Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. यापूर्वी आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे.

     

    करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले होते. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली होती. एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही.

     

    त्यातही नोंदणी मोबाईलवर आनलाईन करुन घेतांना नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून अजूनही हजार शेतकरी नोंदणी पासून वंचित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेत शेतकऱ्यांचे हजार अर्ज येऊन पडले असताना नोंदणी करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ ला संपत आहे. त्यामुळे हजार शेतकरी पुन्हा नोंदणी पासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी शेकडो शेतकरी बांधवांसमोर सांगितले.

     

    यासाठी नोंदणी साठी राहून गेलेले शेतकऱ्यांसाठी परत १५ दिवसाची मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघ, आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे सध्या देशी-विदेशी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

     

    ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंगस घरी बसल्या ऑन-लाईन करता येतात आणि त्यामुळे ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

     

    जवळपास २ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिध्द असलं तरी शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं, झाडं-वेली पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साज चढलाय. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांत पणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात.

  • चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धेचा ज्वर वाढवून वातावरण निर्मितीकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (दि.25) चंद्रपूर व बल्लारपूर या शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत नागरिकांनी स्वत:हून मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

     

    बाईक रॅलीला सुरवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाजे, दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपुर क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

     

    सदर रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. ही रॅली पुढे वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर, ब्राह्मणी फाटा या मार्गाने विसापूरपर्यंत पोहचली. तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील क्रीडा संकूलात असलेल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

     

    रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 3 हजार खेळाडू जिल्ह्यात दाखल होत आहे. वाघांच्या भुमीत येणा-या विविध राज्यातील खेळाडूंना जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची मोफत टायगर सफारी करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी विविध राज्यातील 336 खेळाडूंनी मोफत टायगर सफारीचा मनसोक्त आनंद लुटला.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटन समिती स्थापन करण्यात आली असून वनविभागाच्या वतीने खेळाडूंना मोफत टायगर सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोमवारी सकाळच्या सत्रात 169 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक तर दुपारच्या सत्रात 167 खेळाडू अशा एकूण 336 जणांना मोफत सफारी घडविण्यात आली.

     

    सकाळच्या सत्रात केंद्रीय विद्यालय संघटनचे 55 खेळाडू, महाराष्ट्राचे 63 आणि पश्चिम बंगालचे 51 तर दुपारच्या सत्रात हिमाचल प्रदेशचे 46 खेळाडू, पंजाब 65, जम्मू काश्मिर 41 आणि ओडीसाचे 15 अशा एकूण 336 खेळाडूंनी मोफत ताडोबा सफारीचा आनंद लुटला. यावेळी सर्व खेळाडूंना वनविभागाच्या वतीने वेलकम किट देण्यात आली. यात टी-शर्ट, कॅप, किचन, ताडोबा डायरी मॅगझीन व ताडोबाची माहिती पुस्तिकेचा समावेश होता. तसेच सर्वांना सकाळी उत्तम नाश्ता व दुपारी जेवण देण्यात आल्याचे वनविभागाने कळविले आहे.

     

  • चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशात अन् राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होतांना कायमच आपल्याला दिसते.अशातच शिवसेना ऊबाठा गटातील नेतृत्वावर विश्वास ठेवत चंद्रपुरात युवकांची मोठी फळी युवासेनेत प्रवेश करतानाचे चित्र दिसत आहे.

    चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे विक्रांत सहारे यांनी घेताच त्यांनी युवकांची मोठी फळी चंद्रपुरात तयार केली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात विक्रांत सहारे हे पक्ष संघटन बांधणीत आगेकूच करीत आहे.

     

    आज दिनांक २५ डिसेंबर २०२३ शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे व प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेनेचे शिवा मिलिंद वझरकर, शाहबाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांनी युवासेनेत प्रवेश केला.

    येत्या काळात चंद्रपुरात शिवसेनेच्या उबाठा गटाला युवकांच्या माध्यमातून बळ मिळतांना नक्कीच दिसेल.

  • चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.

