देवेंद्र फडणवीस होते म्हणून आज हे शक्य झालं अन्यथा – राधाकृष्ण विखे पाटील

News34 chandrapur

अहमदनगर – मागील 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरणाच्या कार्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आज या प्रकल्पाचे उदघाटन होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राधाकृष्ण विखे पाटील फडणवीस यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या प्रकल्पाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.

 

कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले.

गेल्या ५३ वर्षापासून रखडलेला आणि ८ कोटीहून सुरू झालेला प्रकल्प आज ५ हजार कोटीवर गेला. पण तरीही या प्रकल्पाच्या सुधारीत खर्चाला मान्यता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आली होती.

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच निळवंडे धरणाच्या या महत्वपुर्ण प्रकल्पाला गती मिळाली. नाहीतर अजूनही १०-१५ वर्ष अजून हे काम झालेच नसते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *