्मक नेतृत्व कौशल्ये दाखवली आहेत आणि अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या समर्पण आणि अथक प्रयत्नांमुळे त्यांना एक विश्वासू कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. Ips status

     

    या पोलीस अधिकाऱ्यांना सरकारने दिलेली मान्यता ही त्यांच्या कठोर परिश्रम, व्यावसायिकता आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी अटूट बांधिलकीचा पुरावा आहे. IPS दर्जा हा अशा व्यक्तींसाठी राखीव असलेला एक प्रतिष्ठित सन्मान आहे ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी अधिकारी म्हणून त्यांच्या भूमिकांमध्ये अपवादात्मक क्षमता आणि सचोटीचे प्रदर्शन केले आहे. Law enforcement officers

     

    भारतीय पोलीस सेवा ही भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवा (IFS) सह तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. आयपीएस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचा प्रतिबंध आणि तपास आणि नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. Public safety

     

    पाच पोलीस उपायुक्तांना आयपीएस दर्जा प्रदान करणे हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि राज्यभरातील इतर पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. हे कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात समर्पण, व्यावसायिकता आणि नैतिक वर्तनाचे महत्त्व अधोरेखित करते.

     

    पूर्णिमा गायकवाड, पराग मणेरे, एन.जी. पाटील, आर.ए.शिंदे आणि संजय जाधव यांचे त्यांच्या योग्य ओळखीबद्दल संपूर्ण समुदायासह पोलीस विभाग मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक उत्कृष्टतेलाच प्रतिबिंबित करत नाही तर राज्यातील पोलिस दलाच्या सर्वांगीण प्रगती आणि परिणामकारकतेमध्ये योगदान देते.

     

     

    लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची कबुली देणे आणि त्यांचे कौतुक करणे महत्वाचे आहे. IPS दर्जा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नात न्याय, निष्पक्षता आणि अखंडता या तत्त्वांचे पालन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो.

  • Manohar joshi : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल – आमदार प्रतिभा धानोरकर

    Manohar joshi : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल – आमदार प्रतिभा धानोरकर

    Manohar joshi चंद्रपूर – मुंबईत महानगरपालिकेत नोकरी ते मुख्यमंत्री अशा सर्वच पदांवर विराजमान झालेले माननीय डॉक्टर मनोहर जोशी यांच्या आज निधनाने राजकीय आदर्श हरपला असल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. 

    राजकीय ; भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे

    Manohar joshi शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून लढलेला हा नेता काळाच्या पडद्याआड जाणे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधीं साठी मोठी दुःखद घटना आहे. भविष्यात त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन वाटचाल करणार आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीप्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    कोण होते मनोहर जोशी?

    मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला.

    माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती.

    पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केले. पुढे वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली.  शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.

    बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. 1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.

    नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

  • Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी नुकतेच मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भयानक सवयीबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक श्री मेश्राम आणि सहाय्यक शिक्षक श्री व्यंकटी भदाडे हे वारंवार मद्यधुंद अवस्थेत शाळेत येताना दिसले आहेत, त्यामुळे शाळेतील समाजात खळबळ उडाली आहे. Alcoholic teacher

     

    अतिमद्यप्राशन केल्याने सहाय्यक शिक्षक बेशुद्धावस्थेत कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या वागणुकीचा शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर होत असलेल्या नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थी आणि पालक अतिशय त्रस्त आहेत. School environment

     

    शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याने, शिक्षकांच्या आचरणावर दारूचा प्रभाव पाहणे निराशाजनक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, बिडीचे बंडल आणि खर्रा घेऊन साक्ष दिल्याची नोंद केली आहे, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणखी वाढली आहे. Education department

     

    परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

    आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांचे कल्याण आणि शैक्षणिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अल्कोहोलच्या गैरवर्तनाच्या समस्येवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. Asapur zilla parishad highschool

     

    जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा आसापूर येथील मुख्याध्यापक मंगलदास मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भदाडे यांनी १६ फेब्रुवारी शुक्रवारी शाळेत दारूच्या नशेत बेधुंद होऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार विद्यार्थी व पालकांनी उघडकीस आणत त्यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडे २० फेब्रुवारी ला तक्रार दाखल करून दारूच्या नशेत शाळेत झिंगाट होऊन आलेल्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांला निलंबित करण्याची मागणी केली होती. Alcohol abuse

     

    त्यामुळे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना विदाऊट पे करुन कारणे दाखवा नोटिस बजावत या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात दोन शिक्षकांना डेप्यूटेशवर देण्यात आले आहेत.आसापूर येथील पालकांनी दिलेल्या
    तक्रारीवरून २२ फेब्रुवारी गुरूवारी शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानराज आवारी,व विस्तार अधिकारी रामा पवार यांनी येथील मदतनीस व पालकांचे एकत्रित बयाण नोंदविले आहे.या संदर्भातील चौकशीचा अहवाल दोन दिवसांत वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • Obc Students : ओबीसी विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

    Obc Students : ओबीसी विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतीगृह सुरू करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे 2 वसतीगृह सुरू करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने, ओबीसी कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ओ.बी.सी.,व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज करू शकतात. Obc students

     

    सदर प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात येईल. Government hostels

     

    चंद्रपूर शहरातील रहिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशाकरीता अर्ज घेता येणार नाही. विद्यार्थ्याचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. अर्ज घेतेवेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक मूळ/साक्षाकिंत प्रत (मार्कशीट, टि.सी., जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र) घेऊन येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला इयत्ता 12वीच्या परीक्षेत 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. पालकाची उत्पन्न मर्यादा 2.5 लाख असावी. अर्जदार हा इमाव, विजाभज, विमाप्र, आर्थिक मागास प्रवर्गातील असावा. अर्जदार हा व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारा असावा. Obc welfare department

     

    असे असेल वसतीगृहनिहाय 100 जागांचे आरक्षण : वसतीगृहनिहाय रिक्त जागांमध्ये इतर मागासवर्गाकरीता 48 जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती 31, विशेष मागास प्रवर्ग 6, ईडब्ल्यूएस 4, दिव्यांग 4, अनाथ 2 तर खास बाबीसाठी 5 अशा प्रत्येक वसतीगृहात 100 जागा राहणार आहेत. Admission

     

     

    असे राहील वेळापत्रक : 20 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान अर्ज वाटप व स्वीकारणे. 15 मार्च रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करणे. 25 मार्च पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत राहील. 28 मार्च रोजी दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करणे आणि 5 एप्रिल 2024 रोजी दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

     

     

    तरी ओ.बी.सी.,व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर वसतीगृहातील प्रवेशाकरीता अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.