     

    घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर.जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले. सदर वाघ ही मादी असून 1 वर्षाची आहे, शवविच्छेदन केल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या वतीने देण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर सर्व स्पष्ट होणार.

     

    मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

     

    दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू – पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात 14 नोव्हेम्बरला 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर 18 नोव्हेम्बरला ताडोबा नैसर्गिकरित्या मृत्यू, 10 डिसेंबर ला वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू, 14 डिसेंबर पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू, 21 डिसेंम्बरला विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला, 24 डिसेंबर ला शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली आज 25 डिसेंम्बरला सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला.

  • राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

    राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

    News34 chandrapur

    चंद्रपूर: राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय्य डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, २६ डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.

     

    या स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूरनगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण झाले असून नानाविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.

     

    देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण तयारी झाली आहे.

     

    २६ ते ३१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास ३ हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडावी यासाठी आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

     

    यासंदर्भात वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी आढावा घेऊन समायोजित निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुरूप स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

     

    अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा

    भव्य अशा ६७ वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते सलमान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर येथील क्रीडा संकुलमध्ये होणारी ही स्पर्धा यशस्वी व्हावी, अशी भावना अभिनेते सलमान खान यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशातून व्यक्त केली आहे. त्याचसोबत जयंत दुबळे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, रोहिणी राऊत ,माधुरी गुरनुले, ज्योती चव्हाण आंतरराष्ट्रीय धावपटू , सायली वाघमारे अथलेटिक्स परीक्षक यांनी देखील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

     

    थीम साँगला कैलाश खेर यांचे स्वर

    ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी आवाज दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज ही या थीम साँगची वैशिष्ट्ये ठरत आहेत.

     

    सूर्यनमस्कारातील मुद्रा, रंगबेरंगी भिंती, उड्डाणपूलावर रोषणाई

    ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डाणपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. जणू काही दिवाळी असल्यासारखे चंद्रपूर शहर सजविण्यात आले आहेत.

  • चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    News34 chandrapur

    चंद्रपूर / यवतमाळ – विकसीत व सामर्थ्यशाली भारत घडविण्याची ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात असल्याने ‘महाविजय 2024’ चे लक्ष्य गाठण्यासाठी व देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती सोपविण्यासाठी प्रत्येक बुथवर 50 टक्के मतदान हे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून सुपर वॉरीयर्सनी आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा अशी सुचना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र समन्वयक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.

     

    दि.23 डिसेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी पदाधिकारी व सुपर वॉरीयर्सना ते संबोधीत होते. सदर बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडीया, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, किशोर बावने, बंडु चांदेकर, संजय पिंपळशेंडे, मंगला धाकडे, ममता अवताडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे प्रभृती उपस्थित होते. यावेळी हंसराज अहीर यांनी ‘विकसित भारत रथ’ कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

     

    सुपर वॉरीयर्स तसेच बुथ संबंधात माहिती घेतली. पक्षीय कार्यकमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती घेतांनाच उपयुक्त सुचना केल्या. हंसराज अहीर यांनी आर्णी विधानसभा कोअर कमिटीची पांढरकवडा येथे बैठक घेवून संघटनात्मक कार्य तसेच प्रदेश भाजपाद्वारा दिलेल्या कार्यकमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्वांनी परिश्रमपुर्वक कार्य करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहचेल असे नियोजन करीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य करावे असे आवहन केले.

     

    यावेळी संतोष चिंतावार, आनंद वैद्य, किशोर देशट्टीवार, मदन जिड्डेवार, बंटी जुआरे, गुड्डू शुक्ला, विपिन राठोड मोहन कन्नाके, स्वप्नील मंगळे, बाळु हमंद, अॅड. मुत्तलवार, दयानंद सोयाम, दिलीप मुथा, शंकर समृतवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….

    चंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी –  ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात सकाळच्या सुमारास गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पट्टेदार वाघ मृत अवस्थेत पडला होता.

    सदर वाघ हा शिकारीच्या शोधात आला असून तो विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला.

     

    यावेळी तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार साहेब यांनी वनविभाग चमु घेऊन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी विहिरीत पडलेल्या वाघाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.

     

    सदर पट्टेदार वाघ हा नर असुन अंदाजे वय अडीच वर्षाचे आहे.यावेळी ब्रम्हपुरी वनविभाग चे प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक एस.डी.हजारे, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविदपुर क्षेत्रसहाय्यक आर.एस.गायकवाड, तळोधी चे क्षेत्र सहायक मने,नेरीचे क्षेत्रसहाय्यक रासेकर, वनरक्षक श्रीरामे,बंडू धोतरे एन.टि.सी.ए.,मानद वन्य जीवरक्षक विवेक करंबेळकर, पंकज माकोडे एन.जीओ.यश कायरकर, पशुवैद्यकीय डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ.ममता वानखेडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले.

     

    यावेळी तळोधी बा.पोलीस स्टेशन चे कर्मचारी वर्ग बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित होते.विहिरीत पडलेल्या वाघाला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती.सावरगांव येथील रोपवाटीका मध्ये मुत्यु पडलेल्या वाघाचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • अजून किती जीवतोडुन सांगणार?

    अजून किती जीवतोडुन सांगणार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नुकतीच ओबीसी परिषद पार पडली मात्र या परिषदेतून एका स्वयंघोषित व स्वतःला ओबीसी नेता म्हणणाऱ्याच्या अस्तित्वाची धडपड दिसून आली.

     

    मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, त्यानंतर ओबीसी समाज जागृत झाला, अनेकांनी विरोधही केला, यामध्ये जरांगे पाटील यांचा विरोध करणाऱ्यात अग्रेसर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राहिला.

     

    जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटनांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले, चंद्रपुरात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी स्वतःला ओबीसी नेते म्हणजेच स्वयंघोषित असलेल्यांनी हजेरी लावली, आंदोलनाच्या मध्ये हे ओबीसी नेते मंडपाजवळ सुद्धा भटकले नाही.

     

    यामुळे अनेक ओबीसी समाजातील नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, फक्त चमकोगिरी साठी ओबीसी चा वापर करायचा आता हेच काम या नेत्याला उरले आहे.

     

    ओबीसी परिषदेनंतर विविध ठराव घेण्यात आले होते, मात्र ते ठराव कुणी मांडले? कुणाचं कुणी अभिनंदन केले? ओबीसी प्रवर्गातील विविध प्रतिनिधी आले मात्र त्यांचं नाव कुठेही आले नाही, म्हणजेच ते नाव नसलेले प्रतिनिधी होते काय? कारण ओबीसी परिषदेच्या प्रेसनोट मध्ये फक्त एकंच नाव होतं, बाकी कोण आलं कोण गेलं याचा काही एक उल्लेख त्यामध्ये नव्हता हे विशेष.

     

    एकीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शासनजवळ आपली मागणी विविध माध्यमातून पोहचविताना दिसतो मात्र दुसरीकडे आपल्या प्रांगणाच्या आतून हे स्वयंघोषित ओबीसी नेते आपला आवाज चार भिंतीच्या आत वाजविण्याचे काम करीत असतात.

     

    चंद्रपुरातील या स्वयंघोषित ओबीसी नेत्याची वाहवा काही निवडक लोक करताना दिसून येतात, मात्र खरे ओबीसी आपल्या समाजासाठी धडपडत आहे, आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र होत आपली ताकद दाखवीत आहे मात्र ओबीसी मधील काही अपवाद वगळता आपण आपल्या समाजात कसे श्रेष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी हे स्वयंघोषित धडपडत आहे.

     

    ओबीसी परिषद झाली, ठराव मांडले, त्याची प्रत उपमुख्यमंत्री यांना दिली त्यावेळी फक्त एकच नेता ही परत देताना दिसला, म्हणजेच फक्त नावासाठी ओबीसी समाजाचा वापर करायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे, मात्र तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरीही खरे ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.